Thursday, July 23, 2026
Home Blog Page 377

ठाणे जिल्ह्यात अडीच वर्षांत साडे पाच लाख वाहनांचा भार

0
ठाणे जिल्ह्यात अडीच वर्षांत साडे पाच लाख वाहनांचा भार


ठाणे : ठाणे जिल्ह्यात विशेषत: ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या सारख्या शहरात अरुंद रस्ते, विविध प्रकल्पांची कामे, अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असतानाच, दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात मागील सुमारे अडीच वर्षात तब्बल साडे पाच लाख नव्या वाहनांची नोंद झाल्याचे परिवहन विभागाच्या आकडेवारीतून समोर येत आहे.

सर्वाधिक वाहनांची नोंद ठाणे विभागात झाली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्हा मुंबईपासून जवळचा भाग असल्याने मुंबईत कामानिमित्ताने जाणाऱ्या नोकरदारांनी ठाणे जिल्ह्यात गृह खरेदीला प्राधान्य दिले. जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहेत. त्यातच शहरात नव-नवे गृहप्रकल्प तयार होत आहे. घोडबंदरचा विस्तार गायमुख-नागलाबंदर पर्यंत गेला आहे. तर भिवंडीसारख्या गोदामाच्या शहराला देखील आता ‘नवे ठाणे’ अशी बिरुदे मिळू लागली आहे.

हेही वाचा

भिवंडीतील कशेळी-काल्हेर भागात मोठ्याप्रमाणात नागरिक वास्तव्यास जात आहेत. जिल्ह्यात काही वर्षांपासून मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर- कासारवडवली) आणि मेट्रो पाच (ठाणे-भिवंडी-कल्याण) मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. तसेच घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्गाचे रुंदीकरण अशी विविध मोठी प्रकल्प जिल्ह्यात सुरु आहेत. त्यामुळे रस्ते आक्रसले गेले आहेत.

शहरात लोकसंख्या वाढल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही बसत आहेत. परिवहन सेवेचच्या अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिक खासगी वाहनाने स्थानक गाठतात. त्यामुळे स्थानकांमध्येही गर्दी होत असते. तर, रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी काही नोकरदार खासगी वाहनाने मुंबईला जाण्यास पंसती देत असतात.

हलक्या वाहनांची वाहतुक त्यासोबतच गुजरात, भिवंडी, उरण मार्गावर सुरु असलेली अवजड वाहनांची वाहतुक देखील सुरु असते. त्यामुळे वाहन चालकांना दररोज कोंडीचा फटका सहन करावा लागत असतो. परंतु मागील सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीत म्हणजेच, १ जानेवारी २०२३ ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत ठाणे जिल्ह्यात पाच लाख ७३ हजार ५५९ वाहनांची नोंद झाली आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

सर्वाधिक वाहनांची नोंदणी ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या क्षेत्रात झाली. ठाणे उप प्रादेशिक परिवहन विभागात ठाणे, भिवंडी शहर आणि ग्रामीण पट्टा येतो. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात डोंबिवली ते बदलापूर आणि ग्रामीण क्षेत्राचा सामावेश आहे. तर वाशी उपप्रादेशिक परिवहन विभाग क्षेत्रात नवी मुंबई शहराचा सामावेश आहे. ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागात दोन लाख ८० हजार ८०१, कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागात एक लाख ९८ हजार ५२ आणि वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागात ९४ हजार ७०६ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे.

हेही वाचा

पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतुक सुविधा आणखी उपलब्ध झाल्यास खासगी वाहनांच्या वापराच्या संख्येमध्ये नक्कीच कमतरता येईल. घाटकोपर- अंधेरी मेट्रोचा वापर आज प्रमाणात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मेट्रोची कामे पूर्ण झाल्यास त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. तसेच वाहतुकीच्या वेळा देखील निश्चित करायला हव्यात.

सार्वजनिक वाहतुक सुविधांचा वापर अधिक वाढल्यास व्यक्तीला मानसिक ताण देखील कमी होईल तसेच इंधन खर्च देखील बचत होईल. खासगी कंपनीच्या कार्यालयांनीही त्यांच्या वेळांमध्ये बदल केल्यास रस्त्यावरील होणाऱ्या वाहनांचा ताण कमी होईल. – डाॅ. शंकर विश्वनाथ, वाहतुक तज्ज्ञ.

वार्षिक आकडेवारी

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३

ठाणे – १, १२, ४३४
कल्याण- ७९, ४३३
वाशी- ३८,५१८

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४

ठाणे – १,२७,०२८
कल्याण- ८९,२४५
वाशी- ४२,२५५

१ जानेवारी ते २० एप्रिल २०२५

ठाणे – ४१,३३९
कल्याण- २९,३७४
वाशी- १३,९३३





Source link

फलटणमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अद्यापही अधांतरी; अनुयायांमध्ये तीव्र नाराजी

0
फलटणमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अद्यापही अधांतरी; अनुयायांमध्ये तीव्र नाराजी

फलटण :- फलटण शहरात 23 एप्रिल 1939 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक भेट दिली होती. त्यांनी येथे घेतलेल्या सभेत सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या विचारांची मशाल पेटवली होती. याच दिवशी तत्कालीन संस्थांनाधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी बाबासाहेबांना राजवाड्यात चहासाठी आमंत्रित केले होते. आजही हे शहर त्या पावन क्षणांचा साक्षीदार आहे. मात्र, या शहरात उभ्या असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण अजूनही केवळ आश्वासनापुरतेच राहिले आहे, हे खेदजनक वास्तव आहे.

1969 साली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते आणि इंदुमती मोहन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आंबेडकर पुतळ्याचे भव्य अनावरण झाले होते. त्यानंतर तब्बल 56 वर्षे उलटून गेली, पण सुशोभीकरणाचे काम सुरू झालेले नाही. नुकतीच बाबासाहेबांची 134 वी जयंती संपूर्ण देशभर जल्लोषात साजरी झाली, त्याच पार्श्वभूमीवर पुतळ्याच्या दुर्लक्षित अवस्थेची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

पूर्वी अनेक वेळा राजकीय नेत्यांनी पत्रकार परिषदांमधून आणि जाहीर सभांमधून कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचा दावा केला होता. मात्र तो निधी खरोखर मंजूर झाला होता का? की निवडणुकांच्या तोंडावर आंबेडकरी अनुयायांची मते मिळवण्यासाठी राजकीय थापा मारण्यात आल्या? या प्रश्नांनी आता अनुयायांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे.

एका बाजूला तेलंगणामध्ये बाबासाहेबांचा 175 फूट उंच पुतळा दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला, तर दुसरीकडे फलटणमध्ये पुतळ्याच्या आसपासच्या भागाचे साधे सौंदर्यीकरणही रखडलेले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर केवळ राजकारण होत आहे का? डॉ. आंबेडकरांच्या नावावर राजकीय भांडवल तर उभं केलं जात नाही ना? अशी रास्त शंका अनुयायांमध्ये निर्माण झाली आहे.

या ऐतिहासिक स्मृतीस्थळाच्या नाममात्र सुशोभीकरणावरून, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि बाबासाहेबांच्या कार्याशी केलेली ही बेइमानी उघड होऊ लागली आहे. आता प्रश्न हाच आहे — पुतळ्याचे सौंदर्यीकरण कधी होणार? की पुन्हा एकदा आश्वासनांचे नवे खेळ रंगणार?

शहरातील रस्त्यांवर आता गुलाबी रिक्षांची ‘धाव’, १७७६ ‘पिंक ई-रिक्षां’ना परवानगी

0
शहरातील रस्त्यांवर आता गुलाबी रिक्षांची ‘धाव’, १७७६ ‘पिंक ई-रिक्षां’ना परवानगी



pune city pink rickshaw 1776 new pink auto rickshaw to run on the streets of पुणे : शहरातील रस्त्यांवर आता गुलाबी रिक्षांची ‘धाव’, १७७६ ‘पिंक ई-रिक्षां’ना परवानगी





Source link

जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात आज निदर्शने

0
जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात आज निदर्शने


लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी ‘विशेष जन सुरक्षा विधेयक’ तयार केले आहे. मात्र , हे विधेयक जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणत असल्याचा आरोप जन सुरक्षा विधेयक २०२४ विरोधी समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत.

जन सुरक्षा विधेयकात बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना याबाबतच्या व्याख्या अत्यंत ढोबळ ठेवण्यात आल्या आहेत. कोणते कृत्य बेकायदेशीर आहे आणि कोणती संघटना बेकायदा हे ठरविण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे. विधेयकानुसार सरकारने बेकायदेशीर म्हणून घोषित केलेल्या संघटनेच्या सभासद व सहकाऱ्यांसाठी अनेक वर्षांचा कारावास व लाखो रुपयांचा दंड अशा तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्या अत्यंत चुकीच्या असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

दरम्यान, हे जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करावे यासाठी जन सुरक्षा विधेयक २०२४ विरोधी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने मंगळवारी मुंबईसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि तहसिल कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.



Source link

सत्ता परिवर्तनाच्या तयारीसाठी भाजपची तालुका-शहर कमान मजबूत; सोनवलकर, रणवरे, शिंदे यांची निवड

0
सत्ता परिवर्तनाच्या तयारीसाठी भाजपची तालुका-शहर कमान मजबूत; सोनवलकर, रणवरे, शिंदे यांची निवड

फलटण | साहस Times प्रतिनिधी  :- भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात संघटनात्मक ताकद वाढवण्याचे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत युवा नेतृत्वाला संधी देत लक्ष्मण सोनवलकर आणि अमित रणवरे यांची तालुकाध्यक्ष पदी, तर बापूराव शिंदे यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीची अधिकृत घोषणा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाली. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, “हर घर भाजपा” अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी ही नवी टीम सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, “नवीन पदाधिकाऱ्यांनी काम करताना सर्वसामान्य जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे. भाजप ही लोकशाहीची पक्ष आहे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.”

जिल्हा पातळीवरील जबाबदाऱ्या:

  • लक्ष्मण सोनवलकर यांच्याकडे कोळकी, गुणवरे व विडणी हे जिल्हा परिषद गट सोपवले आहेत.
  • अमित रणवरे यांच्याकडे साखरवाडी, तरडगाव आणि उत्तर कोरेगाव या भागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

जातीय समन्वयाचे राजकारणही चर्चेत:
या निवडींमुळे भाजपने फलटणमध्ये जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते.

  • धनगर समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मण सोनवलकर,
  • माळी समाजाचे बापूराव शिंदे,
  • मराठा समाजाचे अमित रणवरे —
    अशा विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व या संघटनेच्या नव्या रचनेत दिसून येते.

या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून भाजप फलटणमध्ये आगामी नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

ओपिनिअन: टोकियो ते नवी दिल्ली, ट्रम्प यांच्या धोकादायक व्यापार डिप्लोमसीने नव्या जागतिक व्यवस्थेचा रचला पाया

0
ओपिनिअन:  टोकियो ते नवी दिल्ली, ट्रम्प यांच्या धोकादायक व्यापार डिप्लोमसीने नव्या जागतिक व्यवस्थेचा रचला पाया


  • Marathi News
  • Opinion
  • Trump’s High level Trade Diplomacy Laid The Foundation For A New World Order

राम चरण6 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

या आठवड्यात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानचे आर्थिक पुनरुज्जीवन मंत्री रयोसेई अकाझावा यांची भेट घेऊन परस्पर शुल्कांवरील वाटाघाटी सुरू केल्या. या मुद्द्यावर ही त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. येत्या आठवड्यातही वाटाघाटी सुरू राहतील. याचा निकाल महत्त्वाचा आहे. केवळ जपानसाठीच नाही, तर नवीन जागतिक व्यवस्था काय असण्याची शक्यता आहे हे समजून घेण्यास उत्सुक असलेल्या प्रत्येकासाठी.

ट्रम्प आणि जपानी टीममध्ये जे घडते ते येणाऱ्या काळासाठी एक नमुना निश्चित करेल. अमेरिकेच्या अध्यक्षांना माहिती आहे की दोन्ही बाजूंना त्रास होईल, कारण समायोजन करणे सोपे नाही. देशांनी त्यांच्या चलनाचे कौतुक करावे आणि विनिमय दर योग्य ठेवावा अशी त्यांची इच्छा असेल.

जपानी येन आधीच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 159 वरून 143 पर्यंत वाढला आहे. तो आणखी पुढे जाण्याची गरज आहे का? कदाचित आणखी 10%. देशांनी अमेरिकेत निवडक उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षादेखील ट्रम्प करतील. जपानच्या बाबतीत टोयोटा आणि इतर कंपन्यांनी त्यांच्या पुरवठादार नेटवर्कसह अमेरिकेत त्वरित विस्तार करावा अशी त्यांची इच्छा असेल. इतर कंपन्या आणि उत्पादने देखील निवडली जातील. त्यांचे करार खर्च कमी करण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी संयुक्तपणे काम करण्यावर भर देतील, विशेषतः चीनच्या तुलनेत.

अनुदाने आणि अन्याय्य विनिमय दर काढून टाकल्यानंतर चीनच्या हायपर-स्केल-बेस्ड मार्जिनल कॉस्टचा विचार करावा लागेल. दोन्ही देश कालांतराने एकत्रितपणे चीनला मागे टाकू शकतात. पण ते कठीण असेल. कोणत्याही राष्ट्रावर सामान्य शुल्क आकारले जाणार नाही. ते उत्पादन दर उत्पादन असेल. परस्पर, परस्पर! जागतिक बाजारपेठेत चीनला मागे टाकण्याचा हेतू आहे. परस्पर करारांद्वारे संतुलित व्यापार परस्पर वाढीच्या शर्यतीचे दरवाजे उघडतो. यामुळे दोन्ही देशांना चीनसोबतच्या व्यापार युद्धात बाजारपेठेतील वाटा मिळू शकतो. ही एक नवीन जागतिकीकरण प्रक्रिया आहे.

काही देशांमध्ये पॅटर्नमध्ये अद्वितीय भिन्नता असतील. जपान आणि अमेरिकेला राजकीय आणि लष्करी सहयोगी म्हणून एकमेकांची आवश्यकता आहे. चीनचा धोका जवळ आला आहे. चीन ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्सभोवती फिरत आहे आणि तैवानवर जवळजवळ नाकेबंदी केली आहे. म्हणून जपानसाठी, काही गोपनीय करारदेखील केले जातील.

मी स्पष्टपणे सांगतो: मी चुकीचा असू शकतो, परंतु मी ट्रम्पचा बराच काळ अभ्यास केला आहे. माझ्या मते ते एक बांधकाम व्यावसायिक आहेत. ते सीसीपी (चीनी कम्युनिस्ट पक्ष) च्या जादूटोण्याविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी एक नवीन जागतिक व्यवस्थेचे बांधकाम करणारे असतील. त्यांचे काम आता दिसून येऊ लागले आहे. वेदना असतीलच. ती वेदना महागाई आहे.

भारत

भारत खूप चांगल्या स्थितीत आहे. मला अपेक्षा आहे की ट्रम्पच्या भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटीही अशाच पद्धतीने होतील, एका अपवादाशिवाय. आसियान देशांमध्ये चीनच्या व्यापार धोक्याचा आणि या प्रदेशातील कोणत्याही संभाव्य लष्करी संघर्षाचा सामना करण्यासाठी भारताने अधिक सहकार्य करावे अशी ट्रम्प यांची इच्छा असेल. माझ्या उद्योग संपर्कांवरून असे दिसून येते की मोदी सरकार उत्पादनानुसार आणि उद्योगानुसार वाटाघाटींसाठी तयारी करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे.. सचिव स्थानिक कंपन्यांकडून माहिती मागत आहेत.

कापड आणि औषधनिर्माण यासारख्या अनेक भारतीय उद्योगांसाठी ही संधीची खिडकी आहे. भविष्यात काय घडणार आहे याबद्दल परिस्थिती बदलू शकते. एक परिस्थिती निश्चित आहे. चलनातील आणखी वाढ ही अजेंड्यावर आहे. तसेच, चीनशी स्पर्धा करण्यासाठी कमी खर्च आणि उच्च दर्जाची आवश्यकता आहे. म्हणून अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींकडे दुर्लक्ष करून, सर्व कंपन्यांनी त्यांच्या खर्चाच्या रचनेचे आणि खर्चाच्या पातळीत बदल करायला हवेत. स्पर्धात्मक होण्यासाठी मार्जिनल कॉस्टसाठी डिजिटायझेशन किंवा एआयचा वापर आता निकडीचा आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी भारताला दरवर्षी अंदाजे ₹४१.७५ लाख कोटी ($५०० अब्ज) अमेरिकेत निर्यात करण्याचे आमंत्रण दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी विशिष्ट धोरणे शोधावी. यामध्येच वाढ आणि तांत्रिक प्रगती आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. चला मग लाट सुरू करूया आणि त्यावर स्वार होऊया.



Source link

प्रेमसंबधातून रक्तपात, विवाहित प्रेयसीच्या पतीची भरचौकात हत्या

0
प्रेमसंबधातून रक्तपात, विवाहित प्रेयसीच्या पतीची भरचौकात हत्या


लोकसत्ता टीम

नागपूर : विवाहित महिलेचे दोन वर्षांपासून असलेले अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर तिच्या पतीने पत्नीला मारहाण आणि मानसिक शारीरिक त्रास देणे सुरु केले. पतीच्या छळाला कंटाळलेल्या प्रेयसीने प्रियकराकडे आपली व्यथा व्यक्त केली. प्रियकराने थेट प्रेयसीच्या पतीचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना पाचपावलीत घडली. शेरा (३२, पाचपावली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर रजत ऊर्फ गीतेश उके (३२, नाईक तलाव) आणि भोजराज कुंभारे (३४, नाईक तलाव) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरा हा पत्नी अरुणा (काल्पनिक नाव) व दोन मुलांसह राहत होता. तो महापालिकेत स्वच्छता कर्मचारी पदावर कार्यरत होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्यामुळे पत्नी त्याला कंटाळली होती. यादरम्यान, शेराच्या पत्नीची आरोपी रजत ऊर्फ गीतेश कमलेश उके याच्यासोबत इंस्टाग्रामवरुन ओळख झाली. रजत हा विवाहित असून त्याला सहा वर्षांची मुलगी आहे. तो अॅक्वागार्ड कंपनीत नोकरी आहे.

अरुणाला इंस्टाग्रामवर रिल्स बनविण्याची सवय होती. रजत हा अरुणाच्या रिल्सवर नेहमी कमेंट करीत होता. त्याच्या कमेंटला अरुणा उत्तरही देत होती. यातूनच दोघांची मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करायला लागले. दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. यादरम्यान अरुणा आणि रजत एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही विवाहित असल्याचे विसरुन प्रेमसंबंध ठेवत होते. पती घरी नसल्यास रजत थेट तिच्या घरी जात होता. तीसुद्धा बिनधास्तपणे रजतसोबत फिरायला जात होती. दोघांनीही प्रेमाच्या सीमा ओलांडल्या. पती दारु पिऊन नेहमी मारहाण करीत शारीरिक त्रास देत असल्याची तक्रार अरुणा नेहमी प्रियकर रजतकडे करीत होती.

प्रेमातील अडसर केला दूर

प्रेयसीला होणारा त्रास रजतला सहन होत नव्हता. त्यामुळे त्याने प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्याचे ठरविले. रविवारी रात्ररी रजत हा मित्र भोजराज कुंभारे याच्यासोबत शेराच्या घराकडे निघाला. नंदगिरी रोडवर दुचाकीने जात असलेल्या शेराला थांबवले. त्याच्यावर दोघांनीही चाकूने हल्ला केला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर पळ काढला.

दोन्ही आरोपींनी तासाभरात अटक

शेराचा खून केल्यानंतर दोनही आरोपींनी वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. पाचपावलीचे ठाणेदार बाबुराव राऊत यांनी दोन पथके नियुक्त करुन दोन्ही आरोपींना तासाभरात अटक केली. प्रेयसीला नेहमी मारहाण करीत असल्यामुळे तिच्या पतीचा खून केल्याची कबुली आरोपी रजतने दिली. यापूर्वी रजत आणि शेरा यांच्यात वाद झाला होता. ‘माझ्या पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंध तोडून टाक आणि माझ्या पत्नीच्या नादाला लागल्यास जीवंत सोडणार नाही,’ अशी धमकी शेराने दिली होती. त्यामुळे शेराचा खून केल्याची कबुली आरोपी रजतने पोलिसांना दिली.



Source link

कृषी क्षेत्रासाठी ‘एआय’ धोरणात सहा पिकांचा समावेश, अजित पवार यांची माहिती

0
कृषी क्षेत्रासाठी ‘एआय’ धोरणात सहा पिकांचा समावेश, अजित पवार यांची माहिती



Six crops included in ‘AI’ policy for agriculture sector, Ajit Pawar informed कृषी क्षेत्रासाठी ‘एआय’ धोरणात सहा पिकांचा समावेश, अजित पवार यांची माहिती





Source link

अर्ध्या भारताला माहिती नसेल रेल्वेचा हा नियम! रेल्वे तिकिटांसह पूर्णपणे मोफत मिळतात खास सुविधा

0
अर्ध्या भारताला माहिती नसेल रेल्वेचा हा नियम! रेल्वे तिकिटांसह पूर्णपणे मोफत मिळतात खास सुविधा


Indian Railway interesting Rules: दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत. पण दररोज प्रवास करुनही रेल्वेबद्दलच्या अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. रेल्वे आपल्या प्रवाशांना अशा अनेक सुविधा देखील पुरवते ज्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. रेल्वे तिकीट खरेदी केल्याने प्रवाशाला अनेक अधिकार मोफत मिळतात. याअंतर्गत ट्रेनमध्ये मोफत बेडरोलपासून ते मोफत जेवणापर्यंतच्या अधिकारांचा समावेश आहे. रेल्वेकडून प्रवाशांना या सर्व सुविधा कधी आणि कशा पुरवल्या जातात? याबद्दल जाणून घेऊया. 

मोफत बेड रोल

भारतीय रेल्वेकडून सर्व एसी 1, एसी 2, एसी 3 कोचमध्ये प्रवाशांना एक ब्लँकेट, एक उशी, दोन चादरी आणि एक हात टॉवेल दिले जाते. असे असताना गरीब रथ एक्सप्रेसमध्ये लोकांना यासाठी 25 रुपये द्यावे लागतात. काही गाड्यांमध्ये प्रवाशांना स्लीपर क्लासमध्ये बेडरोल देखील मिळू शकतो. जर तुम्हाला तुमच्या रेल्वे प्रवासादरम्यान बेडरोल मिळाला नसेल तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार करू शकता आणि परतफेड मागू शकता. 

मोफत वैद्यकीय मदत

जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करताना आजारी पडलात तर रेल्वे तुम्हाला मोफत प्रथमोपचार देते. जर स्थिती गंभीर असेल तर पुढील उपचारांची व्यवस्था देखील केली जाते. यासाठी तुम्ही फ्रंटलाइन स्टाफ, तिकीट कलेक्टर, ट्रेन सुपरिटेंडेंट अशा यंत्रणेशी संपर्क साधू शकता. आवश्यक वाटल्यास भारतीय रेल्वेकडून पुढील स्थानकावर वाजवी शुल्कात तुमच्यासाठी वैद्यकीय उपचारांची व्यवस्था देखील केली जाते.

मोफत जेवण

जर तुम्ही राजधानी दुरांतो आणि शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनने प्रवास करत असाल तर ही सुविधा तुम्हाला माहिती असायला हवी. तुमची ट्रेन 2 तासांपेक्षा जास्त उशिराने येत असेल तर रेल्वे तुम्हाला मोफत जेवण देते. याशिवाय जर तुमची ट्रेन उशिरा आली असेल आणि तुम्हाला काहीतरी चांगले खायचे असेल तर तुम्ही आरई-केटरिंग सेवेमधून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करू शकता.

सामान ठेवू शकता

देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर क्लोकरूम आणि लॉकर रूम उपलब्ध असतात. तुम्ही तुमचे सामान या लॉकर रूम आणि क्लोकरूममध्ये जास्तीत जास्त 1 महिन्यासाठी ठेवू शकता. यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल.

मोफत प्रतीक्षालय

अनेकदा स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्हाला पुढची ट्रेन पकडायची असते. किंवा कोणत्याही कामासाठी स्टेशनवर काही वेळ थांबावे लागते. अशावेळी तुम्ही स्टेशनवरील एसी किंवा नॉन-एसी वेटिंग हॉलमध्ये थांबू शकता. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे ट्रेन तिकीट दाखवावे लागेल.





Source link

chanakya niti the blessings of mother lakshmi on such people

0
chanakya niti the blessings of mother lakshmi on such people


Blessings Goddess Laxmi: आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. चाणक्य नीती जीवनाच्या विविध पैलूंवर आधारित सखोल आणि व्यावहारिक ज्ञान देते. यामध्ये कुटुंब, नातेसंबंध, समाज आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या शिकवणींचा समावेश असतो. यात त्यांनी व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींचा उल्लेख केलाय, ज्यामुळे आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे या वाईट सवयींपासून सर्वांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे. चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टी जीवनात अंगीकारल्या तर खूप फायदा होतो. अशा लोकांना माता लक्ष्मी कधीही सोडत नाही. माँ लक्ष्मीच्या कृपेने असे लोक नेहमी धनवान राहतात. 

१. असं म्हटलं जातं की वेळ कोणासाठी थांबत नाही. गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे वेळेचे मूल्य समजले पाहिजे. आयुष्यात फक्त तेच लोक यशस्वी होतात ज्यांना वेळेची किंमत समजते. कोणतंही ध्येय तेव्हाच साध्य होतं जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर योग्य निर्णय घेते. जे लोक वेळेचा चांगला वापर करतात, ते आपले ध्येय सहजपणे साध्य करू शकतात. अशा लोकांवर आई लक्ष्मीची कृपा सदैव राहते.

हेही वाचा

२. चाणक्य नीतिमध्ये आळस हा देखील मानवाच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा असल्याचं सांगितलं आहे. जो व्यक्ती आळशी आहे, तो आलेल्या संधीचा फायदा घेण्यास मुकतो. आळशी व्यक्ती कोणतंही काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही, ज्यामुळे यश मिळण्यास बराच विलंब होतो. त्यामुळे आळशीपणापासून दूर राहिले पाहिजे. जे लोक आळशीपणापासून दूर राहतात त्यांच्यावरही आई लक्ष्मी कृपा करते.

३. आचार्य चाणक्य सांगतात, ज्यांना मेहनत करायला भीती वाटते, त्यांनाही यश मिळत नाही. अशा लोकांकडे नेहमीच पैशांची कमतरता असते. कारण मेहनतीशिवाय यश शक्य नाही. म्हणून मेहनत करा.

४. चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने स्वतःला नेहमी मादक पदार्थांपासून दूर ठेवलं पाहिजे. कारण कोणत्याही प्रकारची नशा आपल्या आरोग्यावर तसंच आपल्या मेंदूवर परिणाम करते. एखादी व्यक्ती सक्षम आणि कार्यक्षम असूनही चांगली कामगिरी करण्यापासून वंचित राहते. अंमली पदार्थांचे व्यसन केल्याने योग्य आणि अयोग्य गोष्टी ओळखता येत नाही. अशा लोकांवर सुद्धा आई लक्ष्मी कृपा करीत नाही.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)





Source link