Monday, July 27, 2026
Home Blog Page 433

सत्य, अहिंसा आणि संयमाचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये विविध कार्यक्रम; आमदार सचिन पाटील यांचे अभिवादन

0
सत्य, अहिंसा आणि संयमाचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये विविध कार्यक्रम; आमदार सचिन पाटील यांचे अभिवादन

फलटण (साहस टाइम्स) – अहिंसा, सत्य आणि संयमाचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती आज फलटणमध्ये श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महावीर स्तंभावर खास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी महावीर स्तंभाजवळ उपस्थित राहून भगवान महावीर यांच्या चरणी अभिवादन केले. यावेळी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या शिकवणीचा प्रसार करण्याचा निर्धार यावेळी भाविकांनी व्यक्त केला.

सक्करदरा तलाव सौंदर्यीकरणाच्या नावावर सिमेंटचा अतिरेक

0
सक्करदरा तलाव सौंदर्यीकरणाच्या नावावर सिमेंटचा अतिरेक


नागपूर : शहराचे वैभव असलेला सक्करदरा तलाव कोरडाठाक पडला आहे. यात वर्षभर जलसाठा राहू शकेल यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. मात्र, सौंदर्यीकरणाच्या नावावर तलावाच्या दोन्ही बाजूला सिमेंटचा अतिरेक केला जात आहे.

भोसलेकालीन तलावापैकी एक असलेला सक्करदरा तलाव उन्हाळा लागण्यापूर्वीच आटला आहे. तलावात जलपर्णी वाढली आहे. या कचऱ्यामुळे जलचरांचे नुकसान झाले आहे. नागपूरच्या विकास आराखड्यात तलावाच्या आजूबाजूचा सर्व भाग रहिवासी क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला असून अपवाद वगळता दक्षिण किनारा हरित क्षेत्र म्हणून राखीव आहे. सक्करदरा तलाव सुमारे ४ हेक्टर क्षेत्रात आहे. आता ते एखाद्या खेळाच्या मैदानासारखे दिसू लागले आहे. तलावात वर्षभर पाणी राहावे, याचा विचार कोणीच करत नाही. सक्करदरा तलावाभोवती बांधकाम झाल्याने तलाव परिसर आकुंचन पावत आहे. तलावात कचरा टाकला जाऊ नये म्हणून लोखंडी कठडे लावण्यात आले, तरीही लोक येथे कचरा टाकतात.

२०१९ मध्ये सक्करदरा सुशोभीकरण समितीने तलाव सफाईचे काम सुरू केले होते. जे फार काळ टिकू शकले नाही. तलावात मूर्ती व निर्माल्य विसर्जन करण्यास मज्जाव आहे. त्यासाठी लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत. तरी देखील तलावाच्या काठावर अनेक दिवसांपासून मूर्ती, निर्माल्य आणि कचऱ्याचे ढीग आहेत. या ऐतिहासिक तलावाच्या दुरवस्थेसाठी या भागातील लोकप्रतिनिधींसह, नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी जबाबदार असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.

हेही वाचा

सक्करदरा तलावाच्या काठावर सुरू असलेले बॉलिवूड सेंटर पॉईंट हॉटेल बंद झाले असून तेथील बांधकाम ध्वस्त करण्यात आले आहे. पण, त्याचा मलबा तलावाशेजारी असून त्या बाजूने भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.

नागरिक काय म्हणतात?

सक्करदरा तलाव आणि शेजारचे उद्यान मिळून सौंदर्यीकरण करण्यात यावे. या तलावात वर्षभर जलासाठा राहावा तसेच येथे नौकाविहार सुरू करण्यात यावे.

संदीप शिरभाते

सक्करदरा तलाव आणि परिसर दक्षिण आणि पूर्व नागपूरसाठी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होऊ शकते. तलावाशेजारी उद्यान आहे. तसेच जवळच दत्तात्रयनगर उद्यान आहे. याशिवाय तलावाच्या दुसऱ्या बाजूला बॉलिवूड सेंटर पॉईन्टची जागा आहे. हे सर्व मिळून एक चांगले पर्यटन स्थळ विकसित केले जाऊ शकते.

उमंग कोहळे





Source link

नवे ‘स्थलांतर विधेयक’ भेदभाव सुरूच ठेवणार…

0
नवे ‘स्थलांतर विधेयक’ भेदभाव सुरूच ठेवणार…


संजय हेगडे

अधिकाऱ्यांना मनमानीची मुभा देणारे कायदे करून सत्ताधारी वर्ग आपले संविधानविरोधी राजकारण पुढे रेटू पाहातो आहे…

नागरिकत्व हे केवळ पासपोर्ट अथवा तत्सम कागदपत्रे देणारे नसते; तर संबंधित देशामधले काहीएक हक्कही नागरिकत्वामुळे मिळतात. भारतात नागरिकत्वाबद्दलच्या दोन बृहद्-कल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. या दोनपैकी पहिली ‘लोकांमुळे राष्ट्र बनते’ या कल्पनेशी सुसंगत असलेली  संकल्पना ही “सरजमीं-ए- हिन्द पर आवाम-ए- आलम के, ‘फिराख’। क़ाफिले बसते गए, हिन्दोस्ताँ बनता गया।।’’ या शायर व गीतकार फिराख गोरखपुरी यांच्या काव्यपंक्तींतून स्पष्ट होते; तर याउलट असलेली दुसरी संकल्पना सावरकरांच्या शब्दांत- ‘आसिंधुसिंधूपर्यंत’ पसरलेल्या विशाल भारतभूमीला जे आपली ‘पितृभू आणि पुण्यभू’ मानतात ते हिंदू – अशी सांगता येते. या दोन संकल्पनांमधली तफावत निव्वळ शाब्दिक नाही. नगरिक कोणाला मानायचे, म्हणजेच हक्क कोणाला द्यायचे आणि कोणाला नाकारायचे याच्या राजकारणापर्यंत ही तफावत जाऊ शकते.

याच राजकारणाचा वास ‘इमिग्रेशन ॲण्ड फॉरेनर्स बिल, २०२५’ (परकी नागरिक स्थलांतर विधेयक- २०२५) या विधेयकाला येतो आहे. हे विधेयक लोकसभेत २७ मार्च, तर राज्यसभेत २ एप्रिल रोजी मंजूर झाले, मग ४ एप्रिल रोजी त्यावर राष्ट्रपतींच्या मंजुरीची मोहोरही उमटली. आता कायद्याचे स्वरूप आलेले हे विधेयक, यथावकाश त्याबाबतचे नियम तयार झाल्यावर अमलातही येईल. या विधेयकाने ‘१९३९ सालचा कायदा रद्द केला’ असे सांगितले जात असले तरी, जे कायदे रद्द होतील त्यापैकी एकच तितका जुना होता. भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रे ज्यांच्याकडे नाहीत, अशा सर्वांना भारतात दीर्घकाळ वास्तव्यासाठी आजतागायत १९४६ चा कायदा लागू होता; त्यात बदल घडवणाऱ्या २०२५ च्या विधेयकात अशा अ-नागरिकांसाठी विशेष यंत्रणा उभारण्याची तरतूद आहे. या विधेयकावरचा प्रमुख आक्षेप म्हणजे अधिकारीवर्गास दिले गेलेले अमर्याद अधिकार आणि दाद मागण्यास कमीतकमी वाव. ‘राष्ट्रीय सुरक्षा’ हा मुद्दा या विधेयकाच्या भलामणीसाठी पुढे करण्यात आला असला तरी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी व्यक्तीचे हक्करक्षणही महत्त्वाचेच असते याचा विसर पडला की काय अशी शंका या विधेयकासंदर्भात रास्त ठरावी.

नेमके हेच अमेरिकेत, तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरंभले आहे. निर्वासितांवर, कुटुंबांच्या स्थलांतरांवर आणि बिगर-अमेरिकी पालकांपोटी अमेरिकेत जन्मलेल्या अपत्यांवर नागरिकत्व नाकारण्याची कुऱ्हाड ट्रम्प प्रशासन चालवू पाहाते आहे. यात सरळच श्रीमंत स्थलांतरित हवे आणि गरीब (पर्यायाने, गरीब देशांमधून आलेले) स्थलांतरित नकोत असेही दिसून येते. हक्क हे निवडक लोकांसाठीच असणार, असे धोरणच यातून स्पष्ट होते. याच ट्रम्प यांनी मुस्लिमांची अडवणूक केलेली आहे. अर्थात भारतातही, ‘सीएए’ (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) संमत झाला तेव्हा अशीच भेदभावमूलक धोरणे दिसून आलेली होती.

यंत्रणांना अमर्याद अधिकार देणारा, पण या यंत्रणांच्या उत्तरदायित्वाबद्दल मौन पाळणारा असा २०२५ परकी नागरिक स्थलांतर कायदा आहे, त्यामुळे तर भेदभाव पराकोटीला जाऊ शकतो. ‘आप्रवास (म्हणजे स्थलांतर) अधिकाऱ्या’ला या कायद्यात निर्णयस्वातंत्र्य देण्यात आलेले आहेच, शिवाय ‘नोंदणी अधिकाऱ्यां’कडे नोंद तातडीने करण्याची सक्तीही आहे. ही तातडी वा सक्तीची भाषा आधीच्या कायद्यात नाही. शिवाय, एखाद्या अधिकाऱ्याला जर एखादा अर्जदार ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करू शकतो असे वाटले तर’ अर्ज तात्काळ नाकारला जाऊ शकतो किंवा नोंद करून घेण्याची विनंती फेटाळली जाऊ शकते. यावर दाद कशी मागायची, किती काळात उत्तर मिळणार, याविषयी काहीही उल्लेख नव्या कायद्यात नाही.

त्याहून विचित्र तरतूद बेकायदा स्थलांतरितांना कितीही काळ डांबून ठेवण्याचेही अधिकार फक्त प्रशासनालाच देण्याची. हे असे डांबून ठेवण्याचे आदेश जिल्हा स्तरावरील कनिष्ठ अधिकारीसुद्धा नव्या २०२५ च्या कायद्यानुसार खुशाल देऊ शकतात. अर्थात, बेकायदा स्थलांतरितांना अडवलेच पाहिजे आणि प्रसंगी कोठडीत ठेवले पाहिजे याबद्दल वाद नाही- पण जुन्या कायद्यात थोडीफार का होईना, अधिकारांची विभागणी होती. प्रशासनाला सर्वाधिकार नव्हते. ‘न्यायालयात उभे करून, तेथे कोठडीच्या मुदतीचा निर्णय’ ही कायद्याच्या राज्याची किमान अपेक्षा जुन्या कायद्यात पाळली जात होती. 

गरिबांवरच कुऱ्हाड

नोकरशाहीला वाव देण्याचा आव या कायद्याने आणला तरी, या नोकरशाहीवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असू शकतो हे सर्वज्ञात आहेच. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये, कोलकात्यात राहणाऱ्या कुणा बंगाली-भाषक गरीब मुस्लीम मजुराकडे केवळ त्याचे गावचे घर पुरात वाहून गेले म्हणून नागरिकत्वाची कागदपत्रे नसली, तरीही या गरीब मुस्लीम मजुराला चटकन एखाद्या अधिकाऱ्याने ‘बांगलादेशी’ ठरवून टाकायचे, त्याला प्रचंड रकमेचा दंड आकारायचा, अर्थातच इतके पैसे माेजण्याची त्याची ऐपत नसल्यामुळे त्याला डांबून ठेवायचे… इतकेच नव्हे तर त्याला बांगलादेशात पाठवून देण्याचाही आटापिटा सुरू करायचा, असे प्रकार कुणा अधिकाऱ्याला आता ‘कायदेशीर’पणे करता येऊ शकतात.

या कायद्याची रचनाच जणू श्रीमंतांसाठी करण्यात आली आहे. महागडी कायदेशीर मदत मिळवू शकतात, त्यांना विशेषाधिकार देते तर ज्यांना अशी मदत मिळवत येणार नाही त्यांना शिक्षा करते. सध्या ‘प्रगत’ म्हणवणाऱ्या इतर देशांमध्येही मानवतावादी विचारांना बाजूला ठेवून बहुतेकदा  आर्थिक उपयुक्ततेच्या किंवा गुणवत्तेच्या दृष्टीने ‘स्थलांतर सुधारणा’ अमलात आणल्या जात आहेत; त्यामुळे ‘वसाहतकालीन कायदा रद्द’ करण्याचा आव आणणारे आपण, आजदेखील पुन्हा अधिकच हिरिरीने ‘पाश्चात्त्यांचे अनुकरण’ करतो आहोत.

मोघम भाषेचा फायदा कुणाला?

 या २०२५ च्या कायद्यात कोणत्याही धार्मिक गटाचे नाव घेतलेले नसले, तरी त्याची अंमलबजावणी विशिष्ट गटांना लक्ष्य करून, म्हणजे गेल्या दशकभरात उघडच सुरू असलेल्या ‘पद्धतशीर’पणे होण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याने (सीएए) शेजारील देशांमधून आलेल्या फक्त मुस्लिमेतर निर्वासितांना प्राधान्य देऊन नागरिकत्वात भेदभावाची वाट आधीच आखून दिलेली आहे. नवीन स्थलांतर कायदा त्या रचनेला बळकटी देण्याचे काम करताे.

आसाममध्ये, राष्ट्रीय नागरिक नोंदवहीतून (एनआरसी) जवळपास १९ लाख व्यक्तींना वगळले, त्यांत बहुतेक बंगालीभाषक मुस्लिम आणि बंगालीभाषक हिंदू होते. सरकारने या व्यक्तींना ‘घुसखोर’ ठरवलेले आहे.  नवा स्थलांतर कायदा या अशा प्रकारांना राष्ट्रीय पातळीवर वाव देऊ शकतो. या स्थलांतर कायद्यामध्ये शाळा, रुग्णालये आणि हॉटेले अशा प्रकारच्या संस्थांवर ‘कागदपत्र नसलेल्या संशयित व्यक्तींची तक्रार करण्याचे बंधन’ घालण्यात आलेले आहे. या साऱ्या सेवा-क्षेत्रातल्या, बिगर-सरकारी संस्था असल्या तरी त्यांना हा कायदा अंमलबाजवणीसाठी मदतनिसासारखे वापरून घेणार आहे.

आधुनिक, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा धार्मिक किंवा वैचारिक आडकाठीशिवाय कोणाही गरजवंतांना आश्रय देण्याचा इतिहास आहे – मग ते १९५९ मध्ये आलेले तिबेटी लोक असोत, १९७१ मधल्या बांगलादेश मुक्तिसंग्रामाने पोळलेले लोक असोत किंवा १९७२ मध्ये युगांडातील आशियाई लोक असोत. यापैकी कुठल्याही वेळी, राज्ययंत्रणेने विस्थापित लोकांचे वर्गीकरण धर्म/ श्रद्धांच्या आधाराने केलेले नाही.

याउलट सध्याचा कायदेविषयक दृष्टिकोन खूप वेगळा आहे. उदाहरणार्थ, अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदूचे निर्वासित म्हणून स्वागत केले जाऊ शकते, तर नरसंहारातून पळून जाणाऱ्या रोहिंग्याला तो मुस्लीम म्हणून अटकेचा सामना करावा लागतो. जरी स्थलांतर कायदा हिंसाचाराला प्रोत्साहन देत नसला तरी, त्याच्या अंमलबजावणीत धार्मिक आणि वांशिक ओळखीवर बरेच काही अवलंबून राहाण्याची- म्हणजेच कायदेशीर संरक्षणसुद्धा ‘सशर्त’ आणि निवडकांनाच देण्याची- साेय या विधेयकाच्या रचनेतच आहे. 

या कायद्याचे अनेक पैलू संवैधानिक चिंता निर्माण करतात. राज्यघटनेने दिलेल्या हमीशी हे विसंगत ठरते. उदाहरणार्थ, 

● अनुच्छेद  १४ (कायद्यासमोर समानता):  या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मात्र वाजवी वर्गीकरण किंवा औचित्य न ठेवता, ‘सर्व व्यक्ती (नागरिक नव्हे, कोणीही व्यक्ती) समानच’ हे तत्त्व मोडीत काढण्याची मुभा अधिकारीवर्गास मिळू शकते. 

● अनुच्छेद २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण): हा कायदा दीर्घकाळ, अनिश्चित अटकेला परवानगी देत असल्यामुळे ‘योग्य कायदेशीर प्रक्रिये’च्या घटनात्मक बंधनाचे महत्त्व कमी होऊ शकते.

हा कायदा नागरिकत्वाच्या संकल्पनेला अत्यंत संकुचित पातळीवर नेऊन ठेवणारा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार नोकरशाहीच्या विवेकबुद्धीच्या (म्हणजे कदाचित मर्जी अथवा मनमानीच्याही) अधीन आहेत. कायदेशीर मदतीची हमी नसणे, अटकेत असलेल्यांना दूतावासाशी संपर्क साधण्याची संधी देण्याचे बंधन अधिकाऱ्यांवर नसणे, संशयिताच्या कुटुंबावरही कारवाईचे अधिकार असल्याने कुटुंबांसाठी वाढलेली अनिश्चितता हे सर्व घटक संविधानाला अपेक्षित असलेल्या संकल्पनांशी सुसंगत आहेत का, याचा विचार होणे आवश्यक आहे. जुन्या कायद्यांच्याही अंमलबजावणीमुळे आधीच संशयास्पद अटकेचे प्रकार घडले आहेत; नवीन स्थलांतर कायदा तर अशा परिणामांची व्याप्ती वाढवतोच. न्यायालयात दाद मागण्याची मुभा जरी या कायद्यात असली, तरी ती मुख्यत्वे विशेष न्यायालये किंवा रिट (प्राधिलेख) काढण्याची परवानगी  असलेल्या (उच्च व सर्वोच्च) न्यायालयांपुरती आणि मर्यादित प्रमाणात आहे.

‘इमिग्रेशन ॲण्ड फॉरेनर्स बिल, २०२५’ (परकी नागरिक स्थलांतर विधेयक- २०२५) ही काही केवळ प्रशासकीय सुधारणा नसून, त्यामागे राजकारण आहे, ते कोणाचे आणि कोणत्या आधारावर आहे हे सारेच या कायद्याच्या रचनेतून उघड होते आहे. या अशा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे स्थलांतर-विषयक कामकाज हे आजच्याप्रमाणे नियंत्रण नियमन एवढ्यापुरते न राहाता, ते राजकीय आणि सामाजिक बहिष्काराचे साधन म्हणून वापरले जाईल, अशीही  शक्यता आहे.

याचे संवैधानिक परिणाम आणि मानवी हक्कांवर होऊ शकणारे परिणाम लक्षात घेऊन या कायद्याची कायदेशीर, संस्थात्मक आणि राजकीयदृष्ट्या बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे. हा कायदा केवळ स्थलांतर- धोरणालाच नव्हे तर आपला देश सर्वांना सामावून घेणारा आहे या विश्वासालाच तडा देणारा ठरू शकतो… अर्थात नियमावली वगैरे लागू होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली, तर! 

लेखक सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत.



Source link

बांगलादेश-चीन दोस्तीने भारतासमोर नवे भूराजकीय आव्हान? काय आहे ‘चिकन नेक’ कॉरिडॉर? ते भारतासाठी का महत्त्वाचे?

0
बांगलादेश-चीन दोस्तीने भारतासमोर नवे भूराजकीय आव्हान? काय आहे ‘चिकन नेक’ कॉरिडॉर? ते भारतासाठी का महत्त्वाचे?



Is Bangladesh-China friendship a new geopolitical challenge for India? What is the ‘Chicken Neck’ Corridor? Why is it important for India? विश्लेषण : बांगलादेश-चीन दोस्तीने भारतासमोर नवे भूराजकीय आव्हान? काय आहे ‘चिकन नेक’ कॉरिडॉर? ते भारतासाठी का महत्त्वाचे?





Source link

बदलापूर, वसई-विरार, उल्हासनगरवासियांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण?

0
बदलापूर, वसई-विरार, उल्हासनगरवासियांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण?



Will the dream of the metro of the residents of Badlapur, Vasai-Virar, Ulhasnagar be fulfilled soon? विश्लेषण : बदलापूर, वसई-विरार, उल्हासनगरवासियांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण?





Source link

वीज पडून 13 जण दगावले! CM ने जाहीर केली मदत; उन्हाळ्यात भरदुपारी विजांचा तांडव कारण…

0
वीज पडून 13 जण दगावले! CM ने जाहीर केली मदत; उन्हाळ्यात भरदुपारी विजांचा तांडव कारण…



बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने गोंधळ उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. माहितीनुसार, राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये वीज पकडून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश यांनीही भरपाईची घोषणा केली आहे.



Source link

UPSC Preparation: River System युपीएससीची तयारी : नदी प्रणाली

0
UPSC Preparation: River System युपीएससीची तयारी : नदी प्रणाली


या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठीचा नदी प्रणाली हा घटक समजून घेणार आहोत. नदी प्रणालीवर नियमितपणे पुढीलप्रमाणे प्रश्न विचारलेले आहेत. नद्यांचा अभ्यास करताना हिमालयीन नद्या (सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा) व द्वीपकल्पीय नद्या (गोदावरी, कृष्णा आणि कावेरी), पूर्वेकडे वा पश्चिमीकडे वाहणाऱ्या व उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या तसेच लांबीनुसार नद्यांचा क्रम अभ्यासायला हवा.

एखाद्या नदीचा अभ्यास करताना नदीचा उगम, विस्तार, तिच्या उपनद्या (उजवीकडील व डावीकडील), नदीचे खोरे, नदी ज्या राज्यातून वाहते ती राज्ये, नदीच्या काठावरील महत्त्वाची शहरे, त्या नदीवरील धरण (उदा. कृष्णा नदीवर असलेले अलमट्टी धरण), नदीशी संबंधित कालवा (उदा. गंगा नदीवरील २२४५ मी. लांबीचा फरक्का कालवा) इ. अभ्यासणे अपेक्षित आहे.

२०२४ च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा :

● प्र. हिमालयातील नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रयागराजच्या गंगा नदीच्या प्रवाहात सामील झाल्याच्या संदर्भात, खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?

(अ) घाघरा — गोमती — गंडक — कोसी

(ब) गोमती — घाघरा — गंडक – कोसी

(क) घाघरा — गोमती — कोसी – गंडक

(ड) गोमती — घाघरा — कोसी – गंडक

वर सांगितल्याप्रमाणे या प्रश्नात नद्यांचा क्रम विचारला आहे. १९९७ मध्ये खाली दिलेल्या नकाशातील क्रमांकानुसार नद्या ओळखा असा प्रश्न विचारला होता

UPSC Preparation, River System, UPSC ,

१. कोसी २. गोमती ३. घाघरा ४. गंडक

नद्यांच्या दिशा व क्रमावर नियमितपणे (१९९७ ते २०२४) प्रश्न विचारल्याचे यावरून स्पष्ट होते.

● प्र. खालील माहिती विचारात घ्या:

UPSC Preparation, River System, UPSC ,

वरीलपैकी किती ओळींमध्ये दिलेली माहिती योग्यरित्या जुळली आहे?

(अ) फक्त एक (ब) फक्त दोन (क) तिन्ही (ड) काहीही नाही

धुंधर धबधबा भेडाघाट प्रदेशाचा असून नेत्रावतीच्या जागी शरावती नदी असणे अपेक्षित आहे.

२०२३ च्या युपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा :

● प्र. खालील विधाने विचारात घ्या:

१. झेलम नदी वुलर सरोवरातून जाते.

२. कृष्णा नदी थेट कोल्लूर सरोवराला पाणी देते.

३. गंडक नदीच्या वळणामुळे कंवर सरोवर तयार झाले.

वरीलपैकी किती विधाने बरोबर आहेत/आहेत?

(अ) फक्त एक

(ब) फक्त दोन

(क) तिन्ही

(ड) काहीही नाही

उत्तर. (अ)

यातील वुलर सरोवराचा पाण्याचा मुख्य स्राोत झेलम नदी आहे. कोल्लेरू तलाव हा एक नैसर्गिक युट्रोफिक तलाव आहे, जो गोदावरी आणि कृष्णा या दोन प्रमुख नदी खोऱ्यांमध्ये स्थित आहे. बुडामेरू आणि तमलेरू या दोन हंगामी नद्या आणि अनेक नाले आणि कालव्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो, जो दोन्ही नद्यांच्या डेल्टा दरम्यान नैसर्गिक पूर संतुलन जलाशय म्हणून काम करतो. स्थानिक भाषेत कंवर झील असे म्हणतात.

पूर्व घाटातून उगम पावणाऱ्या नद्यांवर २०२१ च्या युपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न बघा झ्र

● प्र. खालील नद्यांचा विचार करा.

१. ब्राह्मणी २. नागावली

३. सुवर्णरेखा ४. वंशधारा

वरीलपैकी कोणते पूर्व घाटातून उगम पावते?

(अ) १ आणि २ (ब) २ आणि ४ (क) ३ आणि ४ (ड) १ आणि ३

नागावली नदीचा उगम भारतीय ओडिशा राज्यातील कालाहांडी जिल्ह्यात १,३०० मीटर उंचीवर असलेल्या लखबहालजवळील पूर्व घाटात होतो. लांगुल्या हे नागावली नदीचे दुसरे नाव आहे. वंशधारा नदी ओडिशा राज्यातील पूर्व घाटात उगम पावते आणि भामिनी मंडळातील श्रीकाकुलम जिल्ह्यात प्रवेश करते आणि शेवटी कलिंगपट्टणमजवळ बंगालच्या उपसागरात येते.

ब्राह्मणी नदी, जी तिच्या वरच्या भागात दक्षिण कोएल म्हणून ओळखली जाते, ती झारखंडच्या रांची जिल्ह्यातील नागरी गावाजवळून सुमारे ६०० मीटर उंचीवर उगम पावते. सुबर्णरेखा नदी झारखंडच्या रांची जिल्ह्यातील नागरी गावाजवळील छोटानागपूर पठारात ६०० मीटर उंचीवर उगम पावते.

नदीद्वारा निर्माण होणाऱ्या भुरूपांवरही प्रश्न विचारले जातात. उदा. धबधबे, व्ही-आकाराच्या दऱ्या, इंटरलॉकिंग स्पर्स, गर्जेस, डेल्टा, कॅन्यन इ. २०२२ च्या युपीएससी पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न बघा :

● प्र. दक्षिण भारतातील गांदीकोटा कॅन्यन खालीलपैकी कोणत्या नदीने निर्माण केले आहे?

(अ) कावेरी (ब) मंजिरा (क) पेन्नार (ड) तुंगभद्रा

दक्षिण भारतातील गांदीकोटा कॅन्यन पेन्नार नदीने निर्माण केले आहे. भारतातील नद्यांचा जसा आपण अभ्यास करतो तसा आंतराष्ट्रीय महत्त्वाच्या नद्या जसे नाईल, अमेझॉन, यांग्त्झे, मिसिसिपी-मिसुरी, मेकाँग, डॅन्यूब यांचाही अभ्यास अपेक्षित आहे. चालू घडामोडीतील नद्यांवर विशेष भर द्या.

केवळ वाचून नदीप्रणाली समजून घेणे गुंतागुंतीचे ठरू शकते. यासाठी अॅटलसद्वारे नद्यांचा अभ्यास करायला हवा. एनसीआरटीमधील नकाशेही इथे अभ्यासायला हवेत.

sushilbari@gmail. com





Source link

Job Opportunities Recruitment in NPCIL नोकरीची संधी : एनपीसीआयएलमध्ये भरती

0
Job Opportunities Recruitment in NPCIL नोकरीची संधी : एनपीसीआयएलमध्ये भरती


● न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( NPCIL) ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदांची GATE २०२३/२०२४/२०२५ स्कोअरवर आधरित भरती.

डिसिप्लिननुसार एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजच्या रिक्त पदांचा तपशिल –

एकूण रिक्त पदे – ४०० (अजा – ६१, अज – ३२, इमाव – १११, ईडब्ल्यूएस् – ३९, खुला – १५७). यात बॅकलॉगच्या पदांचा समावेश आहे. (अजा – २, अज – २, इमाव – ४)

(१) मेकॅनिकल – १५० पदे (अजा – २३, अज – १२, इमाव – ४२, ईडब्ल्यूएस – १५, खुला – ५८).

(२) केमिकल – ६० (अजा – ९, अज – ५, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला -२३)

(३) इलेक्ट्रिकल – ८० (अजा – १२, अज – ६, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३२).

(४) इलेक्ट्रॉनिक्स – ४५ (अजा – ७, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १८).

(५) इन्स्ट्रूमेंटेशन – २० (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८).

(६) सिव्हील – ४५ (अजा – ७, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १८).

एकूण २८ पदे दिव्यांग कॅटेगरी इ/ LV – w, D/ HH – w, OA/ OL etc. – ६, एएसडी/आयडी/एमआय – १० साठी राखीव.

पात्रता – संबंधित विषयातील आणि अलाईड विषयातील बी.ई./बी.टेक्. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित सब्जेक्ट कोडमधील GATE २०२३, २०२४ किंवा २०२५ चा स्कोअर.

कमाल वयोमर्यादा – दि. ३० एप्रिल २०२५ रोजी २६ वर्षे. (इमाव – २९ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षे), (दिव्यांग – ६/३९/४१ वर्षे)

ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना १ वर्ष कालावधीच्या पुढील स्ट्रीमप्रमाणे Induction Course साठी पाठविले जाईल.

(१) प्रेशराईज्ड् हेवी वॉटर रिअॅक्टर ( PHWR) स्ट्रीम

(२) लाईट वॉटर रिअॅक्टर ( LWR) स्ट्रीम सिव्हील विद्याशाखा वगळता इतर विद्याशाखांतील पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन अर्जामध्ये रिअॅक्टर स्ट्रीमसाठी पसंती द्यावी लागेल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजना ( ETs) DAE च्या इस्टॅब्लिशमेंटवरील भारतभरातील लोकेशन्स किंवा परदेशात नेमणूक दिली जाईल. काही ETs ना TAPS १ & २ ऑपरेटींग स्टेशन तारापूर येथे नेमले जाईल.

स्टायपेंड – ETs ना दरमहा रु. ७४,०००/- स्टायपेंड दिले जाईल. पुस्तकांसाठी अलाऊन्स रु. ३०,०००/- एकदाच दिले जातील. ETs ना NPCIL चे लॉजिंग व बोर्डींग अनिवार्य आहे.

ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ETs ना ‘सायंटिफिक ऑफिसर-सी’ (ग्रुप-ए) वर कायम केले जाईल. त्यांना १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

वेतन – पे-लेव्हल – १० (रु. ५६,१००) अंदाजे वेतन रु. १.१३ लाख प्रतिमाह.

याशिवाय परफॉर्मर्स, लिंक्ड् इन्सेंटिव्ह दिले जाईल.

निवड पद्धती – GATE २०२३/२०२४/२०२५ च्या स्कोअरनुसार १:१२ प्रमाणात शॉर्ट लिस्टेड उमेदवारांचा इंटरव्ह्यू९ ते २१ जून २०२५ दरम्यान घेतले जातील. उमेदवारांना इंटरव्ह्यूहिंदी किंवा इंग्रजी भाषेत देता येईल.

अंतिम निवड इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित केली जाईल. (प्रतिक्षा यादी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत ग्राह्य असेल.)

मेडिकल फिटनेस पाहून अंतिम निवड करताना GATE स्कोअर विचारात घेतला जाणार नाही. निकाल www. npcilcareers. co. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. इंटरव्ह्यू पुढील सेंटर्सवर घेतले जातील – अणुशक्ती नगर, मुंबई; नरोरा अॅटॉमिक पॉवर स्टेशन NAPS, उत्तर प्रदेश; मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन ( MAPS) तामिळनाडू आणि कैगा जनरेटिंग स्टेशन ( KGS), कर्नाटक. इंटरह्यूच्या वेळी मूळ कागदपत्रं तपासली जातील.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-.

ऑनलाईन अर्जात GATE २०२३, २०२४, २०२५ च्या अॅडमिट कार्डवर GATE अथॉरिटीजने दिलेला रजिस्ट्रेशन नंबर नोंद करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज www. npcilcareers. co. in या संकेतस्थळावर दि. १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ (१६.०० वाजे)पर्यंत करावेत.

ऑफिसर आणि मॅनेजर पदे

● सेन्ट बँक होम फिनान्स लिमिटेड ( CBHFL), मुंबई – ऑफिसर आणि मॅनेजर पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – २१२. ( I) ऑफिसर – एकूण १११ पदे (अजा – १६, अज – १२, इमाव – २८, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४५).

(१) सेल्स मॅनेजर/ऑफिसर – ९४ पदे.

कामाचे ठिकाण – अहमदनगर, आकुर्डी, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, वसई, वापी, अहमदाबाद, सुरत इ.

(२) कलेक्शन एक्झिक्युटिव्ह/ ऑफिसर – १७ पदे.

कामाचे ठिकाण – आकुर्डी, नागपूर, सुरत, वडोदरा इ.

पद क्र. १ व २ साठी पात्रता – (दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी) १२ वी उत्तीर्ण आणि होम लोन/मॉर्टगेज संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी) १८ ते ३० वर्षे.

( II) ज्यु. मॅनेजर – एकूण ३४ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १४).

(३) क्रेडिट प्रोसेसिंग असिस्टंट/ज्यु. मॅनेजर – १८ पदे.

कामाचे ठिकाण – अहमदनगर, आकुर्डी, कल्याण, वापी, अहमदाबाद इ.

(४) ब्रँच ऑपरेशन मॅनेजर – १६ पदे.

कामाचे ठिकाण – अहमदनगर, कल्याण, पुणे, वापी इ. पद क्र. ३ व ४ साठी पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण आणि होम लोन/मॉर्टगेज संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – २१-२८ वर्षे. याशिवाय किमान ४/५/६/७ /८/१० वर्षांचा अनुभव आवश्यक असलेली इतर एकूण ६७ पदे.

सर्व पदांसाठी Annexure- II मधील विहीत नमुन्यातील अनुभवाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे.

निवड पद्धती – प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांचा इंटरह्यू घेतला जाईल. इंटरह्यूच्या वेळी सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी जाहिरातीमधील पॅरा ११ मध्ये उपलब्ध आहे.

प्रोबेशन कालावधी – निवडलेल्या उमेदवारांना ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. अजा-अज ( Annexure- III)/ इमाव ( Annexure- IV) उमेदवारांनी केंद्र सरकारी नोकरीकरिता विहीत केलेल्या नमुन्यातील दाखले सादर करणे आवश्यक. इंटरव्ह्यूसाठीचे कॉल लेटर उमेदवारांना www. cbhfl. com या वेबसाईटवरून Careers link/ admit card लिंकमधून डाऊनलोड करता येतील.

अर्जाचे शुल्क – खुला/ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. १,५००/-; अजा/अज – रु. १,०००/-.ऑनलाइन अर्ज www. cbhfl. com या संकेतस्थळावर दि. २५ एप्रिल २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237 @gmail. com





Source link

Questions on optional subjects मुलाखतीच्या मुलखात : वैकल्पिक विषयांवरील प्रश्न

0
Questions on optional subjects मुलाखतीच्या मुलखात : वैकल्पिक विषयांवरील प्रश्न


उमेदवार वैकल्पिक विषयाची निवड करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करतात? विषय स्कोअरिंग आहे का? आपल्याला या विषयाची पार्श्वभूमी आहे का? या विषयाचे अभ्यास साहित्य सहज उपलब्ध आहे का? हा उमेदवारांमध्ये लोकप्रिय विषय आहे का? संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा पद्धतीचा आपण विचार केला तर असे लक्षात येते की एकाच एक विषयात अनेक वर्षं उमेदवारांना उत्तम गुण मिळत आहेत असे होत नाही. हे असे का होते याचा थोडक्यात विचार करूया.

या परीक्षेचं महत्व आणि काठिण्य पातळी टिकू देण्यासाठी हे होत असो. एखाद्या विषयात उमेदवारांना चांगले गुण मिळतात तेव्हा या विषयांचं मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेस ना सुद्धा या विषयाच्या स्कोअरिंगसाठी काय काय टॉपिक्स केले पाहिजेत-त्या टॉपिक्स वर कशाप्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येत असतो आणि त्यानुसार ते कोचिंग देत असतात. विद्यार्थीही एकमेकांशी चर्चा करत असतात, नोट्स ची देवाणघेवाण करत असतात. या सर्वातून स्कोअरिंगचा पॅटर्न तयार होतो. आणि हा पॅटर्न जास्त टिकू न देण्याचा यशस्वी प्रयत्न परीक्षा पद्धतीमध्ये होत असतो. सध्याच्या काळात कुठचे वैकल्पिक विषय विद्यार्थीप्रिय आहेत ते एकदा बघूया. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, अँथ्रोपॉलॉजी वा मानववंशशास्त्र , मॅथेमॅटिक्स (प्रामुख्याने आयआयटी मध्ये शिकलेले उमेदवार हा वैकल्पिक विषय घेतात), सोशॉलॉजी वा समाजशास्त्र हे सर्वात जास्त प्रमाणात सध्या घेतले जाणारे वैकल्पिक विषय दिसतात. या बरोबरीने भूगोल, इतिहास, फिलॉसॉफी वा तत्त्वज्ञान, सायकॉलॉजी वा मानसशास्त्र हेही विषय घेतले जातात. एमबीबीएस उमेदवार मेडिकल सायन्स हा वैकल्पिक विषय अनेकवेळा निवडतात.

वैकल्पिक विषयावर तुम्ही मुख्य परीक्षेत ५०० गुणांचे पेपर्स लिहिल्याने सहसा जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. जे प्रश्न विचारले जातात त्यामध्येही थिअरी संबंधी प्रश्न खूप कमी असतात. त्या विषयाचं उपयोजन (अॅप्लिकेशन ) हा प्रश्नांचा फोकस असतो. उमेदवाराने जो वैकल्पिक विषय घेतला असेल त्याचा प्रशासनात काय उपयोग आहे हा प्रश्न हमखास अनेक उमेदवारांना विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तराची व्यवस्थित तयारी करावी. कारण या प्रश्नाच्या आधारे काही उपप्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. याचे एक उदाहरण बघूया. एखाद्या उमेदवाराचा वैकल्पिक विषय भूगोल आहे, तर त्याचा प्रशासनात काय उपयोग होईल असा प्रश्न विचारला तर उमेदवार सांगेल की यामुळे देशाबद्दल आणि जगातल्या महत्त्वाच्या भूप्रकारांबद्दल, महासागरांबद्दल, हवामानाबद्दल माहिती मिळते.

या माहितीचा शेती, हवामान बदल, आंतरराष्ट्रीय संबंध या सर्वात उपयोग होऊ शकतो. मग असा उपप्रश्न विचारला जाऊ शकतो, ‘पनामा कालव्याचे भौगोलिक आणि राजकीय महत्त्व काय आहे?’ भारताच्या भूगोलामुळे भारताचा इतिहास रचला गेला का? कारण सुरुवातीला नदी, नाले, पाण्याच्या जवळ लोक रहात होते. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना १९९३ साली लातूर, उस्मानाबाद भूकंप का व मोठया प्रमाणात प्राणहानी का झाली? भूकंप प्रवण क्षेत्रात कोणत्या प्रकारची घरे बांधावीत या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात.

पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा वैकल्पिक विषय असेल तर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आज बघूया. ब्युरोक्रसी ही संकल्पना कोणी मांडली? ब्युरोक्रसी बद्दल मॅक्स वेबर ने काय काय मुद्दे/विचार मांडले आहेत? आजच्या काळात ते कितपत महत्त्वाचे आहेत? QUAD / BRICS / ASEAN/ SAARC/ BIMSTEC याचं भारतासाठी महत्त्व काय? इस्रायल- हमास संघर्षामध्ये व युक्रेन-रशिया संघर्षात भारताची भूमिका काय आहे? ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीचा सामना आपण कसा करणार आहोत? भारताची लूक इस्ट आणि अॅक्ट इस्ट ही धोरणे काय आहेत? भारतासाठी बांग्लादेशाबरोबर सदसंबंध का महत्त्वाचे आहेत? भारत आणि चीन देशाच्या संबंधित भारताने चीनच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पात का सहभाग घेतला नाही? चीन ब्रम्हपुत्रा नदीवर मोठे धरण बांधत आहे या धरणामुळे भारताचे काय नुकसान होऊ शकते?

उमेदवार मुलाखतीसाठी जातो त्या दरम्यान भारताच्या पंतप्रधानांनी किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी कोणत्या देशाला भेट दिली असेल किंवा इतर कोणत्या देशाचे राष्ट्रपती/पंतप्रधान भारतात असतील तर त्यांच्याशी असणाऱ्या भारताच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. या भेटींमध्ये काही महत्वाचे करार झाले असतील तर त्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपले प्रधानमंत्री नुकतेच ज्या देशाचा दौरा करून आले त्या विषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे असते

इतर वैकल्पिक विषयांबद्दलचे प्रश्न पुढच्या काही लेखांमध्ये बघू.

mmbips@gmail. com

supsdk@gmail. com





Source link

Dhananjay Munde – Karuna Sharma relationship marriage Sessions Court धनंजय मुंडे

0
Dhananjay Munde – Karuna Sharma relationship marriage Sessions Court धनंजय मुंडे



Dhananjay Munde – Karuna Sharma relationship marriage Sessions Court धनंजय मुंडे- करुणा शर्मा यांचे नातेसंबंध विवाहाचेच, दिलासा देताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण





Source link