


पुणे : वाचनप्रसारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रंथालीने गेल्या पाच दशकांमध्ये ग्रंथयात्रा, ग्रंथमोहोळ, ग्रंथएल्गार, बहुजन साहित्य यात्रा, विपुल ग्रंथयात्रा, विजय तेंडुलकर संवादयात्रा असे विविध उपक्रम राबविले. या वाटचालीत अनेक जण सहभागी होत गेले. नवविचारांची, नवलेखकांची पुस्तके ग्रंथालीने प्रसिद्ध केली. त्यामध्ये बहुजनांच्या दुःखाचा हुंकार होता. विविध विषय नव्याने पुढे येत होते, नवे लेखक घडत होते. त्याचवेळी ग्रंथाली सामाजिक-सांस्कृतिक भान राखत जगण्याच्या सर्वांगांना भिडणाऱ्या कलांचे व्यासपीठ झाली. अशा ‘ग्रंथाली’ चळवळीच्या अर्धशतक पूर्तीची शुक्रवारपासून (४ एप्रिल) तीन दिवसीय विविध कार्यक्रमांनी सांगता होणार आहे. सांगीतिक मैफल आणि जन्मशताब्दी स्मृतिजागर असे या महोत्सवाचे स्वरूप आहे.
संवाद, पुणे, महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे महापालिकेच्या सहकार्याने ४ एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ गायिका डाॅ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या गायनाने सांगता समारंभाची नांदी होणार आहे. या मैफलीमध्ये विजयराज बोधनकर व्यक्तिचित्र रेखाटन करणार आहेत. जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य आणि व्यक्तित्त्व उलगडणारा कार्यक्रम शनिवारी (५ एप्रिल) ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे दुपारी तीन वाजता, तर, विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम रविवारी (६ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. रामदास भटकळ, कुमार केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या या कार्यक्रमाच्या संहिता राजीव नाईक आणि मोनिका गजेंद्रगडकर यांनी लिहिल्या आहेत. यानिमित्ताने ग्रंथप्रदर्शन आणि सवलतीत विक्री होणार आहे.
प्रत्येक साहित्यिकावर निर्मित लघुचित्रफितीचे लेखन आणि संपादन राजीव जोशी यांनी केले आहे. कार्यक्रमामध्ये अभिवाचन, पुस्तिका प्रकाशन, नाट्यप्रवेश असेल. मराठी रंगभूमी, चित्रपट-मालिकांतील कलाकार या साहित्याचा आविष्कार आपल्या वाचिक अभिनयातून चित्रदर्शी साकार करतील. चंद्रकांत काळे, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, प्रमोद पवार, स्वाती चिटणीस, शैलेश दातार, प्राजक्त देशमुख, ऐश्वर्या नारकर, रजनी वेलणकर, मधुरा वेलणकर-साटम, पुष्कर श्रोत्री, अनिता दाते, अभिजित खांडकेकर, गौतमी देशपांडे, पूर्वा पवार, मोहित वैद्य, विशाख म्हामणकर आणि मोनिका गजेंद्रगडकर असे कलावंत यात सहभागी होत आहेत.
४ एप्रिल – सुनील महाजन (मो. क्र. ९३७१०१०४३२)
५ आणि ६ एप्रिल – राजेश देशमुख (मो. क्र. ८६९८५८०७३९), आर्या करंगुटकर (मो. क्र. ९००४९४९६५६), धनश्री धारप (मो. क्र. ९२२३४६६८६०)
कार्यक्रमाच्या प्रवेशिका १ एप्रिलपासून उपलब्ध होतील.

भारताने संरक्षण क्षेत्रात 627000000000 रुपयांची सर्वात मोठी डील केली आहे. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होणार आहे.
Source link

ग्वालियरच्या अमित कुमार सेनला आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरांपासून जीवाला धोका निर्माण होण्याची भीती वाटत आहे. पत्नीचे अनेक प्रियकर असून, एकासह ती लिव्ह-इनमध्ये राहत आहे असा त्याचा आरोप आहे.
Source link

Top 5 Best Selling Electric Scooters in February 2025 : इलेक्ट्रिक स्कूटर्स बनवणाऱ्या कंपन्यांसाठी फेब्रुवारी २०२५ हा महिना उत्तम होता. या महिन्यात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री वाढली आहे. विशेष म्हणजे या महिन्यात बजाज ऑटोने मोठी मुसंडी मारली आहे. बजाजने ओला, टीव्हीएस, अॅथरसह अनेक इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांना मागे टाकत सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्स विकण्याचा विक्रम केला आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बाजारात बजाजने मोठी हिस्सेदारी मिळवली आहे.
भारतीय वाहन बाजारात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्टूकर्स विक्रीच्या बाबतीत टीव्हीएस मोटर ही कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. अॅथर तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर, ओला व ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक या दोन कंपन्या अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.
बजाज ऑटोने गेल्या काही महिन्यांत बाजारातील आपली स्थिती सुधारली आहे. जानेवारी महिन्यात गमावलेलं बाजारातील पहिलं स्थान फेब्रुवारी महिन्यात कंपनीने परत मिळवलं आहे. फेब्रुवारी महिन्यात बजाजने त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर्सचे २१,३८९ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये ०.३७ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ८१.८२ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने बजाज चेतकचे २१,३१० युनिट्स विकले होते. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे ११,७६४ युनिट्स विकले होते.
टीव्हीएस मोटरने गेल्या महिन्यातील बाजारातील आपलं पहिलं स्थान गमावलं आहे. जानेवारी महिन्यात ही कंपनी पहिल्या स्थानी होती, तर फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या स्थानी घसरली आहे. फेब्रुवारी महिन्यात टीव्हीएसने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे १८,७६२ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये २१ टक्के घट झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल २८.१६ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटर्सचे २३,८०९ युनिट्स विकले होते. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटरचे १४,६३९ युनिट्स विकले होते.
एफएडीएच्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात अॅथर एनर्जीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ११,८०७ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये ८ टक्के घट झाली आहे. तर, गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल २९.८० टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने अॅथर इलेक्ट्रिक स्कूटरचे १२,९०६ युनिट्स विकले होते. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे १०,००० युनिट्स विकले होते.
ओला इलेक्ट्रिकने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ८,६४७ युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये ५४.४७ टक्के घट झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ७४.६१ टक्के घट झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने ओला इलेक्ट्रिकचे २४,३३६ युनिट्स विकले होते.
ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ३,७०० युनिट्स विकले आहेत. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यामध्ये २.४६ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या (२०२५) फेब्रुवारी महिन्यातील विक्रीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ४८.७१ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने ३,६११ इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या होत्या. तर, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात १,४८८ इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली होती.


फलटण – महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त भीम फेस्टिव्हल 2025 अंतर्गत ‘जल्लोष भीम गीतांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक युवा उद्योजक संग्राम अहिवळे आणि सोनू संग्राम अहिवळे यांनी ही माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील. तसेच, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) सुनिल आनंदराव जाधव, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस् फलटणचे चेअरमन श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर आणि समाजकल्याण निरीक्षक दत्ता म्हस्के यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शक गणेश दुबळे यांच्या ‘चवदार तळाचा सत्याग्रह’ या ऐतिहासिक नाटिकेचा प्रयोग सादर होणार आहे. तसेच, उच्चशिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव’ समारंभ, ‘दर्पण पुरस्कार’ प्राप्त पत्रकारांचा सन्मान आणि सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध भीम गीत गायिका कडुबाई खरात यांचा विशेष सादरीकरण असणार आहे. त्यांच्या जोडीला आंबेडकरी प्रभावशाली रील स्टार तृप्ती बोरकर, ‘फॅन झालो ग स्वाभिमानाने जय भीम’ फेम ऋतिक गंगावणे, तसेच भीम गायिका प्रज्ञा कांबळे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
सनी अहिवळे (माजी नगरसेवक) आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश काकडे (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच, रोहित माने, गणेश बिराडे, सिद्धार्थ अहिवळे, विकी काकडे, आदित्य साबळे, विशाल गुंजाळ, मुकुल अहिवळे, रवी मोरे, तेजस भोसले हे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, प्रत्येकजण त्यांच्या आरोग्याबद्दल चिंतित आहे. यामुळे रोग होण्याची शक्यता वाढते आणि अनेकांसाठी शारीरिक तंदुरुस्ती राखणे खूप कठीण होते. यासाठी लोक आपला आरोग्य ठेवा ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. काही लोक जिम मध्ये जातात, काही लोक हेल्दी डाएट घेतात, तर काही औषधे घेतात. परंतु, आजकाल लोक परत प्राचीन आणि नैतिक पद्धतींच्या कडे परत वळत आहेत.
याच संदर्भात पतंजली आयुर्वेद देखील लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बালकृष्ण यांनी सुरू केलेले पतंजली आयुर्वेद, त्यांच्या आयुर्वेदिक उत्पादने आणि उपचाराद्वारे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करत आहे.
पतंजली आयुर्वेदाचे मानणे आहे की, त्यांचे सर्व उत्पादने नैतिक घटकांपासून बनवले जातात, जसे की जडी-बुटी, आंवला, अश्वगंधा, शहद इत्यादी. या घटकांमुळे आपल्याला शरीराची शक्ती मिळते आणि ते शरीराला मजबूत बनवते. याव्यतिरिक्त, कंपनीचा उद्देश असा आहे की, केमिकल्सपासून मुक्त उत्पादने वापरून लोकांचे आरोग्य राखले जावे, ज्यामुळे कोणताही साइड इफेक्ट आणि तणाव न होता लोक चांगले आणि निरोगी राहू शकतात.
कंपनीचा विश्वास आहे की पतंजलीच्या सर्व उत्पादने पर्यावरणास अनुकूल आहेत. हे उत्पादने नैतिक आणि निसर्गपूरक घटकांपासून बनवले जातात, ज्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होऊ नये. तसेच, योग आणि ध्यानाच्या पद्धतींना आयुर्वेदिक उपचारांसोबत जोडून शरीर आणि मनामध्ये योग्य संतुलन ठेवता येते.
आजच्या काळात आयुर्वेदिक उत्पादने आरोग्य क्षेत्रात एक मोठा प्रभाव पाडत आहेत. हे फक्त भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय होत आहेत. लोक आता नैतिक आणि सुरक्षित पद्धतींनी त्यांचे आरोग्य सुधारू इच्छित आहेत, त्यामुळे यांची मागणी वेगाने वाढत आहे. याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आयुर्वेदिक उद्योग देखील खूप वेगाने वाढत आहे. पतंजली आयुर्वेदिक उत्पादने लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असून, त्यांना निरोगी आणि नैतिक जीवन जगण्यास मदत करत आहेत.
(Disclaimer – This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)

चीनमधील विवाह दरात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. ही सध्या देशात एक मोठी समस्या ठरत आहे. २०२४ मध्ये देशभरात ६.१ दशलक्ष विवाहांची नोंदणी झाली. २०२३ मध्ये हा आकडा ७.७ दशलक्ष होता. या घसरणीमुळे चीनचे राष्ट्रीय राजकीय सल्लागार चेन सोंग्शी यांनी कायदेशीर विवाहाचे वय २२ वरून १८ करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला आहे. चीनमधील विवाह दर घसरला आहे आणि त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यात वाढता आर्थिक दबाव, विवाहाबद्दलचा सामाजिक दृष्टिकोन व उच्च शिक्षणाचा स्तर यांचा समावेश आहे. त्यातच चीनमध्ये वधू खरेदीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. वधू खरेदी करण्याचा नेमका प्रकार काय आहे? लग्नासाठी देशातील महिलांना सोडून विदेशी महिलांना का प्राधान्य दिले जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
चीनमधील शहरात राहणाऱ्या महिलांचा सामाजिक दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. त्यांचा दृष्टिकोन लग्न आणि मूल जन्माला घालणे एवढाच मर्यादित राहिलेला नाही. महिलांना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. दुसरीकडे वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे अनेक तरुणांसाठी लग्न करणे परवडणारे राहिलेले नाही. तसेच चीनमध्ये बऱ्याच काळापासून स्त्री आणि पुरुषांच्या संख्येत असमतोल असल्याचे चित्र आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला चीनमध्ये जन्मदर १०० मुलींमागे १२१ मुले, असा होता. त्यावेळी काही राज्यांमध्ये हा दर १०० मुलींमागे १३० पेक्षा जास्त मुले, असा होता.
१९८० च्या दशकात जन्मलेल्यांमध्ये लिंग असमतोल स्पष्टपणे दिसून येतो. १९८० च्या दशकाच्या मध्यापासून अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि त्यामुळे पालकांना गर्भात मुलगी आहे की मुलगा, हे कळू लागले. त्यामुळे अनेकांकडून मुलगी असल्यास गर्भधारणा थांबवण्यात आली. चीनमध्ये अविवाहित पुरुषांना ‘लेफ्टओव्हर मॅन’ (चिनी भाषेत शेंगनान शिदाई), असे संबोधले जाते. हा एक इंटरनेटवरील शब्द आहे, जो २०२० ते २०५० मधील कालावधीचा संदर्भ देतो. या काळात तब्बल ३० ते ५० दशलक्ष चिनी पुरुषांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु, यातून निर्माण झालेला प्रश्न असा आहे की, यातील बरेच पुरुष लग्न करू इच्छितात. परंतु, जोडीदार न मिळाल्याने काही चिनी पुरुष विदेशी वधूंना खरेदी करण्याकडे वळले आहेत. या वधूंच्या वाढत्या मागणीमुळे बेकायदा विवाहांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागात त्यांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आग्नेय आशियातल्या शेजारील देशांमधून चीनमध्ये तस्करी केलेल्या मुली आणि महिलांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये म्यानमारहून चीनमध्ये होणाऱ्या वधूंच्या तस्करीबद्दल प्रसिद्ध झालेल्या ‘ह्युमन राईट्स वॉच’च्या अहवालानुसार, “एक सीमा आणि दोन्ही बाजूंच्या कायदा अंमलबजावणी संस्थांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अभाव यामुळे असे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणामुळे तस्करांचा व्यवसाय वाढत आहे आणि त्यांची भरभराट होत आहे”. चीन सरकारने आता या उद्योगावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मार्च २०२४ मध्ये चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने महिला व मुलींच्या आंतरराष्ट्रीय तस्करीविरुद्ध मोहीम सुरू केली आणि हे गुन्हे संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले.
विदेशी महिलांचे चिनी पुरुषांशी केले जाणारे विवाह व्यावसायिक एजन्सींद्वारे केले जातात. ते चीनच्या राज्य परिषदेनुसार बेकायदा आहेत. शेजारच्या देशांमधील महिला आणि मुलींना बहुतांशी दलालांकडून चीनमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन देऊन फसवले जाते. चीनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना अशी आश्वासने दिली जातात आणि मग त्यांना चिनी पुरुषांना ३,००० डॉलर्स ते १३,००० डॉलर्समध्ये विकले जाते. चीनमध्ये सीमापार बेकायदा विवाहांचे प्रमाण निश्चित करणे आव्हानात्मक आहे. कारण- याचे स्वरूप गुप्त आहे.
ब्रिटनच्या गृह कार्यालयाच्या अलीकडील आकडेवारीवरून असेही दिसून येते की, व्हिएतनामधील मानवी तस्करीला बळी गेलेल्यांपैकी ७५ टक्के लोकांची चीनमध्ये तस्करी करण्यात आली होती. त्यामध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण ९० टक्के आहे. २०२२ मधील पुरस्कार विजेता माहितीपट ‘द वूमन फ्रॉम म्यानमार’ याच विषयावर आधारित होता. त्यात तस्करीद्वारे चीनमध्ये लग्नासाठी विकल्या गेलेल्या एका म्यानमारमधील महिलेची कहाणी दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात तस्करी करण्यात आलेल्या वधूंचे वास्तव दाखवण्यात आले आहे. या माहितीपटात महिलांना छळाचा कसा सामना करावा लागतोय आणि त्यांना वस्तू म्हणून कसे वागवले जात आहे, हे दाखवण्यात आले आहे. या माहितीपटात दाखविण्यात आलेल्या तस्करीत अडकलेल्या लॅरी या महिलेने स्पष्ट केले की, जोवर मी मुलांना जन्म घालू शकते, तोवर मी जिवंत आहे.
चीनमधील विवाह संकटाचे देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय भविष्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. वाढत जाणारी वृद्ध लोकसंख्या हे चिनी आर्थिक वाढ आणि सामाजिक स्थिरतेसाठी सर्वांत मोठे आव्हान असल्याचे मानले जाते. आर्थिक वाढीच्या बाबतीत कामगार शक्ती महत्त्वाची आहे; परंतु चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स सल्लागार मंडळाचे सदस्य जस्टिन लिन यिफू यांचे सांगणे आहे की, कामगार हे सर्वांत महत्त्वाचे आहेत; मात्र देशात त्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.
देशातील पुरुष मोठ्या संख्येने अविवाहित आहेत. त्यामुळे सामाजिक स्थिरतेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अभ्यासात असे आढळून आले आहे की, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष-महिला लिंग गुणोत्तर आणि गुन्हेगारी दर आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, चीनमध्ये १९९० च्या दशकाच्या मध्यापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे.अविवाहित पुरुष असल्याने हा आकडा १४ टक्क्यांनी वाढला आहे. चीनमधील अविवाहित पुरुष कोणाशी लग्न करतील, हा प्रश्न देशासाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. सरकार याबाबत नक्की काय पावले उचलणार यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे.

‘अतुल तोडणकर’ आणि ‘अद्वैत दादरकर’ उघडले स्वर्गाचे दारच्या प्रवेशातून अतुल परचुरे ह्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.