




बिहारच्या तीन प्रमुख राजघराण्यांपैकी एक असलेल्या बेतिया राजची राणी जानकी कुंवर आज पुन्हा तिच्या मृत्यूच्या 71 वर्षांनंतर चर्चेत आली आहे. 1954 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे असलेल्या कोठीत राणी जानकी कुंवर यांचं निधन झालं. राणीच्या मृत्यूनंतर कोर्ट ऑफ वॉर्ड्सने केवळ त्यांची हवेली आणि जमिनीचा ताबा घेतला नाही तर तिजोरीही काढून घेतली. ती तिजोरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्रिवेणी शाखेत ठेवण्यात आली होती. आता बिहार महसूल परिषदेचे पथक प्रयागराजला पोहोचले असून बेतिया राणीच्या मालमत्तेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या तिजोरीत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असल्याचा म्हटलं जातं आहे.
ही तिचं बेटिया राणीची आहे जिचा उल्लेख अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या ‘अधूरे ख्वाब‘ आणि ‘बसेरे से दूर‘ या चित्रपटात केला आहे. तर ही बेतिया राणी कोण होती तर 1883 मध्ये बिहारमधील सर्वात मोठ्या राजघराण्यातील बेतिया राजाचे महाराजा राजेंद्र किशोर सिंह यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचा मुलगा हरेंद्र किशोर सिंहासनावर विराजमान झाला. महाराज हरेंद्र किशोर हे एक कुशल नेते आणि प्रशासक होते. ब्रिटिश सरकारनेही त्याची ताकद मान्य केली होती.
1884 मध्ये त्यांना महाराजा बहादूर ही पदवी देण्याचे हेच कारण होते. इतकंच नाही तर त्या काळात त्यांना बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर सर ऑगस्टस रिव्हर्स थॉम्पसन यांच्याकडून खिलाफत आणि सनद देखील देण्यात आली. त्यानंतर 1 मार्च 1889 रोजी त्यांना भारतीय साम्राज्याच्या सर्वात प्रतिष्ठित ऑर्डरचा नाईट कमांडर बनवण्यात आलं. एवढी प्रसिद्धी आणि कामगिरी असूनही, महाराजा हरेंद्र सिंह यांची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. वडील जिवंत असताना त्यांनी शिव रत्न कुंवर हिच्याशी लग्न केलं पण ते वडील होऊ शकले नाहीत म्हणून काही दिवसांनी त्यांनी जानकी कुंवर हिच्याशी लग्न केले. यानंतरही त्यांना मुलं झालं नाही आणि अखेर 26 मार्च 1893३ रोजी बेतिया राजाचा कोणताही वारस न सोडता त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्युनंतर, महाराणी शिवरत्न कुंवर यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली, मात्र त्यांचेही 24 मार्च 1896 रोजी निधन झालं. अशा परिस्थितीत, त्यांची दुसरी राणी जानकी कुंवर संपूर्ण शाही मालमत्तेची वारस बनली. राणी जानकी कुंवर खूप सुंदर होती. राणीचे ओठ आणि गाल अतिशय सुंदर, तिचे डोळ्यांवरुन नजर हटत नव्हती. असं म्हटलं जातं की जेव्हा महाराजा हरेंद्र सिंह यांनी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांचं भान हरपलं होतं. हरिवंशराय बच्चन देखील बेतिया राणीच्या सौंदर्यावर अनेक कविता केल्या आहेत.
हे सर्व असूनही, त्यांच्याकडे राज्य कारभार हाताळण्याची क्षमता नव्हती. म्हणून ब्रिटिश राजवटीने त्याच्या राज्य मालमत्तेचा ताबा घेतला. यानंतर, महाराणी जानकी कुंवर बेतियाहून तत्कालीन अलाहाबाद, म्हणजेच आजच्या प्रयागराज इथे आल्या आणि येथे त्यांनी एक भव्य हवेली बांधली आणि तिथे राहू लागल्या. 27 नोव्हेंबर 1954 रोजी त्यांचे निधन झालं. त्यानंतर ही हवेली आणि त्यांची मालमत्ता कोर्ट ऑफ वॉर्ड्सने ताब्यात घेतली. सुमारे 22 बिघा जमिनीवर बांधलेला त्यांचा वाडा अजूनही येथे आहे, ज्याबद्दल हरिवंश राय बच्चन यांनी कवितेत उल्लेख केला आहे. ही हवेली सध्या सरकारच्या ताब्यात आहे.

Dhaniram Mittal : गुन्हेगार न्यायाधीश बनला आणि त्याने 2 महिन्यात 2000 कैद्यांची जैलमधून सुटका केली… हा एखाद्या चित्रपटाचा फिल्मी सीन वाटतोय ना. मात्र, ही भारतातील धनीराम मित्तल नावाच्या चोराची खरी खुरी आणि शॉकिंग स्टोरी आहे. विशेष म्हणजे धनीराम मित्तल हा असा गुन्हेगार आहे जो कधीच पोलिसांच्या हाती लागला नाही.
कायद्याची पदवी, हस्तलेखन तज्ज्ञ आणि ग्राफोलॉजिस्ट अशी उच्चशिक्षित पार्श्वभूमी असतानाही धनीराम याने चोरीचा मार्ग निवडला होता. चोरी हे त्याच्यासाठी पॅशन होते. 1939 मध्ये हरियाणामधील भिवानी येथे धनीराम मित्तल याचा जन्म झाला. धनिराम याने दिल्ली, हरियाणा, राजस्थान, चंडीगड आणि पंजाब या राज्यांमधून सुमारे 1 हजारांहून अधिक कार चोरल्याचे सांगितले जाते. धनीराम हा एक सराईत चोर होता. दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि आसपासच्या परिसरातून दिवसाढवळ्या तो चोरी करायचा. धनिराम याच्या विरोधात फसवणुकीचेही 150 हून अधिक गुन्हे दाखल होते.
धनीरामचा कारनामा जाणून घ्यायचा असले तर आपल्याला 1970 सालात जावे लागेल. झज्जरच्या अतिरिक्त न्यायाधीशांविरोधात विभागीय चौकशीचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये छापून आले होते. त्यानंतर धनीराम याने असा प्लान बनवला ज्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. अतिरिक्त न्यायाधीशांबद्दलची सर्व माहिती गोळा केली. कुठूनतरी त्याने त्यांचा पत्ताही शोधून काढला. त्याने एक पत्र लिहून ते सिलबंद लिफाफ्यात घालून त्यावर हायकोर्टाच्या रजिस्ट्रारचा शिक्का मारला. तसेच ते चौकशी सुरू असलेलेल्या न्यायाधीशाच्या घरी पाठवले.
धनीराम याने न्यायाधीसांना 2 महिन्यांच्या सक्तीच्या रजेचे पत्र पाठवले होते. पत्रावर हायकोर्टाच्या रजिस्ट्रारचा शिक्का होता. धनीराम हस्तलेखनाची नक्कल करण्यात पटाईत होता. न्यायाधीशांनाही हे पत्र खरं वाटलं. आदेश मानून न्यायाधीश सुट्टीवर गेले. धनीरामने जसे न्यायाधीशांना बनावट पत्र पाठवले तसेच बनावट पत्र कोर्टाला पाठवलं. अतिरिक्त न्यायाधीशांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन न्यायाधीश पदभार स्वीकारतील असे लिहिले होते. दुसऱ्याच दिवशी धनीराम न्यायाधीशांचा पोशाख घालून न्यायालयात पोहोचला. कोर्टातील कर्मचारी वर्गाने त्याला खरा न्यायाधीश मानत होते.
न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती चोर आहे हे कुणाच्याच लक्षात आले नाही. 40 दिवस धनीराम याने धुमाकूळ घातला. कोर्टात हजारो खटल्यांची सुनावणी करताना धमीरामने 2740 आरोपींना जामीन दिला. एवढंच नाही तर स्वत:विरोधातील खटल्याची स्वत:च सुणावणी देखील केली. स्वत:ची त्याने निर्दोष मुक्तता करून घेतली. आपला कानामा उघड होण्याआधीच धनीराम तिथून पसार झाला. धमीराम कधीच पोलिसांच्या हाती लागला नाही. एप्रिल 2024 मध्ये धनीरामचा मृत्यू झाला.


मुलीचं लग्न ठरलेलं असतानाच 6 एप्रिलला अनिता आपला होणारा जावई राहुलसोबत पळून गेली होती.
Source link

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने आता पुन्हा एकदा नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.विदर्भाच्या वातावरणात द्रोणिका (वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा) व चक्रवातीय वारे सक्रिय आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर आर्द्र वारे विदर्भात येत आहेत. यामुळे विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, काही जिल्ह्यांमध्ये विजांसह व जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ४० ते ५० किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील तापमान अन्य दिवसांच्या तुलनेत जास्त राहण्याची शक्यता आहे. उशिरा रात्री पावसाची शक्यता असल्यामुळे दिवसाच्या तापमानावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, पुढील पाच दिवसांसाठी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. तो आता कमजोर झाला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिम भागापासून विदर्भाच्या उत्तर भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सध्या राज्यातील बहुतेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या आसपास आहे. तरीही, किनारपट्टी भागातील तापमानात काहीशी घट नोंदवली गेली. विदर्भाव्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील काही भागात उद्या अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.
विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यात उद्या, तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी उष्ण आणि दमट हवामान राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी तर बीड जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी तसेच लातूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला. पुणे, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामान असेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

