





भाईंदर : – भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेला कंटेनर वाद थांबण्याऐवजी अधिक चिघळण्याची चिन्हं आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे नवीन कंटेनर मिरा भाईंदर शहरात दाखल झाले असून हा वाद पेटून उठण्याची शक्यता आहे.
मिरा भाईंदर शहरात रस्त्यांच्या कडेला व पदपथांवर शिवसेनेकडून कंटेनर उभारून पक्षाच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत अशा सुमारे १६ शाखा स्थापन करण्यात आल्या असून, या सर्वच शाखा अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांकडून या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, राजकीय दबावामुळे महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपनेही विरोध दर्शवण्यासाठी म्हणून शहरात कंटेनर कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, भाजपने महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या निवासस्थानाबाहेरच कंटेनर कार्यालय उभारून त्याचे उद्घाटन केले.त्यावर प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी अनधिकृत कार्यालयांची यादी तयार करून लवकरच कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे प्रशासकीय भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, हा वाद थांबेल असे वाटत असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा एकदा शिवसेनेचे नवीन कंटेनर शहरात दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथील प्रभाग क्रमांक २० मध्ये नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अश्विन कसोदरिया यांना हे कंटेनर देण्यात आले असल्याचे समजते. मात्र, याबाबत बोलण्यास कसोदरिया यांनी नकार दिला आहे.

बुलढाणा: बातमीचे शीर्षक गोंधळून टाकणारे आहे हे नक्कीच! काहींना अविसश्वनीय वाटणारे देखील असू शकते.एखादा ट्रक पोलिसांची कशी गोची कारू शकतो? असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.पण हे सत्य आहे. हे सर्व एका अपघातामुळे घडलं आहे.
बुलडाणा ते मलकापूर राज्य महामार्गावरील राजूर घाटात देवीच्या मंदिरा जवळील वळणावर एक मालवाहू ट्रक उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मजेशीर बाब अशी की हा अपघात दोन पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या अगदी सीमा रेषेवर झाला आहे. ट्रक उलटल्याने ट्रकची कॅबिन ( चालक कक्ष) बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे तर बॉडी (मागील भाग) बुलडाणा शहर ठाण्याच्या हद्दीत आहे.
दोन्ही ठाणे हद्धच्या ज्या संगम रेषेवर (ठिकाणी )अपघात झाला त्याच्या बाजूलाच ठाणेच्या हद्दीचा बोर्ड लागलेला आहे, हे विशेष.त्यामुळे अपघात कोणत्या पोलीस ठाणे हद्धीमध्ये?, बुलढाणा शहर की बोराखेडी पोलीस ठाणे हद्धीमध्ये असा प्रश्न या अपघातग्रस्त ट्रक मूळे उपस्थित झाला. तसेच घटनेचा तपास कोण करणार? हा पूरक प्रश्न ओघाने आलाच, प्राप्त माहितीनुसार बुलडाणाकडून कापसाच्या गठी घेऊन एक ट्रक मलकापूरच्या दिशेने दुपारच्या सुमारास जात होता.
यावेळी अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळच्या वळणावर घाट उतरत होता. नेमके याच वेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डाव्या बाजूला उलटला. या घटनेमुळे राजूर घाटात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाता प्रकरणी गुन्हा कोणत्या ठाण्यात दाखल होतो याकडे वाहन धारक, नागरिकांचे आणि सर्वांचेच लक्ष लागले आहे..

Rajnath Singh on Operation Sindoor : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी भारत-पाकिस्तान सीमेजवळील भूज एअरबेसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एका कडक शब्दात इशारा दिला. भूजमध्ये त्यांनी उपस्थित असलेल्या हवाई योद्ध्यांशी संवाद साधला. भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानीमधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर योग्य उत्तर दिले. राजनाथ सिंह यांनी पुन्हा पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की, ‘हा फक्त ट्रेलर होता, संपूर्ण पिक्चर अजून येणे बाकी आहे’.
राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात भूजच्या शौर्यगाथेची आठवण करून दिली आणि म्हणाले, “1965 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे हे भूज साक्षीदार राहिले आहे. 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे हे भूज साक्षीदार राहिले आहे. आणि आज पुन्हा एकदा, हे भूज पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचे साक्षीदार बनले आहे.”
त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि पहलगाममध्ये अलीकडेच मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांनाही श्रद्धांजली वाहिली.
#WATCH | गुजरात: रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, “…यह वो सिंदूर है जो श्रृंगार का नहीं बल्कि शौर्य का प्रतीक है। यह वो सिंदूर है जो सौंदर्य का नहीं बल्कि संकल्प का प्रतीक है। यह सिंदूर खतरे की वह लाल लकीर है, जो भारत ने आतंकवाद के माथे पर खींच दी है।” pic.twitter.com/uoIkAFnSV7
— ANI_HindiNews (@AHindinews) May 16, 2025
राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी भूमीवर वाढणारे दहशतवादी तळ अवघ्या 23 मिनिटांत उद्ध्वस्त केले. “लोकांना त्यांचा नाश्ता पूर्ण करण्यासाठी जितका वेळ लागतो, तितका वेळ तुम्ही शत्रूंशी सामना केला आहे.” ते म्हणाले की, हा केवळ क्षेपणास्त्रांचा प्रतिध्वनी नव्हता, तर तो भारताच्या पराक्रमाचा आणि हवाई दलाच्या शौर्याचा प्रतिध्वनी होता.
भारतीय हवाई दलाचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आता ते फक्त हवाई दल राहिलेले नाही तर ते एक स्काय फोर्स बनले आहे. ते म्हणाले की, भारताची लढाऊ विमाने आता सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूच्या प्रत्येक कोपऱ्याला लक्ष्य करू शकतात. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आता भारत परदेशी शस्त्रांवर अवलंबून नाही. डीआरडीओने विकसित केलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आणि ‘आकाश’ हवाई संरक्षण प्रणालीने हे सिद्ध केले आहे की ‘मेक इन इंडिया’ आता भारताच्या लष्करी शक्तीचा कणा बनला आहे.

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेेच्या कल्य़ाण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३६ लाख रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला (३०), कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी (३३), शिवासिंग अमिरसिंग बावरी (२५) आणि पुनमकौर अमिरसिंग बावरी (३७) असे गुन्हेगारांची नावे आहेत. हे चौघेही कल्याणमधील रहिवाशी आहेत. या आरोपींनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घडलेल्या एकूण २९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये दरोडा, सोनसाखळी चोरी, मोटार वाहन चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या आणि चोरीला गेलेल्या मालमत्तेमधून एकूण ३६ लाख २९ हजार ७२५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि सहा चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.


Ballia Murder Case : हत्येचा आणखी एक थरारक प्रकार जो हादरवून टाकणारा आहे. पीटीआयचा रिपोर्टनुसार, एका 44 वर्षीय महिलेने आपला प्रियकर आणि दोन साथीदारांच्या मदतीने निवृत्त सैनिक पतीची हत्या केली. क्रूर पत्नी एवढ्यावरच थांबली नाही तर पतीच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.
रिपोर्टनुसार, ही घटना शनिवारी समोर आली जेव्हा सिकंदरपुर पोलिस स्टेशनच्या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत खैरीद गावाजवळ एक शेतात पिशवित गुंडाळलेला एक हात आणि पाय सापडला. आरोपींनी पीडित व्यक्तीची ओळख लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीची ओळख ही 62 वर्षीय सेवानिवृत्त देवेंद्र कुमार अशी आहे. त्यांची पत्नी माया देवीने 10 मे रोजी बलिया सिटी पोलिस ठाण्यात नवरा हरवल्याची तक्रार केली होती. ज्यामध्ये पती अनेक दिवसांपासून हरवले आहेत. मात्र मुलगी अम्बली गौतमने या घटनेचा खुलासा पोलिसांसमोर केला. मुलीने दिलेल्या जबाबामध्ये आईने वडिलांची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मायाने आपल्या साथीदारांसोबत मिळून पती देवेंद्र कुमारची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले. दोन हात, पाय आणि डोकं असे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये तुकडे टाकले.
एसपी ओमवीर सिंह यांनी सांगितले की, हरिपूर खरसारा येथील रहिवासी देवेंद्र राम हे बहादुरपूरमध्ये घर बांधल्यानंतर त्यांच्या पत्नीसह राहत होते. १० मे रोजी, त्याची पत्नी मायादेवी यांनी बक्सर येथून बेपत्ता झाल्याबद्दल कोतवाली शहरात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिस तपासादरम्यान, देवेंद्र रामच्या घरी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन सापडले. दरम्यान, ११ मे रोजी दियारमध्ये एक कापलेला हात आणि पाय आढळला. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तिची काटेकोरपणे चौकशी केली, त्यानंतर माया देवींनी घटनेची संपूर्ण कहाणी सांगितली.