Sunday, July 12, 2026
Home Blog Page 233

The list of candidates recommended under selection without interview उमेदवारांची शिफारस

0
The list of candidates recommended under selection without interview उमेदवारांची शिफारस


पुणे : पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीप्रक्रियेतील मुलाखतीविना निवडीअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यात मराठी माध्यमासाठी ९६३, उर्दू माध्यमासाठी १००, हिंदी माध्यमासाठी ३५, बंगाली माध्यमासाठीच्या १६ उमेदवारांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पवित्र संकेतस्थळामार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीविना निवडीचा पर्याय निवडलेल्या १८ जिल्हा परिषदांनी ४६८, १३ महापालिकांनी ३६२, ५७ नगरपालिका-नगर परिषदांनी २२१, तर २५ खासगी शैक्षणिक संस्थांनी ५३७ अशा एकूण १५८८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली होती. त्यानुसार पात्रताधारक उमेदवारांचे निवडयादीकडे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमीवर, मुलाखतीविना निवडीअंतर्गत १५८८ रिक्त पदांसाठी एकूण १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यात पहिली ते चौथीसाठी ५५४, सहावी ते आठवीसाठी २१०, नववी ते दहावीसाठी २१६, अकरावी ते बारावीसाठी १३४ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात अनुसूचित जातीतील ३५, अनुसूचित जमातीतील ६४, विमुक्त जातीतील (अ) ३७, भटक्या जमातीतील (ब) २६, भटक्या जमातातील (क) २२, भटक्या जमातीतील (ड) १४, विशेष मागास प्रवर्गातील ६, इतर मागास प्रवर्गातील १६८, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १०७, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील १३३, खुल्या प्रवर्गातील ४०२ उमेदवारांचा समावेश आहे.

हेही वाचा

मुलाखतीसह निवडीसाठी ८ हजार ७३३ पदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांमध्येही भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार ८ हजार ७३३ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.





Source link

आंबिल ओढा परिसरात सीमाभिंत कधी उभारणार? नागरिकांची विचारणा

0
आंबिल ओढा परिसरात सीमाभिंत कधी उभारणार? नागरिकांची विचारणा



पुणे : आंबिल ओढ्याचे पाणी सोसायट्यांमध्ये शिरू नये, यासाठी सीमाभिंत कधी बांधणार, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात आला आहे.सीमाभिंत उभारण्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य सरकारचा निधीच न आल्याने निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली.

मंगळवारी शहरात जोरदार झालेल्या पावसामुळे पद्मावती येथे एका सोसायटीची सीमाभिंत कोसळण्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर आंबिल ओढा आणि इतर नाल्यांच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका सीमाभिंती उभारणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.पाच वर्षांपूवी शहरातून वाहणाऱ्या आंबिल ओढ्याला पूर आला होता. ओढ्याचे पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये घुसले होते.

यामध्ये सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या होत्या. महापालिकेच्या मुख्य सभेत यावर जोरदार चर्चा झाली होती. सोसायट्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात होती. महापालिकेला या ठिकाणी निधी खर्च करण्यासाठी मर्यादा येत असल्याने या परिसरातील सीमाभिंतींची कामे रखडली होती. या कामासाठी विशेष बाब म्हणून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

आंबिल ओढ्याच्या कामासाठी राज्य सरकारने २०० कोटींचा निधी मंजूर केला होता. याच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, निविदांमध्ये आमदाराच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळाली नाहीत. त्यामुळे हा निधी आला नाही.- अश्विनी कदम, माजी नगरसेविका, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष



Source link

यूपीएससीची तयारी: पेपर कसा सोडवावा?

0
यूपीएससीची तयारी: पेपर कसा सोडवावा?



विद्यार्थी मित्रांनो, या लेखात आपण २५ मे रोजी होणाऱ्या यूपीएससी पूर्वपरीक्षा २०२५ च्या दृष्टीने पेपर सोडविण्याची रणनीती जाणून घेणार आहोत. ही परीक्षा तुमच्या एक वा त्यापेक्षा अधिक वर्षांच्या कष्टाचे फळ आहे, तेव्हा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाणे अपेक्षित आहे. लक्ष केंद्रित करून पेपरला सामोरे जाताना वेळेचे अचूक व्यवस्थापनही इथे अपेक्षित आहे.

● ओएमआर -उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरा :

ओएमआर – उत्तरपत्रिकेवर तुमचा परीक्षा क्रमांक, पेपरचा कोड, परीक्षेचे नाव इ. बाबी अचूकपणे भरणे अपेक्षित आहे. बहुतेकदा काही विद्यार्थी इथे चूक करतात. एकतर ही उत्तरपत्रिका बदलून मिळत नाही आणि त्यामुळे तुमची मानसिकताही सुरुवातीपासून खराब होते. ज्याचा परिणाम पेपरवर होतो. त्यामुळे शांतपणे सर्व तपशील भरा.

● वेळेचे नियोजन :

पेपर सोडविताना पेपरचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘जीएस’ व ‘सीसॅट’ या दोन्ही पेपरमधील सर्व प्रश्न वाचून व्हायला हवेत. ‘सीसॅट’ साठी वेळेचे नियोजन हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. बहुतेकदा ‘जीएस’चा पेपरही वेळखाऊ असतो. एखादा प्रश्न वाचल्यावर त्यासंबंधी बाबी रिकलेक्ट होत नसतील तर लगेच पुढच्या प्रश्नाकडे आपण जायला हवे.

● प्रश्न काळजीपूर्वक वाचा :

हा एक सोपा उपाय आहे की प्रश्नामध्ये कधीकधी योग्य उत्तराशी संबंधित दुवा असू शकतो. अंदाजे उत्तर दिल्याने प्रश्न बरोबर येण्याची शक्यता ५०/५० असते. प्रश्न काळजीपूर्वक वाचल्याने तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येते. जरी हे प्रत्येक प्रश्नाला लागू होत नसले तरी बऱ्याच वेळा ते तुम्हाला योग्य चित्र आणि अचूक उत्तर देऊ शकते. बहुतेकदा प्रश्न नीट न वाचल्याने उत्तर चुकूही शकते. ‘योग्य’ व ‘अयोग्य’ यात गोंधळ होतो. किंवा काही विधाने ही अर्धी बरोबर अर्धी चूक असतात.

● एलिमिनेशन तंत्र :

चुकीचे पर्याय वगळल्याने, योग्य पर्याय निवडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रश्नासाठी दिलेले चुकीचे पर्याय वगळून तुम्ही योग्य पर्यायांचा विचार करायला हवा. जेव्हा तुम्हाला अचूक उत्तराबद्दल खात्री नसते. तेव्हा हे तंत्र वापरल्याने फायदा होतो. परंतु यूपीएससीने गेल्या २-३ वर्षापासून पर्याय देताना काही प्रश्नांसाठी एलिमिनेशन तंत्र वापरता येणार नाही अशी योजना केलेली आहे. त्यामुळे या तंत्रालाही मर्यादा आहेत.

● ज्ञानाच्या आधारावर अंदाज बांधणे:

बहुपर्यायी प्रश्न हे चुकीचे पर्याय वगळण्याबद्दल असतात. अंदाजे उत्तरे देणे तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकते, पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या विषयाबद्दल पूर्वीचे ज्ञान असेल ज्यातून हा प्रश्न विचारला गेला आहे. तुमच्याकडे आधीपासून ज्ञान असेल तेव्हाच अंदाजे उत्तरे देणे फलदायी ठरू शकते. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, तुम्ही दिलेल्या नमुना चाचण्या आठवा. तुम्हाला प्रश्नाबद्दल काहीतरी सुगावा मिळू शकेल आणि त्यामुळे तुम्हाला प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यास मदत होईल. अंदाज लावताना त्याला काहीतरी संदर्भ असावा हे इथे लक्षात घ्या.

● सर्व पर्यायांचा विचार करा :

प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेले सर्व पर्याय नीट तपसा. अनेक वेळा विद्यार्थी ‘वरील सर्व’ आणि ‘यापैकी काहीही नाही’ हे पर्याय म्हणून दुर्लक्षित करतात, पण हे दिशाभूल करणारे ठरू शकते. ‘वरील सर्व’ आणि ‘यापैकी काहीही नाही’ हे देखील उत्तर असू शकते.

● महत्त्वाच्या शब्दांचे (की वर्डस) अनुसरण करा:

नेहमी प्रश्नातील महत्त्वाच्या शब्दांचे अनुसरण करा. बर्याच वेळा तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर मिळू शकते. प्रत्येक पर्याय तपासा आणि बारकाईने प्रश्नाशी जोडा. सर्वात योग्य पर्याय शोधण्याची ही युक्ती आहे.

● सीसॅट पेपरकडे दुर्लक्ष करू नका : सीसॅट हा पेपर जारी पात्रतेचा आहे म्हणून त्याला गृहीत धरू नका. २०० पैकी ६६ गुण मिळतीलच म्हणून कमी अटेम्प्ट अंगाशी येवू शकतो. इथे अचूकता महत्त्वाची आहे. २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षी यूपीएससी पूर्वपरीक्षेचे मेरिट कमी होण्यामागे या पेपरचा सिंहाचा वाटा आहे. बहुतेक विद्यार्थी या पेपरमध्ये ६६ गुण मिळवू शकलेले नाहीत. तेव्हा शांत व संयमाने आपण या पेपरला सामोरे जाणे गरजेचे आहे.

● पेपर सोडविताना खालीलप्रमाणे रणनीती असावी :

पेपरला सोडविताना किमान आपले ३ राऊंड व्हायला हवेत. म्हणजे पेपर किमान ३ वेला नजरेसमोरून जायला हवा.

● पहिला राउंड = १०० खात्रीशीर प्रश्न

पहिल्या राउंडमध्ये, तुम्हाला ज्या प्रश्नांची १०० खात्री आहे ते प्रश्न सोडवा. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर तुम्हाला किमान ३५ ते ४० प्रश्न १०० खात्रीने यायला हवेत.

● दुसरा राउंड = ५० खात्री असलेले प्रश्न

जर तुम्ही ४ पैकी २ पर्याय वगळले असतील, तर तुमच्याकडे फक्त २ पर्याय उरतात, ज्यापैकी १ योग्य उत्तर असेल. म्हणून, फेरी २ मध्ये, फक्त तेच प्रश्न घ्या ज्यामध्ये तुम्ही २ पर्याय वगळले आहेत.

● तिसरा राउंड = ३३ खात्रीशीर प्रश्न

ज्या प्रश्नांची बरोबर येण्याची शक्यता ३३ आहे ते प्रश्न सोडवा.

● अटेम्प्ट :

जीएस पेपरला ८० – ८५ इतका अटेम्प्ट हा चांगला अटेम्प्ट आहे. सीसॅट पेपरमध्ये अचूकतेवर भर दिल्यास ५० – ५५ इतका अटेम्प्ट पात्रतेसाठी योग्य ठरू शकतो. नकारात्मक गुणांची योजना इथे आहे. ३ उत्तरे चुकल्यास १ बरोबर उत्तराचे गुण वजा होतात, तेव्हा अधिकचा अटेम्प्ट त्रासदायक ठरू शकतो.

तुम्ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा देत आहात, त्यामुळे कोणतीही कसर राहू नये याची खात्री करा. सर्वांना २५ मे रोजी होणाऱ्या यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

sushilbari10 @gmail. com

दिल्ली विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी तसेच बीटेक प्रवेशांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी ६ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. हे प्रवेश admission. uod. ac. in वर अधिक माहिती उपलब्ध आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील यूपीएससी सीएसई २०२६ परीक्षेसाठी मोफत निवासी प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार admission. jmi. ac. in वर २८ मे २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

एमएचटी सीईटी २०२५ परीक्षेतील पीसीएम गटाच्या प्रश्नांविषयीचे आक्षेप २२ ते २४ मे या कालावधीत नोंदवायचे आहेत. त्यासाठी कँडिडेट लॉगइनमध्ये ‘ऑब्जेक्शन ट्रॅकिंग’ पर्याय उपलब्ध आहे.



Source link

मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू



सोलापूर : विद्युत जनित्राचे दुरुस्तीचे काम करताना अचानकपणे वीजपुरवठा सुरू होऊन विजेचा धक्का बसून एका कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा बळी गेला. मंगळवेढा शहरात ही दुर्घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मृतदेह आणून ठेवला आणि आंदोलन केले होते. अखेर चौकशीसह संबंधित दोषींवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अतिश जयराम लांडे (वय २८, रा. नागणे गल्ली, मंगळवेढा) असे मृत कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवेढा शहरात कारखाना चौकात एका नादुरुस्त विद्युत जनित्र दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी तेथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुरुस्तीचे काम करण्यासाठी अतिश लांडे हा उंच खांबावर चढला होता. काम सुरू असताना अचानकपणे तेथील वीजपुरवठा सुरू झाला आणि विजेचा धक्का बसून क्षणार्धात अतिश लांडे हा खांबावरून खाली जमिनीवर कोसळला. त्यास उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अखेर त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृत अतिश लांडे यांच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांसह शेकडोंचा जमाव मृतदेहासह मंगळवेढ्यातील महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकला. मृतदेह तेथेच ठेवून आंदोलन करण्यात आले. घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जमावाची मागणी होती. दरम्यान, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळत चौकशीचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधिकाऱ्यांनीही शिष्टाई केली. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.



Source link

Demand was made to build a memorial for Dr Narlikar डॉ. जयंत नारळीकर यांचे स्मारक

0
Demand was made to build a memorial for Dr Narlikar डॉ. जयंत नारळीकर यांचे स्मारक


कोल्हापूर : येथील महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनच्या वतीने कोल्हापूरचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना येथे बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. नारळीकर यांचे स्मारक कोल्हापुरात साकारावे, अशी मागणी करण्यात आली.

महाद्वार रोडवरील नारळीकर भवन येथे जयंत नारळीकर यांचे निवासस्थान होते. याच जागी आज त्यांच्या प्रतिमेला भाजपचे सचिव अशोक देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. असोसिएशनचे अध्यक्ष श्याम जोशी यांनी महाद्वार रोडचे रहिवासी आमच्या शेजारी वास्तव्यास असणारे कोल्हापूरचे थोर शास्त्रज्ञ आणि त्यांच्याविषयी आठवणी सांगितल्या. त्यांचे स्मारक कोल्हापुरात व्हावे, अशी मागणी केली.

हेही वाचा

कार्याध्यक्ष भालचंद्र लाटकर, सचिव डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, उमेश लाटकर, मालोजी केरकर, हेमंत आराध्ये, शिवनाथ पावसकर, किरण धर्माधिकारी, अमित माने, केदार पारगावकर, अमित निगवेकर, व्यापारी, रहिवासी उपस्थित होते.





Source link

District Collector Amol Yedge gave instructions निवारा केंद्रे तयार ठेवा

0
District Collector Amol Yedge gave instructions निवारा केंद्रे तयार ठेवा


कोल्हापूर : मान्सून कालावधीत इचलकरंजी, हातकणंगले भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

वारणा व पंचगंगा नदी काठावरील निलेवाडी, जुने पारगाव, किणी, रांगोळी, इचलकरंजी आदी संभाव्य पूरबाधित १५ भागांबाबत तालुका प्रशासनाने व इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतला. तत्पूर्वी हातकणंगले तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव येथील ठिकाणांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच, वारणा उद्योग समूह येथील पूरबाधित नागरिकांसाठीच्या संभाव्य निवारा केंद्राची पाहणी केली.

उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरकुमार साळवे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, सुनील शेरखाने, रोहित तोंदले, प्रसाद संकपाळ उपस्थित होते. रस्ते व पुलावरील पुराच्या पाण्यात नागरिक गेल्यास दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करा, अशा सूचना येडगे यांनी यावेळी दिल्या.उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय व गावनिहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाची माहिती दिली.

हेही वाचा





Source link

A case of fraud has been exposed in Hinjewadi Baner by taking money from customers फसवणूक

0
A case of fraud has been exposed in Hinjewadi Baner by taking money from customers फसवणूक


पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून मंजूर परवानगीपेक्षा अधिक मजल्यांच्या बांधकामासाठी परवानगी असल्याचे दाखवून ग्राहकांकडून पाच कोटी ३७ लाख रुपये घेत कोणतेही बांधकाम न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर येथे हा प्रकार घडला.

निखिल ज्ञानेश्वर फालक (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बांधकाम प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून चार मजल्यांची परवानगी घेतली आहे. तसेच दुसऱ्या एका प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाच मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी घेतली आहे. असे असताना त्यांनी बांधकाम प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती न देता ग्राहकांना दहा मजल्यापर्यंत परवानगी प्राप्त करण्यात येत असल्याची खोटी माहिती दिली. फालक आणि इतर व्यक्तींना दोन, पाच, नऊ आणि दहाव्या मजल्यावरील सदनिका व दुकाने विक्री करण्याचे आश्वासन दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

फालक आणि इतर ग्राहकांकडून पाच कोटी ३७ लाख ५५ हजार ७५९ रुपये घेतले. आरोपींनी ग्राहकांना रक्कम स्वीकारल्याच्या पावत्या, वाटपपत्र दिले. मे २०२० पर्यंत ताबा देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम पूर्ण न करता फालक आणि इतर ग्राहकांकडून घेतलेली रक्कम परत न करता तसेच गुंतवणूकदार यांच्याशी कोणताही रजिस्टर नोंदणी विक्री करार न करता रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार कांदे तपास करीत आहेत.





Source link

A young man was beaten up in Chakan on suspicion तरुणाचा खून

0
A young man was beaten up in Chakan on suspicion तरुणाचा खून


पिंपरी : नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून लाकडी फळीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. चाकण येथे ही घटना घडली.

बंटीसिंह नरेंद्रसिंह परमार (वय ३०, रा. मध्यप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार हौशीराम गाडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटीसिंह आणि आरोपी हे एकत्र राहण्यास होते. आरोपीला त्याच्या नातेवाईक महिलेसोबत बंटीसिंह याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. १३ मे रोजी रात्री बंटीसिंह घरी झोपलेला असताना आरोपीने लाकडी फळीने त्याच्यावर हल्ला केला. बंटीसिंहच्या तोंडावर जोरजोराने लाकडी फळी मारून त्याला गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार चालू असताना १९ मे रोजी बंटीसिंह याचा मृत्यू झाला.दरम्यान, आरोपीने त्याच्या घरात पडलेले रक्त पुसून टाकत पुरावा नष्ट केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

हेही वाचा





Source link

खडकवासला धरणाजवळ रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
खडकवासला धरणाजवळ रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू



पुणे : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला धरण परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष माधव मते (वय ४७, रा. खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक राेहित दत्तात्रय चव्हाण (रा. खडकवासला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश माधव मते (वय ४५, रा. खडकवासला) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मते हे १० मे रोजी खडकवासला धरण परिसरातून निघाले हाेते. त्या वेळी भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या मते यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मते यांचे भाऊ अविनाश यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक रोहित चव्हाण याने मद्यप्राशन करून अपघात केल्याचे मते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.



Source link

Piracy in India: दहशतवादाचे एकमेव कारण विचारसरणी नाही, पैसा आणि पायरसी हे देखील : माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा

0
Piracy in India: दहशतवादाचे एकमेव कारण विचारसरणी नाही, पैसा आणि पायरसी हे देखील : माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा


India Against Piracy: माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी पायरसी देश आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.  ‘दहशतवादी नेटवर्क केवळ विचारसरणीवर टिकत नाहीत, ते पैशावर टिकतात आणि पायरेटेड कंटेंट हा त्यांच्या सर्वात शांत स्त्रोतांपैकी एक आहे. पायरसीमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे, असे माजी राज्यसभा खासदार डॉ. चंद्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एका पोस्टमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायरसीचा काळा बाजार हजारो कोटी रुपयांचा आहे.

fallback

देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.

अलिकडच्याच एका मीडिया रिपोर्टनुसार, देशात २२,४०० कोटी रुपयांचा चित्रपट लीक घोटाळा उघडकीस आला आहे.  रेड २, सिकंदर आणि जाट सारखे प्रमुख हिंदी चित्रपट त्यांच्या थिएटर रिलीजच्या एक दिवस आधी ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  तथापि, अशा प्रकारे चित्रपट लीक होणे यात चित्रपट क्षेत्रातील आतील व्यक्तींचाच  सहभाग असल्याचे अंगुली निर्देश करत आहे. पायरसीतून मिळवलेले पैसे दहशतवाद पसरवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

मीडिया पार्टनर्स एशियाच्या विश्लेषणानुसार, जागतिक स्तरावर, भारत ९०.३ दशलक्षाहून अधिक युजर्ससह ऑनलाइन व्हिडिओ पायरसी मार्केटमध्ये अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर इंडोनेशिया (४७.५ दशलक्ष) आणि फिलीपिन्स (३१.१ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो.

 

‘दहशतवादामागे पैसा आणि पायरसी’

पायरसी केवळ मनोरंजन उद्योगाचेच नाही तर संपूर्ण देशाचे नुकसान करते. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, मे २०२५ मध्ये त्यांच्या नियोजित सिनेमा प्रीमियरच्या एक दिवस आधी अनेक चित्रपट लीक झाले होते.

त्याच वेळी, EY-IAMAI अँटी-पायरसी स्टडी २०२४ म्हणजेच द रॉब रिपोर्टनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून एक मोठा घोटाळा सुरू आहे. रिलीजनंतरच्या नेहमीच्या पायरसीपेक्षा वेगळे असलेले हे सुरुवातीचे लीक भारतीय चित्रपट उद्योगात गंभीर चिंता निर्माण करत आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान 

EY-IAMAI आणि ET च्या खुलाशानुसार, २०२३ मध्ये भारतीय मीडिया उद्योगाला पायरसीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. खेदाची बाब म्हणजे सरकार आणि पोलिसांनी या संदर्भात उचलेली सर्व पाऊले अपुरी पडत आहेत.





Source link