


India Pakista Ceasfire : भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्धबंदी आहे, अशी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. ते म्हणाले की, आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक पुन्हा चर्चा करणार आहेत, असे मिस्री म्हणाले.
भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. ती पुढेही कायम राहील. दरम्यान भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “अमेरिकेने मध्यस्थी केल्याने रात्रभर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि आपल्या हुशारीचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
त्यानंतर त्याला पाकिस्तान परराष्ट्रमंत्री इशक डार यांनी दुजोरा दिला आहे.
Pakistan and India have agreed to a ceasefire with immediate effect. Pakistan has always strived for peace and security in the region, without compromising on its sovereignty and territorial integrity!
— Ishaq Dar (@MIshaqDar50) May 10, 2025
या घोषणेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत भारताचा भूमिकेबद्दल सांगितलं. आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता दोन्ही देशांचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक पुन्हा चर्चा करणार आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलण्याची चर्चा दोन्ही देशांमध्ये झाली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये अचानक घोषित झालेल्या युद्धबंदीमागे एक मोठे राजनैतिक कारण आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अमेरिकन समकक्षांसोबत सतत चर्चेत होते. या चर्चेचा उद्देश सीमेवरील वाढता तणाव संपवणे आणि शांततापूर्ण तोडगा काढणे हा होता.
22 एप्रिल 2025 ला जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 27 पुरुषांचे प्राण गेले होते.


ठाणे – देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्यात यावे. तसेच नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत. यासोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेलया सायरनची नियमित तपासणी करणे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करण्यात यावी. तर जीवनावश्यक वस्तू व साहित्याची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच, आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी प्रशासनातील सर्व संबंधित विभागांना दिले आहे. तर प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रजेवरून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले.
देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्याचे तसेच नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले. यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, त्यांच्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. जीवनावश्यक वस्तू व साहित्याची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच, आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
“आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आहे. देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी. जशी वेळ येईल, तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागेपुढे पाहू नका,” – अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे</strong>





PIB Fact Check: पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादाविरोधात मोठी मोहीम उघडलीय. सिंदूर ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळं भारताच्या टार्गेटवर आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमेवर भ्याड हल्ले करण्यात येत असून भारतीय लष्कराकडून हे हल्ले परतवून लावण्यात येत आहेत. भारताकडून अशी हार मिळत असतानाच पाकिस्तानने खोट्या बातम्यांचा आधार घेतला आहे. भारतीय सीमेवर तणाव वाढवण्याबरोबरच पाकिस्तान सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवत आहे. त्यांच्याकडून काही दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात भारतीय फायटर जेट्स क्रॅश होण्याबरोबरच एक महिला पायलटला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येतं. तसंच, वायुसेनाचे फायटर जेट्स क्रॅश झाल्याचा मेसेजदेखील व्हायरल होतोय. मात्र भारत सरकारकडून अधिकृत फॅक्ट चेक एंजन्सी PIB Fact Check ने हे तिन्ही दावे पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलं आहे.
भारत-पाकिस्तान तणावाची परिस्थिती असताना पीआयबी फॅक्ट चेकने पाकिस्तानने केलेले तीन दावे खोडून काढले आहेत. त्याचा पहिला दावा होता की, पाकिस्तानने भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्व्स्त केली आहे. सोशल मीडियावर असे अनेक पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र PIB Fact Check ने पूर्णपणे हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. एस-400 ला कोणतेही नुकसान झाले नसून ह दावा तथ्यहीन आणि आधारहिन आहे.
दुसरा दावा हा आहे की, हिमालय क्षेत्रात भारतीय वायुसेनेचे तीन फायटर जेट्स क्रॅश झाल्याचाचा दावा केला जात होता. तसंच, एक फोटोदेखील व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो 2016 चा असून त्याचा आणि आत्ताच्या परिस्थितीचा काहीही संबंध नसल्याचे आढळले आहे.
तिसरा दावा हा आहे की, भारतीय महिला एअरफोर्सची एक पायलट शिवानी सिंह यांना पाकने ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. पण यावरही PIB Fact Checkने स्पष्ट केलं आहे की हा दावा पूर्णपणे चुकीचा असून स्कॉड्रन लीडर शिवानी सिंह या सुरक्षित असून अशी कोणतीही घटना झाली नाहीये. हा दावा पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया अंकाउंट्सकडून पसरवण्यात येत असलेला प्रोपोगंडा आहे.
