



Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी एक भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि संपूर्ण जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला गेला. 26 निष्पापांचा बळी गेलेल्या या हल्ल्याचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हाती घेतल्यानंतर आता या तपासातून प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये पाकिस्ताननंच या हल्ल्याचा कट रचल्याचे सबळ पुरावे समोर आले आहेत.
एनआयएच्या प्रारंभिक अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार पहलगाममधील हल्ला पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबा आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयसह पाकिस्तानी सैन्यदलाच्या प्रयत्नांतून घडवण्यात आला. हल्ल्याचा कट पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात आयएसआयच्या नेतृत्त्वाअंतर्गत रचण्यात आला आणि हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधील हँडलर्च्या संपर्कात होते. पाकिस्तानातूनच त्यांना आदेश आणि आर्थिक मदत पुरवली जात होती.
एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली असून, ते पीओकेमधूनच आल्याचं स्पष्ट झालं. हाशिम मूसा, तल्हा भाई अशी त्यांची नावं असून ते पाकिस्तानचेच रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं. काश्मीरमध्ये राहणाऱ्या आदिल ठोकर यानं लष्करच्या या दहशतवाद्यांची मदत केली असल्याचं तपासातून उघड झालं.
पहलगाम हल्ल्यासंदर्भातील संपूर्ण तपास प्रक्रियेत आतापर्यंत 150 हून अधिकजणांची चौकशी करण्यात आली असून, त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तर या संपूर्ण प्रक्रियेत 2500 हून अधिकजणांची प्राथमिक चौकशी झाली आहे. शिवाय आवश्यकता भासेल त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येत आहे. एनआयएच्या तपास करणाऱ्या चमूनं बैसरन खोऱ्याचं 3डी मॅपिंग करत तिथं घटनाक्रमाचं प्रात्यक्षिकही केलं. यातून तिथं दहशतवाद्यांनी शस्त्रसाठा नेमका कुठं लपवला होता हे स्पष्ट झालं.
या भागातून निकामी काडतुसं मिळाली असून पुढील तपासणीसाठी ती Forensic Science Lab मध्ये पाठवण्यात आली आहेत. एनआयएकडून तयार करण्यात आलेला हा अहवाल लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपवण्यात येणार असून त्याच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधा कारवाई करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघटनाही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
एनआयए, दोन एफएसएल पथकं, रॉची एक टीम आणि जम्मू-कश्मीरमधील सर्व गुप्तचर यंत्रणा सध्या पहलगाममध्ये तळ ठोकून आहेत. शिवाय 15 ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGWs) तपास यंत्रणांच्या रडारवर असून, यापैकी काहींना अटकही करण्यात आली आहे. ही संपूर्ण मोहीम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


पहलगामयेथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यांना भारताच्या प्रत्युत्तराची भीती वाटते. त्यामुळेच पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व धार्मिक कार्यक्रम पुढील १० दिवसांसाठी बंद केले आहेत. इतकंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले १००० हून अधिक मदरसे ही तात्पुरते बंद केले आहेत. भारत या मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून टार्गेट करू शकतो, अशी भीती खुद्द पाकिस्तानी अधिकारीच व्यक्त करतात.

Ramraje Naik Nimbalkar: राज्यातील विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. रामराजे नाईक निंबाळकरांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. उद्या (शनिवारी) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केला होता. रामराजेंना समन्स पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलीस यांच्याकडून चौकशीसाठी समजपत्र पाठवण्यात आलं आहे. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर समन्स पाठवण्यात आलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता वडूज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या आहेत. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेले काही कार्यकर्ते यांना नोटिसा बजावल्याची माहिती मिळत आहे.
कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. मला गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत सांगितली. मात्र, त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही. माझी बदनामी होत असल्याचं त्या महिलेने म्हटलं होतं, यावरून मंत्री गोरेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं, त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या प्रकरणी ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडूज, दहवडी, म्हसवड, तलभीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला आहे.
गोरे यांनी यावर अधिवेशन चालू असताना स्पष्टीकरण दिलं होतं, “2017 साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे.” याप्रकरणी आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स पाठवण्यात आलं आहे.
अधिक पाहा..



Today’s Viral Trending News Highlight’s : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर….