Saturday, July 25, 2026
Home Blog Page 421

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य संपदेचे प्रकाशन लांबणीवर

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य संपदेचे प्रकाशन लांबणीवर


मुंबई : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’ने दीड वर्षे मेहनतीने ‘जनता’ या वृत्तपत्राचे तीन खंड तसेच लेखन व भाषणमालेतील सहा खंडांचा मराठी अनुवाद तयार केला आहे. मात्र प्रकाशन कार्यक्रमास सरकारमधील उच्चपदस्थांना वेळ नसल्याने वाचकमोल असलेल्या खंडांचे प्रकाशन लांबणीवर पडले आहे.

सोमवारी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने छापून तयार असलेल्या बाबासाहेबांच्या ९ खंडांचे प्रकाशन होणार होते. मात्र सरकारमधील उच्चपदस्थांकडून वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडला. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ व ‘समता’ या बाबासाहेबांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांपैकी जनता वृत्तपत्र (१९३० ते १९५६) अधिक काळ चालले. आंबेडकरी चळवळीचा इतिहास अभ्यासण्यासाठी ‘जनता’चे स्थान महत्त्वाचे आहे. याचे ६ खंड प्रकाशित आहेत. नवे तीन खंड (खंड ७, खंड ८, खंड ९) छापून तयार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे या मूळ इंग्रजी पाच खंडांचाही (खंड २, खंड ४, खंड ६, खंड ९, खंड १३) मराठी अनुवाद छापून तयार आहे. बाबासाहेबांच्या चरित्राची मूळ साधने उपलब्ध करून देण्यासाठी १९७६ मध्ये समिती स्थापन झाली. समितीला मुदतवाढ दिली गेली.

हेही वाचा

बऱ्याच कालावधीनंतर समितीला बाबासाहेबांचे नवे खंड वाचकांच्या हाती देण्यास यश आले. विभागाला याचे प्रकाशन मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच उरकायचे होते. समितीने स्वतंत्र प्रकाशनाचा आग्रह धरला. त्यामुळे जयंतीपूर्वी प्रकाशन नाही होऊ शकले. – ज. वि. पवार, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती

हेही वाचा

बाबासाहेबांच्या नव्या खंडांच्या प्रकाशनाला विलंब झालेला नाही. मंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार झाला आहे. या महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन होईल. – डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य -सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती





Source link

नॅशनल हेराल्ड, ‘एजेएल’विरुद्ध नोटिसा, मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीची कारवाई

0
नॅशनल हेराल्ड, ‘एजेएल’विरुद्ध नोटिसा, मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीची कारवाई



National Herald, notices against ‘AJL’, ED action to seize assets नॅशनल हेराल्ड, ‘एजेएल’विरुद्ध नोटिसा, मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीची कारवाई





Source link

अमेरिकेचे छुपे आक्रमण! पनामामधील विरोधी पक्षाचा आरोप

0
अमेरिकेचे छुपे आक्रमण! पनामामधील विरोधी पक्षाचा आरोप


वृत्तसंस्था, पनामा शहर

अमेरिकेने पनामावर छुपे आक्रमण केले आहे असा आरोप तेथील विरोधी पक्षांनी केला आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या तीन दिवसांच्या पनामा दौऱ्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमचे सैनिक पनामाच्या दिशेने पाठवले आहे असे पत्रकारांना सांगितले. यावरून पनामामध्ये राजकीय मतभेद वाढले आहेत.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर, ही छुपी घुसखोरी असल्याची टीका पनामामधील ‘अदर वे मूव्हमेंट’ या विरोधी पक्षाचे नेते रिकार्डो लोम्बाना यांनी केली. बंदुकीची एकही गोळी न झाडता, बडगा दाखवून आणि धमक्या देऊन ही घुसखोरी करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

मात्र, ‘‘चीनच्या प्रभावापासून पनामा कालव्याचे संरक्षण करण्यासाठी आधीच्या तीन तळांवर अमेरिका सैन्य वाढवणार आहोत,’’ असे हेगसेथ यांनी सांगितले.





Source link

Tararani play History of the Maratha Empire Yuvraj Patil नाट्यरंग : रणरागिणी ताराराणी

0
Tararani play History of the Maratha Empire Yuvraj Patil नाट्यरंग : रणरागिणी ताराराणी


‘छावा’ चित्रपटानंतर अचानक आपल्या लोकांना इतिहासाबद्दलचा उमाळा दाटून आलाय. त्याआधी इतिहासाबद्दलची अनास्थाच सर्वत्र दिसत होती. आता अचानक औरंगजेबाची कबर राजकीय पक्षांच्या आणि हिंदुत्ववादी संस्थांच्या डोळ्यांत खुपू लागली आहे. याआधी माजी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल याच संघटना आणि पक्षांनी डोळ्यांवर कातडे ओढून घेतले होते. तर ते असो. सध्या इतिहासाला आलेल्या बऱ्या दिवसांनी त्याबद्दलचे औत्सुक्य वाढले आहे. पण ते इतिहासाच्या अस्सल लिखाणाबद्दलचे आहे की काल्पनिक ललित इतिहासाबद्दल आहे यावर चर्चा, वादविवाद झडू शकतात. कारण बहुअंशी काल्पनिक, ललित कलांमध्ये चित्रित केलेल्या अभिनिवेशी इतिहासातच लोकांना जास्त रस दिसतो. त्याला इतिहासाभ्यासाचा कितपत आधार आहे हे पाहिले जात नाही. पुन्हा आपल्या इतिहास अभ्यासकांतही एकमत नाही. त्यांचे ग्रह, पूर्वग्रह, त्यांच्या लिखाणाला असलेला-नसलेला पुराव्यांचा आधार हेही त्यांच्या लिखाणात डोकावतं. त्यामुळे खरा इतिहास काय, हे संदिग्धच राहतं. तरीही ललित इतिहास आणि खरा इतिहास यांत अंतर हे असतंच. पण त्याबद्दल जाणीवजागृती नसल्याने सामान्यजन ललित कलाकृती याच इतिहासाचा आधार धरून तोच इतिहास मनाशी जोपासत असतात. इतिहासकारही समूहविवेकाच्या या दबावाला बळी पडून खरं काय ते सांगायला पुढे येत नाहीत. असो. नुकतंच श्री छत्रपती शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टने ‘रणरागिणी ताराराणी’ हे युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आणलं आहे. त्यात संभाजी महाराजांच्या नंतरचा मराठेशाहीचा इतिहास चितारलेला आहे.

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाला वाटले की आता आपल्याला मराठेशाहीचा अंत करता येईल. पण त्याचं हे स्वप्न धुळीला मिळालं. संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज आणि राणी ताराराणींनी मराठ्यांचा लढा जारी ठेवला. त्यात संताजी-धनाजींसारखे शूरवीरही आघाडीवर होते. मात्र, त्याकरता मराठेशाहीत शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतनदारी पद्धती सुरू करून मावळ्यांना लढ्यास प्रवृत्त करावे लागले. आपल्या वतनासाठी तरी मावळे शत्रूवर तुटून पडतील, स्वराज्य राखतील हा हिशेब त्यामागे होता. फंदफितुरी, स्वार्थांधतेची कीड मराठेशाहीला लागलेली होतीच. पण ती दृष्टीआड करून राजाराम महाराज आणि ताराराणींनी औरंगजेबाविरुद्धचा लढा जारी ठेवला. अखेर २७ वर्षे मराठेशाहीशी लढूनही औरंगजेबाच्या हाती मराठ्यांचं राज्य काही आलं नाहीच. उलट त्याचाच इथल्या मातीत अंत झाला.

‘रणरागिणी ताराराणी’ हे नाटक हाच इतिहास मंचित करतं. पण नाटकाच्या नावाप्रमाणे ताराराणींचा पराक्रम त्यात प्राधान्याने आलेला नाही. जवळजवळ पाऊण नाटक झाल्यावर ताराराणीसाहेब मराठेशाहीची सूत्रं हाती घेतात आणि त्यांचा मग त्रोटक इतिहास रंगमंचावर सादर होतो. या अर्थाने या नाटकाचं शीर्षक त्याला न्याय देत नाही. मात्र, संभाजी महाराजांनंतरचा मराठेशाहीचा इतिहास बऱ्यापैकी यातून पुढे येतो. मराठ्यांनी औरंगजेबाशी दिलेली कडवी झुंज यात पाहायला मिळते. त्यासाठी आखलेली रणनीती, प्रसंगी घेतलेली माघार, औरंगजेबाच्या सरदारांत पाडलेली फूट, मराठे सरदार आणि त्यांचे राग-लोभ, त्यातून मराठेेशाहीत पडलेली फूट, राजाराम महाराजांचे अननुभवीपण, त्याचे मराठेशाहीला भोगावे लागलेले परिणाम, त्यांच्या पश्चात ताराराणीबाईंनी कंबर कसून औरंगजेबाविरुद्ध उभं ठाकणं… हा सगळा इतिहास या नाटकात यथार्थतेनं मांडलेला आहे. शिवाजी महाराजांनंतर मराठेशाहीला लागलेली घरघर, राजघराण्यात माजलेली बेदिली, त्यातून अवघ्या मराठी मुलखात पसरलेली निराशा आदी पार्श्वभूमी चित्रित करत नाटक पुढे सरकतं. औरंगजेबाच्या मावळत्या काळाचं चित्रण यात तपशीलवारपणे आलेलं आहे. दोन दशकांहून अधिक काळ मराठ्यांशी लढण्याने औरंगजेबाच्या फौजेत आलेली नैराश्याची आणि मरगळीची भावना, त्यातूून त्याची त्याच्या सैन्यावरील हळूहळू निसटत चाललेली पकड आणि मराठ्यांनी ती हेरून रचलेल्या चाली, आखलेली रणनीती यामुळे मराठेशाही औरंगजेबाशी दोन हात करू शकली. नाटकात हा इतिहास यथातथ्यतेनं आला आहे. औरंगजेबालाही ‘संध्याछाया भिवविती हृदया’ असं वाटून आपला अंत जवळ आल्याची जाणीव होते, हे नेमकेपणानं नाटकात येतं.

हेही वाचा

लेखक युवराज पाटील यांनी संभाजी महाराजांनंतरचा इतिहास या नाटकाद्वारे मंचित केला आहे. पण शीर्षकात सुचवलं गेल्याप्रमाणे तो ताराराणींचा इतिहास नाही. त्यांचं त्रोटक चित्र यात आलेलं आहे. त्यांचा पराक्रम, त्यांनी योजलेली रणनीती, आखलेले डावपेच, त्याची परिणीती वगैरे भाग नाटकात येता तर त्या शीर्षकाला काही न्याय मिळाला असता. असो. पण मराठेशाहीचा इतिहास बऱ्यापैकी त्यांनी मांडला आहे. त्या घडवणाऱ्या- बिघडवणाऱ्या व्यक्ती, त्याने इतिहासाला मिळालेलं वळण, या वाटचालीत आलेले हर्ष-खेदाचे क्षण त्यांनी प्रत्ययकारीतेनं दाखवले आहेत. त्यासाठी त्यांनी उर्दूचा केलेला यथायोग्य वापर नाटकाला अस्सलता प्रदान करतो… प्रसंगांतली दाहकता वाढवतो. नाटकात राजाराम महाराज काहीसे दुबळे आणि अननुभवी दाखवले आहेत. संताजींना सेनापतीपदावरून काढून टाकण्यात त्यांची अदूरदृष्टीच दिसून येते. त्यांच्या पश्चात ताराराणी बाईसाहेबांचं खंबीर नेतृत्व ज्या प्रकारे यात समोर यायला हवं होतं त्या अर्थाने ते पुढे येत नाही. नाटकाच्या शेवटाकडे निरनिराळ्या सरदारांना वेगवेगळ्या मोहिमांवर पाठवणं एवढीच त्यांची भूमिका दिसते. त्यांनी स्वत: दाखवलेला पराक्रम इथे येतच नाही. त्यामुळे उत्तरार्धातील मराठेशाहीचा इतिहासच जास्तकरून मनावर ठसतो.

दिग्दर्शक विजय राणे यांनी ऐतिहासिक नाटकाची प्रकृती हेरून पल्लेदार संवादफेक, अभिनिवेशी वाटावी अशा प्रसंगमांडणीबरोबरच संभाजी राजांनंतर मराठेशाहीला आलेली उतरती कळा, त्याला तोंड देताना संबंधितांची झालेली कोंडी, त्यातून मार्ग काढण्याचे त्यांचे अकटोविकटीचे प्रयत्न, मराठा सरदारांना लढ्यास प्रवृत्त करण्यातली उर्जस्वल ओजस्वीता, औरंगजैबाची मावळतीची हतबलता वगैरे गोष्टी नेमकेपणानं सादरीत केल्या आहेत.

राजघराण्यातील अंतर्गत गोष्टी, त्यांतील ताणेबाणे, एकेक किल्ला लढवण्याची शिकस्त, रायगडावरील माघार, राजाराममहाराजांच्या जिंजीकडील प्रस्थानात आलेले अडथळे, पुन्हा जिंजीवरून स्वराज्यात परतताना करावी लागलेली तडजोड, औरंगजेबाचा हळूहळू होत गेलेला भ्रमनिरास आदी प्रसंग दिग्दर्शकाने रंगतदार केले आहेत. पण ज्या ताराराणींवर हे नाटक बेतलं गेलं आहे असा दावा नाटकात केला जातो त्या ताराराणीसाहेबांना संहितेत पुरेसा न्याय दिला गेलेला नाही ही गोष्ट त्यांनी लेखकाच्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. असो.

हेही वाचा

संदेश बेंद्रे यांनी ऐतिहासिक नाटकाला साजेशी नाट्यस्थळं वैविध्यपूर्ण नेपथ्यातून साकारली आहेत. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना नाट्यात्म प्रसंग उठावदार करते. अमीर हडकर यांचं संगीतही नाट्यपूर्णतेत भर घालतं. सिद्धांत घरत यांची साहसदृश्यं नेत्रदीपक आहेत. राहुल सुरते यांनी रंगभूषेतून आणि गणेश लोणारे आणि पूनम भागवत यांनी वेशभूषेतून पात्रांना बाह्यरूप प्रदान केलं आहे. सगळ्या कलाकारांनी आपापली कामं चोख केली आहे. ताराराणी झालेल्या तनिशा वर्दे यांनी त्यांची विजीगिषु वृत्ती, तडफ छान दाखवली आहे. येसूबाईंचा संयत, पण ठाम स्वभाव कृष्णा राजशेखर यांनी नेमकेपणानं टिपला आहे. राजाराममहाराजांचं अननुभवीपण अरुण पंदरकर यांच्या देहबोलीतून दिसून येतं. सुनील गोडसे यांनी मग्रुर, मुत्सद्दी आणि २७ वर्षांच्या मराठेशाहीविरुद्धच्या लढाईने थकलाभागलेला, तरीही पीळ कायम असलेला असा औरंगजेब उत्तम साकारला आहे. उमेश ठाकूर यांचा संताजी आणि हृषिकेश शिंदे यांचा धनाजी भाव खाऊन जातात. मुकूल देशमुख यांनी धिप्पाड देहाचा झुल्फिकार छान वठवला आहे. गणोजी झालेले निलेश नाईक एकाच प्रसंगात उठून दिसतात. सिद्धी घैसास (जानकीबाई), मोहिका गद्रे (झीनत), प्रसाद धोपट (असदखान), तेजस भोर (खंडोजी), चेतन मस्के (शंभूराजे) आदींनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.





Source link

‘देवमाणूस’ चित्रपटात सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत

0
‘देवमाणूस’ चित्रपटात सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत


प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटातील पहिले गाणे ‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आहे असून लोकप्रिय गायक सोनू निगम यांनी हे गाणे गायले आहे.

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील ‘पांडुरंग’ हे भक्तीगीत सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले हे गाणे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून प्रसाद मदपुवार यांनी लिहिले आहे. ‘पांडुरंग’ हे माझे पहिले वारीवरचे गाणे आहे आणि या गाण्याचा एक भाग होऊ शकलो याचा मला आनंद वाटतो. जेव्हा रोहन-रोहन यांनी स्टुडिओत मला हे गाणे ऐकवले, तेव्हा या गाण्यातील खरे भाव काय आहेत हे मला समजावून सांगा, असं मी त्यांना सांगितलं होतं. कारण या गाण्यात काही पारंपरिक शब्द आहेत, जे माझ्यासाठी नवीन होते. विठ्ठलाला अर्पण केलेले माझे हे भावपूर्ण गाणे श्रोत्यांच्या हृदयालाही स्पर्श करेल, असा विश्वास सोनू निगम यांनी व्यक्त केला.

तर या गाण्यासाठी सोनू निगम हीच आमची पहिली पसंती होती, असे सांगत त्यांच्याबरोबर हे गाणे ध्वनीमुद्रित करण्याची प्रक्रियाच आमच्यासाठी अद्भुत होती, अशी भावना संगीतकार रोहन – रोहन यांनी व्यक्त केली. युनिव्हर्सल म्युझिक इंडियाद्वारे वितरित केले जाणारे हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





Source link

चिनूचा प्रामाणिकपणा

0
चिनूचा प्रामाणिकपणा



चिनू नावाचा एक मुलगा होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूकच होती. त्याचे वडील भाजी विकायचे. चिनू हुशार होता. एके दिवशी तो त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष एका काटलेल्या पतंगाकडे गेलं. चिनू धावण्यातही पटाईत होता. तो क्रिकेट अर्धवट सोडून पतंगाच्या मागे धावला आणि तो पतंग चिनूला मिळालाही. त्या पतंगावर ड्रॅगनचं चित्र होतं. चिनू धावतच त्याच्या बाबांकडे गेला. त्याचे बाबा भाजी विकत होते. त्याने बाबांना तो काटलेला पतंग आपल्याला कसा मिळाला याची सगळी गोष्ट सांगितली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. त्याने तो पतंग भाजीच्या गाडीच्या खाली असलेल्या जागेत ठेवला. थोड्या वेळाने त्यांच्या गाडीवर एक बाई भाजी विकत घेण्यासाठी आल्या. तिच्या मागोमाग एक लहान मुलगा आला. तो त्या बाईंना रडवेल्या सुरात म्हणाला, ‘‘आई, माझी पतंग एका मुलानं काटली.’’ त्यावर आई म्हणाली, ‘‘तुझ्या बाबांनी पाच पतंग आणले आहेत. त्यातली एक घे.’’

चिनू ते सगळं ऐकत होता. चिनू त्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘‘माझ्याकडे एक पतंग आहे, बघ बरं तो तुझाच आहे का?’’

तो पतंग पाहताच मुलगा म्हणाला, ‘‘हा पतंग माझाच आहे.’’ पण त्याला आश्चर्य वाटलं, चिनूला मिळालेला हा पतंग तो आपल्याला का देत आहे. त्याने तो पतंग चिनूकडेच ठेवायला सांगितला. त्या दिवसापासून ते दोघे चांगले मित्र झाले.

धनश्री अतुल चौधरी,

इयत्ता- सहावी, सुभेदारवाडा, कल्याण



Source link

वाळव्यात विद्यार्थ्याची आत्महत्या; शिक्षकाच्या घरावर दगडफेक

0
वाळव्यात विद्यार्थ्याची आत्महत्या; शिक्षकाच्या घरावर दगडफेक


सांगली : वाळव्यात अकरावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. या मुलाने वर्गात शिक्षकाने अवमान केल्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याच्या समजातून मुलाच्या नातेवाइकांनी संबंधित शिक्षकाच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रकार रात्री घडला.

विराज शिवाजी डकरे (वय १७) या मुलाने शुक्रवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयाच्या नजरेस आल्यानंतर त्याला तत्काळ इस्लामपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समजताच त्याच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांना धक्का बसला. वर्गात एका शिक्षकाने त्याला अवमानकारक वागणूक दिली. या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असे त्याच्या मित्रांचा समज झाला. ही माहिती कुटुंबातील लोकांना समजताच वाळवा-इस्लामपूर रस्त्यावर असलेल्या संबंधित शिक्षकाच्या घरावर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. यामध्ये खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर दारासमोर लावण्यात आलेल्या शिक्षकाच्या दुचाकीची दगडाने तोडफोड करण्यात आली. शिक्षकाच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच संबंधित शिक्षकाच्या घराजवळ पोलीस बंदेाबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा

याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत अशी नोंद करण्यात आली असून, मुलाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. घरावर दगडफेक झाल्याप्रकरणीही कोणतीही तक्रार दाखल नसल्याचेही पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.





Source link

sangli police destroy 813 kg drugs of rupees 84 lakhs सांगलीत अमली पदार्थांचा साठा नष्ट

0
sangli police destroy 813 kg drugs of rupees 84 lakhs सांगलीत अमली पदार्थांचा साठा नष्ट


सांगली : जिल्ह्यात विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेला ८४ लाखांचा ८१३ किलो अमली पदार्थांचा साठा रविवारी पोलीस बंदोबस्तात जाळून भस्म करण्यात आला. शासनाच्या कृती आराखड्यानुसार पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्ह्यांतील मुद्देमाल १०० दिवसांत नाश करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या ९ पोलीस ठाण्यांकडील अमली पदार्थांची लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील गेल्या ३९ वर्षांतील जप्त अमली पदार्थांचा साठा पोलीस विभागाकडील गोदामात होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी न्यायालयात पाठपुरावा करून मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले.

जिल्ह्यातील ९ पोलीस ठाण्यांत दाखल १७ गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला, पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन या अमली पदार्थांचा मुद्देमाल मिरज औद्योगिक वसाहतीतील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी येथे रविवारी बॉयलरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला. ८१३ किलो २३२ ग्रॅम वजनाचे ८४ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ भस्म करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.





Source link

Kolhapur ichalkaranji teacher dies in accident इचलकरंजीत अपघातात शिक्षकाचा मृत्यू

0
Kolhapur ichalkaranji teacher dies in accident इचलकरंजीत अपघातात शिक्षकाचा मृत्यू


कोल्हापूर : एसटी बसखाली सापडून शिक्षक ठार झाल्याची घटना शनिवारी इचलकरंजीत घडली. विजयकुमार बाळासो चौगुले ( रा. यड्राव ) असे या शिक्षकाचे नाव आहे.

शनिवारी सकाळी हा अपघात झाला. इचलकरंजीकडे येणाऱ्या एसटीला ओव्हर टेक करत दुचाकीस्वार चौगुले जात होते. तेथे महापालिकेचे रस्ता बांधणीचे काम चालू आहे. विजेच्या खांबाच्या तुटलेल्या तारेमध्ये दुचाकी अडकल्याने दुचाकीचालक चौगुले खाली पडले. याचवेळी मागून एसटी बस येत होती. तिच्या मागील चाकाखाली ते सापडले. डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले.

येथे रस्ता बांधणीचे काम अगदी संथगतीने चालू आहे. त्याचा दर्जा निकृष्ट आहे. अनेक वाहने खडी, वाळूमुळे घसरून पडून छोटे अपघात, वाद निर्माण झाले आहेत. पण कुणीच गंभीरपणे याची दखल घेत नाहीत, असा प्रवासी, वाहनधारक, कार्यकर्त्यांचा आक्षेप यावेळी दिसून आला.





Source link

MP Supriya Sules Mother in law Anni Sule Passes Away Inform by Social Media

0
MP Supriya Sules Mother in law Anni Sule Passes Away Inform by Social Media


राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सासू ॲनी सुळे यांचं निधन झालं आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, “माझ्या सासू ॲनी सुळे या आम्हाला काल सोडून गेल्या. त्या एक खंबीर, कणखर आणि प्रतिष्ठित महिला होत्या. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्याप्रती शोक व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते.”

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या काकी भारती पवार यांचंही दोन आठवड्यांपूर्वी निधन झालं. या दुःखातून सावरत असतानाच त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं आहे.





Source link