Friday, July 17, 2026
Home Blog Page 326

how to Reduce The Bitterness Of Bitter Gourd

0
how to Reduce The Bitterness Of Bitter Gourd



how to Reduce The Bitterness Of Bitter Gourd | कारल्याचा कडूपणा काही मिनिटांत करा दूर; ‘या’ ५ टिप्सद्वारे बनवा कारल्याची चविष्ट भाजी





Source link

दौंड खूनप्रकरणाचा निकाल: बारामती न्यायालयाची ऐतिहासिक कारवाई; बारा आरोपींना जन्मठेप

0
दौंड खूनप्रकरणाचा निकाल: बारामती न्यायालयाची ऐतिहासिक कारवाई; बारा आरोपींना जन्मठेप


बारामती – हत्या करूनही सुटता येणार नाही, याचा ठोस संदेश बारामती न्यायालयाने दिला आहे. दौंड शहरातील पाच वर्षांपूर्वी घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा निकाल देत बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी एक ऐतिहासिक निर्णय सुनावला. संजीत टाकसह त्याच्या कुटुंबातील चार सख्खे भाऊ आणि तीन महिलांसह एकूण १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

ही शिक्षा बारामती न्यायालयाच्या इतिहासातील सर्वाधिक आरोपींना एकाच प्रकरणात देण्यात आलेली शिक्षा आहे. ३ मे २०१८ रोजी विनोद नरवाल यांची त्यांच्या पत्नीसमवेत मोटारसायकलवरून जात असताना धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.

संजीत, सुजीत, रवि, रणजित टाक, आकाश उर्फ छोटू बेहोत, नरेश वाल्मिकी, बबलू व सुरेश सरवान, मयुरी, माधुरी टाक, शोभा आणि विकी वाल्मिकी (सर्व रा. दौंड, पुणे) या बारा आरोपींनी तलवार, कोयते, लोखंडी पाइप, दगडांचा वापर करून नरवाल यांच्यावर क्रूर हल्ला केला होता.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी केला. विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी, सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, फिर्यादीचे वकील अॅड. मंगेश देशमुख, कोर्ट पॅरवी अधिकारी नामदेव नलवडे व जी. के. कस्पटे, आणि पोलिस अधिकारी मनिषा अहिवळे यांच्या मेहनतीने हे प्रकरण न्यायालयात सिद्ध झाले.

न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी, न्यायवैद्यकीय साक्षी आणि आठ साक्षीदारांच्या साक्षीवर विश्वास ठेवत जन्मठेपेचा निर्णय दिला. दंडाची रक्कम नरवाल यांच्या पत्नी मीना यांना देण्याचे निर्देशही दिले.

man who molested woman on Kelve Road jailed for a year within 29 days

0
man who molested woman on Kelve Road jailed for a year within 29 days



man who molested woman on Kelve Road jailed for a year within 29 days | विनयभंग करणा-या आरोपीला एका वर्षाची शिक्षा, सफाळे पोलिसांच्या प्रयत्नाने २९ दिवसात निकाल





Source link

च्या मर्जीने बॉलीवूडमध्ये काम करणे सोडले नाही…; दिग्गज अभिनेत्री मुमताज यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “माझ्या सासरच्यांनी…”

0
च्या मर्जीने बॉलीवूडमध्ये काम करणे सोडले नाही…; दिग्गज अभिनेत्री मुमताज यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “माझ्या सासरच्यांनी…”



veterans actress Mumtaz reveals reason of quit Films says in laws forbade me from acting: mumtaz says quit job and got married at a time when I was the highest-paid actress: स्वत:च्या मर्जीने बॉलीवूडमध्ये काम करणे सोडले नाही…; दिग्गज अभिनेत्री मुमताज यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “माझ्या सासरच्यांनी…”





Source link

कामगारांचे खरे तारणहार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

0
कामगारांचे खरे तारणहार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

साहस टाईम्स :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण सर्वजण संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, पण त्यांचे कामगार कल्याणासाठीचे योगदान देखील अतुलनीय आहे. देशाचे पहिले कामगार मंत्री म्हणून त्यांनी कामगारांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले.

डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांसाठी खालील महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या:

  • कामाचे तास १२ वरून ८ तासांवर आणले.
  • सर्व कामगारांना पीएफ योजना लागू केली.
  • भरपगारी सुट्टीची तरतूद केली.
  • वेतन आयोग लागू केला.
  • पेन्शन योजना सुरू केली.
  • सीएल (C.L.), ईएल (E.L.), पीएचएल (P.H.L.) सर्वांना लागू केली.
  • कर्मचारी मृत्यू झाल्यास वारसास नोकरीची तरतूद केली.
  • ईएसआयसी (ESIC) योजना लागू केली.
  • आठवड्याला एक दिवस सक्तीची सुट्टी लागू केली.
  • महिलांसाठी भरपगारी प्रसूती रजा लागू केली.

या सर्व योजना आजही देशातील कोट्यवधी कामगारांच्या आयुष्याला आधार देत आहेत. बाबासाहेबांनी केलेले हे कार्य त्यांना फक्त संविधान निर्माता नव्हे, तर कामगारांचा खरा तारणहार बनवते.

mumtaz on sharmila tagore we were never friends opens up on saif ali khan incident

0
mumtaz on sharmila tagore we were never friends opens up on saif ali khan incident



mumtaz on sharmila tagore we were never friends opens up on saif ali khan incident | “मी सुंदर होते, मला तिच्यापेक्षा जास्त…”, मुमताज यांचे शर्मिला टागोर यांच्याबाबत मोठे वक्तव्य; म्हणाल्या…





Source link

निकोबार बेटावर वेळेआधीच मोसमी पाऊस येणार…

0
निकोबार बेटावर वेळेआधीच मोसमी पाऊस येणार…


मुंबई : देशभरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच दक्षिण भारताच्या दिशेने मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांजवळील समुद्रसपाटीवर सध्या ढगांच्या हालचाली आणि वाऱ्याचा वेग यामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. हे लक्षण वेळे आधी मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल देत आहे. सामान्यतः मोसमी पाऊस मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या भागात दाखल होतो. मात्र यंदा तो एक आठवडा आधी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निकोबार बेटांवर मोसमी पाऊस कधी दाखल होतो, यावरून भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्याची प्रगती, वेग, वेळ, आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे येथील बदलांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.

मोसमी पाऊस १५ मेदरम्यान दाखल होतो

निकोबार बेटांवर मोसमी पाऊस सामान्यतः १५ मेच्या आसपास दाखल होतो. भारतातील मोसमी पावसाचे सर्वप्रथम आगमन होणारा हा भाग आहे. या भागात पूर्वी १० मे, अथवा १८ ते २० मेदरम्यान मोसमी पाऊस दाखल झाला आहे . यंदा मात्र १० मेच्या आसपास मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याआधी १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ आणि २००८ साली १० मे रोजी निकोबार बेटांवर मोसमी पाऊस दाखल झाला होता.

हेही वाचा

निकोबार बेटांवरील हवामान

निकोबार बेट हे बंगालच्या उपसागरात असून, येथील हवामान उष्ण व दमट आहे. वर्षभर उष्णता आणि आर्द्रता कायम असते. येथे दोन मुख्य पावसाळी हंगाम अनुभवले जातात.

दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस (मुख्य मोसमी पाऊस)

  • सुरुवात: साधारणतः १५ मेच्या आसपास
  • शेवट ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत
  • याच काळात सर्वाधिक पर्जन्यमान होते.
  • अंदमान-निकोबार हा भारताच्या मोसमी प्रवासाचा पहिला टप्पा आहे.

ईशान्य मोसमी पाऊस (हिवाळी पावसाचे काही प्रमाण) :

  • ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान
  • तुलनेत कमी पाऊस, पण दमट हवामान कायम

सरासरी पर्जन्यमान

निकोबार बेटांमध्ये वर्षाला ३०००- ३८०० मिमी पाऊस पडतो, तो भारताच्या इतर भागांपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा

भौगोलिक प्रभाव

घनदाट जंगल, जैवविविधता आणि किनारपट्टीवर आधारित जीवनशैली यामुळे पावसाचा येथील जनजीवनावर मोठा प्रभाव असतो. पाऊस लवकर पडल्यास बेटांवरील शेतीला चालना मिळते.

पावसाच्या नोंदी

पोर्ट ब्लेअरमध्ये २७ ऑगस्ट २०१६ रोजी २४ तासांत १७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळची २४ तासांतील ती उच्चतम नोंद होती. सामान्यतः अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे २,९६७ मिमी असते. ३० सप्टेंबर २०२३ रोजी दक्षिण अंदमानमध्ये एकत्रित पर्जन्यमान २,२२७.२ मिमी इतके नोंदवले गेले. या बेटांमध्ये पावसाचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत असल्याचेही निरीक्षणात आले आहे. विशेषतः, निकोबारमध्ये दरवर्षी सरासरी पर्जन्यमानात २.८४ मिमी वाढ होत असल्याचे एका अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.





Source link

iranian woman in ambivali arrested by Khadakpada anti narcotics squad smuggling mephodren

0
iranian woman in ambivali arrested by Khadakpada anti narcotics squad smuggling mephodren



iranian woman in ambivali arrested by Khadakpada anti narcotics squad smuggling mephodren | कल्याणमध्ये इराणी वस्तीमधील महिला मेफेड्रोनची तस्करी करताना अटक





Source link

महापे, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाशी ते कल्याण प्रवासासाठी सहा तास; गरमाईचा ताप आणि कोंडीमुळे प्रवासी हैराण

0
महापे, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाशी ते कल्याण प्रवासासाठी सहा तास; गरमाईचा ताप आणि कोंडीमुळे प्रवासी हैराण



on wednesday for Vashi to Kalyan journey Six hours due to traffic jam on Mahape, Mumbra, Shilphata road on महापे, मुंब्रा, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाशी ते कल्याण प्रवासासाठी सहा तास; गरमाईचा ताप आणि कोंडीमुळे प्रवासी हैराण





Source link

तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करण्यासाठी आधार, पॅनकार्ड पुरेसं नाही; ‘या’ राज्य सरकारचं फरमान

0
तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करण्यासाठी आधार, पॅनकार्ड पुरेसं नाही; ‘या’ राज्य सरकारचं फरमान


Aadhar card, PAN card Latest Update : कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी भारतीय असल्याचा वैध पुरावा विचारल्यास आधार आणि पॅन कार्ड सादर केलं जातं आणि ते ग्राह्यसुद्धा धरलं जातं. आता मात्र भारतातील एका राज्यामध्ये हे पुरावे नागरिकांना भारताचं नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीयेत. कारण, त्यासाठी दोन महत्त्वाचे पुरावे अनिवार्य करण्यात आले आहेत. 

भारतात कुठे पुरेसे ठरणार नाहीत पॅन आणि आधार कार्ड? 

तिथं भारतात पाकिस्तानी नागरिकांविरोधातील कारवाईला वेग आला असून या नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी यंत्रणांनी कठोर निर्बंध लागू केले असतानाच आता दिल्लीमध्येही बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील कारवाईला नवं वळण मिळालं आहे. 

अवैधरित्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांना आता भारतीय नागरिकत्वं सिद्ध करण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड सादर करणं पुरेसं ठरणार नाही. तर, त्यासाठी मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट हे दोन पुरावेच अंतिम स्वरुपात ग्राह्य धरले जाणार आहेत. केंद्र शासनानं जारी केलेल्या निर्देशांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून, अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. 

का बदलण्यात आले हे नियम?

साधारण वर्षभरापूर्वी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पुनर्पडताळणी मोहिमेदरम्यान दिल्लीत मोठ्या संख्येनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी झाल्याची बाब लक्षात आली, जिथं ही मंडळी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड असे पुरावे दाखवून आपण भारतीय नागरिक असल्याचं भासवत होते. अनेक नागरिकांकडे तर UNHCR नं जारी केलेले शरणार्थी कार्डसुद्धा आढळले. यामुळं नागरिकांमधून भारताचे नेमके नागरिक ओळखणं आव्हानात्मक ठरलं आणि त्याच कारणास्तव आता या अवैध नागरिकांना पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र हे पुरावे सादर करणं बंधनकारक ठरणार आहे. 

कारवाईदरम्यान पाकिस्तानी नागरिकांवर करडी नजर 

दिल्ली पोलिसांच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या या कारवाईमध्ये विशेषत: पाकिस्तानी नागरिकांवर करडी नजर ठेवली जात असून, आतापर्यंत दिल्लीतील 3500 पाकिस्तानी नागरिकांपैकी 400 जणांना माघारी पाठवण्यात आलं आहे.  

 





Source link