Sunday, June 28, 2026
Home Blog Page 46

फलटणमध्ये सामाजिक नेतृत्व हरपले : चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे दुःखद निधन

0
फलटणमध्ये सामाजिक नेतृत्व हरपले : चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे दुःखद निधन

फलटण :- फलटणमध्ये सामाजिक नेतृत्व हरपले : चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे दुःखद निधन
फलटण शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते तथा विठ्ठल मंदिर ट्रस्ट, फलटणचे सन्माननीय माजी सदस्य चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच फलटण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मनमिळाऊ, हसतमुख आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात ते नेहमी सहभागी होत असत. राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती.
त्यांच्या जाण्याने फलटण शहराने एक सामाजिक नेतृत्व गमावले असून सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ९ वाजता स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना.

साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची रणनीती; भाजपला ‘चेकमेट’ देण्याची तयारी?

0
साताऱ्यात शिवसेना–राष्ट्रवादीची रणनीती; भाजपला ‘चेकमेट’ देण्याची तयारी?

फलटण | सातारा जिल्ह्याची राजकीय संस्कृती सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक राहिली असून जिल्ह्याचे नेतृत्व स्थानिक आणि विकासाभिमुख विचारांच्या हाती राहणे आवश्यक आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय जिल्ह्याच्या हिताचा ठरेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात भाजपचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी आणि स्थानिक नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, पालकमंत्री शंभूराजे देसाई, कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एकत्रितपणे घेतलेला निर्णय सातारा जिल्ह्यासाठी “माईलस्टोन” ठरेल.
सातारा जिल्हा हा पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा म्हणून ओळखला जातो. ‘यशवंत विचार’ टिकवून ठेवण्यासाठी आणि विकासाच्या राजकारणाला चालना देण्यासाठी या तिन्ही नेत्यांची एकजूट निर्णायक ठरेल, असेही मोरे यांनी नमूद केले. जिल्ह्यात पुन्हा “राम-राज्य” प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपला ‘चेकमेट’ देण्यासाठी गुप्त रणनीती?
दरम्यान, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या एका चर्चेला जोर आला आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात नुकत्याच काही ‘गुप्त बैठका’ झाल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकींचा मुख्य अजेंडा जिल्हा परिषदेच्या सत्तेतून भाजपला दूर ठेवणे आणि शिवसेना–राष्ट्रवादीचा संयुक्त अध्यक्ष निवडणे हा असल्याची चर्चा राजकीय पातळीवर रंगत आहे. तसेच या राजकीय समीकरणाला ठाण्यातूनही ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण नव्या वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात या युतीची अधिकृत घोषणा आणि त्यानंतरच्या राजकीय हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नंदकुमार मोरे (सामाजिक कार्यकर्ते)

नानासो मोहिते यांचा मनमानी कारभार?आयु. महावीर भालेराव यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ फलटण तालुका कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

0
नानासो मोहिते यांचा मनमानी कारभार?आयु. महावीर भालेराव यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ फलटण तालुका कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

नानासो मोहिते यांचा मनमानी कारभार?
आयु. महावीर भालेराव यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ फलटण तालुका कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

फलटण (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात फलटण तालुका कार्यकारिणीने सामूहिक राजीनामा देत जिल्हा नेतृत्वाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हा पूर्व चे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते यांनी केलेली कारवाई ही वैयक्तिक द्वेषातून व मनमानी पद्धतीने पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
गेल्या वीस वर्षांपासून तन-मन-धनाने संघटनेसाठी कार्यरत असलेल्या आयु. महावीर भालेराव यांना कोणतीही पूर्वसूचना न देता निलंबित करण्यात आले आहे. निर्णय घेण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घेणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक संवाद टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे निलंबनाचे पत्र येण्यापूर्वीच भालेराव यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी चूक होणार नसल्याचे स्पष्ट केले होते, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भालेराव यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी स्वतःला संघटनेचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कोणतेही मत मांडले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. किंवा त्यांनी आंबेडकर समाजाला उद्देशून आव्हान केले नव्हते.तसेच कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या प्रचाराचे आवाहन केले नसल्याचा दावा ही करण्यात आला आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्यात आवश्यक तो समन्वय न झाल्यानेच गैरसमज निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष या नात्याने नानासो मोहिते यांनी दोन्ही संघटनांमध्ये अधिकृत बैठक घेणे अपेक्षित होते. ते न करता कारवाई करण्यात आली, हा गंभीर प्रश्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

फलटण तालुक्यात ‘BSI मिशन-25’ अंतर्गत इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक सक्रिय कामगिरी झाल्याचा दावा कार्यकारिणीने केला आहे. अशा परिस्थितीत अध्यक्षांवरच कारवाई करणे हे अन्यायकारक असल्याचा सूर व्यक्त झाला.

पिंपरद (ता. फलटण) येथे फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासो मोहिते यांनी ग्राम शाखा स्थापन केली. त्या शाखेच्या उद्घाटनाला ते स्वतः व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्या ग्रामशाखेतील पदाधिकाऱ्यांनी उघडपणे भाजप सारख्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने दुहेरी निकष लावले जात असल्याची टीका करण्यात आली आहे.
तसेच खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष आयु. यशवंत खुंटे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख करत, त्यांच्यावरील कथित राजकीय सहभागाबाबत केलेली कारवाई योग्य असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र दोन्हीही अध्यक्षांवरील कारवाईची पार्श्वभूमी वेगळी आहे. असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

१२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वच्या पदाधिकाऱ्यांची आभासी बैठकीत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी भालेराव यांना प्रत्यक्ष बोलावून समज देण्याचा पर्याय सुचवला होता. त्यावर एकमत ही झाले होते. मात्र, त्या मतांना धुडकावून जिल्हा अध्यक्षांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवर चुकीची माहिती देऊन निलंबनाची कारवाई रेटून नेल्याचा गंभीर आरोपही कार्यकारिणीने केला आहे.

या पार्श्वभूमीवर फलटण तालुका कार्यकारिणीने सामूहिक राजीनामा जाहीर करत निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. नानासो मोहिते स्वतः हॉटेल व्यवसायिक असून असल्याने धम्माच्या कामाला हवा तेवढा वेळ ते देऊ शकत नाहीत. तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका सोडून ते इतर कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत.

राज्याने व केंद्राने या गोष्टीची तातडीने दखल घेऊन भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व च्या कार्यक्रमांना वेळ देणारा व सर्वांना घेऊन नेतृत्व करणारा जिल्हाध्यक्ष निवडावा. यासंबंधी राज्य व केंद्रीय नेतृत्वाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा सातारा जिल्हा पूर्वचे धार्मिक व सामाजिक काम ठप्प होईल असे तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये फलटण तालुका शाखेचे सरचिटणीस बाबासाहेब जगताप सर , कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संस्कार सचिव बजरंग गायकवाड, संघटक विनोद भोसले, प्रशांत सोनवणे, विशाल काकडे, अतुल मोरे, संरक्षण विभाग शुभम अहिवळे, प्रचार पर्यटन सचिव राजेंद्र गायकवाड, हिशोब तपासणीस सतीश कांबळे, प्रचार व पर्यटन सचिव अमोल भोसले, संरक्षण सचिव चंद्रशेखर मोरे या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

0
भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र व केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या BSI मिशन 25 अंतर्गत सर्व महापुरुष व महामातांना अभिवादन करण्याचा उपक्रम सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाला आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. स्वराज्य, समता, न्याय आणि स्वाभिमान या मूल्यांची जपणूक करणे हीच शिवरायांना खरी आदरांजली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास आयु. महावीर भालेराव, आयु. बाबासाहेब जगताप, आयु. बजरंग गायकवाड, आयु. आनंद जगताप, आयु. स्वप्निल गायकवाड, आयु. चंद्रकांत मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला असून सन २०२६ मध्ये त्यांची ३९६ वी जयंती साजरी होत आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे शिवाजी महाराज हे शूर, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी शासक होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला

जयकुमार गोरे हे मोठे आणि दिग्गज मंत्री… त्यांच्याबाबत बोलताना भीती वाटते : शंभूराज देसाई

0


सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर सत्ता नेमकी कोणाची येणार यावरून सस्पेन्स कायम आहे. काहीही झालं तरी भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते.  शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर खोचक टीका करत ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री ते आहेत.त्यांच्या वक्तव्यावर बोलताना आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही बोलत नाही कारण लगेच त्यांच्याकडून दुसरा पालकमंत्री नेमला जातो, असं म्हटलं आहे.

शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी तुम्ही दुसरा ग्रामविकास मंत्री नेमू शकता असा प्रश्न विचारल्यावर मला तो अधिकार नाही मात्र जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत, अशी खोचक टीका मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली आहे.

चमत्कार करायचा नाही पण चमत्कार करावा लागल्यास करु: जयकुमार गोरे

सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सर्वात जास्त 27 सदस्य निवडून आले असून एक अपक्ष आमच्या सोबत आलेला आहे, अशा परिस्थितीत सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये म्हटलं होतं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ मात्र तसे न घडल्यास चमत्कार करायची इच्छा नाही पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असं जयकुमार गोरे यांनी आज म्हटलं.  

दरम्यान, साताऱ्यात भाजपाला बाजूला ठेवून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शंभराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एकनाथ शिंदे यांची नंदनवदन या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. 

सातारा जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी 27 जागा जिंकल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. सातारा जिल्हा परिषदेतील बहुमताचा आकडा पार करण्या इतकं संख्याबळ दोन्ही पक्षांकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 आणि शिवसेनेनं 16 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमदेवार देखील विजयी झाला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संख्या बळ 37 पर्यंत पोहोचतं आहे. 

सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65

भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस :20
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीचा रंजक इतिहास, 3 वर्षांपूर्वीपर्यंत जयंती साजरी करण्यावर होती बंद

0
आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीचा रंजक इतिहास, 3 वर्षांपूर्वीपर्यंत जयंती साजरी करण्यावर होती बंद


Manali Sagvekar

सध्या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी ‘सकाळ मीडिया’ ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ – एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, ‘साम टीव्ही मराठी’मध्ये (जुलै २०२५ – सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

…Read More





Source link

किडनीच्या समस्यांचा थेट संबंध मेंदूच्या आरोग्याशी! संशोधकांनी सांगितले कारण

0
किडनीच्या समस्यांचा थेट संबंध मेंदूच्या आरोग्याशी! संशोधकांनी सांगितले कारण


Chronic Kidney Disease Can Affect On Brain Health: किडनीचे आरोग्य हे फक्त शारीरिक आरोग्याशी संबंधित आहे असे मानले जाते. पण तुम्ही हे जाणून थक्क व्हाल, एका संशोधनातून असे समोर आले आहे की किडनीच्या समस्यांचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावरही होतो. ‘द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल एसोसिएशन नेटवर्क ओपन’ या अधिकृत वेबसाईटवरील एका संशोधनानुसार, क्रॉनिक किडनीचा आजार जसजसा वाढत जातो, तसतशी बौद्धिक क्षमताही कमकुवत होत जाते. या समस्येला सामोरे जात असलेल्या व्यक्तींना कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत करणे कठीण जाते. योग्यवेळी काळजी न घेतल्यास ही समस्या पुढे गंभीर स्वरूप घेऊ शकते. 

Add Zee News as a Preferred Source

 

क्रॉनिक किडनीची सुरूवातीची लक्षणे कोणती? 

क्रॉनिक किडनी हा मूत्रपिंडाचा एक गंभीर आजार आहे. या स्थितीत मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू मंदावते आणि ते कायमचे निकामी होण्याची शक्यता असते. याची मुख्य कारणे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूतखडा ही आहेत. लघवीमध्ये बदल दिसणे, शरीरावर सूज येणे, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, त्वचेला खाज येणे आणि कोरडेपणा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होऊन धाप लागणे ही काही सुरुवातीची लक्षणे या आजारात दिसून येतात. तसेच मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा विषारी घटकांमुळे कामात लक्ष न लागणे, विसरभोळापण किंवा चक्कर येणे अशा समस्या जाणवतात. 

 

संशोधनातून काय समोर आले? 

क्रॉनिक किडनीच्या आजाराचा मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याबाबत संशोधन करण्यासाठी टुलेन विद्यापीठ आणि अमेरिकेतली इतर संस्थांमधील संशोधकांनी एक तपासणी केली. ज्यामध्ये त्यांनी 21 ते 79 वयोगटातील 5.600 पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश होता. सर्वप्रथम संशोधकांनी या व्यक्तींच्या रक्ताचे आणि मुत्राच्या नमून्यांची चाचणी केली आणि 6 वर्षांपर्यंत त्यांच्या बौद्धिक कार्य क्षमतेचे मूल्यांकन केले. या संशोधनातून असे दिसून आले की, क्रॉनिक किडनी या आजारामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढू शकतो. याच वाढत्या रक्तदाबामुळे रुग्णांची बौद्धिक क्षमता कमकुवत होऊ शकते. 

उच्च रक्तदाब ठरते मेंदूच्या समस्यांचे कारण? 

शरीरातील किडनी आणि मेंदू हे दोन्ही वेगवेगळे अवयव असले तरी, ते रक्तवाहिन्यांनी जोडलेले असतात. रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे किडनीचे रक्त शुद्ध करण्याचे कार्य मंदावते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण निर्माण होऊन त्या आकुंचन पावतात किंवा फुटतात, मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. उच्च रक्तदाबामुळे मेंदूच्या अगजी लहान रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते. यामुळे मेंदूच्या आत लहान-लहान सायलेंट स्ट्रोक येत असतात. यामुळे मेंदूचा जो भाग स्मरणशक्ती, तर्कशास्त्र आणि निर्णयक्षमतेसाठी जबाबदार असतोस, तो भाग हळूहळू कमकुवत होऊ लागतो. आणि मेंदूच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!

0
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!


साहस Times : छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य जितके पराक्रमाने उजळलेले आहे, तितकेच ते सामाजिक जाणिवांनी समृद्ध आहे. विविध अभ्यासकांनी, लेखकांनी आणि शाहिरांनी शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या अंगांनी समजून घेतले. परंतु एक गोष्ट समान दिसते: शिवराय म्हणजे जनतेचा, न्यायाचा आणि स्वाभिमानाचा राजा.
३९५ किल्ले जिंकूनही अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारे विज्ञाननिष्ठ राजे…
बारा बलुतेदार व अठरापगड जातींना स्वराज्यात सन्मानाचे स्थान देणारे…
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे जाणते राजे – छत्रपती शिवाजी महाराज!
शेतकऱ्यांच्या देठालाही धक्का न लावण्याची कठोर आज्ञा देणारे,
बिगर व्याजी कर्ज देऊन शेतकऱ्यांचा आधार बनणारे,
सर्व धर्मांना समान आदर देणारे धर्मनिरपेक्ष शासक…
गनिमी काव्याच्या तंत्राने गनिमांना घाम फोडणारे रणधुरंधर,
अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधणारे दूरदर्शी नेतृत्व!
शिवजयंती साजरी करण्याची परंपरा सुरू करणाऱ्या थोर व्यक्तींना मानाचा मुजरा!

चिकित्सक इतिहासदृष्टी : संघर्ष धर्माविरुद्ध नव्हे, अन्यायाविरुद्ध
गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या ग्रंथातून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला धार्मिक द्वेषाच्या चौकटीत बसवण्याचा विरोध केला. त्यांच्या मांडणीत शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव जपणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे शासक होते.
पानसरे दस्तऐवजांच्या आधारे दाखवतात की शिवाजींच्या फौजेत मुस्लीम सरदार होते, आरमारात दौलतखान, सिद्दी इब्राहिम यांसारख्या अधिकाऱ्यांना स्थान होते, आणि मशिदी किंवा धार्मिक स्थळांचे रक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. यावरून त्यांचा संघर्ष ‘धर्म’ नव्हे तर ‘दडपशाही’विरुद्ध होता, हे स्पष्ट होते.
प्रशासन, संघटन आणि राष्ट्रनिर्मिती
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि जयसिंगराव पवार यांनी बखरी, पत्रव्यवहार, फारशी कागदपत्रे आणि दप्तरांचा आधार घेत शिवाजी महाराजांचे प्रशासन उलगडले आहे. त्यांच्या अभ्यासातून काही ठळक बाबी समोर येतात. त्या म्हणजे स्वराज्याची महसूल पद्धती शिस्तबद्ध आणि लेखी पुराव्यांवर आधारित होती. किल्लेव्यवस्था ही केवळ लष्करी नव्हे तर प्रशासनिक केंद्रे होती. गनिमी कावा हा अनियंत्रित हल्ला नसून नियोजनबद्ध रणतंत्र होता.
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात असे.

जयसिंगराव पवार यांच्या मते, शिवाजी महाराज हे “मध्ययुगीन भारतातील राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरू करणारे नेते” होते. म्हणजेच त्यांचे स्वराज्य हे केवळ भूभाग जिंकण्यापुरते नव्हते; ते संघटित शासन उभारण्याचा प्रयत्न होता. जयसिंगराव पवार
“शिवाजी महाराज हे मध्ययुगीन भारतातील एक अद्वितीय राष्ट्रनिर्माते होते.”असे म्हणतात.
“त्यांनी स्वराज्य ही संकल्पना व्यवहारात आणली.”
जयसिंगराव पवार यांनी शिवाजी महाराजांच्या प्रशासन, किल्लेव्यवस्था आणि महसूल पद्धतीचे तपशीलवार विश्लेषण केले आहे.
बहुजन स्वाभिमानाचा राजा
प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीय चौकटीत अडकवण्याचा निषेध केला. त्यांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकाच्या लेखनात छत्रपती शिवाजी हे बहुजन समाजाच्या कष्टातून उभा राहिलेला नेता आहे असे मांडले आहे. ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामागे मावळ्यांचे श्रम, शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि सर्वसामान्यांचा विश्वास होता. प्रबोधनकार ठाकरे
“शिवाजी हा बहुजनांचा राजा होता.”
“त्याला ब्राह्मणांनी निर्माण केले नाही; तो जनतेतून उभा राहिला.” असे म्हणतात. प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांना ब्राह्मणवादी चौकटीबाहेर काढून बहुजन स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून मांडले.
समाजक्रांतिकारक महात्मा फुले यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा’ मधून शिवाजी महाराजांना “कुळवाडी भूषण” म्हटले. फुलेंच्या दृष्टीने शिवाजी हे शेतकरी आणि शोषितांचे रक्षणकर्ते होते.
फुलेंनी शिवाजी महाराजांना ब्राह्मणेतर चळवळीच्या आत्मसन्मानाचे प्रतीक मानले. ही मांडणी सामाजिक समतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.
शाहिरीतील शिवराय : जनतेचा आवाज
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांनी आपल्या गीतांतून आणि पोवाड्यांतून छत्रपती शिवाजी महाराजांना जनआंदोलनांचे प्रेरणास्थान केले.त्यांच्या शाहिरीत शिवाजी म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड करणारा, कष्टकरी वर्गाचा आधार आणि आत्मसन्मानाचा ध्वज. शाहिरी परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचली. ती केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक चळवळीची ऊर्जा बनली.अण्णा भाऊ साठे
त्यांच्या शाहिरीतून “शिवबाचा जयजयकार, अन्यायाचा होवो संहार!”असे म्हणतात. अण्णाभाऊंनी शिवाजी महाराजांचा पराक्रम कामगार-शेतकरी चळवळीशी जोडला.

आजची परिस्थिती आणि शिवरायांचा संदेश
आज आपण अशा काळात जगतो आहोत जिथे
जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण वाढताना दिसते.
इतिहासाचे राजकीय सोयीने अर्थ लावले जातात.
शेतकरी, कामगार आणि वंचित घटक संघर्ष करत आहेत. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात:
१) समता : बारा बलुतेदार, अठरापगड जाती-सर्वांना स्वराज्यात स्थान. आज आपण सामाजिक समता कितपत प्रस्थापित केली आहे?
२) धर्मनिरपेक्षता : सर्व धर्मांचा आदर. आज आपण सामाजिक सलोखा जपतो आहोत का?
३) शेतकरी हित : शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण. आजचा शेतकरी सुरक्षित आणि सन्मानित आहे का?
४) स्वराज्याची संकल्पना : स्वराज्य म्हणजे लोकांच्या सहभागाचे शासन. आज लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपण काय करतो?

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव नव्हे, संकल्प म्हणून साजरी केली पाहिजे. शिवजयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा उत्सव नव्हे. ती समतेची, न्यायाची आणि सामाजिक ऐक्याची आठवण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना खरे वंदन म्हणजे-
संविधानिक मूल्ये जपणे, बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे, जात-धर्माच्या भिंती तोडून बंधुता वाढवणे.
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
त्यांच्या स्वराज्याच्या विचाराने प्रेरित होऊन समतेचा, स्वाभिमानाचा आणि ऐक्याचा समाज उभारण्याचा संकल्प करूया.
सर्व बहुजन समाजाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ! जय शिवराय! जय भीम!

आयु. सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)
मोबाईल नं. 7387145407

आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा…, देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos

0


Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 

शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 



Source link

श्री संत गाडगेबाबा मिशन संचलित आश्रम शाळेत दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

0
श्री संत गाडगेबाबा मिशन संचलित आश्रम शाळेत दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

फलटण (ता. फलटण) – ताथवडे येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जिद्द, संघर्ष, सातत्य आणि चिकाटी या गुणांच्या बळावर स्पर्धेच्या युगात टिकून राहावे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दादासाहेब चोरमले यांनी केले.
शाळेचा निसर्गरम्य परिसर आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार शिक्षण याचे त्यांनी कौतुक केले. संगणकीय आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि सातत्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
थॉमस एडिसन आणि डॉ. कलाम यांचे उदाहरण
आपल्या भाषणात चोरमले यांनी Thomas Edison यांचे उदाहरण देत सांगितले की, शालेय जीवनात अपयश आले तरी जिद्दीच्या जोरावर ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ बनले. हजारो प्रयोगांनंतर त्यांनी विजेचा दिवा शोधला. तसेच A. P. J. Abdul Kalam यांनी बालपणी वृत्तपत्र विक्री करत संघर्षमय जीवन जगले, परंतु चिकाटीच्या बळावर ते भारताचे राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
“परिस्थिती कधीही शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही; गरज असते ती जिद्द आणि संघर्षाची,” असे सांगून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत व ती पूर्ण करण्यासाठी तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुलींनी संधीचा लाभ घ्यावा
फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक विकास काकडे यांनी आपल्या मनोगतात मुलींना उपलब्ध होत असलेल्या विविध क्षेत्रांतील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी अद्ययावत राहून शिक्षणाच्या संधी साधाव्यात, असे त्यांनी सांगितले.
मोबाईलचा अतिरेक टाळण्याचा सल्ला देत, “मोबाईल हा वेळ वाया घालवणारा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.
संत गाडगेबाबांच्या विचारांची गरज
मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी Sant Gadge Baba यांच्या समाजप्रबोधनपर कार्याचा आढावा घेतला. संत गाडगेबाबांनी दिलेल्या दहा संदेशांचे पालन केले, तर प्रत्येकजण यशस्वी नागरिक बनू शकतो, असे ते म्हणाले. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य महान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक साळुंखे सर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्री संत गाडगेबाबा मिशन चे संचालक ह. भ. प. शिंदे महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास विविध मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.