


मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण स्मृती राष्ट्रीय पुरस्कार’ गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेचे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना देण्यात आला.
Source link


Venus Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह सध्या मीन राशीत विराजमान असून तो १७ मार्च रोजी या राशीत अस्त होणार आहे असून त्याचा २३ मार्च रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी उदय होईल. शुक्राचा उदय काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल, काही राशींचे भाग्य चमकण्यास आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राची उदित अवस्था खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या कामातील अडथळे दूर होईल, प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. या राशीच्या व्यक्तींना या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
मकर
शुक्राची ही स्थिती मकर राशीसाठी लाभादायी ठरेल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्णत्वास येतील. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासही वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. केवळ कामात कोणताही हलगर्जीपणा करू नका. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही शुक्राची ही स्थिती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील प्रश्न सुटतील. कामाच्या ठिकाणी तुमचेच वर्चस्व असेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आरोग्य उत्तम राहिल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. अचानक धनलाभ होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)






रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने वर्षभराच्या कालावधीत दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा वनडेमधूनही निवृत्ती घेणार अशा जोरदार चर्चा सुरू होत्या. पण रोहित शर्माने विजयानंतर मी या फॉरमॅटमधून निवृत्त होत नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले. पण भविष्यातील त्याच्या प्लॅनबाबत त्याने मौन ठेवले आहे. पण तरीही रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत माजी खेळाडूंना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. यावर एबी डिव्हिलियर्सने उत्तर दिले आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग धरण्यामागचं कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माबाबत एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्टनुसार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्याबाबत योजनांची माहिती द्यावी असे बोर्डाने सांगितले होते, जेणेकरून त्या दृष्टीने संघबांधणी करता येईल. पण रोहितने निवृत्तीच्या चर्चांना नकार दिला असला तरी तो २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबाबत त्याने माहिती दिलेली नाही. कारण तोपर्यंत रोहित शर्मा ३९ वर्षांचा आहे.
आता एबी डिव्हिलियर्सने रोहित निवृत्त न होण्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्माने कोणत्याही प्रकारची टीका सहन करू नये, असे त्याचे मत आहे. रोहितने निवृत्ती का घ्यावी तो एक महान कर्णधार आहे. असे मत एबी डिव्हिलियर्सचे आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “रोहित शर्माकडे निवृत्तीचे कोणतेही कारण नाहीये. त्याने कोणतीही टीका सहन करण्याचे कोणतंही कारण नाही. त्याचे रेकॉर्डचं सर्व सांगतात. इतकंच नाही तर त्याने त्याचा खेळही बदलला आहे.”
पुढे डिव्हिलियर्स म्हणाला, “तो का निवृत्त होईल? केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणूनही त्याला अशा विक्रमासह पुढे खेळायला आवडेल. अंतिम सामन्यात ७६ धावा करून त्याने भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि संघाच्या यशाचा पाया रचला आणि जेव्हा संघ दबावात तेव्हाही त्याने आघाडी घेत नेतृत्व केले.”
रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून कामगिरीबद्दल सांगताना तो म्हणाला, “इतर कर्णधारांच्या तुलनेत रोहित शर्माच्या विजयाची टक्केवारी पाहिली तर ती जवळपास ७४ टक्के आहे, जी यापूर्वी होऊन गेलेल्या कोणत्याही कर्णधारापेक्षा जास्त आहे. तो असाच पुढे जात राहिला तर तो आतापर्यंतचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध होईल. रोहित शर्मा स्वत:देखील म्हणाला की तो निवृत्त होत नाहीये आणि अशा अफवा पसरवू नये असे त्याने सांगितले आहे.”