Sunday, July 12, 2026
Home Blog Page 237

SC Grants Interim Bail to Ashoka University Professor in Operation Sindoor post Case

0
SC Grants Interim Bail to Ashoka University Professor in Operation Sindoor post Case



SC Grants Interim Bail to Ashoka University Professor in Operation Sindoor post Case | ‘ऑपरेशन सिंदूर’ पोस्टप्रकरणी अटकेत असलेल्या अली खान महमूदाबाद यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर





Source link

सुनेच्या गळ्यात साडी गुंडाळून बाईकने फरफटत नेलं, ती मेल्याची खात्री झाल्यावर..; सासू-सासऱ्यांसहीत पतीला अटक

0
सुनेच्या गळ्यात साडी गुंडाळून बाईकने फरफटत नेलं, ती मेल्याची खात्री झाल्यावर..; सासू-सासऱ्यांसहीत पतीला अटक


Women Death Case: कर्नाटकमधील बेळगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचा गळा दाबून खून केल्यानंतर हा सर्व प्रकार अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मोटारसायकलला बांधून मृतदेह ओढून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपाखाली पीडित महिलेचे सासरे आणि तिच्या पतीसहीत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मयत रेणुका मुलाला जन्म देऊ शकली नाही म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये कमन्ना (सासरे), जयश्री (सासू) आणि संतोष (पती) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर एस. गुलेद यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. “शनिवारी संध्याकाळी ही भयानक घटना घडली. सुरुवातीला पोलिसांना एक फोन आला की त्यांच्या सूनेचा अपघात झाला आहे आणि तिचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघेजण मोटारसायकल होते. सासरे मोटरसायकल चालवत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी जयश्री आणि तिसरी व्यक्ती रेणुका बसली होती, असं सांगण्यात आलं” अशी माहिती गुलेद यांनी दिली. “रेणुका यांचे पाच वर्षांपूर्वी संतोषशी लग्न झाले. दुर्दैवाने, ती आजाराने ग्रस्त होती आणि ती आई होऊ शकत नव्हती,” असंही पोलिसांनी सांगितलं. “संतोषने अलीकडेच दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. दुसरी महिला गर्भवती आहे. दुसऱ्या लग्नानंतर, ते रेणुकाला घर सोडून जाण्यास भाग पाडत होते. पण ती तिथेच राहिली. तिच्या निर्णयामुळे तिची हत्या करण्यात आली,” असं पोलिसांनी सांगितलं.

चौकशीत समोर आलं सत्य

“चौकशीदरम्यान, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे संतोष देऊ शकला नाही. कमन्ना (सासऱ्या) वर संशय असल्याचे पोलिसांना समजले आणि पुढे आमच्या चौकशीदरम्यान, कमन्ना यांनी कबूल केले की त्यानीच सुनेचा गळा दाबला होता. सूनने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांनी तिची हत्या केली असं ते म्हणाले. प्रत्यक्षात असं घडलं की, संध्याकाळी जेव्हा ती मंदिरातून आली तेव्हा सासू-सासरे तिला बाईकवरुन घेऊन गेले. वाटेतच त्यांनी तिला ढकललं. जेव्हा ती खाली पडली पण तिचा मृत्यू झाला नाही. म्हणून, त्यांनी तिचा गळा दाबला आणि तिच्याच साडीने तिला मोटारसायकलला बांधले. अपघात आहे असं दाखवण्यासाठी सासू-सासऱ्यांनी तिची साडी बाईकला बांधून तिला 120 मीटर ओढत नेले. मात्र पुढील सहा तासांतच हा खून असल्याचे उघड झाले,” असं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणामध्ये, “सासरे, सासू आणि नवऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कसून चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे,” असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.





Source link

Cannes 2025 Urvashi Rautela reveals the reason of wearing a torn dress

0
Cannes 2025 Urvashi Rautela reveals the reason of wearing a torn dress



Cannes 2025 Urvashi Rautela reveals the reason of wearing a torn dress | Cannes च्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेलाने उसवलेला ड्रेस का घातलेला? अभिनेत्रीने स्वत:च सांगितलं सत्य, ट्रोल करणाऱ्यांनीही थेट सुनावलं





Source link

नाशिक जिल्ह्यात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

0
नाशिक जिल्ह्यात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध



नाशिक – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंदूर मोहिमेतून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबले असले तरी सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय शहर हद्द वगळून) तीन जूनपर्यंत ड्रोन उड्डाणास प्रतिबंध (नो ड्रोन फ्लाय झोन) केला आहे.

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमानुसार १६ मे ते तीन जून २०२५ या कालावधीत हे निर्बंध लागू केले आहेत. या आदेशान्वये महत्वाचे धार्मिक स्थळ, गर्दीची रेल्वे स्थानके, मॉल्स, औद्योगिक क्षेत्र या सर्व ठिकाणी ड्रोन, दूरसंवेदक नियंत्रित मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटरर्स, हँग ग्लायडर्स, गरम हवेचा बलून आणि तत्सम सर्व हवाई क्रियाकल्पांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.



Source link

farmer Built farm pond on Five acres video goes viral on social media

0
farmer Built farm pond on Five acres video goes viral on social media



farmer Built farm pond on Five acres video goes viral on social media | शेतकऱ्याचा नाद नाय! तब्बल ५ एकरवर बांधलं जबरदस्त शेततळं; VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की





Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांचा कंटाळासुद्धा साजरा करा

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांचा कंटाळासुद्धा साजरा करा


31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

४६ वर्षीय प्रवीण पाटील सुद्धा असाच विचार करतात आणि त्यांनी या महिन्यात त्यांची मुलगी सान्वी पाटील (११) आणि अन्य एक मुलगा अर्णव भोईणकर (१२) यांच्याबाबत हा प्रयोग केला. प्रवीण यांनी विचार केला की, ‘यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद वेगळ्या पद्धतीने का घेऊ नये?’ आणि त्यांनी मुंबई ते कन्याकुमारी सायकलवरून जाण्याचे ठरवले. त्यांचे मत आहे की, अशा प्रकारचा अनुभव मुलांना केवळ मोबाइल आणि इतर गॅजेट्सपासून दूरच ठेवणार नाही, तर त्यांच्याकडेही बालपणीच्या त्या सर्व आठवणी असतील, जशा आपल्याकडे झोके खेळतानाच्या आहेत. त्यांना दिसतंय की, आजकालची मुले कॅरम, बुद्धिबळ किंवा सापशिडीसारखे खेळही मोबाइलवर खेळतात. स्थानिक सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या प्रवीण यांनी आपल्या मुलीला ही कल्पना सांगितली तेव्हा ती लगेच तयार झाली. अर्णवही नियमित सायकल चालवत असल्यामुळे त्यांनी अर्णवच्या पालकांना ही कल्पना सांगितली, तेव्हा तेही तयार झाले. तिघांनी २ मे रोजी मुंबईहून प्रवास सुरू केला आणि कोकणातून हळूहळू दक्षिणेकडे सरकत दररोज सुमारे १०० किमी अंतर कापून दोन आठवड्यांत कन्याकुमारीला पोहोचले.

मुले या प्रवासातून काय शिकली?

१. नियोजन करणे : त्यांनी या कडक उन्हाळ्यात उपयोगी पडू शकतील, पण वजनाने हलक्या अशा आवश्यक सर्व वस्तू सोबत घेतल्या. पाण्याची बाटली, पोषणासाठी सुकामेवा, चिक्की, स्नॅक्स इ.

२. शिस्त : वाहतूक मोठी समस्या असल्याने प्रवीण यांनी टीमसाठी एक नियम बनवला – तिघांनी एकामागे एक सायकल चालवावी आणि एकमेकांपासून जास्त अंतर नसावे, जेणेकरून मोठ्या आवाजात बोललेले ऐकू येईल. यामुळे संभाषणावर नव्हे, रस्त्यावर नेहमी लक्ष राहील.

३. वर्तमानात राहणे : त्यांनी रेस्टॉरंटची निवड काळजीपूर्वक केली, जेणेकरून वाटेत आजारी पडू नये. जेवण हलके व पौष्टिक ठेवले. केळी नेहमी हातात असत, त्यातून मुलांना निरोगी अन्न काय असते व त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, हे शिकायला मिळाले. त्यांनी कोणते अन्न शरीरासाठी चांगले आहे आणि कोणते नाही, हेही समजून घेतले.

४. शरीराचे ऐकणे : त्यांनी वेगवेगळ्या तापमानाच्या भागातून प्रवास केला, त्यामुळे त्यांच्या शरीरानेही प्रतिक्रिया दिली. त्यांना खूप थकवा जाणवला किंवा खूप गरम वाटले, तेव्हा त्यांनी मोठा ब्रेक घेतला आणि शरीर उष्णता सहन करण्यास तयार झाले तेव्हा पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली.

५. प्रशंसा हाताळायला शिकणे : या छोट्या सायकलस्वारांबद्दल जाणून घेऊन आणि त्यांना पाहून वाटसरूही थक्क होत होते. प्रवीण यांचे मत आहे की, खरी ‘शो-स्टॉपर’ तर मुलेच होती. काहींनी त्यांना थांबवले आणि प्रश्नांची सरबत्ती केली; तर काहींनी सेल्फी काढली. एका ठिकाणी तर एका कुटुंबाने त्यांच्या नाष्ट्याचे बिल दिले, तर काहींनी त्यांच्या प्रयत्नाला सलाम केला. तामिळनाडूत एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आपल्या घरी आराम करण्यासाठीही आमंत्रित केले. ते १४ दिवसांत कन्याकुमारीला पोहोचले. सोमवारी त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. दोन्ही बाजूंचे मिळून सुमारे ३,३०० किमी अंतर ते पूर्ण करतील. मला खात्री आहे की, असे प्रवास मुलांसाठी सर्वात अविस्मरणीय ठरतील व परतल्यावर त्यांच्याकडे सांगायला शेकडो कथा असतील.

आजच्या काळात इंटरनेटचे व्यसन व स्क्रीन-अवलंबित्व मुलांसाठी व किशोरांसाठी मोठी चिंता असताना तज्ज्ञ सल्ला देतात की, “कंटाळाही साजरा करा!” हो. पुढच्या वेळी तुमचे मूल उन्हाळ्याच्या सुटीत कंटाळल्याची तक्रार करेल, तेव्हा तो चांगला साजरा करा आणि मुलाला म्हणा, “हे छान आहे! कंटाळा तुझ्या मनाला काही तरी सर्जनशील बनण्यासाठी प्रेरित करतो!” आपल्याला प्रत्येक गोष्ट ठरवून करण्याची गरज नाही. काहीही न करणेही चांगले आहे. नवे अनुभव हवे असतील तर पूर्णपणे अनियोजित किंवा पॅटर्न मोडून काही तरी पूर्णपणे नवीन करून बघा.

फंडा असा की, कंटाळा ही एक तात्पुरती अवस्था आहे आणि आता आपण स्क्रीनच्या पलीकडे जाऊन काही तरी नवीन अनुभव घेणार आहोत, हे त्याचे संकेत आहेत. वरच्या उदाहरणातील मुलांनी केले तसे काही तरी करायला मुलांना घेऊन जा आणि मग हे तुमच्या मुलांना कसे प्रेरणेने भरून टाकते, ते बघा.



Source link

pimpri road digging deadline violation warning by pcmc

0
pimpri road digging deadline violation warning by pcmc



pimpri road digging deadline violation warning by pcmc | पिंपरी : मुदत संपूनही पिंपरीत रस्ते खोदाई; महापालिकेने दिला गुन्हे दाखल करण्याचा इशारा





Source link

रश्मी बन्सल यांचा कॉलम: स्वप्नांच्या सायकलवर प्रवास करा, खरोखर यश मिळेल‎

0
रश्मी बन्सल यांचा कॉलम:  स्वप्नांच्या सायकलवर प्रवास करा, खरोखर यश मिळेल‎


  • Marathi News
  • Opinion
  • Rashmi Bansal’s Column Travel On The Cycle Of Your Dreams, You Will Truly Achieve Success

3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सीबीएसई बारावीचे निकाल लागले आहेत. ‘पुढे काय‎करायचं बेटा?’ असं सगळे विचारत आहेत. काही मुलांना ‎आयआयटी वगैरेमध्ये प्रवेश मिळेल, पण बाकीचे कुठे ‎जातील? ते अशा कॉलेजमध्ये जातील, जिथे काही विशेष‎अभ्यास होत नाही. जिथल्या पदवीला काही किंमत नाही.‎

तसे पाहता, एआयच्या काळात आता काही सांगता येत‎ नाही. कोणत्याही पदवीचे आयुष्यभर मूल्य राहील असे ‎वाटत नाही. नुकतेच आयआयएम अहमदाबादच्या एका‎ विद्यार्थ्याने चॅट-जीपीटीने आपल्या असाइनमेंट केल्या‎ आणि त्याला ‘ए’ ग्रेड मिळाला. नंतर त्याने या गोष्टीचा‎खुलासा केला की, ‘मी फक्त हे पाहू इच्छित होतो की,‎निकाल काय लागतो?’‎

तसे ‘कॉपी’ करणे तर खूप पूर्वीपासून होत आले आहे.‎आधी लोक चिठ्ठ्या पास करायचे, आता ते तंत्रज्ञानाचा ‎वापर करतात. कॉपी करणाऱ्याला खूप आनंद होतो की ‎‘बघा मी परीक्षकाला कसा मूर्ख बनवला?’ पण हे‎करत-करत तुम्ही स्वतः मूर्ख बनला नाहीत का?‎

आळस हा माणसाचा शत्रू आहे. पण हेही खरे आहे की, ‎कॉलेजचा अभ्यासक्रम खूप कंटाळवाणा आणि जुना आहे.‎ जग वेगाने पुढे जात आहे, पण त्याच जुन्या गोष्टी शिकवल्या‎ जात आहेत. विद्यार्थी विचार करतो- ‘हे शिकून मला काय‎फायदा?’ विद्यापीठाकडे याचे कोणतेही उत्तर नाही.‎

सामान्य माणसाला खात्री हवी असते की ‘अमुक-तमुक ‎करून आयुष्य ‘सेट’ होईल.’ शाळा-कॉलेजमध्ये हे शक्य‎ आहे. पण, आयुष्याची परीक्षा इतकी सोपी नसते. त्यात तर‎ बहुतांश प्रश्न ‘अभ्यासक्रमाबाहेरचे’ च (आउट ऑफ‎सिलॅबस) येतात. कारण उद्या काय होईल, हे कोणालाच ‎माहिती नाही.‎

असे म्हटले जात आहे की, एआयमुळे २-४ वर्षांत अनेक ‎नोकऱ्या गायब होतील. प्रोग्रामर असो वा कन्सल्टंट, जे काम‎ते करत होते, ते आता मशीन करेल. इतकेच काय,‎ड्रायव्हरलेस गाड्याही आता येत आहेत. त्या हजारो-लाखो‎लोकांचे काय होईल, ज्यांची रोजीरोटी जाईल?‎

आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक दिवस मशीन‎ आपल्यासाठी काम करतील आणि आपण आराम करू.‎ सरकार प्रत्येकाला ‘निश्चित रक्कम’ देईल, त्यामुळे ‎तुम्हाला काम करण्याची गरज नाही. आज वेळ खूप ‎मौल्यवान आहे, कळत नाही तो कुठे गेला? पण तुमच्याकडे ‎खूप वेळ असता तर तुम्ही काय केले असते? उफ्फ, हे ‎काल्पनिक विचार आहेत. जे शक्य नाही, त्याची स्वप्ने का‎पाहावी? हीच तर समस्या आहे. तुम्ही वर्तमान काळाच्या ‎दलदलीत असे फसला आहात की याहून चांगले जग तुम्ही ‎मनातही तयार करू शकत नाही. स्वप्न पाहणे हा तुमचा ‎जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्काने पाहा.‎

जगात जेवढी प्रगती झाली आहे, ते कधी तरी एक स्वप्न‎ होते, कोणाच्या तरी डोक्यात. स्वतंत्र होण्याचे स्वप्न, श्रीमंत‎होण्याचे स्वप्न, काही तरी करून दाखवण्याचे स्वप्न. स्वप्नाचा आकार-प्रकार नसला तरी त्यात अपार शक्ती‎आहे. लोक रस्त्यावर चालत आहेत, स्वप्न पाहणाऱ्याकडे‎ सायकल आहे. ती सायकल चालवण्यासाठी जोर लागेल,‎ घाम येईल, थकवा येईल. पण, स्वप्न मनाच्या पडद्यावर ‎येऊन पुन्हा जोश देईल. टायर पंक्चर होईल, अपघातही‎होऊ शकतो. जेव्हा असे वाटेल की, पुढे जाणे अशक्य‎आहे, तेव्हा कोणी तरी अनोळखी व्यक्ती येऊन मदत करेल. ‎गुगलवर सर्च करा- “द हीरोज जर्नी”, त्यात १२ टप्पे येतात. ‎महाभारतातील पात्र असो किंवा आजचा जिवंत माणूस, हा‎ फॉर्म्युला स्वप्न पाहणाऱ्यावर लागू होतो – जो कोणी मोठे ‎आव्हान स्वीकारतो, जो आपल्या नशिबाला आव्हान देतो.‎

तर तुमचे कमी मार्क आले, ‘चांगल्या कॉलेज’मध्ये‎ प्रवेश मिळाला नाही, हरकत नाही. तुम्ही स्वप्न बघा की, मी‎ एकलव्यासारखा अर्जुना इतका हुशार बनेन. आज इंटरनेट‎ द्रोणाचार्यापेक्षा कमी नाही. शिकण्याची इच्छा ज्याला‎ असेल, त्याला जगाचे समस्त ज्ञान मिळू शकते.‎

हो, जग बदलेल, त्याला कोणीही रोखू शकत नाही, पण‎ विजय त्याचाच होईल, जो वेळेनुसार बदलण्यास तयार‎ आहे. जो ‘आउट ऑफ सिलॅबस’ परीक्षेला घाबरत नाही,‎जो आपल्याच मार्गावर चालतो. ज्याने आपल्या आत‎आत्मविश्वास जागृत केला, त्याला पदवीपेक्षा काही तरी‎ अधिक मिळाले. स्वप्नांच्या सायकलवर प्रवास करा, ‎तुम्हाला खरोखर यश मिळेल.‎

(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)‎



Source link

प्रो. चेतन सिंग सोलंकी यांचा कॉलम: ‘एक देश – एक निवडणूक’चा ‎पर्यावरणावरही चांगला परिणाम‎

0
प्रो. चेतन सिंग सोलंकी यांचा कॉलम:  ‘एक देश – एक निवडणूक’चा ‎पर्यावरणावरही चांगला परिणाम‎


  • Marathi News
  • Opinion
  • Prof. Chetan Singh Solanki’s Column “One Nation One Election” Has A Good Effect On The Environment Too

5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‘एक देश – एक निवडणूक’ (ओएनओई)च्या ‎प्रस्तावाने देशभरात चर्चांना जन्म दिला आहे, त्यात ‎मुख्यत्वे प्रशासनाची कार्यक्षमता, खर्च-बचत व‎ प्रशासकीय तसेच सुरक्षा प्रणालींवरील भार कमी‎करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा सरकारी यंत्रणेला ‎निवडणूक-प्रचाराऐवजी प्रशासनावर अधिक लक्ष‎ केंद्रित करण्यास सक्षम करू शकणारा उपाय म्हणून‎ प्रशंसला जात आहे. तसेच विविध राज्यांत सततच्या ‎निवडणुकांमुळे होणारे अडथळे कमी करू शकते.‎पण, आणखी एक पैलू अनेकदा दुर्लक्षित केला जातो‎- त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम.‎

लोकशाहीसाठी निवडणुका आवश्यक आहेत, पण‎त्यासाठी पर्यावरणालाही किंमत मोजावी लागते. प्रत्येक ‎‎निवडणूक चक्रात लोकांची प्रचंड हालचाल,‎साहित्याची छपाई, इंधनाचा वापर, विजेचा वापर व‎मोठ्या प्रमाणावर शारीरिक व डिजिटल उलाढाल‎होते. २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांत वेगवेगळ्या ‎‎निवडणुकांची संख्या विचारात घेतल्यास हे प्रमाण खूप ‎‎मोठे होते. भारताने ओएनओईद्वारे लोकसभा व‎विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर‎अंदाजे ६.५ लाख कोटींच्या एकूण अंदाजे निवडणूक ‎‎खर्चातून पाच वर्षांच्या कालावधीत किमान ४ किंवा ५‎लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते. ही केवळ‎ आर्थिक बचत नाही; हे उपक्रमांतील मोठ्या‎ कपातीचेही सूचक आहे.‎

ओएनओईच्या अंमलबजावणीद्वारे वाचवले जाणारे‎उत्सर्जन अनेक स्रोतांकडून येतील. प्रवास हा एक‎प्रमुख योगदानकर्ता आहे. प्रत्येक निवडणुकीत लाखो‎मतदान अधिकारी, अर्धसैनिक दल, राजकीय प्रचारक‎व मतदार हवाई, रेल्वे व रस्ते यासह वाहतुकीच्या‎विविध साधनांचा वापर करून देशभरात फिरतात.‎ कमी निवडणुका म्हणजे कमी प्रवास, कमी इंधनाचा‎वापर व कमी प्रदूषण. राजकीय मोहीम तीव्र ऊर्जा‎वापराचे आणखी एक क्षेत्र आहे. हजारो रॅल्या‎ आयोजित केल्या जातात, त्यात लाऊडस्पीकर,‎लायटिंग सेटअप, डिझेल जनरेटर, वाहनांचे ताफे व‎तात्पुरत्या संरचनांचा वापर केला जातो – हे सर्व वीज‎व इंधनावर चालतात. याशिवाय निवडणुकीच्या‎हंगामात मुद्रित साहित्य – पोस्टर्स, बॅनर्स, फ्लायर्स,‎टी-शर्ट्स व प्लास्टिकच्या वस्तूंचा पूर येतो. यापैकी‎बहुतांश सिंगल युज वस्तू असतात, त्या एक तर‎कचराकुंडीत जातात किंवा जाळल्या जातात, त्यामुळे‎ प्रदूषणात भर पडते.‎

डिजिटल आणि प्रसारण मोहिमांनाही पर्यावरणीय ‎किंमत मोजावी लागते. प्रत्येक सोशल मीडिया ‎जाहिरात आणि व्हिडिओ स्ट्रीममागे एक डेटा सेंटर‎असते, ते प्रत्येक सेकंदाला वीज वापरते. शेकडो‎मतदारसंघ व अनेक निवडणूक चक्रांत एकत्रित ‎डिजिटल फूट प्रिंट खूप मोठे होते. ओएनओई ही चक्रे‎एकाच, वेळेनुसार प्रक्रियांत संघटित करेल, त्यामुळे‎चांगले नियंत्रण, नियोजन व शेवटी कमी पर्यावरणीय‎ दुष्परिणाम शक्य होतील.‎

कार्बन-तीव्रता म्हणजे एकक जीडीपीसाठी किती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सीओ-२ उत्सर्जित होतो. २०२३-२४ पर्यंत भारताची‎कार्बन-तीव्रता प्रत्येक ₹१०० खर्चावर ०.२४ किलोग्राम‎सीओ-२ होती. या आधारावर ₹५ लाख कोटींच्या‎आर्थिक उलाढालींमुळे सुमारे १.२ दशलक्ष टन – किंवा‎१२ लाख मेट्रिक टन सीओ-२ उत्सर्जन होईल. हे सुमारे ‎१२ लाख परिपक्व झाडे तोडण्यासारखे आहे, कारण‎एक पूर्ण वाढलेले झाड त्याच्या आयुष्यात सुमारे एक‎मेट्रिक टन सीओ-२ शोषून घेते. अशा प्रकारे‎ओएनओईचे बहुआयामी फायदे आहेत. यामुळे‎पैशांची बचत होते व प्रशासकीय ताण कमी होतो.‎सरकारांना दीर्घकालीन धोरणावर काम करण्यासाठी‎अधिक अखंड वेळ मिळतो. आणि हे स्पष्टपणे ‎हवामानाचे फायदे देखील प्रदान करते.‎

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)‎‎



Source link

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: धर्म आणि नैतिकता एकत्र‎ आल्यास शांतता प्रवेश करते‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  धर्म आणि नैतिकता एकत्र‎ आल्यास शांतता प्रवेश करते‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column If Religion And Morality Come Together Then Peace Enters पं. विजयशंकर

7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मार्ग दोन प्रकारच्या लोकांसाठी गंतव्यस्थान बनतो. एक तर तुम्ही‎भाग्यवान आहात किंवा तुम्ही शहाणे आहात. या वेळी जी व्यक्ती‎जीवनाचा समतोल समजून घेते त्याला ज्ञानी म्हटले जाईल. हे विज्ञान व‎तंत्रज्ञानाचे युग आहे, एआयने प्रवेश केला आहे, म्हणून एआयशी‎ लढण्याची गरज नाही. जसे हनुमानाने लंकेला जाताना मैनाक पर्वताला‎स्पर्श केला होता, तसेच नाकारले नाही आणि मैनाक पर्वत हा आजच्या‎तंत्रज्ञानाचा वापर आहे. म्हणून हनुमान म्हणतात की, त्याचा वापर करा,‎पण मी मैनाक पर्वताला जे सांगितले ते तुम्ही तंत्रज्ञानालाही सांगावे -‎श्रीरामाचे काम केल्याशिवाय मला विश्रांती कुठे मिळेल. आपले ध्येय‎यशासोबत शांतीदेखील असले पाहिजे. एआय आपल्याला आपल्या‎ध्येयापर्यंत घेऊन जाईल, पण आपली शांती हिरावून घेईल. नवीन पोप‎ म्हणाले आहेत की, एआय ही दुसरी औद्योगिक क्रांती आहे. हे मानवी‎ विचारसरणी व श्रमावर हल्ला करेल. म्हणूनच त्यांनी धार्मिक संस्थांना व‎विशेषतः त्यांच्या स्वतःच्या संस्थांना सांगितले आहे की, एआयबाबत ‎नैतिक स्पष्टता व धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. धर्म व‎नैतिकता एकत्र आल्या तर शांती खूप लवकर प्रवेश करते.‎



Source link