

एकनाथ शिंदे पुन्हा रमले शेतात, प्रथमच केली आवाकाडोची लागवड
Source link

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी ८ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या वेळात प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाही.
मुंबई विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली होती. त्यानुसार विमानाच्या वेळापत्रकाचे नियोजित वेळापत्रक तयार केले. यातून मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनासह मुंबई विमानतळ प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे करणार आहेत. यात धावपट्टीचे, धावपट्टीच्या बाजूला असलेल्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल यांसारखी प्रमुख कामे या कालावधीत केली जातील.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, सुरक्षा वाढविण्यासाठी आणि विमानाची उड्डाणे आणि आगमने योग्यरित्या होण्यासाठी नियोजित वार्षिक मान्सूनपूर्व देखभाल केली जाणार आहे. या काळात दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहणार आहेत. विमानतळ प्रशासनाने मान्सून पूर्व देखभाल-दुरूस्तीची माहिती विमान कंपन्यांना दिली असल्याने या काळात विमान कंपन्यांनी उड्डाणांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे प्रवाशांवर फारसा परिणाम होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १,०३३ एकरावर विस्तारलेले आहे. या विमानतळावरील धावपट्टीची वार्षिक मान्सूनपूर्व देखभाल करणे महत्त्वाचा भाग आहे. विमानतळावरील धावपट्टीची झीज होते. त्याची तपासणी करून, योग्य ती कारवाई करून पावसाळ्यात सुरक्षित उड्डाण आणि लँडिंग केली जाते. तसेच यावेळी पाणी साचण्याची ठिकाणे वेधून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष दिले जाते. संपूर्ण देखभाल प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सहा तासांच्या आत देखभाल-दुरूस्तीची कामे केली जातात.





Government of Tamil Nadu Melts 1000 kg gold : भारतातील मंदिर सोन्याच्या खाणींपेक्षा कमी नाहीत. विशेषतः दक्षिणेकडील मंदिरांमध्ये सोन्याचा प्रचंड खजिना आहे. दक्षिण भारतातील एका राज्य सरकारने 21 मंदिरांमधील तब्बल 1000 किलो सोने वितळवले आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोनं वितळवून आलेल्या पैशांचे या सरकारने काय केले जाणून घेऊया?
तामिळनाडू राज्यात मंदिरांमधील सोनं वितळवण्यात आले आहे. येथील 21 मंदिरांमध्ये भक्तांनी दान म्हणून अर्पण केलेल्या 1000 किलोपेक्षा जास्त सोनं वितळवण्यात आले आहे. हे सोनं वितळवून 24 कॅरेटच्या बारमध्ये वितळवून बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे. सोन्याच्या बारमधील या गुंतवणुकीतून तामिळनाडू सरकार वार्षाला 17.81 कोटी रुपयांचे व्याज मिळवत आहे.
मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या सोन्याच्या वस्तू ज्या वापरात नव्हत्या, त्या मुंबईतील सरकारी टांकसाळीत वितळवून 24 कॅरेटच्या बारमध्ये रूपांतरित केल्या गेल्या आणि सुवर्ण गुंतवणूक योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये गुंतवल्या गेल्या.
हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाचे मंत्री पीके शेखर बाबू यांनी विधानसभेत सादर केलेल्या धोरण अहवालात याबाबत माहिती देण्यात आली. गुंतवणुकीतून मिळणारे व्याज संबंधित मंदिरांच्या विकासासाठी वापरले जाते. या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील तीन विभागांसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
31 मार्चपर्यंत राज्यातील 21 मंदिरांमधून मिळालेल्या 10,74,123.488 ग्रॅम शुद्ध सोन्यावर दरवर्षी 17.81 कोटी रुपये व्याज मिळाले, जे गुंतवणुकीच्या वेळी सोन्याच्या किमतीनुसार निश्चित केले गेले. मंदिरांमध्ये, तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील समयापुरम येथील अरुलमिघू मरीअम्मन मंदिराने गुंतवणूक योजनेसाठी सर्वाधिक 424 किलो सोने दान केले.

