


Crime Thriller Movies On OTT: सध्या ओटीटीवर क्राइम-थ्रिलर चित्रपट व सीरिज पाहण्याची क्रेझ लोकांमध्ये दिसून येते. प्रेक्षकांना क्राइम-थ्रिलर कलाकृती आवडत असल्याने त्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. अशाच काही कलाकृतींबद्दल जाणून घेऊयात.
विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेल्या ५ सर्वोत्तम चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात. हे चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं डोकं चक्रावेल. या सिनेमांचा सस्पेन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. या चित्रपटांना आयएमडीबीवर उत्तम रेटिंग मिळालं आहे.
Joseph on OTT : ‘जोसेफ’ हा थ्रिलर चित्रपट आहे, जो २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जोजू जॉर्जने महत्त्वाची भूमिका केली आहे. हा सिनेमा एका निवृत्त पोलिसावर आधारित आहे जो एका प्रकरणात अडकतो. एकदा तुम्ही हा चित्रपट पाहण्यास सुरुवात केली की, तो तुम्हाा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. याला IMDb वर ८ रेटिंग मिळाले असून तो प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
Villain on OTT : २०१७ मध्ये रिलीज झालेला ‘विलेन’ हा मल्याळम क्राईम-ॲक्शन चित्रपट आहे. मोहनलाल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच राशी खन्ना, हंसिका मोटवानी यांच्यासह अनेक स्टार्स यात आहेत. चित्रपटाची कथा एडीजीपी मॅथ्यू मंजूरन यांच्याभोवती फिरते, जे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. ते काही काळ सुट्टी घेतल्यानंतर राजीनामा देतात. पण एका प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना पुन्हा नोकरीवर बोलावलं जातं. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.१ टक्का रेटिंग मिळाले असून तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
Mumbai Police on OTT: मुंबई पोलीस हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, जो २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. रोशन एंड्रयूज दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनने काम केले होते आणि सिनेमा लोकांना खूप आवडला होता. याला IMDb वर ७.९ रेटिंग मिळाले आहे आणि तो तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
Cold Case on OTT : ‘कोल्ड केस’ हा एक हॉरर, थ्रिलर आणि खून रहस्यपट आहे. यात पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात एका मच्छिमाराला मृत व्यक्तीची कवटी सापडते, तपासणी केल्यानंतर असं समजतं की कवटीचा सांगाडा २५ ते ३० वर्षे वयाच्या इवा मारिया नावाच्या मुलीचा आहे. प्रकरणाचा तपास सुरू होतो आणि शेवटी धक्कादायक सत्य समोर येतं. आयएमडीबीवर ६.१ रेटिंग असलेला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
Identity on OTT: टोविनो थॉमस आणि त्रिशा कृष्णन यांचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘आयडेंटिटी’ यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या सिनेमाची कथा आणि सस्पेन्स तुमचं मन जिंकेल. या चित्रपटाला IMDb वर ७.४ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही तो ZEE5 वर पाहू शकता.




No match is being played.
Apr 14, 2025 | Match 30
Indian Premier League, 2025
CSK (20 ov) 166/7 | VS | LSG 168/5(19.3 ov) |
| Chennai Super Kings beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
Apr 13, 2025 | Match 29
Indian Premier League, 2025
MI (20 ov) 205/5 | VS | DC 193(19 ov) |
| Mumbai Indians beat Delhi Capitals by 12 runs | ||
| Full Scorecard → | ||
Apr 13, 2025 | Match 28
Indian Premier League, 2025
RCB (20 ov) 173/4 | VS | RR 175/1(17.3 ov) |
| Royal Challengers Bengaluru beat Rajasthan Royals by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||

Gold Rate Today In Marathi: भारतात सोनं हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. भारतीय कुटुंब व्यवस्थेत लग्नासाठी सोनं करून ठेवणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. गेल्या कित्येक पिढीपासून ही प्रथा सुरू आहे. अनेक कटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही सोन्याचे दागिने आणि सोन्याचे शिक्के देण्याची परंपरा आहे. आर्थिक अनिश्चित्तता आणि सुरक्षित गुंतवणूकीसाठी सोनं हा सुरक्षित पर्याय मानला जातो. सध्या जगावर अनिश्चिततेचं सावट आहे. जगात अनेक ठिकाणी आर्थिक युद्ध आणि जागतिक मंदीची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. अनेक मोठ्या शहरांत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. जर तुम्हीदेखील सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर जाणून घ्या आजचे दर काय आहेत.
एका अहवालानुसार, सोनं या वर्षाअखेर 1.30 लाखांचा आकडा पार करु शकतो. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आर्थिक मंदीचा फटका बसू नये यासाठी सोन्याच्या मागणी वाढली आहे. त्याचाच परिणाम सोन्याच्या दरात होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीने उच्चांकी दर गाठला आहे. त्यामुळं त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरदेखील होताना दिसत आहे.
मंदीचा धोका, वाढत्या रोखे उत्पन्न आणि आर्थिक अस्थिरतेबद्दलच्या चिंता या कारणांमुळं गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित करत आहेत. वैयक्तिक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त, संस्था आणि मध्यवर्ती बँकांकडूनही सोन्याची मागणी वाढत आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2020 नंतर सोन्यावर आधारित एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली. केंद्रीय बँका, विशेषतः उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात अधिक सोने खरेदी करत आहेत.
मुंबईत काल 18 कॅरेट सोन्याचे दर 7,164 प्रति ग्रॅम होती तर आज प्रतिग्रॅम 7,135 रुपयांवर पोहोचली आहे. प्रतितोळा सोनं 71,470 रुपयांवर पोहोचलं आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत काल 8,755 रुपये प्रति ग्रॅम होती. तर आज मुंबईच्या बाजारपेठेत 8,720 रुपये प्रतिग्रॅम आहे. तर प्रतितोळा 87,350 रुपयांवर 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत काल प्रतिग्रॅम 9,566 रुपये होती. तर, आज प्रतिग्रॅम 9,533 रुपयांवर पोहोचले आहे. प्रतितोळा सोनं 95,330 रुपयांवर पोहोचले आहे.

NCERT Books Name : देशात सध्या हिंदी भाषेवरून दक्षिणेकडील राज्यांचा केंद्र सरकारशी संघर्ष चालू आहे. अशातच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) त्यांच्या नवीन इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांना रोमन लिपीत हिंदी नावं दिली आहेत. यामध्ये इंग्रजी पुस्तकांचाही समावेश आहे. पुस्तकांना हिंदी शीर्षके दिल्यामुळे केरळमध्ये वाद चालू झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा प्रकार आहे. एनसीईआरटीची ही कृती हिंदीतर (बिगर हिंदी) भाषिक राज्यांमध्ये हिंदीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दिसतोय. तमिळनाडू सरकारने आधीच पाठ्यपुस्तकांना विरोध केला आहे.
उदाहरणार्थ इयत्ता सहावीचं इंग्रजी पाठ्यपुस्तक पूर्वी हनीसकल या नावाने ओळखलं जात होतं. आता त्या पुस्तकाला ‘पूर्वी’ असं नाव देण्यात आलं आहे. ‘पूर्वी’ हा हिंदी शब्द असून पूर्व दिशेच्या अर्थाने वापरला जातो. हा शास्त्रीय संगीतातील एक राग देखील आहे. इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकाला मृदुंग आणि तिसरीच्या पुस्तकाला संतूर असं नाव देण्यात आलं आहे. ही दोन्ही भारतीय वाद्ये आहेत. गणिताच्या पुस्तकासंदर्भातही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. सहावीच्या गणिताच्या पुस्तकाला पूर्वी मॅथेमॅटिक्स असं नाव होतं, जे आता गणित नावाने प्रकाशित करण्यात आलं आहे.
दरम्यान, केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी एनसीईआरटीच्या या निर्णयाला विरोध केला आहे. इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांना हिंदी शीर्षके देण्याच्या निर्णयावर त्यांनी जोरदार टीका केली. हा तर्कहीन निर्णय असल्याचं शिवनकुट्टी यांनी म्हटलं आहे. अनेक दशकांपासून प्रचलित असलेल्या इंग्रजी शीर्षकांऐवजी मृदुंग व संतूरसारख्या हिंदी शीर्षकांचा वापर करणे हा अन्याय आहे. केरळच्या भाषिक विविधतेचं जतन करण्याच्या, प्रादेशिक व सांस्कृतिक स्वायत्ततेला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या विरोधात आहे.
मंत्री शिवनकुट्टी म्हणाले, “इंग्रजी शीर्षके विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता व समज वाढवतात. मात्र, एनसीईआरटी हिंदी शीर्षके लादत आहे. एनसीईआरटीचा हा निर्णय संघराज्यीय तत्त्वे व संवैधानिक मूल्यांना कमजोर करणारा आहे. एनसीआरटीने त्यांच्या निर्णयाचा आढावा घेऊन तो मागे घ्यावा. तसेच शिवनकुट्टी यांनी इतर राज्यांना एनसीईआरटीच्या या निर्णयाविरोधात, हिंदी लादण्याविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

Eknath Shinde and Amit Shah Meeting : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी (१३ एप्रिल) मुंबईत भेट घेतली. महायुतीतील काही तक्रारी मांडण्यासाठी शिंदे यांनी ही भेट घेतल्याची माहिती आहे. सलग तीन दिवसांत तीन वेळा शिंदे गटाच्या प्रमुखांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह हे शनिवारी रायगड किल्ल्यावर आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी एकनाथ शिंदेंनी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर त्यांची भेट घेतली.
विशेष बाब म्हणजे शिंदेंनी ज्यावेळी अमित शाह यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये होते; तर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये बंड दाराआड नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत तर्क-वितर्क केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे कोणतीही तक्रार केली नाही, असं भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शाह यांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“महायुतीत धुसफूस नाही खूश खूश आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत आणि काम करणारे लोक तक्रारींचे रडगाणे गात नाहीत. काय असेल ते बसून चर्चेतून सगळे सुटेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. “अमित शाह हे एनडीए आणि महायुतीचे प्रमुख नेते आहेत. त्यांना राज्यात आणि मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची मला माहिती द्यायची होती म्हणून मी त्यांची भेट घेतली, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुतीतील नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल, तर ते तिकडे तक्रार करतील, असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील. आमचे संबंध तेवढे चांगले आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
आणखी वाचा : Congress Strategy : काँग्रेससमोर कोणकोणती आव्हानं? गुजरातमध्ये भाजपाला कसं रोखणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे विविध कारणांमुळे त्यांच्या सहयोगी मित्रपक्षांवर नाराज आहेत. महायुतीत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याचं शिंदे यांनी अमित शाह यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेमुळे भाजपाला तीन वर्षांपूर्वी सत्ता मिळाली होती आणि शिंदे गटाच्या आमदारांचे सध्याचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक असल्याने शिवसेनेला सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक वाटा हवा, अशी आग्रही मागणीही शिंदे यांनी शाह यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेच्या आमदारांना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत समान निधी मिळत नाही, त्यांची कामे होत नाहीत. रायगड व नाशिकचे पालकमंत्री पदाची मागणी करूनही आमची दखल घेतली जात नाही, असं गाऱ्हाणंही शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली असलेल्या व्यक्तींना मंत्र्यांचे खासगी सहायक (PA) किंवा विशेष कार्याधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळेही शिंदे गट नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयएएस अधिकारी संजय सेठी यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे महामंडळावरील अधिकार कमी झाल्याचं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले होते. शिंदे गटाच्या तीव्र विरोधानंतर अखेर फडणवीस यांना आपला निर्णय बदलावा लागला आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रं द्यावी लागली.
एकनाथ शिंदे यांची कथित नाराजी दूर करण्यासाठी आणि महायुतीत समन्वय राखण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार आहे, असं भाजपाच्या एका नेत्यानं सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधीन असलेल्या विभागातील सर्व फायली अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच पाठवल्या जात आहेत, असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडावा लागला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांचे बरेच अधिकार संपुष्टात आले. त्यामुळे आपण प्रशासकीय व्यवस्थेपासून वेगळे झाल्याचा समज त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा : Ambedkar Jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाभोवती कसं फिरतंय देशाचं राजकारण?
दरम्यान, अर्थ विभागाने पुरेसा निधी न दिल्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याची तक्रारही शिंदेंनी अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती आहे. परिवहन खातं हे शिवसेनेकडे असल्याने यामुळे पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसत असल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंनी अमित शाहांकडे त्यांच्या नगरविकास खात्यात सुरू असलेल्या हस्तक्षेपांबाबतही तक्रार केली आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णय बदलले जात असल्याचंही शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. “शिंदेंना असं वाटतंय की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांना जाणूनबुजून डावलण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही महायुतीतील एका सूत्रानं सांगितलं.
भाजपामधील एका पदाधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, “शिंदेंना जून २०२२ मध्ये मुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे संपूर्ण अधिकार होते. मात्र, नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीतील पक्षांचं संख्याबळ पाहता, त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं. त्यामुळे आता त्यांना पूर्वीसारखे अधिकार अपेक्षित ठेवता येणार नाहीत. भाजपाला जवळजवळ बहुमत मिळाल्यामुळे फडणवीस यांच्यावर चांगल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्ष किंवा आमदारांना खूश करण्यासाठी मनमानी निर्णय घेऊ शकत नाहीत,” असंही भाजपाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरूनही महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जानेवारीमध्ये महायुती सरकारनं राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि दादासाहेब भुसे यांनी अनुक्रमे रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पदाची मागणी केली होती. मात्र, ही पदं राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि भाजपाचे गिरीश महाजन यांना दिली गेली. शिंदे गटानं याविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीसांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती दिली. तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर आमचा कायदेशीर हक्क असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. दरम्यान, महायुतीतील कथित वाद लवकर सुटणार की वेगळंच वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
