Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 355

Anil Ambani Net Worth : क्या बात! मुलांमुळे अनिल अंबानी मालामाल… कोट्यवधींचं कर्ज फेडल्यानंतर आता संपत्ती किती?

0
Anil Ambani Net Worth : क्या बात! मुलांमुळे अनिल अंबानी मालामाल… कोट्यवधींचं कर्ज फेडल्यानंतर आता संपत्ती किती?


Anil Ambani Net Worth : कोरोना काळानंतर व्यवसाय क्षेत्रामध्ये कैक गोष्टी बदलल्या. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नवे बदल झाले. इथं भारतात व्यवसाय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अंबानी कुटुंबाच्या नफ्याची आकडेवारीसुद्धा बदलली. यामध्ये अनिल अंबानी अर्थात मुकेश अंबानी यांच्या धाकट्या बंधूनंही वेगानं प्रगती करत या क्षेत्रात आपली ओळख नव्यानं प्रस्थापित केली. 

साधारण मागील वर्षभरात अनिल अंबानी यांनी त्याच्या कंपन्यांवर असणारं बरंच कर्ज फेडलं. असं म्हणतात की आर्थिक चणचण भासली तेव्हा खुद्द टीना अंबानी यांनीच आपले दागिने पुढे करत कर्ज फेडण्यासाठी हातभार लावला होता. 2025 हे वर्षसुद्धा अनिल अंबानी यांच्यासाथी सकारात्मक सुरुवात करणारं ठरलं. 1 जानेवारीला अनिल अंबानी यांच्या एका कंपनीनं 1286 कोटी रुपयांचं कर्ज फेडण्याची घोषणासुद्धा केली. उपलब्ध आकडेवारीनुसार रिलायन्स पॉवर सब्सिडिअरी कंपनी सासन पॉवर लिमिटेडनं आयआयएफसीएल (IIFCL) ची 150 म‍िल‍ियन डॉलर (1286 कोटी ) ची कर्जफेड केली. 

IIFCL आणि इतर कंपन्यांकडून घेतलेलं कर्ज फेडल्यामुळं पॅरेंट कंपनी रिलायन्स पॉवरची बॅलेन्स शीट आणखी साकारात्मक प्रभाव पाडताना दिसली आणि कंपनीनं भविष्याच्या दृष्टीकोनातून शाश्वत उर्जा स्त्रोतांच्या दिशेनं आपला प्राधान्यक्रम वळवला. 

सद्यस्थिलीला अनिल अंबानी यांच्या मुख्य कंपन्यांपैकी एक असणारी रिलायन्स कॅपिटल या कंपनीची विक्री होणार असून, हिंदुजा ग्रुपच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) कडून या कंपनीसाठी सर्वाधिक मोठी बोली लावण्यात आली आहे. IIHL चे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांच्या माहितीनुसार यामुळं उद्योग समुहाची बँकेतील भागिदारी 15 वरून 26 टक्क्यांवर आणण्यास सरकारी मान्यता मिळाली आहे. धीम्या गतीनं ही भागिदारी वाढवण्यात येईल. IRDAI कडून जेव्हा यासाठीच्या कराराला मंजुरी मिळेल तेव्हा कर्जदारांना उर्वरित रक्कम फेडता येईल. 

कोविडदरम्यान कंपनीनं गटांगळ्या खाल्ल्या आणि… 

कधी एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या अनिल अंबानी यांनी कोविड काळात अनेक आव्हानांचा सामना केला. त्यांच्या या पडत्या काळात दोन मुलांनीसुद्धा त्यांना साथ दिली. जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी यांच्यापासून अगदी सुनबाई कृष्णा शाह या नव्या पिढीनं अंबानींचा व्यवसाय प्रचंड आत्मविश्वासानं पुढे नेण्यात हातभार लावला. 

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरवर जून 2024 पर्यंत 17812 कोटी रुपयांचं मोठं कर्ज होतं. नवं वर्ष सुरू होताच त्यांनी हे कर्ज फेडत आता हा आकडा शून्यावर आणला आहे. सध्या रिलायन्स इन्फ्रावर किरकोळ प्रमाणात कर्ज असून कंपनीकडून ते फेडण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जात आहेत. ज्यामुळं आता कर्जमुक्त होत व्यवसाय क्षेत्रात नव्यानं सुरुवात करण्यासाठी अनिल अंबानी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. 

गुंतवणुकदारांचा विश्वास 

कर्जमुक्तीनंतर कंपनीचा सकारात्मक मार्गानं प्रवास सुरू झाला आणि आता गुंतवणुकदारही या कंपनीवर विश्वास ठेवताना दिसत आहेत. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इंफ्राच्या शेअरमध्येही चांगली तेजी पाहायला मिळत आहे. परिणामी कंपनीचा मार्केट कॅप शुक्रवारी अनुक्रमे 16,614 कोटी रुपये आणि 10,192.46  रुपयांवर बंद झाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व चढ- उतारांनंतर आता अनिल अंबानी यांच्या एकूण संपत्तीचा आकडा 530 म‍िल‍ियन डॉलर म्हणजेच जवळपास 4500 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अंबानींच्या या संपत्तीमध्ये आणि त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक यशामध्ये त्यांच्या दोन्ही मुलांचा मोलाचा वाटा असल्याची बाब इथं नाकारता येत नाही. 





Source link

खूप कमी वयात युवा घेतात जैन धर्माची दीक्षा; साधु-साध्वी झाल्यानंतर कसा असतो प्रवास?

0
खूप कमी वयात युवा घेतात जैन धर्माची दीक्षा; साधु-साध्वी झाल्यानंतर कसा असतो प्रवास?


गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की जैन धर्मातील तरुणांची मोठी संख्या त्यांचे चांगले जीवन, सुखसोयी आणि चांगले करिअर सोडून जैन भिक्षू बनत आहे. त्यांच्या या पुढचा प्रवास कसा असतो. आंघोळ न करता कोणत्याही औषध पाण्याशिवाय हे जैन भिक्षु आपलं जीवन कसं जगतात? एवढ्या कमी वयात का घेतात एवढा मोठा निर्णय? 

जैन धर्मात दीक्षा म्हणजे काय?

जैन धर्मात दीक्षा घेणे म्हणजे सर्व भौतिक सुखसोयींचा त्याग करणे आणि भिक्षूचे जीवन जगण्यासाठी स्वतःला समर्पित करणे. जैन धर्मात याला ‘चरित्र’ किंवा ‘महानिभिश्रमण’ असेही म्हणतात. दीक्षा समारंभ हा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये होणाऱ्या विधींनंतर, दीक्षा घेणारे मुले साधू बनतात आणि मुली साध्वी बनतात.

त्यानंतर काय करायचे?

दीक्षा घेण्यासोबतच, प्रत्येकाने या पाच प्रतिज्ञांचे पालन करण्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे:
– अहिंसा: तुमच्या शरीराने, मनाने किंवा शब्दांनी कोणत्याही सजीवाला इजा पोहोचवू नका.
– सत्य: नेहमी सत्य बोला आणि सत्याचे समर्थन करा.
– अस्तेय: दुसऱ्याच्या मालमत्तेवर वाईट नजर न ठेवणे आणि लोभापासून दूर राहणे
– ब्रह्मचर्य: तुमच्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि कोणाशीही संबंध न ठेवणे
– अपरिग्रह: गरजेपेक्षा जास्त साठवू नका, फक्त गरजेइतकेच साठवा.

जैन धर्म हा एकमेव धर्म आहे जिथे आजही भिक्षू आणि भिक्षुणी अतिशय कठोर जीवन जगतात आणि त्यांना किमान भौतिक सुविधांचाही लाभ मिळत नाही. ज्या गोष्टी आपल्याला शारीरिक वेदना वाटतात त्या त्यांच्या आयुष्याचा एक सामान्य भाग आहेत आणि त्यांना त्याबद्दल कोणतीही समस्या नाही. 

स्वतःचे केस उपटावे लागतात

दीक्षा घेण्यासाठी आणि त्यानंतर, सर्व साधू आणि साध्वींना त्यांचे घर, व्यवसाय, महागडे कपडे, विलासी जीवन सोडून एका तपस्वीच्या जीवनात पूर्णपणे बुडून जावे लागते. या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी, सर्व साधू आणि साध्वींना त्यांच्या डोक्यावरील केस स्वतःच्या हातांनी उपटावे लागतात.

फक्त सुती कपडे का घालतात? 

यानंतर, सर्व साध्वींना पांढऱ्या रंगाची सुती साडी घालण्यासाठी दिली जाते. तर साधू कपडे पूर्णपणे सोडून देतात. दीक्षा घेतल्यानंतर, त्याला भौतिक सुख म्हणतात तेवढा आनंदही मिळत नाही. खऱ्या अर्थाने, या जगात ते ज्या प्रकारची कठीण जीवनशैली पाळतात ती जगातील इतर कोणत्याही धर्मात दिसून येत नाही. जैन भिक्षू आणि भिक्षुणी कधीही स्वतःचे अन्न स्वतः शिजवत नाहीत; ते भिक्षेतून जे काही मिळवतात ते खातात. त्यांचे जीवन खूप कठीण आहे.

तरुणांमध्ये त्याची क्रेझ का वाढते?

गेल्या अनेक वर्षांत, दरवर्षी मोठ्या संख्येने लहान मुले आणि तरुण जैन धर्मात दीक्षा घेत आहेत. याचे कारण काय आहे? या सर्वांची कारणे वेगवेगळी असू शकतात पण त्यांचे मूळ एकच आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाचा असा विश्वास आहे की, तो बऱ्याच काळापासून खूप अस्वस्थ होता. भौतिक सुखसोयी त्याला तो आनंद देऊ शकल्या नाहीत जो तो शोधत होता. म्हणूनच त्याने जगाच्या नश्वरतेचा त्याग करून साधे जीवन जगण्याचा आणि देवाच्या भक्तीसाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
– मनात वैराग्य निर्माण होऊ लागते.
– जैन भिक्षूंची खडतर जीवनशैली त्यांना वास्तविक जीवनाचे सार वाटते.
– जैन धर्मात, अगदी लहानपणापासूनच, जैन मुले त्यांच्या धर्मातील भिक्षू आणि भिक्षुणींच्या संपर्कात येतात आणि त्यांचे जीवन पाहतात, त्यामुळे त्यांच्यावर त्यांचा प्रभाव पडू लागतो.
– घरी धर्माबद्दल पालकांची तीव्र ओढ देखील त्यांना याकडे घेऊन जाते.

दीक्षा घेतल्यानंतरचे जीवन कसे असते?

दीक्षा घेतल्यानंतर म्हणजेच संताच्या जीवनात प्रवेश केल्यानंतर, जैन भिक्षू आणि भिक्षूंचे जीवन खूप संतुलित आणि शिस्तबद्ध होते. सूर्यास्तानंतर, जैन भिक्षू आणि भिक्षू एक थेंबही पाणी पीत नाहीत किंवा अन्नाचा एक कणही खात नाहीत. सूर्योदयानंतरही, हे लोक सुमारे 48 मिनिटे वाट पाहतात आणि त्यानंतरच पाणी पितात. 

फक्त भिक्षा मागूनच जेवावे लागते

जैन भिक्षू आणि भिक्षुणी कधीही स्वतःसाठी अन्न शिजवत नाहीत. तसेच आश्रमात कोणीही त्यांच्यासाठी जेवण बनवत नाही. उलट, हे लोक घरोघरी जाऊन अन्नासाठी भीक मागतात. या प्रथेला ‘गोचरी’ म्हणतात. ज्याप्रमाणे गाय प्रत्येक दारातून थोडेसे अन्न घेते, त्याचप्रमाणे जैन भिक्षूंनाही एका घरातून जास्त अन्न घेण्याची परवानगी नाही. ज्या घरात ते भीक मागायला जातात तिथे फक्त शाकाहारी अन्नच तयार केले जाते याची खात्री केली जाते.

फिरायला किंवा हायकिंगला जातात

जैन भिक्षू कोणत्याही प्रकारचे वाहन किंवा प्रवासाचे साधन वापरत नाहीत. तो शक्य तितके चालतो आणि चालत जाऊन लांब अंतर कापण्यावर विश्वास ठेवतो. त्यांना कोणत्याही एका ठिकाणी काही दिवसांपेक्षा जास्त काळ राहण्याची परवानगी नाही. हे लोक पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर प्रवास करत राहतात. या प्रवासादरम्यान, त्यांना ते अनवाणी पायांनी आणि चप्पल किंवा बूट न ​​घालता करावे लागते. याला पदयात्रा म्हणतात आणि त्याचे पालन करणे हा ऋषीमुनींचा धर्म आहे. त्यांचे जीवन पूर्णपणे ध्यान आणि धर्मासाठी समर्पित होते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.) 





Source link

kondraal paavam is available on OTT : Best Thriller Movies On Prime Video : कोंड्राल पावम प्राइम व्हिडीओ : प्राइम व्हिडीओ थ्रिलर फिल्म्स

0
kondraal paavam is available on OTT : Best Thriller Movies On Prime Video : कोंड्राल पावम प्राइम व्हिडीओ : प्राइम व्हिडीओ थ्रिलर फिल्म्स


Best Thriller Movie On Prime Video: घरबसल्या ओटीटीवर काहीतरी चांगलं पाहावं, असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कडक उन्हात घराबाहेर पडायचं नसेल आणि खिळवून ठेवणारा चित्रपट पाहायचा असेल तर आम्ही ज्या सिनेमाबद्दल बोलतोय, ते नक्की वाचा.

खरं तर ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे जगभरातील चित्रपट, शो, वेब सीरिज तुम्हाला फोनमध्ये पाहता येतात. आतापर्यंत आम्ही तुम्हाला अॅक्शन, क्राइम, थ्रिलर, ड्रामा, कॉमेडी, हॉरर अशा विविध जॉनरच्या अनेक सिनेमांबद्दल सांगितलं आहे. आता आम्ही ज्या थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगतोय, त्याची कथा तुम्हाला नक्की आवडेल.

जर तुम्हाला थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. या सिनेमाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर तुम्ही ‘दृश्यम’ आणि ‘महाराजा’ सारखे सिनेमे विसराल. हा उत्तम दक्षिण भारतीय चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत पडद्यावर खिळवून ठेवेल. त्याला IMDB वर उत्तम रेटिंग मिळालं आहे. या चित्रपटाचे नाव काय आहे आणि तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल ते जाणून घ्या.

हेही वाचा

कोणता आहे हा दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपट?

आम्ही आज ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो तमिळ क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. त्याचं दिग्दर्शन दयाल पद्मनाभन यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रताप कृष्णा आणि मनोज कुमार यांनी इन्फॅच स्टुडिओच्या माध्यमातून केली असून. या चित्रपटाचे नाव ‘कोंड्राल पावम’ आहे. यात वरलक्ष्मी सरथकुमार, संतोष प्रताप, ईश्वरी राव आणि चार्ली यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला होता आणि याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा

कोंड्राल पावमची कथा

‘कोंड्राल पावम’मध्ये तमिळनाडूतील एका गावातली गोष्ट दाखवण्यात आली आहे. या गावात एक गरीब कुटुंब राहतं. त्यांची भेट एका ज्योतिषाशी होते. तो ज्योतिषी या कुटुंबाला सांगतो की त्यांच नशीब पालटणार आहे. यानंतर त्यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती येते, ती तिथे रात्रभर थांबण्याची परवानगी मागते. आधी हे कुटुंबीय त्या व्यक्तीला थांबायला नकार देतात, मग तयार होतात. यानंतर त्यांच्या आयुष्यात जे ट्विस्ट येतात, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल चित्रपट?

‘कोंड्राल पावम’ हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या पाहता येईल. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळालं आहे.





Source link

Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, अनंतनागमध्ये १७५ संशयितांना घेतलं ताब्यात

0
Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, अनंतनागमध्ये १७५ संशयितांना घेतलं ताब्यात


जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करत सुमारे १७५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या चार दिवसांपासून अनंतनाग पोलीस, लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि इतर यंत्रणांची संयुक्त पथके जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात घेराव घालून शोध मोहीम राबवत आहेत. या कारवाईचा एक भाग म्हणून जिल्हाभरात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. कडक दक्षता घेऊन दिवसरात्र शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी कारवायांना मदत करणारे सपोर्ट नेटवर्क नष्ट करण्यासाठी आतापर्यंत सुमारे १७५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.



Source link

ठाण्यात अवजड वाहनांमुळे कोंडी, गायमुख घाटाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक कोंडी

0
ठाण्यात अवजड वाहनांमुळे कोंडी, गायमुख घाटाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक कोंडी



thane traffic jam gaimukh ghat repair works ठाण्यात अवजड वाहनांमुळे कोंडी, गायमुख घाटाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक कोंडी





Source link

पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल, शांत बसणार नाही; पहलगाम हल्ल्यावरून शरद पवारांनी केंद्राला घेरलं

0
पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल, शांत बसणार नाही; पहलगाम हल्ल्यावरून शरद पवारांनी केंद्राला घेरलं


पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानविरोधात सुरू असलेल्या कडक कारवाईबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला असून अशा पावलांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे. सिंधुदुर्गात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, आज आम्ही काही निर्णय घेतो, पण उद्या पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. पाकिस्तान शांत बसेल असे मला वाटत नाही.



Source link

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

0
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू, ४ गंभीर


दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर हरियाणातील नूंह जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.



Source link

मातृत्वासंदर्भात महिला टेनिस संघटनेचा उपक्रम ठरतोय स्तुत्य; काय आहे नेमकी ही योजना?

0
मातृत्वासंदर्भात महिला टेनिस संघटनेचा उपक्रम ठरतोय स्तुत्य; काय आहे नेमकी ही योजना?



महिला गृहिणी असो वा बाहेर काम करणारी, तिची तारेवरची कसरत काही सुटत नाही. त्यात ती एक स्वतंत्र खेळाडू म्हणून करिअर करीत असेल, मग काही काळासाठी तिच्या आयुष्यात मोठा पॉज येणार हे निश्चित. मूल झाल्यावर किंवा गर्भधारणा झाल्यावर खेळाडूंना पॉज घ्यावाच लागतो. अनेक वर्षांपासून उच्चस्तरीय महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करिअर आणि पालकत्वाचा आनंद यापैकी एक पर्याय निवडण्याची समस्या भेडसावत आहे. मोठे परिवर्तन घडवून आणणारे हे पाऊल असणाऱ्या या उपक्रमात महिला टेनिस असोसिएशनने मार्चमध्ये एक नवीन मातृत्व धोरण जाहीर केले. त्यामध्ये महिलांच्या अंडाशयातील प्रजनन पेशी गोठवणे, आयव्हीएफसारख्या उपचारात्मक पद्धतींसाठी अनुदानाचा समावेश करण्यात आला आहे. महिला टेनिस असोसिएशनने पुढाकार घेतल्याने इतर क्रीडा प्रकारातील संस्थादेखील त्यांच्या महिला खेळाडूंना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कशा प्रकारे पाठिंबा देऊ शकतात याबाबत विचार करू लागले आहेत.

धोरण काय आहे?

महिला टेनिस असोसिएशनने सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीच्या भागीदारीत मातृत्व आणि प्रजनन उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात १२ महिन्यांपर्यंत पगारी प्रसूती रजा, अंडाशयातील प्रजनन पेशी गोठवणे व आयव्हीएफ यांसह प्रजनन उपचारांसाठी आर्थिक मदत प्रदान करण्याची तरतूद आहे. ३२० हून अधिक खेळाडू अशा प्रकारच्या मदतीसाठी पात्र आहेत. “हा खरोखरच एक अभूतपूर्व उपक्रम आहे, जो स्वतंत्र व्यावसायिक खेळांमध्ये आतापर्यंत केला गेला नाही”, असे महिला टेनिस असोसिएशनच्या सीईओ पोर्टिया आर्चर म्हणाल्या.

खेळाडूंचं मत काय?

दोन वेळची ग्रँड स्लॅम विजेती व महिला टेनिस असोसिएशनच्या खेळाडूंच्या काउन्सिलमधील सदस्य व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी नवीन धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले. “खेळाडूंकडून मिळालेला अभिप्राय खरोखरच अविश्वसनीय आहे. आपण बदल घडवू शकतो हे प्रेरणादायी आहे. हेदेखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, हा खेळाडूंच्या नेतृत्वाखालील कार्यक्रम होता आणि आम्ही तो प्रत्यक्षात आणण्यासाठी खरोखर खूप प्रयत्न केले”, असे बेलारूसी यांनी सांगितले. इतर खेळांमधील खेळाडूंनीदेखील प्रजनन क्षमता जतन करण्याचे समर्थन केले आहे. वूमन नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (डब्ल्यूएनबीए)च्या दिग्गज स्यू बर्ड यांनी वैयक्तिक अनुभवावर आधारित त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे. “ज्या महिलांना करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी अंडी गोठवणे हा एक थेट व सोपा पर्याय आहे. पर्याय असणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

शारीरिक आणि व्यवस्थापनांबाबत आव्हाने

अंडी गोठवणे ही एक शारीरिकदृष्ट्या कठीण प्रक्रिया आहे. त्यात हार्मोन इंजेक्शन्स, वारंवार देखरेख आणि प्रजनन पेशी पुनर्प्राप्तीसाठी शस्त्रक्रियांचा समावेश असतो. टेनिस खेळाडूंसाठी प्रशिक्षण आणि स्पर्धा यामध्ये संघर्ष होऊ शकतो. “तुमची प्रजनन पेशी गोठवण्यासाठी खूप वेळ आणि नियोजन करावे लागते”, असे स्लोएन स्टीफन्स म्हणाल्या. “जर तुम्हाला तुमच्या खेळावर परिणाम होऊ नये, असे वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या ऑफ-सीझनच्या पहिल्या आठवड्यात हे करावे लागेल. हे व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून काहींसाठी अडथळा आहेत”, असेही त्या म्हणाल्या.

रँकिंग संरक्षण आहे का?

महिला टेनिस असोसिएशन सध्या प्रसूती रजेवरून परतणाऱ्या खेळाडूंसाठी संरक्षित रँकिंग प्रदान करते. मात्र, अद्याप प्रजनन संरक्षण घेत असलेल्या खेळाडूंसाठी ते लागू नाही.
“प्रजनन पेशी गोठवणे आणि अगदी आयव्हीएफदेखील संरक्षित रँकिंग यादीत समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे”, असे स्टीफन्स म्हणाले. “अशा प्रकारे तुमचे रँकिंग कमी होत नाही आणि तुम्ही बरे झाल्यावर आणि परतण्यास तयार असतानाही तुम्ही स्पर्धांमध्ये प्रवेश करू शकता”.

दौऱ्यावर असलेल्या माता

अलीकडच्या वर्षांत अनेक खेळाडू आई झाल्यानंतर मोठ्या स्पर्धेत परतल्या आहेत. बाळंतपणानंतर २०२४ मध्ये रुएन येथे महिला टेनिस असोसिएशन जेतेपद जिंकणारी एलिना स्विटोलिना या प्रवासाबद्दल बोलली. “आई होणे हा प्रेम, त्याग व विनाअट भक्तीचा प्रवास आहे”, असेही त्या म्हणाल्या. स्विटोलिना यांचे पुनरागमन आणि सेरेना विल्यम्स, किम क्लिस्टर्स व इतर अनेकांचे पुनरागमन हे दर्शवते की, मातृत्व आणि व्यावसायिक टेनिस एकमेकांपासून वेगळे असण्याची गरज नाही.

टेनिसची इतर खेळांशी तुलना कशी होते?

इतर व्यावसायिक खेळांनीही पावले उचलली आहेत. मात्र, टेनिस दौऱ्यादरम्यान सातत्यपूर्ण धोरण देण्यासाठी वेगळे आहे. दुसरीकडे सांघिक खेळांमधील फायदे बहुतेकदा वैयक्तिक करार किंवा क्लबवर अवलंबून असतात. WNBA मध्ये २०२० च्या सामूहिक सौदेबाजी करारामध्ये दत्तक, सरोगसी आणि प्रजनन उपचारांसाठी परतफेड समाविष्ट आहे.
नॅशनल वूमेन्स सॉकर लीग (NWSL) मध्ये रेसिंग लुईस व्हील आणि गोथम एफसी यांसारख्या क्लबनी प्रजनन क्लिनिकशी भागीदारी केली आहे. जेणेकरून प्रजनन पेशी गोठवणे आणि गर्भ साठवणूक यांसाठी अर्थसाह्य मिळेल.

महिला टेनिसच्या भविष्यासाठी हे किती महत्त्वाचे?

महिला टेनिस असोसिएशन धोरण केवळ खेळाडूंची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करीत नाही, तर कुटुंब नियोजनाभोवतीच्या संभाषणांना सामान्यदेखील करते. आता अव्वल खेळाडू उदाहरणाद्वारे नेतृत्व करत असल्याने खेळात व्यापक बदल घडवून आणता येतील. “या प्रकारच्या कार्यक्रमामुळे अनेक महिलांना त्यांच्या कारकिर्दीत सुरक्षित वाटण्यासाठी, तसेच आई होणे आणि खेळाडू असणे यापैकी एक निवड करावी लागणार नाही. त्यासाठी मोठे दरवाजे उघडतील,” असे अझरेन्का म्हणाल्या.

सांस्कृतिक बदल

धोरणांच्या पलीकडे संस्कृती बदलत आहे. खेळाडू आता केवळ खासगी बाब म्हणून नव्हे, तर करिअर नियोजनाचा भाग म्हणून प्रजनन क्षमतेबद्दल उघडपणे बोलतात. आता निवृत्त झालेल्या मारिया शारापोवा, प्रजननकेंद्रित स्टार्ट-अप्समध्ये एक समर्थक व गुंतवणूकदार बनल्या आहेत. “जेव्हा महिलांना अंडाशयातील प्रजनन पेशी गोठवून, त्यांच्या स्वतःच्या अटींवर त्यांचे करिअर हाताळण्याची करण्याची संधी मिळते, तेव्हा त्या त्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये अधिक स्वतंत्रपणे काम करू शकतात”, असे त्यांनी म्हटले आहे.



Source link

FIR against BJP MLA Balmukund Acharya over protest outside Jamia Masjid in Jaipur marathi news

0
FIR against BJP MLA Balmukund Acharya over protest outside Jamia Masjid in Jaipur marathi news



FIR against BJP MLA Balmukund Acharya over protest outside Jamia Masjid in Jaipur marathi news | जयपूरमधील मशिदीबाहेर घोषणाबाजी, भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय झालं?





Source link

IITian सायको किलरने दोन मित्रांसह वॉचमनची केली हत्या; प्रायव्हेट पार्टही कापले

0
IITian सायको किलरने दोन मित्रांसह वॉचमनची केली हत्या; प्रायव्हेट पार्टही कापले


भीलवाडा शहरातील अयप्पा मंदिरातील एका ज्येष्ठ वॉचमनची नृशंस हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं जेव्हा आरोपी दीपक नायरच्या घरी आणखी दोन मृतेद सापडले. या दोन्ही मृतदेहांची अतिशय भयावह स्थिती होती. वॉचमनसोबत जसा प्रकार घडला अगदी तसाच प्रकार या दोन मृतदेहांसोबत घडल्याच समोर आलं आहे. या दोन्ही शवांची स्थिती अतिशय खराब आहे. दोघांचेही मुंडक आणि प्रायव्हेट पार्ट कापण्यात आले. पोलीस या तिन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडत आहेत. 

मंदिरात रात्री अडीच वाजता झाली हत्या

मंगळवारी रात्री उशिरा 2.30  वाजताच्या सुमारास सुभाष नगर पोलिस स्टेशन परिसरातील अय्यप्पा मंदिरात एका वृद्ध व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. मृताचे नाव ५५ वर्षीय वॉचमन लाल सिंग रावण असे आहे. रक्ताने माखलेला मृतदेह मंदिराच्या एका कोपऱ्यात पडला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटली

मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर आरोपीची ओळख पटल्याची माहिती डीएसपी श्याम सुंदर बिश्नोई यांनी दिली. आरोपीचे नाव दीपक नायर आहे, तो प्रताप नगर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. यानंतर पोलिसांनी त्याला तासाभरात ताब्यात घेतले.

दीपक नायर यांच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक नायर हा एक सवयीचा गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मानसिक आजारी (सायको) असू शकतो अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जेव्हा पोलिसांनी त्याला घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी त्याच्या घरी नेले तेव्हा तिथे आणखी दोन मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनाही धक्का बसला.

पोलिस तपास करत आहेत

आता पोलीस या हत्येमागील हेतू काय होता आणि हे मानसिक विकाराचे प्रकरण आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तिन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने, पोलिस त्यांना घटनांची मालिका मानत आहेत.





Source link