Friday, July 24, 2026
Home Blog Page 397

वैभववाडीतील सालवा डोंगर आगीमुळे दुर्मिळ जैवविविधतेला धोका

0
वैभववाडीतील सालवा डोंगर आगीमुळे दुर्मिळ जैवविविधतेला धोका



लोकसत्ता वार्ताहर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात विपुल प्रमाणात जैवविविधता, पशु पक्षी आणि जीवसृष्टी आहे त्यामुळे पर्यावरणीय संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. सध्या वैभववाडी डोंगरात आग धुमसत असल्याने जीवसृष्टी, जैवविविधतेला धोकादायक बनले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील शिराळे, सालवा डोंगर यांचा समावेश होतो.वैभववाडीच्या मध्यभागी वसलेला, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि सात गावांचा रक्षणकर्ता असलेला सालवा डोंगर पर्यावरणीय व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या भाग आहे. दोन दिवसांपूर्वी येथील नाजूक परिसंस्था विनाशकारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे असे दिसून येते.

अशा दुर्मिळ पर्यावरणीय संपत्तीचे संवर्धन करण्याचे आवाहन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांनी केले आहे. काही वेळा नकळतपणे तर काही वेळा अज्ञात व्यक्तीकडून असे आगीचे प्रकार घडतात. या डोंगरातील घाबरलेले वन्यजीव घाबरून पळून जात आहेत आणि असंख्य दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी एकतर विस्थापित किंवा नष्ट होऊ शकतात.

सालवा डोंगराच्या अनेक नैसर्गिक खजिन्यांपैकी सेरोपेगिया अनंती ही एक दुर्मिळ वनस्पती प्रजाती आहे. ती या ठिकाणावरून प्रथम शोधली गेली आणि वर्णन केली गेली. सेरोपेगिया अनंतीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सालवा डोंगराचे वनस्पतिशास्त्रीय महत्त्व प्रचंड आहे. या अश्या वणव्या मुळे या सारख्या दुर्मिळ वनस्पती किंवा प्राणी यांना धोका होऊ शकतो.

या भागात किंवा परिसरात सामुदायिक जागरूकता आणि प्रदेशाच्या अद्वितीय जैवविविधतेसाठी मजबूत संरक्षणाची तातडीची गरज असल्याचे मत वैभववाडी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व वनस्पती अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धक डॉ.विजय पैठणे व सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा.श्री. एस. एन. पाटील यांनी व्यक्त केले आहे.



Source link

Maharashtra hindi language compulsory news in marathi

0
Maharashtra hindi language compulsory news in marathi


Hindi made compulsory as 3rd language in Maharashtra Schools: मराठीला महाराष्ट्रात तरी स्थान मिळालंय का?.. असा प्रश्न आज समाजाच्या अनेक स्तरांमधून विचारला जात आहे. नाही म्हटलं तर कारणही तसंच आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठीला होणारा उघड विरोध… कधी भर बाजारात तर कधी वेगवेगळ्या कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मराठी भाषेचा वापर करणार नाही, असं छातीठोकपणे सांगितलं जात आहे. मात्र, आता त्याच वादात तेल ओतण्याचे काम राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे झालं आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आहे. या नव्या शैक्षणिक धोरणावर आता राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि भाजपा त्रि-भाषा धोरणाचा अवलंब का करत आहे? याचाच घेतलेला हा आढावा.

आता हिंदी सक्तीची

‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार असून, अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यातच हिंदी सक्तीने शिकवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. त्याबाबत सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीवरही आता शिक्कामोर्तब झाले आहे.

मनसेकडून विरोध/ Raj Thackeray on Hindi Language

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीपासून मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता हिंदी सक्तीच्या विरोधातही मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. “आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे”, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.

हेही वाचा

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून हिंदीच्या सक्तीला विरोध केला आहे. राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्याकडे पाहिले तर लक्षात येते की, सरकार हा संघर्ष मुद्दामहून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे, असे काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.”

बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. “ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारेच पेटून उठतील. महाराष्ट्रातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळे खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणेघेणे पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही”, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

हिंदीची पुस्तके दुकानात विकू देणार नाही

“महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तके दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी”, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे समर्थन

या सगळ्या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचं समर्थन केलं आहे. फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे. त्याचप्रमाणे देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय आहे. संपर्कसूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी भाषा शिकली पाहिजे.” देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण यापूर्वीच नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आहे. त्यामुळे यात कुठलेही नवीन निर्णय घेतलेले नाहीत. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, हा आपला आग्रह आहे. तसेच देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी ही एक भाषा आहे जी संपर्कसूत्राची भाषा होऊ शकते. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे, अशा प्रकारचा यात आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “कोणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल. अन्य कुठल्या भाषा शिकायच्या असतील तर इतर भाषा शिकण्यापासून कोणलाही मनाई नाही. सर्वांना मराठी आली पाहिजे. तसेच आपल्या देशातील इतर भाषासुद्धा आल्या पाहिजेत. याबाबत केंद्र सरकारने विचार केला आहे. आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी हा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा

हिंदीची सक्ती का?

एकूणच गेल्या काही वर्षांत मराठी भाषकांची संख्या राजधानी मुंबईतच प्रचंड संख्येने घटली आहे. तर दुसऱ्या बाजूला इतर राज्यांमधून येणाऱ्यांची संख्या राज्यभर वाढतच आहे. महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातील अनेक जमिनी या परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कृपाशंकर सिंह. कोकणातील त्यांनी विकत घेतलेला भूखंड हे सर्वश्रुत उदाहरण आहे. मात्र इथे प्रश्न महत्त्वाचा ठरतो तो सत्ताधारी भाजपा त्रि- भाषा धोरणाचा आग्रह का करत आहे. याचे सोपे उत्तर म्हणजे मतदार असे , राजकीय विश्लेषक मानतात. मराठी जनतेचा घटता टक्का आणि परप्रांतीयांचे वाढते प्रमाण हे येणाऱ्या काळात निवडणुकांचे भवितव्य ठरवतील , असे विश्लेषकांना वाटते आहे.
सध्या मराठी भाषकांना विविध ठिकाणी होणारा विरोध वाढला आहे. मांसाहारी म्हणून सोसायटीत जागा नाही हा संघर्षही राजधानी मुंबईत वाढलेला दिसतो. मांसाहारी मंडळी बहुतांश मराठीच आहेत. त्यामुळे इतर भाषक मतदार नजरेसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.



Source link

आई ‘स्टार प्रवाह’वर सासूबाई; तर लेकीचा पहिला सिनेमा! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीची सिनेविश्वात एन्ट्री, पाहा पहिली झलक

0
आई ‘स्टार प्रवाह’वर सासूबाई; तर लेकीचा पहिला सिनेमा! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीची सिनेविश्वात एन्ट्री, पाहा पहिली झलक



rujuta deshmukh daughter sajiri joshi debut as a actress watch promo आई ‘स्टार प्रवाह’वर सासूबाई; तर लेकीचा पहिला सिनेमा! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीची सिनेविश्वात एन्ट्री, पाहा पहिली झलक



Source link

हवामानातील विषमतेचा डहाणू तालुक्यातील मिरची पिकावर परिणाम

0
हवामानातील विषमतेचा डहाणू तालुक्यातील मिरची पिकावर परिणाम



लोकसत्ता वार्ताहर

कासा : डहाणू तालुका चिकूसोबतच वेगवेगळ्या मिरची पिकांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात ११३५ हेक्टर च्या आसपास क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तीव्र उष्णता, ढगाळ वातावरण व पहाटेच्या वेळेस पडणारी थंडी यामुळे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डहाणू तालुक्यात मिरची ११३५ हेक्टर लागवड आहे त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मिरची मिरचीच्या झाडावरील रोगामुळे लाल पडू लागले आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात मिरची उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. लहरी हवामान, त्यात होणारे सततचे बदल आणि मिरची पिकांवर झालेले रोगांचे आक्रमण यामुळे मिरची पीक गंभीर संकटात आहे. परिणामी, अनेक ठिकाणी मिरची लाल पडून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

सध्या डहाणू तालुक्यात थंडी आणि उन्हाचा अचानक होणारा तफावत, यामुळे मिरचीच्या झाडांवर थ्रिप्स, माइट्स आणि व्हाईट फ्लायसारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगांमुळे मिरचीचे झाड सुकत असून, फळांवर डाग पडत आहेत आणि मिरची लालसर रंगात परावर्तीत होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि मिरचीचा दर्जाही खालावला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून थ्रिप्स या किडीने विशेषतः फुलांमध्ये लपून राहून पीक पूर्णतः नष्ट करण्याचा धोका निर्माण केला आहे. या किडीवर नियंत्रण मिळवणं अवघड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात तिखट मिरची, आचारी मिरची आणि भोपळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. एकरी साधारणतः दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादनातून खर्चही निघेल की नाही, अशी चिंता सतावत आहे. डहाणूतील अनेक शेतकऱ्यांनी सध्या मिरची लालसर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिलं असून, हे चिल्ली क्रॉपवर आलेल्या आजाराचं लक्षण असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेत औषध फवारणी आणि हवामानातील स्थैर्यच या संकटावर उपाय होऊ शकतो, असं डहाणू कृषी अधिकाऱ्यांचं मत आहे.

डहाणू तालुका चिकूसोबतच वेगवेगळ्या मिरची पिकांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात ११३५ हेक्टर च्या आसपास क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तीव्र उष्णता, ढगाळ वातावरण व पहाटेच्या वेळेस पडणारी थंडी यामुळे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डहाणू तालुक्यात मिरची ११३५ हेक्टर लागवड आहे त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मिरची मिरचीच्या झाडावरील रोगामुळे लाल पडू लागले आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात मिरची उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. लहरी हवामान, त्यात होणारे सततचे बदल आणि मिरची पिकांवर झालेले रोगांचे आक्रमण यामुळे मिरची पीक गंभीर संकटात आहे. परिणामी, अनेक ठिकाणी मिरची लाल पडून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

सध्या डहाणू तालुक्यात थंडी आणि उन्हाचा अचानक होणारा तफावत, यामुळे मिरचीच्या झाडांवर थ्रिप्स, माइट्स आणि व्हाईट फ्लायसारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगांमुळे मिरचीचे झाड सुकत असून, फळांवर डाग पडत आहेत आणि मिरची लालसर रंगात परावर्तीत होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि मिरचीचा दर्जाही खालावला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून थ्रिप्स या किडीने विशेषतः फुलांमध्ये लपून राहून पीक पूर्णतः नष्ट करण्याचा धोका निर्माण केला आहे. या किडीवर नियंत्रण मिळवणं अवघड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात तिखट मिरची, आचारी मिरची आणि भोपळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. एकरी साधारणतः दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादनातून खर्चही निघेल की नाही, अशी चिंता सतावत आहे. डहाणूतील अनेक शेतकऱ्यांनी सध्या मिरची लालसर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिलं असून, हे चिल्ली क्रॉपवर आलेल्या आजाराचं लक्षण असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेत औषध फवारणी आणि हवामानातील स्थैर्यच या संकटावर उपाय होऊ शकतो, असं डहाणू कृषी अधिकाऱ्यांचं मत आहे.



Source link

व्यापारयुद्धातील चीनचे सर्वांत प्रभावी अस्त्र…‘रेअर अर्थ’! चीनचे दुर्मिळ संयुगांच्या क्षेत्रात वर्चस्व किती निर्णायक?

0
व्यापारयुद्धातील चीनचे सर्वांत प्रभावी अस्त्र…‘रेअर अर्थ’! चीनचे दुर्मिळ संयुगांच्या क्षेत्रात वर्चस्व किती निर्णायक?



China Freezes Rare Earth Exports to America how China s dominance in the field of rare compounds व्यापारयुद्धातील चीनचे सर्वांत प्रभावी अस्त्र…‘रेअर अर्थ’! चीनचे दुर्मिळ संयुगांच्या क्षेत्रात वर्चस्व किती निर्णायक?



Source link

पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांना दिलासा, ३१ डिसेंबरपर्यंत काम करण्यास मुदतवाढ

0
पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांना दिलासा, ३१ डिसेंबरपर्यंत काम करण्यास मुदतवाढ



west Bengal recruitment case supreme court relief to teachers पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांना दिलासा, ३१ डिसेंबरपर्यंत काम करण्यास मुदतवाढ



Source link

Praveen Pardeshi Appointed as Chief Economic Advisor to the Chief Minister Devendra fadnavis महत्त्वाच्या पदप्राप्तीत परदेशी ‘प्रवीण’!

0
Praveen Pardeshi Appointed as Chief Economic Advisor to the Chief Minister Devendra fadnavis महत्त्वाच्या पदप्राप्तीत परदेशी ‘प्रवीण’!


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार, ‘मित्र’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यापाठोपाठ आता विदा (डेटा) धोरणाच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद अशा सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनंतर महायुती सरकारमध्ये प्रभावी अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

राज्याचे नुकतेच ‘स्वतंत्र आधार सामग्री धोरण’ जाहीर करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णय १७ मार्च रोजी काढण्यात आला होता. परंतु त्याऐवजी आता नवीन शासन निर्णय गुरुवारी काढण्यात आला. त्यामध्ये ‘मित्र’ संस्थेचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांची ‘विदा’ धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विविध विभागांच्या आधार सामग्रीत (डेटा) एकवाक्यता यावी, तसेच आधारसामग्रीचे सार्वजनिक वापरांसाठी आदानप्रदान सुलभ व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्याचे आधार सामग्री धोरण बनवण्यात आले.

२५ फेब्रुवारी रोजी आधार सामग्री धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात आली. त्यात १७ मार्च रोजीच्या शासन निर्णयात परदेशी यांना राज्य आधारसामग्री प्राधिकरणाच्या नियामक समितीचे सदस्यपद देण्यात आले होते. नव्याने जारी झालेल्या शासन निर्णयात परदेशी यांना नियामक समितीचे सहअध्यक्ष करण्यात आलेले आहे. इतकेच नाही तर राज्य आधारसामग्री सुकाणू समिती नव्याने स्थापन करण्यात आली असून, ती सुकाणु समिती ‘मित्र’ संस्थेच्या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असणार आहे. परदेशी हे ‘मित्र’ संस्थेचे अध्यक्ष आहेत. परदेशी यांची मुख्य सचिवपदाची संधी हुकली असली तरी लागोपाठ नियुक्त्यामुळे सरकारमध्ये सर्वांत प्रभावी अधिकारी म्हणून ते गणले जात आहेत.

हेही वाचा

उमेदवारीची हुलकावणी

मुख्यमंत्र्यांचे सर्वात विश्वासू अधिकारी म्हणून गणले जाणारे प्रवीण परदेशी यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती. उस्मानाबाद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी निवडणुकीर्पू्वी काही महिने आधी उस्मानाबाद मतदारसंघात सरकारी योजनांची कामे मार्गी लावली होती. परंतु महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला आणि त्यांची उमेदवारीची संधी हुकली.

पदनिर्मिती… छाननीचे अधिकार

● काही दिवसांपूर्वी परदेशी यांची मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लगारपदी नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे परदेशी यांच्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले आहे.

● परदेशी यांना मंत्रिमंडळासमोर वित्त विभागाने सादर करावयाच्या सर्व प्रस्तावांची छाननी करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. या निर्णयाने अजित पवार यांच्या वित्त खात्यात परदेशी यांची घुसखोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.



Source link

Horoscope For Mesh To Meen Zodiac Signs On 18 April 2025

0
Horoscope For Mesh To Meen Zodiac Signs On 18 April 2025



Horoscope For Mesh To Meen Zodiac Signs On 18 April 2025 | शुक्रवारी जुळून येतोय परिघ योग; कोणत्या राशींना मिळणार कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य



Source link

loksatta editorial on waqf amendment act central government supreme court stay अग्रलेख : ‘वक्फ’ करता जो वफा…

0
loksatta editorial on waqf amendment act central government supreme court stay अग्रलेख : ‘वक्फ’ करता जो वफा…


स्वत:च्या कायद्यास स्वत:च स्थगिती मागण्याची वेळ केंद्र सरकारवर आली; कारण वक्फ कायद्याचा हेतू सांगितला जात होता तसा नव्हता…

‘वक्फ’ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आणि त्यास तत्परतेने राष्ट्रपतींची मंजुरीही मिळाल्यानंतर ‘लोकसत्ता’ संपादकीयात (‘‘वक्फ’ने किया…’, ४ एप्रिल) या कायद्यातील काही मुद्द्यांच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ते मुद्दे बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडले आणि संयुक्त संसदीय समिती, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती इत्यादींनी मंजूर केलेल्या कायद्यातील काही तरतुदींस हंगामी स्थगिती दिली जात असल्याची नामुष्की सहन करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली. या कायद्यास संपूर्ण स्थगिती देऊ नये यासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. संजय कुमार आणि न्या. केव्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर केंद्राच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी ‘‘आगामी सात दिवस ‘वक्फ’बाबत ‘जैसे थे’ परिस्थिती राखली जाईल’’ अशी हमी दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ‘आगामी सुनावणी’पर्यंत हा आदेश प्रसृत केला. असे होणे अटळ होते. याचे कारण हा कायदा केला जाण्यामागील केंद्राचे उद्दिष्ट. त्यावर पुन्हा नव्याने भाष्य करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक कृतीमागील कार्यकारणभाव समजून घेणे महत्त्वाचे.

या कायद्यातील तीन मुद्द्यांच्या वैधानिकतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने नि:संदिग्धपणे प्रश्न उपस्थित करत त्यांना स्थगिती देण्याचे बुधवारच्या सुनावणीत सूचित केले होते. वक्फ-वहिवाट (वक्फ-बाय-यूजर) बेदखल करण्याचा सरकारचा अधिकार, बिगर- मुसलमानांचा वक्फ मंडळावरील नियुक्तीचा अधिकार आणि जिल्हाधिकाऱ्यांस ‘वक्फ’चा फेरविचार करण्याची या कायद्याद्वारे दिली जात असलेली मुभा हे ते तीन मुद्दे. वक्फ-वहिवाट हा मुद्दा जुन्या, पुरातन इस्लामी संस्थांस लागू होतो. इंग्रज येण्यापूर्वी या देशात सार्वत्रिक संपत्ती नोंदणी पद्धत नव्हती. अन्य धर्मीयांप्रमाणे काही इस्लामी संस्थाही, उदाहरणार्थ दिल्ली-स्थित जामा मशीद आदी स्थळे आधुनिक वक्फ कायदा अस्तित्वात येण्याआधीपासून वक्फ मालमत्ता म्हणून ‘वहिवाटे’ने नोंदली गेलेली आहेत. संसदेने या संदर्भात मंजूर केलेला ताजा कायदा या वक्फ मालमत्तांचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार सरकारला देतो. ‘‘हे असे करणे संकटास निमंत्रण देणारे ठरेल’’, असे मत या मुद्द्यावर सरन्यायाधीश खन्ना यांनी नोंदवले. ते सूचक होते. यावर केंद्राचे महान्यायअभिकर्ता (सॉलिसिटर जनरल) तुषार मेहता यांनी ‘‘या मशिदींनी नोंदणी करण्यास काय हरकत होती’’, अशी टिप्पणी केली. तीवर भाष्य करताना ‘‘तेव्हा (शेकडो वर्षांपूर्वी) अशी दस्तावेज नोंदणी होती का’’, अशा अर्थाचा प्रश्न विचारून सरन्यायाधीशांनी मेहतांच्या युक्तिवादातील हवा काढून घेतली. सर्व वक्फ मालमत्तांच्या अशा पुनर्विलोकनाचा अधिकार केंद्राने स्वत:कडे घेतल्यास अनवस्था प्रसंग ओढवणार हे उघड आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे रोखले.

दुसरा मुद्दा बिगर-मुसलमानांस वक्फ मंडळावर नेमण्याचा. ‘वक्फ’ याचा अर्थ इस्लाम धर्मीयांनी धर्म/समाजकार्यार्थ आपली संपत्ती अल्लास अर्पण करणे. त्या संपत्तीचे व्यवस्थापन करणारे मंडळ असते आणि त्यावर शासकीय अधिकारही असतो. आतापर्यंत वक्फ मंडळांचे अनेक निर्णय शासकीय यंत्रणांनी वा न्यायालयांनी रोखले/ बदललेले आहेत. वक्फ मंडळांची बरखास्तीही काहींनी अनुभवलेली आहे. तरीही या वक्फ मंडळांवर बिगर-मुसलमानांस नेमण्याची तरतूद ताज्या कायद्यात केली गेली. त्यामागील हेतूंवर भाष्य करण्याची गरज नाही; इतका तो स्पष्ट आहे. तथापि न्यायालयात या कायद्याचे विश्लेषण होत असताना ‘‘हिंदू धर्मस्थळांच्या व्यवस्थापनांत बिगर-हिंदूंस स्थान दिले जाईल काय’’, असा थेट प्रश्न सरन्यायाधीशांनी महान्यायअभिकर्त्यांस विचारला. त्यावर सरळ उत्तर आले नाही. म्हणून सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा त्याचा उच्चार केला. त्यावर शीख धर्मीय संस्थांत काय होते, आणखी कोण काय करतात वगैरे माहिती दिली गेली. तरीही सरन्यायाधीश हा मुद्दा सोडत नाहीत, असे दिसल्यावर मेहता यांनी ‘‘बिगर-मुसलमानांनी मुसलमान संस्थांचे नियमन करायचे नसेल तर आदरणीय न्यायाधीशांस या प्रकरणी सुनावणी घेता येणार नाही’’ अशा अर्थाचा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांनी तो तत्क्षणी फेटाळून लावला आणि ‘न्यायालयात येताना आम्ही आमचा धर्म बाहेर ठेवून येतो… येथे आम्ही पूर्ण निधर्मी असतो’ असे त्यांस सुनावले. परंतु या मुद्द्यावरही पुढील आठवडाभर ‘जैसे थे’ स्थिती राखली जाईल असे आश्वासन देण्याची वेळ अखेर केंद्र सरकारच्या या प्रतिनिधीवर आली. या आठ दिवसांत कोणतीही नवी मालमत्ता ‘वक्फ-बाह्य’ म्हणून अनधिसूचित (डीनोटिफाइड) केली जाणार नाही. या दोन आश्वासनांचा संदर्भ यातील तिसऱ्या मुद्द्याशी आहे. नवीन कायदा वक्फ-मत्ता जेथे आहे तेथील जिल्हाधिकाऱ्यांस याबाबत चौकशीचा तसेच ‘वक्फ’ व्यवस्थेच्या पुनर्विचाराचा अधिकार देतो. एकदा का जिल्हाधिकाऱ्याने अशी चौकशी सुरू केली की सदर मत्तेचे ‘वक्फ’पणच संपुष्टात येईल. हा मुद्दाही आगामी सुनावणीपर्यंत आता स्थगित ठेवला जाईल.

हेही वाचा

या संदर्भात न्यायालयाचा कल लक्षात आल्यावर महाधिवक्त्यांनी केंद्राच्या वतीने न्यायालयास काही आश्वासने दिली. ‘‘केंद्रीय आणि राज्य वक्फ मंडळांवर बिगर-मुस्लीम व्यक्तींची नियुक्ती केली जाणार नाही तसेच वहिवाटीने आलेल्या वक्फ मालमत्ता आणि नोंदणीने आकारास आलेल्या वक्फ मालमत्ता यांच्या व्यवस्थापनात आगामी सुनावणीपर्यंत कोणताही बदल केला जाणार नाही’’, या आश्वासनांस सरन्यायाधीशांच्या पीठाने पटलावर ठेवले आणि पुढील सुनावणीपर्यंत यात बदल होणार नाही, असे स्पष्ट केले. ‘‘आपण फारच कडक भूमिका घेत आहात… मला केंद्राची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जावा…’’, अशी आर्जवे केंद्राच्या वतीने न्यायालयात सातत्याने केली गेली. अखेर त्याची दखल घेत खंडपीठाने केंद्रास आठवडाभराची मुदत दिली. या विधेयकावर लाखोंकडून प्रतिनिधित्व आले, अनेकांनी त्यावर साधकबाधक विचार केला, संयुक्त संसदीय समितीनेही त्याचा अभ्यास केला तेव्हा इतक्या सगळ्या अभ्यासानंतर आकारास आलेल्या कायद्यास न्यायालयाने संपूर्ण स्थगिती देऊ नये, हे सरकारचे म्हणणे न्यायालयाने स्वीकारले. ‘‘या कायद्यात काही चांगल्या बाबीही आहेत. तथापि त्यातील काही मुद्दे चिंता वाढवणारे आहेत’’ असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले. ‘‘संसदेने मंजूर केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करू नये; असेच आमचे मत आहे. तथापि काही अपवाद असतात आणि वक्फ कायदा हा असा अपवाद आहे’’ हे न्यायालयाने स्पष्ट केले तेव्हाच सरकारला या कायद्याबाबत काही पावले माघार घ्यावी लागेल हे दिसून आले.

हेही वाचा

ती शक्यता कायदा मंजूर झाला तेव्हापासूनच दिसत होती. ‘लोकसत्ता’ने ती व्यक्तही केली होती. कारण सरकारचा उद्देश सांगितला जात होता तसा नव्हता आणि अजूनही नाही. सरकारने काहीही कारण नसताना वक्फ कायद्याचे नामांतर करण्याचाही प्रयत्न केला. वक्फ ही इस्लामी संज्ञा. नवा कायदा वक्फचे नामांतर ‘उम्मीद’ (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अॅण्ड डेव्हलपमेंट) असे करू पाहतो. याची काय गरज होती? सरकारला वक्फ मंडळांच्या व्यवस्थापनात आमूलाग्र सुधारणा व्हावी असे वाटते तर त्यातील त्रुटी दूर कशा होतील यासाठी प्रयत्न हवा. कोणत्याही धर्मातील पारंपरिक चालीरीतींप्रमाणे वक्फ व्यवस्थापनातही कालानुरूप बदल होणे गरजेचे आहे हे नि:संशय. त्यात सुधारणांसाठी सरकारचे इरादे नेक आणि तेवढ्यापुरतेच हवेत. येथे तसे झाले नाही. बिगर-मुसलमानांस वक्फवर नेमण्यासारख्या मुद्द्यांतून ते दिसून आले. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या कात्रीत तो सापडला आणि स्वत:च्या कायद्यास स्वत:च स्थगिती मागण्याची वेळ केंद्रावर आली. हे टाळता आले असते तर सरकार मुसलमानांस ‘‘वक्फ’ करता जो वफा… आप हमारे होते’’ असे म्हणू शकले असते. ती संधी गेली.



Source link

सहकारी साखर कारखान्यांकडून पाच हजार कोटींच्या कर्जाची मागणी

0
सहकारी साखर कारखान्यांकडून पाच हजार कोटींच्या कर्जाची मागणी


मुंबई : राज्यातील सहकारी कारखान्यांकडून देय असलेला उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी), वाहतूक आणि तोडणी खर्च आणि कामगारांचे थकीत वेतन भागविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने राज्य सरकारकडे पाच हजार कोटी रुपयांच्या ‘सॉफ्ट लोन’(तात्पुरत्या स्वरुपातील कमी मुदतीचे कर्ज) ची मागणी केली आहे. संघाकडून सातत्याने पाठपुरवा केला जात असला तरीही सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

राज्यातील उसाचा गळीत हंगाम नुकताच संपला आहे. साखर कारखान्यांचा ताळेबंद सुस्थितीत येण्यासाठी किमान १४० दिवस गाळप चालणे आवश्यक आहे. पण, यंदा सरासरी ७० ते ९० दिवस हंगाम चालला आहे. त्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च वाढला आहे. हंगाम कमी दिवसांत संपल्यामुळे कारखान्यांनी हंगाम सुरू करण्यासाठी केलेली आर्थिक गुंतवणूक अडचणीत आली आहे. सुमारे ९० टक्के कारखान्यांचे आर्थिक ताळेबंद तोट्यात गेले आहेत.

त्यामुळे उसाचा रास्त आणि किफायतशीर दराची थकीत रक्कम १४३० कोटी आणि वाहतूक आणि तोडणी खर्चापोटी ११०० कोटी, अशी एकूण सुमारे २७०० कोटी रुपये आणि उर्वरीत रक्कम कामगारांचे चार – पाच महिन्यांपासून थकलेले वेतन देण्यासाठी, अशी एकूण पाच हजार कोटी रुपयांच्या सॉफ्ट लोनची मागणी केली आहे. राज्य सरकारच्या थकहमीनंतर राज्य सहकारी बँक किंवा राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) कर्ज देते. हे कर्ज देताना व्याज सवलतीसह कर्ज परतफेडीच्या अटी निश्चित केल्या जातात.

कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठणाची मागणी

यंदाचा उस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांनी सुमारे साडेपाच हजार कोटींचे कर्ज राज्य सहकारी बँकेकडून घेतले होते. अन्य वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज वेगळेच आहे. राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी सुमारे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. या अल्प आणि मध्यम मुदतीच्या कर्जांचे पुनर्गठण करावे. तीन वर्ष कर्ज रक्कम गोठवावी. त्यानंतर सात किंवा दहा वर्ष कर्जफेडीची मुदत द्यावी, अशी मागणीही साखर संघाने सरकारकडे केली आहे.

हेही वाचा

या पूर्वीही दिले होते सॉफ्ट लोन

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना या पूर्वी २०१४, २०१५, २०१९ मध्ये विविध योजनांच्या अंतर्गत सॉफ्ट लोन दिले गेले होते. त्या नंतर कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात केंद्र सरकारनेही सहकारी कारखान्यांना आर्थिक मदत केली होती. केंद्र सरकारने एफआरपी कर्ज, २००५ मध्ये नाबार्ड पॅकेज म्हणूनही मदत केली होती. केंद्र सरकारच्या संस्थांमार्फत कर्ज देताना काही नियम, अटी घातल्या जातात. मात्र, राजकीय हित आणि दबावामुळे कारखाने नियम, अटी पाळत नाहीत. त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत येताना दिसतात, असे मत साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय आवताडे यांनी दिली.

हेही वाचा

९० टक्के कारखान्यांचा ताळेबंद तोट्यात

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने राज्य सरकारकडे पाच हजार कोटी रुपयांच्या सॉफ्ट लोनची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कर्जाची गरज आहे अन्यथा पुढील हंगामात कारखाने सुरू करणे शक्य होणार नाही. ९० टक्के सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.



Source link