


बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांना भेट दिल्यानंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधी यांची हिंदू धर्मातून हकालपट्टी करण्यात आल्याचा पुनरुच्चार केला. हरिद्वारमधील कनखल येथील शंकराचार्य मठात रात्री मुक्काम केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी सनातन धर्माचा पवित्र ग्रंथ मनू स्मृतीबद्दल खोटी विधाने केली आहेत, म्हणून त्यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून हद्दपार केले आहे.

India Pakistan Tensions : (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावात आणखी भर पडली. सातत्यानं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन असो किंवा सीमाभागात दहशतवादी तळांमध्ये होणारा अन्नाचा किंवा पैशांचा पुरवठा असो. पाकिस्ताननं भारताला डिवचण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले. मात्र त्यांच्या याच कटकारस्थानांमुळं आता हेच वैर शेजारी राष्ट्राला भोवताना दिसत आहे.
भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Tensions) या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढत असतानाच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेनं एका बंद खोलीत उच्चस्तरिय बैठक घेतली. जिथं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या संवेदनशील परिस्थितीत संयमानं कोणतंही पाऊल उचलावं आणि चर्चेतून यावर तोडगा काढावा असं आवाहन सदस्य राष्ट्रांनी केलं.
5 मे 2025 रोजी पार पडलेल्या या बैठकीसंदर्भातील कोणतंही अधिकृत विधान UN च्या वतीनं जारी करण्यात आलेलं नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे मुद्दे जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावावर तोडगा काढत या परिस्थितीवर चर्चात्मक मार्गानं कोणती वाट काढता येईल आणि माहितीच्या देवाणघेवाणीनं कशा प्रकारे ही चर्चा अधिक सक्षम करता येईल यावर भर देण्यात आल्याचं ते म्हणाले. तर, ग्रीसच्या राजदूतांनी या बैठकीतून सकारात्मक परिणाम दिसून आल्याची माहिती दिली. आम्हाला हा तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती रशियाच्या राजदूतांनी दिली.
सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सह्यद अकबरुद्दीन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना या बैठकीतून किंवा चर्चेतून कोणताही तोडगा निघेल अशी आशा वाटत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तर, या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘यापूर्वीप्रमाणेच आजही पाकिस्तानची अरेरावी इथं अपयशी ठरली. याआधी अपेक्षित असल्याप्रमाणेच परिषदेकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भारतीय कूटनितीनं सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानच्या सर्वच प्रयत्नांना हाणून पाडलं’.
बंद खोलीत झालेल्या या पैठकीपूर्वीच संयुक्त राष्ट्र संघटनेते महासचिव एंटोनियो गुटरेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या या तणावाला आतापर्यंतच्या गंभीर स्तराचा तणाव म्हणून संबोधत चिंता व्यक्त केली आणि या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. नागरिकांना निशाण्यावर घेणं स्वीकारार्ह नसल्याचं त्यांनी परखड स्वरांत म्हटलं.

Mumbai Breaking News Live Today: लाडकी बहीण योजनेवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या योजनेत लाडक्या बहिणींना २१०० रुपये न मिळण्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. या विधानावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांनुसार महाराष्ट्रातदेखील मॉक ड्रील होणार का? कशी होणार? याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.


महाबळेश्वर, धुके, गडद हिरवाई आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाबळेश्वरने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आपला ठसा उमठवला! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आयोजित ‘महापर्यटन उत्सव २०२५’ चा भव्य समारोप सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत मंत्री मकरंद पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले व आमदार सचिन पाटील आदींचा सहभाग होता.
भाजपा-महायुती सरकारने पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे पर्यटन राज्य बनवण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्वरला आधुनिक व आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
या सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुनावळे येथे शिवसागर जलाशयातील १० जेट स्की राईड्सचे लोकार्पण करण्यात आले, ज्यामुळे पाण्यावरच्या साहसी पर्यटनाला जोरदार चालना मिळणार आहे.

भाईंदर: महानगरपालिकेने मिरा भाईंदरमधील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. शहरात ३८ अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मिरा रोडमधील १६ तर भाईंदरमधील २२ इमारतींचा समावेश आहे.
मिरा भाईंदर शहरात अनेक वर्षे जुन्या इमारती आहेत. काही ठिकाणी इमारतींची पडझड होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी, अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती सुरू केली आहे.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडणे आवश्यक आहे, अशा इमारतींना ‘सी-वन’ प्रकारात म्हणजेच अतिधोकादायक श्रेणीत गणले जाते.
गेल्या वर्षी शहरात २७ अति-लधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. त्यापैकी १५ हून अधिक इमारती महापालिकेने जमीनदोस्त केल्या असून उर्वरित इमारती न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रलंबित आहेत. यावर्षी देखील ३८ अतिधोकादायक इमारतींची यादी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामुळे यंदा नव्याने समोर आलेल्या आणि मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या इमारतींवर कारवाईची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार लवकरच उत्तन येथील एका इमारतीवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त कल्पना पिंपळे यांनी दिली आहे.
मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने शहरातील जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक श्रेणीत ३८ इमारतींची यादी निश्चित केली आहे. याशिवाय, ३१ इमारतींच्या मालकांना इमारत मोकळी करून संपूर्ण दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काळात या इमारतींची दुरुस्ती न झाल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेने सातत्याने सूचना देऊनही अनेक जुन्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतीचा रचनात्मक अहवाल पालिकेकडे सादर केलेला नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या गोष्टीला गांभीर्याने घेत, ३० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या शहरातील इमारतींना तात्काळ रचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. मात्र तरीही अनेकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

CJI Sanjiv Khanna Asset: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी १ एप्रिल रोजी ‘फुल कोर्ट मीटिंग’मध्ये प्रत्येकाची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी ५ मे रोजी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यात देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३३ पैकी २१ न्यायमूर्तींच्या संपत्तीची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार न्यायमूर्तींच्या नावे किती रक्कम व मालमत्ता आहेत, यांची माहिती या यादीत देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानावे बँकेत ५५ लाख ७५ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट आणि १ कोटी ६ लाख रुपयांचा पीपीएफ आहे. याशिवाय, सरन्यायाधीश खन्ना यांच्यानावे दक्षिण दिल्लीत २ बीएचके डीडीए फ्लॅट असून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये ४ बीएचके फ्लॅटदेखील आहे. त्याव्यतिरिक्त गुरगावमध्ये त्यांच्या मुलीसह संयुक्त मालकी असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांच्यानावे ५६ टक्के हिस्सा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फाळणीपूर्वीपासूनची त्यांची पिढीजात जमीनदेखील त्यांच्यानावे आहे.
या यादीमध्ये येत्या काही दिवसांत म्हणजेच १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणारे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या संपत्तीचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, भावी सरन्यायाधीशांच्या नावे बँकेत १९ लाख ६३ हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात ६ लाख ५९ हजार रुपये आहेत. याशिवाय अमरावतीमध्ये पिढीजात घर, मुंबई आणि दिल्लीत फ्लॅट अशा मालमत्तेचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्याशिवाय, अमरावती आणि नागपूरमध्ये त्यांची पिढीजात शेतजमीनही आहे. तसेच, तब्बल १ कोटी ३० लाखांचं कर्ज त्यांच्या नावावर आहे.
याव्यतिरिक्त २४ मे रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती ए. एस. ओक यांच्या नावे ९२ लाख ३५ हजार पीपीएफ, २१ लाख ७६ हजार एफडी, एक २०२२ चं मॉडेल असलेली मारूती बलेनो कार आणि ५ लाख १० हजारांचं कार लोन आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी आपल्या नावावर नोएडामध्ये २ बीएचके फ्लॅट, अलाहाबादमध्ये एक बंगला आणि उत्तर प्रदेशमध्ये पिढीजात शेतजमीन असल्याचं नमूद केलं आहे. तसेच, दीड कोटींची गुंतवणूकदेखील आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावावर चंदीगढ, गुरग्राम आणि दिल्लीत पत्नीसह संयुक्त मालकी असलेल्या मालमत्ता आहेत. तसेच, एफडीमध्ये ६ कोटी ३ लाख रुपये आहेत.
न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्यानावे अहमदाबादमध्ये दोन घरं आहेत. शिवाय, म्युच्युअल फंडमध्ये ६० लाख रुपये, पीपीएफमध्ये २० लाख रुपये, ५० लाखांचे दागिने आणि २०१५ ची मारुती स्विफ्ट कार आहे. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्याकडे २००८ चं मॉडेल असलेली मारुती झेन एस्टिलो कार आहे. त्याव्यतिरिक्तची सर्व संपत्ती ही आपण न्यायाधीश बनण्याआधीची असून त्यात कोणतीही भर पडलेली नाही, असं त्यांनी नमूद केलं आहे.
न्यायमूर्ती संजय कुमार यांनी शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली आहे. त्यात भारत पेट्रोलियम, भारती एअरटेल, चोलामंडलम फायनान्स, एचसीएल इन्फोसिस, एचसीएल टेक्नोलॉजीज, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी, इन्फोसिस लिमिटेड, आयटीसी, एनएमडीसी, ओलेक्ट्रा ग्रीनटेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, सोलरा अॅक्टिव्ह फार्मा सायन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा सीट्ल, वेदांता लिमिटेड, जिओ फायनान्स, विजया डायग्नोस्टिक सेंटर, आयटीसी हॉटेल्स आणि एनएमडीसी स्टील या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
याशिवाय न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले. त्यांच्यानावे १२०.९६ कोटींची गुंतवणूक असून त्यांनी २०१०-११ ते २०२४-२५ या काळात तब्बल ९१ कोटी ४७ लाख रुपये कर भरल्याची नोंद आहे!

