
Rippling चे संस्थापक प्रसन्ना यांच्यावर त्यांच्या पत्नीने नवे आणि खळबळजनक आरोप केले आहेत. ती म्हणाली की, ती गरोदर असतानाही प्रसन्ना तिच्यासोबत सेक्सचा आग्रह धरत असे. अन्यथा मी बाहेर जाईन, अशी धमकी देत असे.

Rippling चे संस्थापक प्रसन्ना यांच्यावर त्यांच्या पत्नीने नवे आणि खळबळजनक आरोप केले आहेत. ती म्हणाली की, ती गरोदर असतानाही प्रसन्ना तिच्यासोबत सेक्सचा आग्रह धरत असे. अन्यथा मी बाहेर जाईन, अशी धमकी देत असे.

आताच्या काळात भारत जगातील सर्वात वेगाने अर्थव्यवस्था वाढवणारा देश आहे. ज्यामध्ये देशातील अनेक कंपन्यांचे मोठे योगदान आहे. खास करून ज्या कंपन्या स्वदेशीचा अवलंब करत आहेत आणि देशातच त्यांची उत्पादने तयार करत आहेत आणि लोकांना रोजगार देत आहेत. यामुळे, आपल्या देशात उत्पादन होणारे अनेक पदार्थ, सामान जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत आहे. स्वदेशी चळवळ म्हणजे आपल्या स्वतःच्या गोष्टींचा प्रचार करणे. ज्यामध्ये पतंजली कंपनी सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. आज, पतंजली ही चळवळ नवीन उंचीवर घेऊन जात आहे. आयुर्वेदिक आणि देशी उत्पादनांद्वारे पंतजलीने या चळवळीत मोठे योगदान दिले आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली भारतातील टॉप कंपन्यांच्या यादीत पतंजलीचा समावेश आहे. तसेच, वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातही त्यांनी मोठे नाव कमावले आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांना कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
पतंजलीचा महसूल आणि नफा सतत वाढत आहे. देशातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या पतंजलीने त्यांच्या वाढीवर, रोजगार निर्मितीवर आणि स्वदेशी उत्पादनांवर विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या व्यवसाय मॉडेलमुळे आणि कमी दरांमुळे, त्यांनी एफएमसीजी आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या बाजारपेठेत स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतंजलीचे आर्थिक योगदान खूप मोठे आहे.2023-24 मध्ये पतंजली आयुर्वेदाचे उत्पन्न 9335.32 कोटी रुपये होते. जे गेल्या वर्षीपेक्षा 23.15% जास्त आहे. त्याच वेळी, 2023 मध्ये पतंजली फूड्सचे उत्पन्न 31800 कोटी रुपये होते. यावरुन कंपनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पतंजली नवीन रोजगार संधी उपलब्ध करून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्याकडे 10000 आरोग्य केंद्रे, 4500 वितरक असून 638795 गावांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तसेच,10 लाख किराणा दुकाने देखील आहेत आणि आधुनिक व्यापारी दुकानांमध्ये देखील ते उपस्थित आहेत. ज्यामुळे लहान दुकानदार आणि वितरकांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत.
आवळा रस आणि मोहरीचे तेल यांसारखी पतंजली उत्पादने आणि इतर अनेक दैनंदिन वापरातील वस्तू माफक दरात आहेत. आयुर्वेदिक गोष्टी या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. पतंजलीची बहुतेक उत्पादने प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत. यामध्ये गायीचे तूप वगळता सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला, खास करुन ग्रामीण भागातील लोकांना परवडतील अशा आहेत. पतंजलीचे कमी दर आणि स्वदेशी आकर्षण (मेड इन इंडिया) यामुळे किरकोळ बाजारात चांगलीच पसंती आहे.
पतंजली आपली संस्कृती जिवंत ठेवत आहे कारण आयुर्वेद हा त्यांचा मूळ गाभा आहे. आयुर्वेद हे आपल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की, त्यांचे उद्दिष्ट केवळ पैसे कमवणे नाही तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू लोकांना मदत करणे देखील आहे. यामुळे देशाचा अभिमान वाढतो आणि स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळते.
पतंजलीने अनेक लघु आणि मध्यम उद्योगांना मदत केली आहे. कंपनी स्थानिक शेतकरी आणि लहान व्यावसायिकांकडून तिच्या उत्पादनांसाठी कच्चा माल खरेदी करते. ज्यामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आणि त्यांचे उत्पन्न वाढते. पतंजली नोएडा, नागपूर आणि इंदूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये नवीन कारखान्यांसह आपला व्यवसाय वाढवत आहे, ज्यामुळे लोकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.
(Disclaimer – This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)

मुघल सम्राट औरंगजेबाची समाधी असलेल्या खुल्ताबादचे नामकरण लवकरच ‘रत्नापूर’ करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. औरंगजेबाच्या राजवटीपूर्वी अस्तित्वात असलेली ऐतिहासिक ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. खुल्ताबाद पूर्वी रत्नापूर म्हणून ओळखले जात होते, परंतु औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचे नाव बदलण्यात आले. आता आम्ही ते पुन्हा जुन्या नावावर नेण्याच्या प्रक्रियेत आहोत.


लोकसत्ता टीम
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीपूर्वी अपूर्णावस्थेत उद्घाटन करण्यात आलेले येथील नवीन बसस्थानक पाच महिन्यांतच समस्यांचे आगार बनले आहे. उन्हाळ्याची तीव्रत वाढली असताना बसस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी थंड पाण्याची सोय अद्यापही करण्यात आली नाही. लहान बाळांना दूध पाजण्यासाठी असलेला हिरकणी कक्ष बंद असल्याने बाळांची आबाळ होत आहे.
येथील जुने बसस्थानक हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखले जायचे. मात्र नावीन्याचा ध्यास घेतलेल्या महायुती सरकाने २०१८ मध्ये जुने बसस्थानक पाडून नवीन बसस्थानक बांधण्याचा घाट घातला. दिलेल्या मुदतीपेक्षा बऱ्याच कालावधीनंतर अखेर हे बसस्थानक पूर्णत्वास गेले. अशातच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बसस्थानक अर्धवट अवस्थेत असतानाच त्याचे लगबगीने उद्घाटन करण्यात आले. अद्यापही या बसस्थानकात किरकोळ कामे सुरूच आहेत. गाजावाजा करून सुरू केलेले हे बसथानक पूर्वीपेक्षाही बंदिस्त झाले.
बसस्थानकातील प्लॅटफॉर्म अत्यंत दाटीवाटीचे आहेत. येथे येणाऱ्या आणि मुक्कामी राहणाऱ्या बस परिसरातून ने-आण करताना चालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या आत अपघातांची शक्यता नाकारता येत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. यवतमाळचे बसस्थानक विमानतळासारखे राहील अशा वल्गना स्थानिक नेत्यांनी केल्या होत्या. प्रत्यक्षात एखाद्या तालुकास्तरावरील स्थानकासारखे हे बसस्थानक झाले आहे, अशी टीका आता होत आहे.
सध्या तीव्र उन्हाळा सुरू आहे. मात्र बसस्थानकात अद्यापही थंड पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना बाटलीबंद पाणी घेवून तहान भागविण्याचा भूर्दंड बसत आहे. लहान मुलांना दूध पाजता यावे, यासाठी हिरकणी कक्ष येथे तयार करण्यात आला. मात्र तो कुलूपबंद आहे. येथील अधिकारी, कर्मचारी प्रसाधनगृह म्हणून या कक्षाचा उपयोग करत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, शौच्छालयातील अस्वच्छता यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड होत आहे. मात्र स्थानिक आगार प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना बसस्थानकात अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. बसस्थानकातील समस्यांचा पाढा मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे वाचला. या समस्या तत्काळ सोडविल्या नाही तर मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी दिला.
येथील बसस्थानकात थंड पाणी उपलब्ध न करण्यामागे परिवहन महामंडळाचे ‘नाथजल’ कंपनीवर असलेले प्रेम कारणीभूत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. नाथजल या कंपनीला प्रवेशदारावरच मोठे शेड बांधून दिले. हे शेडही चुकीच्या जागेवर बांधल्याने येथे अपघाताची भीती असल्याची शक्यता मनसेने व्यक्त केली. नाथजल कंपनी १५ रूपयाची पाण्याची बॉटल २० रूपयांना विकून प्रवाशांना लुटत असल्याचा आरोप मनसेने केला. शौचालयातही पाच रूपयांऐवजी सर्रास १० रूपये घेवून प्रवाशांची पिळवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आहे. दक्षता समिती व आगार व्यवस्थापकांच्या संगनमताने हे सर्व सुरू असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापूरे यांनी केला आहे.

अमरावती : एका डॉक्टरने परिचयातील तरुणीच्या नियोजित वराकडील मंडळींना खोटी माहिती दिली. त्यांच्याकडे तरुणीची बदनामी करीत तिचे लग्न मोडल्याची धक्कादायक घटना दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. जयदीप पावडे (३०) रा. दर्यापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डॉ. जयदीप पावडे याचे दर्यापुरात हॉस्पिटल आहे. पीडित २७ वर्षीय तरुणीच्या आजीचा त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. ती आजीला घेऊन नेहमीच डॉ. जयदीप पावडे याच्या हॉस्पिटलमध्ये जायची. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली. डॉ. जयदीप पावडे हा पीडित तरुणीला अधूनमधून मोबाइलवर संपर्क देखील साधत होता. तेव्हा मला फोन करत जाऊ नका, असे तिने त्याला बजावले होते.
दरम्यान, तरूणीच्या विवाहासाठी वर शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. २४ मार्च रोजी तरुणीचा एका तरुणाशी साखरपुडा झाला. मे महिन्यात लग्नाची तारीख ठरली. त्यानंतरही डॉ. जयदीप पावडे याने तरुणीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू थांबली नाहीस, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझ्याबद्दल खोटी माहिती सांगून तुझी बदनामी करेन, अशी धमकी डॉ. जयदीप पावडे याने तरुणीला दिली. तरूणीने त्याकडे दुर्लक्ष केले, पण समोर काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज तिला आला नव्हता.
दरम्यान, ३० मार्च रोजी तरुणीच्या नियोजित वराकडील मंडळी तिच्या घरी आली. डॉ. जयदीप पावडे हा आपल्या घरी भेटण्यासाठी आला होता, असे त्यांनी सागितले. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्नसंबंध जोडले आहे, तिचे लग्न झाले आहे, असे सांगून त्याने विवाहाचे प्रमाणपत्र देखील दाखविले. त्यामुळे आम्ही हे संबंध तोडत आहात, असे सांगून ते निघून गेले. हा धक्कादायक प्रकार कळताच पीडित तरूणीचे कुटूंब हादरून गेले. डॉक्टरला तरूणीने आपल्यासोबत संपर्क साधू नको, असे बजावून देखील तो तरूणीचा पाठलाग करीत होता. त्याने विवाहाचे प्रमाणपत्र कसे तयार केले, हे पीडित तरूणीचया कुटुंबीयांसाठी एक कोडेच ठरले. अखेर तरुणीने दर्यापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. पण, या प्रकारामुळे पीडित तरूणी चांगलीच भयभीत झाली आहे.



Rajdhani Express Owner: भारतीय रेल्वेचा आता संपूर्ण लक्ष सध्या हाय स्पीड ट्रेनवर आहे. यामुळं प्रवाशांचा प्रवास आणखी जलद आणि आरामदायी होणार आहे. भारतीय रेल्वेकडे सध्या वंदे भारत, शताब्दी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेससारख्या अनेक सुपरफास्ट ट्रेन आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या ट्रेनचे मालक कोण आहेत. तर दुसरीकडे आयआरएफसी (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पेरेशन) नवरत्न कंपनीचा दर्जा मिळण्याची चर्चा आहे.
सरकारकडून आयआरएफसीला नवरत्नचा दर्जा देण्यात आल्यानंतर कंपनीचे सीईओ आणि सीएमडी मनोज कुमार दुबे यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, नवरत्न दर्जा मिळाल्याने कंपनीला अनेक आर्थिक सार्वभौम अधिकार मिळाले आहेत. या दर्जामुळे मंडळाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. आता कंपनी जलद निर्णय घेऊ शकेल. आता आम्ही रेल्वे क्षेत्रातील आमच्या कर्ज देण्याच्या व्यवसायाला आणखी गती देऊ.
मनोज कुमार दुबे यांनी या संदर्भात सांगितले की, भारतीय रेल्वेमध्ये वापरले जाणारे सर्व इंजिन, मालगाडीचे डबे आणि प्रवासी डबे हे भारतीय रेल्वे वित्त महामंडळाचे (IRFC) आहेत. हे रेल्वेला 30 वर्षांसाठी भाड्याने दिले जातात. या गाड्यांसाठीचे पैसे आयआरएफसीच्या निधीतून येतात. भाडेपट्टा नियमांनुसार, हे 30 वर्षांसाठी आयआरएफसीच्या नावावर राहतात.
म्हणूनच वंदे भारत एक्सप्रेस आणि शताब्दी सारख्या सर्व विशेष गाड्या तांत्रिकदृष्ट्या आयआरएफसीची मालमत्ता आहेत. याचा अर्थ असा की भारतीय रेल्वेच्या सुमारे ८० टक्के प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या आयआरएफसीच्या आहेत. भारतीय रेल्वेच्या प्रगतीत ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते.
मनोज कुमार दुबे यांच्या मते, रेल्वेला वाटप केलेल्या बजेटव्यतिरिक्त ज्या काही अतिरिक्त निधीची आवश्यकता असते, ते बाजारातून कमी किमतीत खरेदी केले जाते आणि रेल्वेला खूप कमी नफ्यात दिले जाते. आयआरएफसी गेल्या 40 वर्षांपासून हे काम करत आहे. रेल्वे व्यतिरिक्त, आयआरएफसी रेल्वे इकोसिस्टम संबंधित इतर प्रकल्पांना देखील अर्थपुरवठा करेल. कंपनी या सर्व प्रकल्पांसाठी कमी व्याजदराने निधी उपलब्ध करून देईल.

नागपूर : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष टोकाच्या पलीकडे गेला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातच या संघर्षाची झळ दिसून येत होती, पण आता सर्वत्र हे लोन पसरत चालले आहे. यात माणसांचा बळी जात आहे आणि प्राण्यांचा देखील. मात्र, या संघर्षाच्या मुळाशी न जाता त्याचे खापर मात्र त्या प्राण्यावरच फोडले जात आहे आणि त्याला कायमचे गजाआड केले जात आहे. त्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मुक्ततेसाठी निर्णय घेण्याकरिता समिती गठीत केली आहे.
मात्र, ते प्रकरण समितीपुढे येऊच दिले जात नाही आणि तो प्राणी कायमचा बंदिवासात जातो. आतापर्यंत अशा कित्येक वाघांना वनखात्याने कायमचे जेरबंद करून टाकत स्वतःची जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न केला आहे. भंडारा येथील लाखांदूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघ आणि वाघिणीला जेरबंद करण्यात आल्यानंतर त्यांना नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. या वाघ आणि वाघिणीला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय डॉक्टरांची एक चमू या वाघ आणि वाघिणीवर लक्ष ठेवून आहेत.
लाखांदूर तहसीलमधील दांभेविराली, टेंभारी आणि गावराळा गावांच्या आसपासच्या परिसरात वाघ आणि वाघिणीने अनेक गुरे मारली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले. त्यांना जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. यानंतर तीन एप्रिलला वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. या वाघाप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून एका वाघिणीने देखील गावात दहशत निर्माण केली होती. तीनेही गावातील गावकऱ्यांची अनेक गुरे फस्त केली.
पाच एप्रिलला सकाळी वाघिणीने गावराळा गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या गुरांची शिकार केली होती. त्यामुळे तिलाही बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. या वाघ आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी परवानगी मागणारा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर, वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. सहा एप्रिलला वाघिणीला पुढील उपचारांसाठी नागपूरमधील गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात आले व वाघ आणि वाघिणीला विलगीकरणात ठेवण्यात आले.