Thursday, July 23, 2026
Home Blog Page 374

‘अमित शाहांचा मेंदू 365 दिवस…’, Pahalgam Terror Attack नंतर संजय राऊतांची मागणी

0
‘अमित शाहांचा मेंदू 365 दिवस…’, Pahalgam Terror Attack नंतर संजय राऊतांची मागणी


Sanjay Raut On Pahalgam Terror Attack Latest News: काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत 28 पर्यटकांचे प्राण घेतले तर अनेकांना जखमी केलं. या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी सायंकाळीच विशेष विमानाने काश्मीरला रवाना झाला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शाहांनी राज भवनामध्ये विशेष बैठकही घेतली. या हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिका दौरा अर्धवट सोडून भारतात परतलेत. दिल्लीमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. असं असतानाच आता या हल्ल्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

शाहांचा मेंदू 365 दिवस…

संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन अमित शाहांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमित शाहांबरोबरच संयुक्त राष्ट्र आणि भारतीय जनता पार्टीच्या अकाऊंटलाही टॅग केलं आहे. अमित शाहांचा फोटो पोस्ट करत राऊतांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शाहांचा सर्व वेळ सरकारं बनवण्यात आणि पाडण्यात जात असून त्यांचा मेंदू 365 दिवस विरोधकांना संपवण्यासंदर्भातील कट रचण्यात व्यस्त असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

रामसुद्धा या लोकांना कंटाळला

“राजीनामा द्या! संपूर्ण वेळ केवळ सरकारं बनवण्यात आणि पाडण्यात जातोय. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी कट रचण्यामध्ये 365 दिवस मेंदू व्यस्त असतो. लोकांची सुरक्षा राम भरोसे आहे. आता रामसुद्धा या लोकांना कंटाळला आहे. राजीनामा द्या, देशावर उपकार करा,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> ‘बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र…’, राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘केंद्र सरकारने आता असा…’

थेट नागरी उड्डाण मंत्र्यांकडे महाराष्ट्राने मागितली मदत

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांना राज्यात परत आणण्याच्या व्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान शिंदे यांनी नायडू यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली. विनंती स्वीकारून नायडू यांनी आश्वासन दिले की अडकलेल्या पर्यटकांची यादी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्याची व्यवस्था केली जाईल. उपमुख्यमंत्री विनंती मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.





Source link

नायगावमध्ये पाणथळीवर मातीभराव टाकून खारफुटी उद्ध्वस्त ? महसूल विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांमधून संताप

0
नायगावमध्ये पाणथळीवर मातीभराव टाकून खारफुटी उद्ध्वस्त ? महसूल विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांमधून संताप



Mangroves destroyed in Naigaon? Revenue department negligence; Citizens angered नायगावमध्ये पाणथळीवर मातीभराव टाकून खारफुटी उद्ध्वस्त ?महसूल विभागाचे दुर्लक्ष; नागरिकांमधून संताप





Source link

सत्ताधाऱ्यांना बाबासाहेब ‘आदरणीय’ वाटू लागण्याआधी जागे व्हा…

0
सत्ताधाऱ्यांना बाबासाहेब ‘आदरणीय’ वाटू लागण्याआधी जागे व्हा…


पुन्हा एक आंबेडकर जयंती साजरी झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांच्या नावाचा जागर झाला आणि या वर्षी आंबेडकरांच्या वारशावर हक्क सांगण्याची जोरदार स्पर्धा झाली. हिसारच्या महाराजा अग्रसेन विमानतळावरून विमानसेवेची घोषणा, लखनौमध्ये मॅरेथॉन आणि सदस्यत्वासाठीची एका पक्षाची मोहीम. दुसऱ्या पक्षाचा ‘स्वाभिमान सन्मान समारंभ’. प्रसिद्ध रॅपर आणि संशोधक सुमित सामोस याने १४ एप्रिलच्या इंडियन एक्सप्रेसच्या अंकात इतिहासाने किती लक्षवेधी वळण घेतलं आहे, हे सांगणारा लेख लिहिला आहे.  

या सगळ्या उत्सवामध्ये एक मोठा धोका आहे. आंबेडकरांचे प्रचंड उदात्तीकरण आता पूर्ण झाले आहे. आता स्वातंत्र्योत्तर भारतात गांधींसारखेच आंबेडकरांच्या वारशाच्या वाट्याला येऊ शकते ! बाबासाहेबांचा वारसाही पोकळ प्रतिमेसारखा वापरला जाऊ शकतो. एखादा रिकामा लिफाफा असावा तसा. या लिफाफ्यात कोणी काहीही घुसवू शकते. सत्ताधाऱ्यांना बाबासाहेब ‘आदरणीय’ वाटू लागण्याआधी बाबासाहेबांच्या ध्येयवादाशी जोडलेल्या लोकांवर मोठी जबाबदारी आहे. बाबासाहेबांचा मूलगामी विचार पुनुरुज्जीवित केला पाहिजे जेणेकरून त्यांचा असा गैरवापर करता येणार नाही. आयुष्यभर बाबासाहेब एक मूलगामी मांडणी करत राहिले. ही मूलगामी मांडणी दूषित करता कामा नये.

यासाठीच अशा प्रकारच्या विशेष लक्षवेधी प्रयत्नाची सुरुवात सूरज येंगडे आणि आनंद तेलतुंबडे यांनी जगभरातल्या विविध संशोधकांच्या लेखांचे संकलन आणि संपादन करुन प्रकाशित केलेल्या ‘द रॅडिकल इन आंबेडकरः क्रिटिकल रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकातून केली आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच आंबेडकरांच्या बहुआयामी संशोधकीय विद्वत्तेच्या वर्णनातील त्रुटी सांगितली आहे. आंबेडकरांची चुकीची प्रतिमानिर्मिती केली जातेः अस्पृश्यांचे मसीहा, संविधान निर्माते, बोधिसत्त्व, नवउदारमतवादी मुक्त बाजाराचे समर्थक, मुद्रावादी असे त्यांना म्हटले जाते तर जातीयवादी, ब्रिटिशांचा पित्तू, कम्युनिस्ट द्वेषी अशीही त्यांची हेटाळणी केली जाते. मात्र या पुस्तकामध्ये पारंपरिक डाव्यांनुसार किंवा कम्युनिस्टांच्या मांडणीनुसार आंबेडकरांमधील मूलगामी काय आहे, याविषयी भाष्य आहे.

हेही वाचा

आणखी एक महत्वाचा निबंध लिहिला आहे डी. नागराज यांनी. ‘फ्लेमिंग फीट अँड अदर एसेज’ या पुस्तकात ‘सेल्फ प्युरिफिकेशन व्हर्सेस सेल्फ रिस्पेक्टः ऑन द रूट्स ऑफ द दलित मूव्हमेंट’ असा महत्वाचा निबंध लिहून त्यांनी गांधी आणि आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये कसे परिवर्तन घडवले, याविषयी एक नवा दृष्टिकोन मांडला आहे. या प्रकारचा राजकीय दृष्टिकोन मांडला देवनुरु महादेव यांनी आणि अकादमिक प्रकारे त्याचा विस्तार ‘गांधी अगेन्स्ट कास्ट’ या पुस्तकात निशिकांत कोलगे यांनी केला आहे. या मांडणीचा प्रभाव अजून निर्माण व्हायचा आहे. या मांडणीविषयी काम करण्याची जबाबदारी आंबेडकर स्टडीजच्या अभिजन अकादमिक विद्वानांवर सोपवता कामा नये. काही सन्माननीय अपवाद वगळता, गांधींविषयक अभ्यासक्षेत्रातील विद्वानांनी मुख्य आणि महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला नाही. मूलगामी आंबेडकर शोधणे हा काही केवळ अकादमिक प्रकल्प नाही. हा आजच्या काळातला सर्वांत महत्वाचा आणि मूलभूत बौद्धिक आणि अकादमिक प्रकल्प आहे. संवैधानिक लोकशाही वाचवणे आणि मुख्य म्हणजे गणराज्यला वाचवणे या प्रकल्पाशी तो जोडलेला आहे.

आंबेडकरांच्या केवळ जातविषयक चिकित्सेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लोकशाहीचे सिद्धांतक या अर्थाने त्यांच्या वारशावर भर देण्यापासून या प्रकल्पाची सुरुवात करता येईल. स्कॉट स्ट्राऊड यांनी ‘द इवॉल्यूशन ऑफ प्रॅगमॅटिझम इन इंडिया’ या निबंधात नोंदवल्याप्रमाणे बाबासाहेबांचे लोकशाहीविषयक चिंतन हे त्यांचे शिक्षक ज़ॉन ड्युई यांच्या लोकशाहीला जीवनशैली मानणाऱ्या विचारांमधून प्रभावित झालेले होते. बाबासाहेबांनी त्या विचारांमध्ये बदल केला आणि तळातून लोकशाहीकडे पाहणारी दृष्टी विकसित केली. आंबेडकर हे कदाचित  विसाव्या शतकातील भारतातील लोकशाहीचे एकमेव सिद्धांतक होते. जयप्रकाश नारायण आणि एम. एन. रॉय यांनी पक्षीय राजकारणाच्या आधारे उभ्या राहिलेल्या प्रातिनिधिक लोकशाहीची चिकित्सा केली; मात्र आंबेडकरांच्या एकूण विचाराच्या केंद्रभागी लोकशाहीविषयक चिंतन होते.  प्रातिनिधिक लोकशाहीच्या राजकीय रचनेचे संवेदनशील पेच आणि संस्थात्मक रचनेचे सामाजिक, राजकीय परिणाम अशा काही मुद्द्यांच्या आधारे त्यांनी लोकशाहीविषयक मांडणी केली.
औपचारिक लोकशाहीकडून मौलिक लोकशाहीकडे जाण्याची वाट सांगताना बाबासाहेबांनी उदारमतवादी लोकशाही धारणा अधिक मूलगामी करत नेली. कायदेशीर संवैधानिक उपाय सांगताना लोकांच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी सांगितला. त्यांनी १९५२ साली ‘कंडिशन्स प्रिसिडंट फॉर द सक्सेसफुल वर्किंग ऑफ डेमॉक्रसी’ नावाच्या निबंधात लोकशाहीची एक नवी व्याख्या दिलीः लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात कोणत्याही रक्तपाताशिवाय क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठीची शासन व्यवस्था आणि तिचे रूप म्हणजे लोकशाही होय ! या सिद्धांतनामुळे बाबासाहेब हे त्यांच्या समकालीन भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांहून वेगळे ठरतात. ड्युईंप्रमाणे बाबासाहेब केवळ ‘सामाजिक लोकशाही’ची मांडणी करत नाहीत तर ते लोकशाहीच्या मूलगामी गणराज्यवादाची कल्पना मांडतात.

आंबेडकरांचे लोकशाहीचे समर्थन हे उदारमतवाद्यांच्या दृष्टीने असलेल्या स्वातंत्र्यावर आधारित नाही. त्यांच्यासाठी लोकशाहीसाठी पायाभूत बाब ही बंधुता आहे. बंधुतेतूनच स्वातंत्र्य आणि समता ही दोन्ही मूल्ये आकाराला येऊ शकतात. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असावा यासाठी आंबेडकर अधिक सखोल युक्तिवाद करतात. अगदी निरक्षर व्यक्तींनाही मताधिकार असावा, यासाठी बाबासाहेब आग्रही मांडणी करतात. सवर्ण हिंदू हे दलितांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत, यासाठीचा बाबासाहेबांचा युक्तिवाद हा नंतरच्या काळात स्त्रीवादी विचारवंतांनीही ‘उपस्थितीचे राजकारण’ मांडताना केला.

‘लोकशाही हे असे रोप नाही की जे प्रत्येक ठिकाणी आपोआप उगवेल’, याची आठवण आंबेडकरांनी करून दिली. प्रत्येक व्यक्तीला सरकारकडून, प्रशासनाकडून समान प्रकारची वागणूक दिली गेली पाहिजे, संवैधानिक नैतिकतेला सर्वांचा पाठिंबा असला पाहिजे आणि ही नैतिक व्यवस्था असणे ही लोकशाहीसाठीची पहिली आणि मूलभूत अट आहे, असे बाबासाहेब मानत. विरोधकांच्या अस्तित्वाशिवाय आणि त्यांना आदर असल्याशिवाय लोकशाही असू शकत नाही. बहुसंख्यांकांची जुलूमशाही ही लोकशाहीच्या विरोधी असते.

हेही वाचा

या प्रकारच्या मांडणीतून बाबासाहेबांचा वारसा जिवंत राहील. त्यांचा जयजयकार करतानाही अनेकदा त्यांना एका चौकटीपुरतेच मर्यादित केले जाते. त्यांना केवळ दलितांचे नेते केले गेले आहे. खरे तर त्यांच्याकडे सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून पाहिले गेले पाहिजे. भारतातल्या आणि जगभरातल्या अन्याय झालेल्या समाजघटकांसाठी बाबासाहेब हे प्रेरणास्थान आहेत. जातीय अन्यायाच्या चष्म्यातून पाहतानाच बाबासाहेबांनी आजच्या अनेक बाबींविषयी मूलभूत मांडणी केली. आजच्या वितंडवादी राजकारणात ब्रिटिश वासाहतिक साम्राज्य आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य चळवळ यांच्या तत्कालीन राजकारणात बाबासाहेबांना अडकवले जाते. मूलगामी बाबासाहेबांचा शोध घेण्यासाठी त्यांनी कोणत्या तत्त्वांचा आधार घेतला आणि त्या तत्त्वांचा आजच्या समकालीन राजकीय संदर्भात कसा अवलंब केला जाऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे. आंबेडकर हे त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होते. दुर्दैवाने त्यांच्या नावावर केले जाणारे राजकारण हे त्यांच्या काळाच्या कितीतरी मागे आहे. आपल्याला आंबेडकरवादाचे दुसरे पर्व हवे आहे.

अनुवादः श्रीरंजन आवटे
राष्ट्रीय संयोजन भारत जोडो अभियान
yyadav@gmail.com





Source link

26 people killed in Kashmir Terror Attack, Maharashtra tourists killed in Kashmir Terror Attack

0
26 people killed in Kashmir Terror Attack, Maharashtra tourists killed in Kashmir Terror Attack


Pahalgam Terror Attack Updates Today: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमधली परिस्थिती पूर्ववत झाल्याचे दावे सरकार व प्रशासनाकडून करण्यात येत होते. पण पहलगामच्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये निरपराध पर्यटकांचे जीव गेल्यानंतर हे दावे फोल ठरल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध केला जात आहे. हल्ला झाला, तेव्हा नेमकं या भागात काय घडलं, याचं प्रत्यक्षदर्शींनी केलेलं थरारक कथन आता समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

मंगळवारचा दिवस जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यामध्ये नेहमीसारखाच सुरू झाला. या भागातील निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली. दुपारच्या सुमारास या भागात जवळपास एक ते दीड हजार पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. हे प्रमाण तसं नेहमीपेक्षा काहीसं कमीच होतं. पण दिवस जसजसा वर सरकू लागला, तसतशी पर्यटकांची संख्याही वाढू लागली. पण पर्यटकांबरोबरच इथे दहशतवादीही दाखल झाल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही!

“एक गोळी अचानक कुठूनतरी माझ्या हाताच्या कोपऱ्याला लागली”

गुजरातचे रहिवासी विनय बै हे बैसरणमध्ये फिरण्यासाठी आले होते. मंगळवारी दुपारी ते या भागात प्रवेश करणार इतक्यात त्यांना गोळीबाराचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. “मी बैसरणमध्ये शिरणात इतक्यात गोळ्यांचा आवाज यायला लागला. लोक जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. मी तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असतानाच एक गोळी कुठूनतरी आली आणि माझ्या हाताच्या कोपरात शिरली”, असं बै यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं.

वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला. “तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”, असं एका महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं.

जे पर्यटक तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, तेही दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या अंदाधुंद गोळीबारात मरण पावले. “हल्ल्यातून वाचलेल्या एका पर्यटकानं आम्हाला सांगितलं की गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर ते सगळे नजीकच्या तंबूंच्या दिशेनं पळाले. पण काही वेळातच दहशतवादी त्या तंबूंपर्यंत पोहोचले. बाजूच्याच तंबूत शिरून त्यांनी सर्व पुरुषांना बाहेर यायला सांगितलं. त्यांच्याशी दहशतवादी काहीतरी बोलले आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या”, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

“२० मिनिटं दहशतवादी बंदुका घेऊन फिरत होते”

दरम्यान, दहशतवाद्यांचा गोळीबार तब्बल २० मिनिटांसाठी सुरू होता, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी पर्यटकानं दिल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. “गोळीबार चालू असताना असं वाटत होतं की तो हल्ला कधी संपणारच नाही. ते सगळे दहशतवादी तिथे जवळपास २० मिनिटं होते. त्यांना कुणीही निर्बंध घालणारं नव्हतं. ते सगळीकडे फिरत होते आणि गोळ्या झाडत होते”, असं त्यांनी सांगितलं.

“पोलीस येईपर्यंत दहशतवादी निघून गेले होते”

बैसरण खोऱ्याचं ठिकाण हे पहलगामपासून जवळपास साडेसहा किलोमीटर आहे. पण तिथपर्यंत एकतर पायी किंवा घोड्यांवरच पोहोचता येऊ शकतं. कारण यातला सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलाचा आणि ओबडधोबड आहे. त्यामुळे पर्यटकांना घटनास्थळापासून बाहेर नेण्यासाठी कोणतंही वाहन तिथे उपलब्ध नव्हतं. काही दुकानदार व टुरीस्ट गाईड्सनी जखमी पर्यटकांना घोड्यांवरून पहलगामच्या दिशेनं नेण्यासाठी मदत केली. “पोलीस घटनास्थळी दाखल व्हायच्या खूप आधीच दहशतवादी निघूनही गेले होते”, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी पर्यटकानं दिली.

हेही वाचा

“आम्हाला वाटलं लष्कराचा नियमित सराव असेल”

दरम्यान, मूळच्या कर्नाटकच्या असणाऱ्या पल्लवी राव यांनी सुरुवातीला हा गोळीबार म्हणजे लष्कराचा नियमित सराव असल्याचाच त्यांचा समज झाल्याचं सांगितलं. त्यांचे ४७ वर्षीय पती मंजुनाथ राव यांची दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली. हल्ल्यातून वाचलेल्या इतर पर्यटकांप्रमाणेच पल्लवी राव यांनीदेखील दहशतवाद्यांनी फक्त पुरुष पर्यटकांना लक्ष्य केल्याचं सांगितलं.





Source link

वक्फ कायद्यातील ‘दुरुस्त्या’ हे बिघडलेल्या राजकारणाचे लक्षण…

0
वक्फ कायद्यातील ‘दुरुस्त्या’ हे बिघडलेल्या राजकारणाचे लक्षण…


श्रीया हांडू यांच्याशी माझी ओळखदेख नाही, पण त्या अभियोक्ता (ॲडव्होकेट) आहेत आणि त्यांचे आडनाव पाहाता, त्या काश्मिरी पंडित समाजातल्या असणार हे उघड आहे. या ॲड. हांडू यांनी त्यांच्या ब्लॉगवर ‘वक्फ दुरुस्ती कायदा पारदर्शकतेसाठी असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा दमनशाहीचाच प्रकार आहे’ असे मत (सर्वोच्च न्यायालयात या कायद्यातील वादग्रस्त तरतुदी काही काळ गोठवण्याची ग्वाही सरकारलाच द्यावी लागण्याआधी) व्यक्त केले होते, त्या मताशी मी पूर्णत: सहमत आहे.

न्यायालय त्याचे काम करीलच, पण मुळात संसदेमध्ये या अशा तरतुदी असलेले विधेयक मांडले जाणे हेच अनावश्यक होते, असे माझे मत आहे. यावर संसदेत चर्चा करताना विरोधी पक्ष एकत्र आले आणि विधेयकाच्या विरोधात त्यांनी मुद्दे मांडले, त्यातून सत्ताधारी पक्षाच्या इराद्यांवर कोरडे ओढले गेले, हेही नसे थोडके. पण सत्ताधाऱ्यांचे खरे इरादे काय आहेत, कोणत्या प्रकारचा विचार आजचे सत्ताधारी करताहेत, हे आठ एप्रिल रोजी ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनी- समूहाने आयोजित केलेल्या ‘रायझिंग भारत समिट’ मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून उघड झाले. काँग्रेसनेच वक्फ विधेयकात मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी बदल केले होते आणि ‘त्यामुळे केवळ मूलतत्त्ववादी आणि जमिनी हडपणाऱ्या मुस्लिमांचे भले होऊन पुढे भारताची फाळणी झाली’ अशा अर्थाचे आश्चर्यजनक विधान पंतप्रधानांनी केले. त्याला दुसऱ्या दिवशी, वृत्तपत्रांनीही प्रसिद्धी दिली. भाजप आणि त्याआधी संघ परिवारातील राजकीय नेते हे फाळणीचे खापर गांधी-नेहरूंवरच फोडतात हे नेहमीचेच; इतके की, मोहम्मद अली जीना यांनी द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेचा पाठपुरावा केला आणि अखेर ते यासाठी हटूनच राहिले, हे त्या सततच्या प्रचारामुळे अनेकजण आज विसरून गेले असतील… पण वक्फ कायद्यामुळे फाळणी झाली हा शोध (मला तो पटत नसला, तरीही) नवाच म्हटला पाहिजे.

अर्थात, मला हे माहीत आहे की, वक्फच्या मालमत्तांचा गैरवापर करू पाहाणारे किंवा त्या मालमत्ता गिळंकृत करू पाहाणारे अनेकजण असतात. तसे एक उदाहरण माझ्या कारकीर्दीत घडले आहे. मुस्लीम समाजातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील दोघी बहिणी मुंबईत माहीम येथे त्यांच्या कौटुंबिक वक्फतर्फे महिला व मुलींसाठी अनाथालय चालवत होत्या, परंतु समुद्राकाठच्या त्या मोक्याच्या जागेवर त्याच भागातल्या कुणाचातरी डोळा असून त्यासाठी या बहिणींना त्रास दिला जातो आहे, अशी माहिती (माझी मोठी मुलगी या दोघींना ओळखत असल्याने) माझ्यापर्यंत पोहोचली. प्रकरण काय आहे, हे पाहण्यास मी संबंधित पोलिसांना सांगतिले. हा वक्फ त्या दोघींनी, वडिलांच्या संपत्तीतून स्थापला होता. तिथे असहाय महिलांना राहण्याची जागाच नव्हे तर कपडेलत्ते, जेवणखाण वा औषधोपचारही दिले जात. ‘आम्हाला आत्ता काही नको- पण आमच्याकडे एक गुरखा सोडला तर आम्ही साऱ्या महिला. तशीच वेळ आल्यास स्थानिक पोलिसांची मदत मिळावी इतकेच’ असे त्यांचे म्हणणे होते आणि मालमत्ता कवडीमोलाने विकण्यासाठी त्यांना त्रास दिला जात असल्याने त्यात तथ्यही होते.

हेही वाचा

अशा प्रकारे प्रत्येक समाजात, दुर्बळांना त्रास देणारे असतात. कारण मोह, लोभ किंवा हाव हे दुर्गुण काही फक्त मुस्लिमांचे नव्हेत. त्यातही त्या-त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांशी संधान असणाऱ्यांच्या लोभाला तर वरदहस्तही असू शकतो आणि मग सरकारी संस्थांनाच हाताशी धरून स्वार्थ साधला जातो. आपल्या पंतप्रधानांनाही हे सारे माहीत असेलच. ते आज वक्फचे प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत पण वास्तविक प्रत्येक धर्माच्या संस्थांमध्ये अशा काही आगळिका होत असतात. फक्त वक्फलाच शिस्त लावण्यासाठी तरतुदी करणे- त्या वादग्रस्त ठरत असूनही संसदेत त्या रेटून नेणे- हे सारे अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या संदर्भात केले जाते आहे, हेही सर्वांना माहीत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे पालुपद अशा वेळी – विशेषत: मुस्लिमांच्या संदर्भात- हमखास विसरले जाते. त्यामुळे कुणाही तटस्थ निरीक्षकाला एवढे समजू शकते की, वक्फवरच भाजपची दृष्टी जाण्याचे कारण त्या संस्था मुस्लिमांशी संबंधित आहेत हेच होते.

समजा कायद्याचा उद्देश चांगला आहे असे गृहीत धरले तरी, तो कायदा राबवणारी मंडळी ‘सबका साथ… सबका विश्वास’ या उक्तीप्रमाणे वागतीलच असे नाही. विशेषत: मुस्लिमांनाच २०१४ नंतर वारंवार लक्ष्य केले जाते आहे, त्या समाजालाच सर्वाधिक शिक्षा दिली जाते आहे, हेही ‘लव्ह जिहाद’सारखे आरोप मुस्लिम तरुणांवर करण्यातून किंवा गुरांची वाहतूक करणाऱ्या मुस्लिमांकडे कागदपत्रे असूनही त्यांना होणाऱ्या जीवघेण्या मारहाणीतून उघड होत असते. पण याला कायदेशीर आणि संस्थात्मक अधिष्ठानही देण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे. ‘सीएए’ म्हणून ओळखला जाणारा ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा’ हा अशा प्रकारचा पहिला संस्थात्मक प्रयत्न होता. वास्तविक या निराळ्या कायद्याची वा तरतुदीची काहीही गरज नव्हती, कारण शेजारील देशांमधले लोक जर निराधार, निर्वासित किंवा शरणार्थी म्हणून आलेले असतील, तर त्यांना यापूर्वीही नागरिकत्व विनासायास मिळालेलेच आहे. तरीही मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व नाकारण्यासाठी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले.

हेही वाचा

त्यामुळे सीएए काय किंवा आताचा वक्फ कायदा काय, हे दोन्ही कायदे मुस्लिम समाजाला डिवचणे आणि मतांसाठी केले जाणारें ‘हिंदुत्वा’चे राजकारण पुढे रेटणे याच हेतूचे असावेत, असे मानण्यास पुरेपूर जागा आहे. इथे मला एक कबुलीही दिली पाहिजे ती अशी की, या प्रकारचा बहुसंख्याकवाद अगदी माझ्या अवतीभोवतीच्या, ओळखीतल्या अनेकांना पटू लागलेला आहे आणि हे सार्वत्रिक असल्याने भाजपचा मत-टक्का वाढतोच आहे. तरीदेखील मी हे लिहितो आहे याचे कारण समाजात दुही पेरण्याचे, तिरस्कारावर आधारलेले राजकारण मला पटत नाही. ‘विविधतेतून एकते’चे आवाहन पंतप्रधान मोदी हेदेखील करतात, हे मी त्यांच्या अनेक भाषणांतून ऐकलेले आहे. मात्र पूरक कृतीविना किंवा धोरणांविना अशी आवाहने पोकळच ठरतात.
पश्चिम बंगालमधील मुस्लिमांनी वक्फ विधेयकावर हिंसक प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ४०० हिंदू कुटुंबांना काही काळासाठी घरदार सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला, याचाही मी निषेध करतो. ‘राजधर्म’ पाळण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीसुद्धा आता, २००२ मधील गुजरातच्या मुख्यमंत्र्यांइतक्याच अपयशी ठरलेल्या आहेत.

वक्फ कायद्यातील तरतुदींबाबत न्यायालयीन सुनावणी सुरूच राहील, परंतु ‘वक्फ’च काय, कुणाच्याही जमिनींचा गैरवापर होऊ नये आणि कुणाच्याही जमिनी कुणीही गिळंकृत करू नयेत, ही अपेक्षा सर्वांनीच कोणत्याही सरकारकडून बाळगायला हवी. ती पूर्ण करण्यात भेदभाव- किंवा, श्रेया हांडू म्हणतात तसा कुणाचे दमन करण्याचा उद्देश दिसू नये.

(लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त)





Source link

District administration unaware of Boisar freight yard relocation Palghar news

0
District administration unaware of Boisar freight yard relocation Palghar news



District administration unaware of Boisar freight yard relocation Palghar news | बोईसर मालवाहू यार्ड स्थलांतराबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ; चित्रालय परिसरात वाहतूक समस्या निर्माण होण्याची शक्यता





Source link

नायगावच्या मातीला मिळणार ‘सावित्री-ज्योती’चा भव्य सन्मान!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक निर्णय

0
नायगावच्या मातीला मिळणार ‘सावित्री-ज्योती’चा भव्य सन्मान!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक निर्णय

नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकासह महिलांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून, या दोन्ही प्रकल्पांसाठी तब्बल १४३ कोटींपेक्षा अधिक निधीची मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी देण्यात आली.

या भव्य स्मारकासाठी १४२ कोटी ६० लाख रुपये, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७ लाख १७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

३ जानेवारी रोजी नायगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीची घोषणा केली होती. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या आराखड्यात पुतळा, चौथरा, कलादालन, महिला प्रशिक्षण केंद्र, कार्यालय, महिला निवास वसतीगृह, विश्रांतीगृह, बैठक कक्ष, कॅंटीन, भित्तीचित्रे, अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ता, बागबगिचा, वाहनतळ, अग्निशामक यंत्रणा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युतीकरण, प्रेक्षागृह आणि सीसीटीव्ही यंत्रणा यांचा समावेश करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे नायगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गावात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ना. जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द खरा करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सावित्रीबाईंच्या कार्याला साजेसा स्मारक साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


IPL 2025 Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians today match |

0
IPL 2025 Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians today match |



IPL 2025 Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians today match | | पुन्हा मुंबईचेच वर्चस्व? आज हैदराबादशी सामना; मोठी धावसंख्या अपेक्षित





Source link

state government admits in high court no proper action taken on illegal loudspeakers after nine years

0
state government admits in high court no proper action taken on illegal loudspeakers after nine years



state government admits in high court no proper action taken on illegal loudspeakers after nine years | ध्वनीक्षेपकांवर म्हणावी तशी कारवाई नाही, कारवाईच्या आदेशानंतर नऊ वर्षांनी राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली





Source link

survey of dangerous buildings begins in thane action to vacate buildings will begin after the end of april

0
survey of dangerous buildings begins in thane action to vacate buildings will begin after the end of april



survey of dangerous buildings begins in thane action to vacate buildings will begin after the end of april | ठाण्यात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू, एप्रिल महिनाअखेरनंतर इमारती रिकाम्या करण्याची कारवाई होणार सुरू





Source link