Sunday, July 12, 2026
Home Blog Page 241

Traffic jam in Balkum every Friday to Monday zws 70

0
Traffic jam in Balkum every Friday to Monday zws 70



Traffic jam in Balkum every Friday to Monday zws 70 | बाळकुम येथे दर शुक्रवार ते सोमवारपर्यंत वाहतुक कोंडीचा कहर; कोंडी सोडविण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस सिग्नल यंत्रणा बंद





Source link

भारतातील ‘या’ राज्यात सोपडली सोन्याची सर्वात मोठी खाण! उत्खनन सुरु; संपूर्ण जगाचे लक्ष फक्त भारताकडे

0
भारतातील ‘या’ राज्यात सोपडली सोन्याची सर्वात मोठी खाण! उत्खनन सुरु; संपूर्ण जगाचे लक्ष फक्त भारताकडे


Gold Mines in India Madhya Pradesh: जगभरात सोन्याचे दर वाढले आहेत.  भारतात सोन्याची किंमत लाखाच्या जवळपास पोहोचली असली तरी त्याची मागणी कमी झालेली नाही. अशातच भारताला लॉटरी लागली आहे. भारतातील एका राज्यात सोन्याचे साठे सपाडले आहेत. या खाणीमध्ये उत्खनन सुरु झाले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. 

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्हा आता केवळ कोळशासाठीच नाही तर सोन्यासाठीही ओळखला जाणार आहे. येथे भूगर्भात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. खाणींमध्ये उत्खननाचे कामही सुरू झाले आहे. चार सोन्याच्या खाणींचा लिलाव पूर्ण झाला आहे आणि हे ब्लॉक वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत.

कंपन्यांनी खाणींमध्ये  यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. आता येथून सोने काढण्याची तयारी जोरात सुरू आहे. ज्या खाणींचा लिलाव करण्यात आला आहे.  त्यात चकारिया, सिलफोरी-सिधार, अमिलहवा आणि चुनपुरवा सोन्याचे ब्लॉक समाविष्ट आहेत. ही सर्व ठिकाणे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. या ठिकाणी उत्खनन खनिज विभागाच्या देखरेखीखाली केले जात आहे.

प्राथमिक अहवालानुसार, या खाणींमधून मिळणाऱ्या प्रत्येक टन सामग्रीमध्ये 1.02 ते 1.5 ग्रॅम सोने सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असून अब्जावधी किमतीचे सोने काढले जाणर असल्याची चर्चा रंगली आहे.
सिंगरौली हा भूभाग कोळसा उत्पादन आणि वीज प्रकल्पांमध्ये आधीच देशात आघाडीवर आहे. आता सोन्याच्या शोधामुळे या जिल्ह्याला आता गोल्डन ओळख मिळली आहे. 

सोन्याच्या साठ्यामुळे या प्रदेशात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या खाणींमधून दरवर्षी सुमारे 250 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे मध्य प्रदेश सरकारच्या उत्पन्नात भर पडणार आहे. स्थानिक विकास योजनांनाही चालना मिळणार आहे.आधुनिक यंत्रे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्खनन केले जाणार आहे.  कंपन्या शक्य तितके सोने काढण्यासाठी वेगाने काम करत आहेत. यामुळे येथे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत.

 





Source link

New English School unique initiative A Question on Astronomy Every Day Inspired by senior scientist Dr Jayant Narlikar pune print news zws 70

0
New English School unique initiative A Question on Astronomy Every Day Inspired by senior scientist Dr Jayant Narlikar pune print news zws 70



New English School unique initiative A Question on Astronomy Every Day Inspired by senior scientist Dr Jayant Narlikar pune print news zws 70 | डॉ. नारळीकर यांच्या प्रेरणेतून ‘रोज एक प्रश्न खगोलशास्त्राचा’, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या उपक्रमात साडेसहा वर्षांत २४००हून अधिक प्रश्न





Source link

कुंडलमध्ये विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान ;वन विभागाच्या मदतीने तरुणांचा पुढाकार

0
कुंडलमध्ये विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान ;वन विभागाच्या मदतीने तरुणांचा पुढाकार


सांगली : चारा-पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या सांबराला कुंडल येथील तरुणांनी वन विभागाच्या मदतीने जीवदान दिले. कुंडल येथे बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या स्वामी मळ्यातील विहिरीत सांबर पडल्याचे रविवारी दुपारी काही तरुणांना दिसले. विहिरीला पायऱ्याच नसल्याने विहिरीबाहेर पडण्याचे त्याचे प्रयत्न तोकडे ठरत होते. ही बाब तरुणांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली.

कडेगाव-पलूसचे वनक्षेत्रपाल संतोष शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांचे बचाव पथक घटनास्थळी आले. रविवारी रात्री उशिरा बचाव पथकाने दोरीच्या मदतीने सांबराला विहिरीबाहेर काढले.

वनक्षेत्रपाल शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचारी सुरेखा लोहार, गणेश कांबळे, नितीन पवार, वन्यजीव विभागाचे कुरेश मुजावर, अक्षय पवार, तन्मय कांबळे, कृष्णा वड्ड, तेजस फासे, सूरज निवळे, सिध्देश टकले, संतोष जंगम, गोपी जंगम आदींच्या पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने या सांबराला विहिरीबाहेर काढून वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

हेही वाचा





Source link

कराड शहरासह परिसराला पावसाने झोडपले ; रस्ते झाले जलमय, महामार्गावर लोकांचे प्रचंड हाल

0
कराड शहरासह परिसराला पावसाने झोडपले ; रस्ते झाले जलमय, महामार्गावर लोकांचे प्रचंड हाल


कराड : कराड शहरासह परिसराला आज मंगळवारी दुपारी एक आणि सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वारे अन् विजांच्या गडगडासह वळवाच्या पावसाने झोडपले. हा पाऊस शेजारील प्रदेशातही सुरू असल्याचे वृत्त आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कराड परिसराची पावसाने दैना उडवून दिली.

उष्म्याचा कहर झाल्याने हैराण जीवांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातारणात तुफान पाऊस होत असल्याने सर्वांना पावसाळ्याची अनुभूती मिळत आहे. गेल्या दोन-चार दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी हा पाऊस जोरदार बरसला असून, अजूनही तो कोसळणे सुरूच आहे. सातारा, कोयनानगर, मायणी, पुसेगाव, महाबळेश्वर, आदर्की, फलटण, वरकुटे- मलवडी, दहिवडी, आनेवाडी, खटाव, कास, चाफळ, मलकापूर अशा सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हा पाऊस कोसळला आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने प्रचंड त्रासलेले लोक सुखावले आहेत. खरीपपूर्व मशागतीसाठी हा पाऊस पोषक असल्याने शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.

सध्याच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी होताना रस्ते जलमय झाले आहेत. पावसाळ्यापूर्वीची संपूर्ण नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने पाणी तुंबून वाहतुकीला मोठा अडथळा होत असल्याचे दिसत आहे. पुणे- बंगळुरू महामार्गाच्या सहापदारीकरणाचे रखडलेले काम, नाल्यांची अपूर्ण कामे यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्यात गेल्याने कुठे वाहतूक ठप्प तर, कुठे ती संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी व स्थानिक लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अशीच परिस्थिती अन्य रस्त्यांवरही दिसून येत आहे.

हेही वाचा





Source link

Early diagnosis of breast cancer is now possible in Thane

0
Early diagnosis of breast cancer is now possible in Thane


मुंबई : स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे. पण वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकतेच डिजिटल मॅमोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्तनाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही.

या नव्या सुविधा विभागाचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. सचिन घोलप, डॉ. अविनाश पडळकर, आदी विविध विभागप्रमुख आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. मॅमोग्राफी ही एक खास प्रकारची एक्स-रे तपासणी आहे जी स्तनांमध्ये होणारे बदल, गाठी किंवा कर्करोगाचे प्रारंभिक संकेत ओळखण्यास मदत करते. ही संपूर्ण प्रक्रिया काही वेळेतच पूर्ण होते आणि यामध्ये फारसा त्रास होत नाही.

सामान्यतः ५० ते ७४ वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. या वयोगटातील महिलांनी दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञ सुचवतात. ४० ते ४९ वयोगटातील महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणीचे अंतर व गरज ठरवावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

या मॅमोग्राफी यंत्रामुळे आता ठाणे आणि परिसरातील महिलांना योग्य वेळेत व कमी खर्चात स्तन कर्करोगाची तपासणी मिळणार आहे. पूर्वी अशा तपासणीसाठी महिलांना खाजगी अथवा मुंबईतील रुग्णालयात जावे लागे, जे वेळखाऊ आणि खर्चिक होते. आता ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने सामान्य महिलांनाही तत्काळ व मोफत तपासणीचा लाभ घेता येईल असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले.





Source link

साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळलं, नाशकात झाड उन्मळून पडलं; पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधारा

0


सातारा: राज्यभरातील विविध जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असून कुठे झाडं पडली आहेत, कुठे वादळी वाऱ्याने पत्रे उडाले आहेत. तर, कुठे वीज पडून जनावरे दगावल्याचीही घटना घडलीय. साताऱ्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अचानक आलेल्या वळवीच्या पावसाने नागरिकांची धांदल उडवली. सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडाट आणि विजेचा कडकडाटासह मोठा पाऊस साताऱ्यात (Satara) झाला आहे. या आलेल्या वादळी वाऱ्याने कास यवतेश्वर रस्त्यावरील मोबाईल टॉवर कोसळल्याची घटना घडली. या टॉवरखाली 4 ते 5 गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मोबाईल टॉवर कोसळल्याने यवतेश्वर कास रस्ता दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ठप्प झाला असून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून (police) वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. 

मुंबईतील पश्चिम उपनगरात सायंकाळी 7 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे. शहरातील अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड, कांदिवली बोरिवली, विलेपार्ले,सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेले मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह पुणे, सोलापूर, सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने धुव्वाधार आगमन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधावर पाऊस सुरू आहे.  

पुणे, रत्नागिरीत पावसाने जनजीवन विस्कळीत

पुण्यातील स्मार्ट सीटी प्रकल्पाचा भाग असलेल्या बाणेर भागात काही वेळ झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. बाणेरमधील बीटवाईज चौकात अनेक वाहन पावसाच्या या पाण्यात अडकली होती. रत्नागिरी परिसरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या तुलनेत 2 तास उशिराने धावत आहेत.

नाशिकमध्ये झाड उन्मळून पडले

नाशिकमधील झाड पडण्याची मालिका सुरूच असून सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने कॉलेज रोडसह इतर भागत ही वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, वाहनाचे नुकसान झाले, सुदैवाने जीवित हानी नाही. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असून गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज वितरण कंपनी आणि महापालिकाच्या मान्सून पूर्व कामाची या पावसामुळे पोलखोल होतेय. 

सोलापुरात पाऊस, बार्शीत शेड कोसळले

सोलापूर जिल्ह्यातही पावसान दमदार हजेरी लावली असून बार्शीत पावसामुळे कॅन्टीनचे छत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एक जण जखमी तर पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. बार्शी तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनचा पत्र्याचा छत कोसळल्याने घडली घटना. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, एका जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने बचावकार्य करून पाच व्यक्तींना सुखरूप काढले बाहेर

हेही वाचा

अधिक पाहा..



Source link

इंदापूरात अजित पवारांची निर्विवाद बाजी; ‘जय भवानी माता’ पॅनलचा दणदणीत विजय

0
इंदापूरात अजित पवारांची निर्विवाद बाजी; ‘जय भवानी माता’ पॅनलचा दणदणीत विजय

बारामती (इंदापूर) : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘जय भवानी माता’ पॅनलने सर्व २१ जागांवर आघाडी घेत निर्णायक यश मिळवले आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा कारखाना पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गटाच्या ताब्यात गेला आहे.

ही निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत लढवली होती. त्यांनी ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनलच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न केले, मात्र मतदारांनी त्यांना साफ नाकारले. रविवारी झालेल्या मतदानानंतर सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीपासून जय भवानी माता पॅनलने स्पष्ट आघाडी घेतली होती.

या निवडणुकीत एकूण २२,६८१ मतदारांपैकी १६ हजारांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. पॅनलच्या अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर करण्यात आले असून त्यांचा गट क्रमांक एक होता. त्यांनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे.

मतमोजणीचा कल पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शेतकरी कृती समितीला मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, तसेच भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात यांच्या ‘छत्रपती बचाव’ पॅनलचा पुरता पराभव झाला आहे.

या निकालामुळे इंदापूरमधील सहकार क्षेत्रात अजित पवारांची पकड आणखी मजबूत झाली आहे.

Justice D V Ramana retires from Indore bench of Madhya Pradesh High Court, expresses regret over transfer in speech

0
Justice D V Ramana retires from Indore bench of Madhya Pradesh High Court, expresses regret over transfer in speech



Justice D V Ramana retires from Indore bench of Madhya Pradesh High Court, expresses regret over transfer in speech | “देव इतक्या सहज विसरत नाही अन् माफही करत नाही”, न्यायमूर्तींनी निवृत्तीच्या भाषणात बोलून दाखवली बदलीबाबतची खंत





Source link

Rbi Rules : बँकेत कोण लॉकर घेऊ शकतं? कोणत्या गोष्टी ठेवता येता आणि कोणत्या नाही? Bank Locker मधून वस्तू गहाळ झालं तर…?

0
Rbi Rules : बँकेत कोण लॉकर घेऊ शकतं? कोणत्या गोष्टी ठेवता येता आणि कोणत्या नाही? Bank Locker मधून वस्तू गहाळ झालं तर…?


Bank Locker Rules : आरबीआयकडून भारतातील बँकांना लॉकर ठेवण्याची व्यवस्था देण्यात आली आहे. बँक ही कुठलही आहे, तिची व्याप्ती किती आहे, यावर त्या बँकेला लॉकरची संख्या दिली जाते. सर्वसाधारण लोकांना माहिती आहे, लॉकरमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि मौलवान वस्तू, दागिने ठेवले जातात. पण त्याशिवाय या लॉकरमध्ये काय काय ठेवता येतं तसंच त्या कुठल्या गोष्टी ठेवता येत नाही याविषयी जाणून घेणार आहोत. अजून एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो तो म्हणजे बँकेमध्ये लॉकर हे कोणाला मिळतं.

बँकेत कोण लॉकर  घेऊ शकतं? 

बँक लॉकर ही ज्वेलरी आवश्यक कागदपत्र आणि वैध सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलं जातं. तर बँकेत लॉकर हे कोणीही घेऊ शकतं. तुम्हाला जर लॉकर उघडायचा असेल तर लॉकर अर्ज करण्यासाठी संबंधित बँकेत तुमचं सेव्हिंग अकाऊंट असावं लागतं. सेव्हिंग अकाऊंट नसेल तर ते आधी उघडावे लागतं. यासाठी तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड याची आवश्यकता लागते. त्यासोबत बँकेसोबत स्टँप पेपरवर एग्रीमेंट करण्यात येतं. (Who can use a locker in a bank What things can be kept and what not What if something goes missing from a bank locker Rbi Rules )

लॉकरमध्ये काय ठेवू शकता?

  1. दागिने
  2. मालमत्तेची कागदपत्रे
  3. जन्म मृत्यु प्रमाणपत्र
  4. आवश्यक कागदपत्रे
  5. विवाह प्रमाणपत्र
  6. विमा पॉलिसी
  7. बचत रोखे
  8. किसान विकास पत्र इ.

लॉकरमध्ये काय ठेवू शकतं नाही?

  1. रोख रक्कम
  2. शस्त्र
  3. औषधे, विष
  4. स्फोटके
  5. भाज्या, फळे इत्यादी नाशवंत वस्तू
  6. किरणोत्सर्गी पदार्थ
  7. बेकायदेशीर वस्तू
  8. इतरांना त्रास देणाऱ्या गोष्टी

लॉकर की सुरक्षा!

बँक लॉकर फक्त ग्राहकांना ही एक्सेस मिळतो. ग्राहकांशिवाय नातेवाईकांना लॉकर उघता येत नाही. 

बँक लॉकर उघडताना ग्राहक आणि बँकेचा एक अधिकारी तिथे असतो. 

तसंच बँक लॉकरची चाबी ग्राहकांनी हरवल्यास बँक जबाबदार नसते. 

लॉकरच्या नुकसानीसाठी बँक जबाबदार आहे.

जर लॉकरमध्ये ठेवा सामान चोरीला केल्यास बँक आपली भरपाई देतं. 

 





Source link