Monday, July 27, 2026
Home Blog Page 441

श्रीराम, गरुड रथयात्रेत उदंड गर्दी; दोन्ही रथांची आकर्षक सजावट

0
श्रीराम, गरुड रथयात्रेत उदंड गर्दी; दोन्ही रथांची आकर्षक सजावट



लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : नाशिककरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथयात्रेला सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात मंगळवारी सायंकाळी श्री काळाराम मंदिरापासून भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली. रात्री उशीरा रथयात्रा शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे.

श्री काळाराम मंदिर तसेच श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे श्रीराम रथ आणि श्रीगरुड रथाचे विधीवत पूजन यंदाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रेनिमित्त दोन्ही रथांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रीराम नवमीनंतर येणाऱ्या एकादशीला श्री काळाराम देवस्थानच्या वतीने रथयात्रा काढण्यात येते.

रथयात्रा जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती, वाहतूक व्यवस्थापन, गरुड रथाची सजावट, सुरक्षा व्यवस्था, ब्रेक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रथसेवकांचा गणवेश, स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर विश्वस्त आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे रथयात्रेला सुरळीत सुरुवात झाली. रथयात्रेपुढे कपालेश्वर मंदिराचे ढोलपथक होते. यावेळी काहींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले. रथयात्रेत नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. राम, सीता, लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा काहींनी परिधान केली होती. उपस्थितांकडून अखंडपणे रामनामाचा गजर करण्यात येत होता.

दरम्यान, रथयात्रेमुळे गोदापात्रात गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गोदापात्रात जमा झालेल्या पानवेली दूरवह वाहून गेल्या. रथयात्रा उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने साध्या वेशात तसेच वर्दीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली

रथावर लहान मुले

रथयात्रा हा नाशिककरांसाठी श्रध्देचा विषय. या यात्रेचा अविभाज्य भाग होता यावे यासाठी नाशिककरांनी श्री काळाराम मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दूरून का होईना, दर्शन व्हावे, यासाठी रथयात्रा मार्गावर मिळेल त्या ठिकाणी लोक उभे होते. रथावर कोणीही उभे राहू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले असतानाही लहान मुलांसह अनेकांनी रथावर गर्दी केली होती. अशा हौशी लोकांना खाली उतरवितांना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले होते.



Source link

87 child laborers rescued from Mumbai child laborers are from Uttar Pradesh and Bihar Mumbai print news

0
87 child laborers rescued from Mumbai child laborers are from Uttar Pradesh and Bihar Mumbai print news



87 child laborers rescued from Mumbai child laborers are from Uttar Pradesh and Bihar Mumbai print news | वर्षभरातून मुंबईतून ८७ बालकामगारांची सुटका; बालकामगारांमध्ये उत्तर प्रदेश, बिहारमधील मुलांची संख्या अधिक





Source link

Priyansh Arya Century in just 39 Balls 2nd Fastest by Indian in History of IPL Against Chennai Super Kings PBKS vs CSK IPL 2025

0
Priyansh Arya Century in just 39 Balls 2nd Fastest by Indian in History of IPL Against Chennai Super Kings PBKS vs CSK IPL 2025


Priyansh Arya Fastest Century in IPL 2025 PBKS vs GT: पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे. प्रियांश आर्याने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ३९ चेंडूत आपलं पहिलं आयपीएलमधील शतक पूर्ण केले. अश्विन, पथिराना अशा उत्कृष्ट गोलंदाजांची धुलाई करत त्याने आपली शतकी खेळी पूर्ण केली. प्रियांश आर्याने बाद होण्यापूर्वी ४२ चेंडूत ७ चौकार आणि ९ चौकारांसह २४५ च्या स्ट्राईक रेटने १०३ धावांची खेळी केली.

आयपीएलमध्ये आपला पहिला हंगाम खेळत असलेल्या २४ वर्षीय प्रियांशने मुल्लानपूरच्या मैदानावर स्फोटक फलंदाजी करत आपले पहिले शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये आपला फक्त चौथा सामना खेळत असलेल्या प्रियांशने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध डावाची सुरुवात केली आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत षटकार मारला.

प्रियांश आर्याने मथीशा पथिरानाच्या १३व्या षटकात सलग ३ षटकार आणि एक चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. हे या हंगामातील सर्वात जलद शतक आहे, तर शतक करणारा तो फक्त दुसरा फलंदाज आहे. याशिवाय प्रियांश आर्याने आयपीएल इतिहासातील भारतीय फलंदाज म्हणून दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं आहे.

गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल पदार्पणात झटपट ४७ धावा करणाऱ्या प्रियांशला मागील सामन्यात निराशेसह परतावे लागले. पहिल्याच चेंडूवर त्याला जोफ्रा आर्चरने बोल्ड केले होते. त्या निराशेवर मात करत, प्रियांशने पुढच्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि अखेरीस शतक झळकावून थांबला. पण खलीलच्या षटकात षटकारानंतर पुढच्याच चेंडूवर खलीलने त्याचा झेल सोडला होता. पण षटकाच्या पाचव्या चेंडूवर या फलंदाजाने पुन्हा षटकार मारला आणि षटकार-चौकारांच्या आतिषबाजीमध्ये सीएसकेच्या गोलंदाजांची धुलाई केली.





Source link

GK : महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले भारतातील जगप्रसिद्ध राज्य! इथं आहेत फक्त दोनच जिल्हे

0
GK : महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले भारतातील जगप्रसिद्ध राज्य! इथं आहेत फक्त दोनच जिल्हे


Maharashtra Goa Border : महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले भारतातील सर्वात जगप्रसिद्ध राज्य आहे. फक्त भारतच नाही तर जगभरातून पर्यटक येथे फिरायला येता. या राज्यात फक्त दोनच जिल्हे आहेत. भारतातील लहान राज्यांच्या यादीत राज्याचे नाव आहे. जाणून घेऊया हे राज्य कोणते. 

फक्त दोनच जिल्हे असलेले हे राज्य फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले गोवा राज्य. गोवा हे एक लोकप्रिय टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. पर्यटक मोठ्या संख्याने  गोव्यात फिरायला येतात.
गर्दीपासून अलिप्त असलेले अथांग समुद्र किनारे, प्राचीन मंदिरे, चर्च, किल्ले येथील पर्यटकांना आकर्षित करतात.  क्रूज तसेच नाईट पार्टीसाठी गोवा खूपच लोकप्रिय आहे. 

गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

रेइस मॅगोस किल्ला: पंजीममधील हा किल्ला 16 व्या शतकातील पोर्तुगीज किल्ला आहे. हा गोव्यातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. 

कोल्वा बीच : कोलवा बीच हे गोव्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे मोठ्या संख्येने बार आणि नाइटक्लब आहेत. पोर्तुगीज घरे आणि व्हिला देखील आहेत. यासह येथे पॅराग्लायडिंग, जेट स्कीइंग, स्नॉर्कलिंग, स्पीड बोट राइड, वॉटर स्कूटरिंग, पॅरासेलिंग आणि बनाना बोट राइड यांसारख्या काही रोमांचक जलक्रीडांचा देखील अनुभव घेता येतो. 
अरामबोल बीच:  उत्तर गोव्यातील सर्वात छान समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. हे गोव्यातील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे.

बागा बीच : बागा बीचे हे नाईटलाइफ अनुभवण्यासाठी गोव्यातील हे सर्वोत्तम ठिकाण आहे. 

अंजुना बीच हे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. अंजुना बीच हा गोल्डन बीच म्हणून ओळखला जातो. 

बटरफ्लाय बीच गोव्याच्या कानाकोना जिल्ह्यात पालोलेमच्या दक्षिणेला आहे. गोव्यातील ही सर्वात रोमँटिक प्लेस मानली जाते. यामुळेच याला हनीमून बीच असेही म्हटले जाते. 

दूधसागर धबधबा: 310 मीटर उंचीवरुन कोसळणारा दूधसागर धबधबा हा देशातील सर्वात उंच धबधबा गोव्यातच आहे.





Source link

313030000000 रुपयांची संपत्ती; ठरवलं तर राजवाडा बांधतील पण आनंद महिंद्रा आजही राहतात जुन्या 3 मजली घरात! कारण…’

0
313030000000 रुपयांची संपत्ती; ठरवलं तर राजवाडा बांधतील पण आनंद महिंद्रा आजही राहतात जुन्या 3 मजली घरात! कारण…’


Anand Mahindra Lifestyle: महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी  वाहनासाठी लोकप्रिय आहे. या कंपनीचे मालक आनंद महिंद्रादेखील तितकेच प्रसिद्ध आहेत. ट्विटरवर त्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. देशासह जगभरात घडणाऱ्या विविध गोष्टींवर ते व्यक्त होत असतात. त्यामुळे लोक आनंद महिंद्रांच्या सोशल मीडियावरील पोस्टची वाट पाहत असतात. आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विट्स आणि सोशल मीडियाद्वारे लोकांशी जोडलेले राहतात. कोट्यवधींची मालमत्ता असलेले आनंद महिंद्रा खूपच साधे जीवन जगतात. आनंद महिंद्रा यांच्याकडे इतके पैसे आहेत की ते हवे तर सहजपणे बंगला किंवा राजवाडाही बांधू शकतात. साधेपणाने वागणारे आनंद महिंद्रा अनेक वर्षे जुन्या घरात राहतात.

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्याकडे 3,13,03,00,00,000 रुपयांची अफाट संपत्ती आहे. अफाट संपत्तीचे मालक असलेले आनंद महिंद्रा यांनी ठरवलं तर ते आलिशान बंगल्यात किंवा बहुमजली इमारतीत राहू शकतील. पण ते एका वर्षानुवर्षे जुन्या घरात राहतात. मुंबईतील नेपियन सी रोडवर बांधलेल्या या तीन मजली घरात महिंद्रा वर्षानुवर्षे राहत आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. हे घर त्याच्या हृदयाच्या फार जवळ आहे. त्यांनी तोच बंगला विकत घेतला जिथे ते आधी भाडेकरू म्हणून राहायचे. आता ते वर्षानुवर्षे त्यांच्या कुटुंबासह त्याच बंगल्यात राहतायत.त्या बंगल्यात असे काय आहे? जे महिंद्रा यांनी जुने घर मागितलेली किंमत देऊन विकत घेतले. 

 270 कोटी रुपये देऊन विकत घेतले

खरंतर नेपियन्सी सी रोडवरील या तीन मजली घरात आनंद महिंद्रा यांनी त्यांचे बालपण घालवले होते. आनंद महिंद्रांचे आजोबा केसी महिंद्रा मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा या घरात स्थायिक झाले. या घराचा मालक येथे त्याच्या गाड्या पार्क करायचा. नंतर त्याने ते घर भाड्याने दिले. केसी महिंद्रा त्यांच्या कुटुंबासह येथे भाडेकरू म्हणून राहू लागले होते. त्या घरात स्थलांतरित झाले तेव्हा आनंद महिंद्रांचा जन्मही झाला नव्हता. पण त्यांचे बालपण त्याच घरात गेले. ते कुटुंबासह वर्षानुवर्षे एकाच घरात राहत होते.नंतर महिंद्राचे कुटुंब येथून स्थलांतरित झाले. ते घरही दुसऱ्या कोणीतरी विकत घेतले होते. पण घराच्या नवीन मालकाने नूतनीकरणाच्या नावाखाली ते पाडण्याचा निर्णय घेतलाय असे आनंद महिंद्रांना कळले. ही बातमी आनंद महिंद्रा यांना कळताच ते अस्वस्थ झाले. वेळ वाया न घालवता त्यांनी 270 कोटी रुपये देऊन ते जुने घर विकत घेतले.  13 हजार एकरमध्ये बांधलेल्या या घराचे नाव त्यांनी ‘गुलिस्तान’ ठेवले.

 घराचे नाव गुलिस्तान

आनंद महिंद्रा यांच्या या घराचे नाव गुलिस्तान आहे. ज्याचा अर्थ फुलांचा गुच्छ असा होतो. तेव्हापासून आनंद महिंद्रा या घरात राहतात. विलासी जीवन जगण्याऐवजी त्यांनी जुन्या आठवणीत जगणे पसंत केले. या तीन मजली इमारतीचे नूतनीकरण केल्यानंतर, तो आता त्याच्या कुटुंबासह येथे राहतो.  आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली परदेशात राहतात.

मुलींना आईच्या कामात रस

आनंद महिंद्रा यांच्या पत्नी पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित आहेत. अनुराधा यांनी मुंबईतील सोफिया कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी पूर्ण केली. त्या व्हर्व्ह आणि द इंडियन क्वार्टरलीच्या मुख्य संपादक आहेत. त्यांच्या दोन्ही मुली आलिका आणि दिव्या चित्रपट आणि डिझाइन क्षेत्रात नाव कमवत आहेत. तसेच त्या आईला व्यवसायातही मदत करतात.  आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुली परदेशात राहत असून त्यांनी परदेशी मुलांशीच लग्न केलंय. दोन्ही मुलींना महिंद्राच्या व्यवसायात रस नाही. त्या आईला मासिकाच्या निर्मितीत मदत करतात. मुलींना जे करायचे ते करण्यापासून रोखत मी नाही, असे आनंद महिंद्रांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.





Source link

लेकीचं 9 दिवसावर लग्न अन् आईनेच होणाऱ्या जावयासोबत… ; गावात एकच खळबळ!

0
लेकीचं 9 दिवसावर लग्न अन् आईनेच होणाऱ्या जावयासोबत… ; गावात एकच खळबळ!


आईसाठी तिच्या मुलीच्या लग्नापेक्षा मोठा सोहळा दुसरा कोणताही नाही. मुलगी जन्माला येताच आई तिच्या लग्नाची तयारी सुरू करते. लग्नादरम्यान मुलीला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दागिन्यांपासून ते प्रत्येक पैशाची बचत केली जाते. पण आता कलियुग आले आहे. आता आपण या जगात अशा माता पाहू लागलो आहोत ज्या स्वतःच्या हातांनी आपल्या मुलीचे घर उद्ध्वस्त करत आहेत. अशीच एक कलियुग आई अलीगढमधून उदयास आली आहे.

अलीगडच्या मद्रक पोलीस ठाण्यात राहणारी एक महिला तिच्या होणार्‍या जावयासह पळून गेली. तिच्या मुलीचे लग्न नऊ दिवसांनी होते. पण होणारा नवरा त्याच्या होणाऱ्या सासूच्या प्रेमात पडला होता. अशा परिस्थितीत दोघांनीही एक योजना आखली आणि पळून गेले. पळून जाण्यापूर्वी, महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिने आणि तिने वाचवलेले पैसेही चोरले. आता कुटुंबातील सदस्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या नाकाखाली प्रेमसंबंध होता सुरु

असे सांगितले जात आहे की महिलेने स्वतः तिच्या मुलीचे लग्न निश्चित केले होते. यानंतर, भावी जावई घरी येऊ लागला. सर्वांना वाटले की, जावई आणि सासू लग्नाची तयारी करत आहेत पण इथे वेगळाच खेळ सुरू होता. जावयाने काही दिवसांपूर्वी त्याच्या सासूला मोबाईल फोनही भेट दिला होता. सगळेजण या गोष्टी अतिशय सामान्य असल्याचं मानत होते पण इथे वेगळाच खेळ सुरू होता. सासू आणि जावईचे प्रेमसंबंध सर्वांच्या नाकाखाली सुरू आहेत हे कोणालाही कळले नाही.

मुलीचा संसार मोडला 

मुलीचे लग्न 16 एप्रिल रोजी होणार होते. लग्नाच्या पत्रिका सर्वत्र वाटल्या गेल्या. दरम्यान, मुलगा घरी आला आणि सासूसोबत खरेदीला जात असल्याचे सांगून बाहेर गेला. दोघेही एकत्र गेले. काही वेळाने, दोघांचेही फोन बंद झाले. मुलीच्या वडिलांना संशय आल्यावर त्यांनी कपाट तपासले. लग्नातील दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे पाहिले. तेव्हाच मला संपूर्ण प्रकरण समजले. आता पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे. दोघांचेही फोन लोकेशन ट्रॅक केले जात आहे.





Source link

Nepal woman murder case Three accused arrested by mokhada police in palghar district

0
Nepal woman murder case Three accused arrested by mokhada police in palghar district



Nepal woman murder case Three accused arrested by mokhada police in palghar district | गोणीवरील अक्षरावरून आरोपींचा शोध, नेपाळ येथील महिलेच्या खुनप्रकरणी तीन आरोपी अटक





Source link

Murshidabad Stone pelting arson violence protests against Waqf Bill turn violent in West Bengal

0
Murshidabad Stone pelting arson violence protests against Waqf Bill turn violent in West Bengal



Murshidabad Stone pelting arson violence protests against Waqf Bill turn violent in West Bengal | पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयकाविरोधातील निदर्शनांना हिंसक वळण, अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ, मुर्शिदाबादमध्ये तणाव





Source link

Anaconda Crocodile Fight Viral Video extreme battle between big snake python vs crocodile wild animals attack

0
Anaconda Crocodile Fight Viral Video extreme battle between big snake python vs crocodile wild animals attack



Anaconda Crocodile Fight Viral Video extreme battle between big snake python vs crocodile wild animals attack | महाकाय अ‍ॅनाकोंडाने मगरीला विळख्यात पकडलं अन् नंतर पुढे जे काही घडलं फार भयानक, पाहा धडकी भरवणारा VIDEO





Source link

औरंगजेबच्या वंशजाने डायरेक्ट DNA रिपोर्टच कोर्टात सादर केला; कारण काय तर….

0
औरंगजेबच्या वंशजाने डायरेक्ट DNA रिपोर्टच कोर्टात सादर केला; कारण काय तर….


Prince Yakub Habeebuddin Tucy :  वक्फ विधेयकानरुन संपूर्ण देशात आणि औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. औरंगजेबाच्या कबरीचं सरंक्षण करण्याच्या मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांच्या नव्या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे. ताजमहल, बाबरी आणि लाल किल्ल्याचे मालक आम्हीच असा दावा  प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी केला आहे. मुघल वंशज असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रिन्स याकूब हबीबुद्दीन DNA रिपोर्टच कोर्टात सादर केला. 

मुघल साम्राज्याच्या सम्राटांनी जवळपास 350  वर्षे भारतावर राज्य केले. बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल सम्राट होता. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून ब्रिटिशांनी त्याला अटक केली होती. त्याच्यासोबतच मुघल साम्राज्याचा अंत झाला. असे असले तरी स्वतःला मुघलांचे वंशज असल्याचा दावा करणारे लोक वेळोवेळी दिसून येत राहतात. त्यापैकी एक म्हणजे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी. 

मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा पणतू असल्याचा दावा प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी करतो. प्रिन्स तुसी यांचा दावा आहे की उझबेकिस्तानसह अनेक देशांनी त्यांना मुघल वंशज म्हणून स्वीकारले आहे. डीएनए चाचण्यांमध्येही त्यांच्या दाव्याची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी  मुघल सम्राटांसारखेच पोशाख घालून फिरतो. यामुळे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी  नेहमीच चर्चेत असतो.

प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी याने कोर्टात DNA चे पुरावे सादर करत आपण मुघलांचे वंशज असल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर मुघलांनी बांधलेला ताजमहाल, दिल्लीतील लाल किल्ला आणि अयोध्येतील बाबरी मस्जिद जमीन आमच्याच मालकीचा असल्याचा दावा केला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच औरंगजेबाच्या कबरीचं सरंक्षण करण्याच्या मागणीसाठी प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून साकडं घातलंय. पत्रातून त्यांनी कबरीच्या संरक्षणाची मागणी केलीय… प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी हे पत्र भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्र राज्यपाल, आणि स्थानिक पोलीस यंत्रणासह  महत्वाच्या लोकांना पाठवलंय. प्रिन्स याकूब हबीबुद्दीन हे मुघल कुटुंबांचे उत्तरधिकारी असल्याचे त्यांनी या पत्रात म्हंटले आहे. 





Source link