






Startup Success Story : राजस्थानचे कबीर आणि चेतन सिहाग यांनी 2020 मध्ये वेदिका ऑर्गेनिक्सची सुरुवात केली. बाजारात खराब आणि कमी दर्ज्याच्या आणि मसाल्यांची त्यांना चिंता होती. त्यामुळे यासगळ्यात त्यांनी एक दुसरा ऑप्शन निवडण्याचा विचार केला आणि आज त्यांच्या स्टार्टअपची कमाई ही कोटींच्या घरात आहे.
आजकाल जेव्हा आपण जेव्हा कोणत्याही गोष्टींची खरेदी करतो, तेव्हा खूप विचार करतो. पण त्या तेलाचा आणि मसाल्यांचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो का? कबीर आणि चेतन सिहाग यांना देखील हा प्रश्न पडला होता. सततचे येणारे प्रश्न आणि सगळ्या भेसळयुक्य वस्तू याला ते दोघं कंटाळले होते. कबीरनं पाहिलं की जेव्हा ते पुढील शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेले तेव्हा जेवणाच्या क्वालिटीमध्ये खूप फरक पडला होता. त्यानंतर त्यांनी वेदिका ऑर्गेनिक्स नावानं 2020 मध्ये एक कंपनी सुरु केली. ही कंपनी लाकडाच्या घाणीत बनवलेलं तेल आणि पोषक तत्व युक्त मसाले विकू लागले. पण आता ही कंपनी सुरु केल्यानंतर हे यशस्वी कसे झाले त्यांनी असं वेगळं काय केलं? नेमकी त्यांची स्टोरी काय आहे ते जाणून घेऊया…
चेतन यांच्यासाठी जेवणाची क्वालिटी आणि स्वच्छता हे खूप महत्त्वाचं होतं. एका महिन्यात ते एकदा किंवा दोनवेळा 100 किलोमीटर दूर जाऊन शुद्ध तेल आणायचे. 2017 मध्ये त्यांना वाटलं की जर चांगलं जेवणं पाहिजे म्हणून आपण इतकी मेहनत करतोय. तर आपल्यासारखे असे अनेक लोकं असतील जे अशा समस्येचा सामना करत असतील. राजस्थानच्या या उद्योजकांनी त्यांच्या काही नातेवाईकांना कॅन्सर आणि डायबिटीज सारख्या समस्येनं त्रस्त झाले आणि अनेकांचे त्यामुळे निधन झाले. 2019 मध्ये कबीर अमेरिकेवरून भारतात परतले. अमेरिकेत तर त्यांना मास्टर डिग्रीसाठी स्कॉलरशिप मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाची साथ दिली.
अमेरिकेत शिक्षण करत असताना कबीर यांनी पाहिलं की ऑर्गेनिक अन्न पदार्थ तिथे सहज मिळतात. पण भारतात ते शोधावे लागतात. त्यातही जे मिळतं ते किती शुद्ध आहे हे माहित करणं खूप कठीण आहे. जेवणाच्या वस्तूंमध्ये भेसळ शोधण्याच्या कमीतरता त्यांना जाणवली. त्यामुळेच त्या दोन्ही भावांनी मिळून एक कंपनी सुरु करण्याचं निर्णय घेतलं आणि तेल काढण्यासाठी 200° C तापमानाचा वापर केला. जास्त तापमान ते तेलाचे प्राकृतिक पोषक तत्व नष्ट करण्यात येतात. वेदिका ऑर्गेनिक्सच्या 100 ग्रॅम सरसो तेलात जवळपास 17.3 ग्रॅम ओमेगा-3 असतात. तर हे इतर दुसऱ्या ब्रॅन्डसच्या तुलनेत दुप्पट आहे.
हेही वाचा : गावातल्या ‘या’ नव्या सरकारी डॉक्टरची ‘पंचायत’ मधल्या सचिव जीसारखी अवस्था
कबीर आणि चेतन यांनी हे स्टार्टअप 3,000 शेतकऱ्यांकडून बियाणं आणि सामान खरेदी केला. हे शेतकरी 25 पेक्षा जास्त गावात राहतात. कंपनी शेतकऱ्यांना योग्य दर देत होती. ही कंपनी शेतकऱ्यांना चांगला दर देते. त्याशिवाय ते हे देखील सुनिश्चित करतात की कच्चा माल हा ऑर्गेनिक पद्धतीनं वाढवायला हवा. बियाणं काढल्यानंतर त्या बियांची चांगल्या प्रकारे तापसनी केली जाते. कंपनी हळू-हळू वाढताना दिसते. तर दर महिन्याला ते जवळपास 18 लाख रुपये कमवतात.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरकडे पाठ, पर्यटकांनी धरली महाबळेश्वरची वाट; मिनी काश्मीरमध्ये गर्दी, चोख बंदोबस्त
Source link


Twinkle khanna Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड व बॉलीवूडचे संबंध सर्वश्रूत आहेत. अभिनेत्री मंदाकिनी व दाऊदचे अफेअर होते, असं म्हटलं गेलं होतं. मात्र मंदाकिनीने ते कधीच मान्य केलं नाही. तसेच दाऊदचे ऋषी कपूर, दिलीप कुमार यांच्याशी संबंध होते असं म्हणतात. दाऊदचं चित्रपटांवर खूप प्रेम होतं आणि इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेले अभिनेते, निर्माते त्याच्या संपर्कात होते. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना दाऊदसाठी नाचली होती, अशा चर्चा एकेकाळी झाल्या होत्या. यावर ट्विंकलने काय म्हटलं होतं ते जाणून घेऊयात.
ट्विंकल खन्नाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ साठी लिहिलेल्या कॉलममध्ये याबाबत तिची प्रतिक्रिया लिहिली होती. “मी एका टीव्ही न्यूज चॅनलवर माझ्या नावाचं टिकर पाहिलं, ज्यात लिहिलं होतं की मी दाऊदसाठी डान्स केला होता. अनेक गाण्यांवर मी वेड्यासारखे नाचले होते. पण खरं सांगायचं झाल्यास माझ्या मुलांनाही असं वाटतं की माझा डान्स पाहणं डब्ल्यूडब्ल्यूएफचा सामना पाहण्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे दाऊदने माझ्यापेक्षा चांगल्या डान्सर निवडल्या असत्या, हे वृत्तवाहिन्यांना कळायला हवं होतं, पण काय करणारं… हे फेक न्यूजचं जग आहे,” असं ट्विंकल म्हणाली होती.
“आपण आतापर्यंत फेरफार केलेल्या अनेक खोट्या बातम्या पाहिल्या आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान एक कुस्तीपटू हसतानाचा फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला होता. अगदी त्या फोटोपासून ते करोना विषाणूपर्यंत असंख्य फेक न्यूज आपण पाहिल्या आहेत,” असंही ट्विंकलने म्हटलं होतं.
अक्षय कुमारला देखील पत्नी ट्विंकलने दाऊदच्या पार्टीत डान्स केल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत दाऊद इब्राहिमच्या पार्ट्यांमध्ये ट्विंकलने हजेरी लावल्याच्या बातम्या या फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं. “मला माहित नाही की अशा बातम्या कुठून येतात. या बातम्यांमध्ये तथ्य असते तर माझ्या घरावर आतापर्यंत छापेमारी झाली असती. ही बातमी समोर आल्यानंतर एकही पोलीस हवालदार माझ्या घरी आला नाही. पण या बातमीमुळे मला त्रास झाला,” असं अक्षयने म्हटलं होतं.
दरम्यान, अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांनी २४ वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. दोघांना आरव व नितारा ही दोन अपत्ये आहेत. ट्विंकलने लग्न केल्यावर फिल्म इंडस्ट्री सोडली. ती लेखिका आहे.
