Saturday, July 11, 2026
Home Blog Page 207

गुप्तांगाजवळची त्वचा काळी पडलीये, रंग उजळण्यासाठी क्रीम लावावी का? पाहा डॉक्टर काय म्हणतात..

0
गुप्तांगाजवळची त्वचा काळी पडलीये, रंग उजळण्यासाठी क्रीम लावावी का? पाहा डॉक्टर काय म्हणतात..


Dark Private Part : गोरा असो किंवा सावळा, पुरुष असो किंवा स्त्री यांचे गुप्तांगाजवळील त्वचा ही काळी असते. या काळा त्वतेची अनेक लोकांना लाज वाटते. जोडीदारासमोर जाताना ते मागेपुढे पाहतात. अशावेळी मार्केटमध्येही अनेक प्रकारच्या क्रीम आल्या आहेत, ज्या गुप्तांगाजवळील त्वचा गोरी करण्याचे दावे करतात. पण ही क्रीम गुप्तांगाजवळील त्वचेला लावणे योग्य आहे का? त्यामुळे आरोग्यास कुठला धोका तर नाही? असे प्रश्नही उपस्थितीत होतात. याबद्दल डॉक्टर काय सांगतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी प्राइव्हेट पार्ट जवळची जागा काळी का असते याबद्दल पहिला पाहूयात. 

प्राइव्हेट पार्ट काळं होण्याचं कारण काय?

डॉ. मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या त्यांनी गुप्तांग काळे असण्यामागील कारण सांगितलं आहे. ते म्हणतात की  गुप्तांग काळे असणे म्हणजे तुम्ही स्वत:ची किंवा गुप्तांगाची योग्य स्वच्छता किंवा काळजी घेत नाही.  तुमच्या गुप्तांगाजवळील त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा अनेकदा गडद असते. हे हार्मोन्स, घर्षण आणि नैसर्गिक रंगद्रव्यामुळे घडतं. पण खरी समस्या तेव्हा सुरु होतं ज्यावेळी लहानपणापासूनच, आपल्याला फिल्टर केलेले फोटो, प्रौढ सामग्री आपण पाहतो, ज्यामुळे आपले शरीर कसे दिसावे याचा एक बनावट आदर्श आपल्या डोळ्यासमोर न कळत उभा राहतो. 

प्राइव्हेट पार्ट काळं असणे गैरनाही!

डॉ. व्होरा पुढे म्हणाले, “आपण गोरा जननांगांवर विश्वास ठेवू लागलो आहोत, ही गैरसमज आपल्याला लाज वाटते. बऱ्याच महिला आणि पुरुषांनाही असुरक्षित वाटते. बरेच लोक यामुळे जवळीक टाळतात, अनेकांना काळजी वाटते की त्यांचा जोडीदार त्यांच्या खालच्या नजरेवरून त्यांचा न्याय करेल.”

मार्केटमधील क्रीमचा वापर करावा की नाही?

डॉ. व्होरा यांनी शेवटी स्पष्ट केलंय, “दुर्दैवाने या लाजेवर पैसे खर्च केले गेले आहेत, कंपन्या तुम्हाला त्वचा पांढरी करणारी क्रीम, जननेंद्रियाला पांढरी करणारी उत्पादने विकतात, जी बहुतेकदा अनावश्यक आणि हानिकारक रसायनांनी भरलेली असतात. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण वैद्यकीयदृष्ट्या याची अजिबात गरज नाही. हे संवेदनशील त्वचेला नुकसान करू शकतं. म्हणून समजून घ्या की तुमच्या खाजगी भागांभोवती काळी त्वचा ही दोष नाही आणि ती दुरुस्त करण्याची गरज नाही.”





Source link

पावसाळ्यात मुरुमांपासून मुक्ती हवीय? चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी वापरा ‘या’ प्रभावी आणि नैसर्गिक पद्धती!

0
पावसाळ्यात मुरुमांपासून मुक्ती हवीय? चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी वापरा ‘या’ प्रभावी आणि नैसर्गिक पद्धती!


How To Prevent Pimples In Monsoon: पावसाळा म्हणजे दमट हवामान, वाढलेली आर्द्रता आणि बॅक्टेरियांच्या वाढीस अनुकूल वातावरण. याचमुळे या हंगामात त्वचेच्या समस्या, विशेषतः मुरुमे अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांना ही समस्या अधिक त्रासदायक ठरते. पावसाळ्यातील बदललेले हवामान, चेहऱ्यावरील घाम, तेल, धूळ आणि ओलसरपणा यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण अडकते आणि मुरुमांची उत्पत्ती होते. यावर मात करण्यासाठी या काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांचा वापर करणे उपयुक्त ठरेल.

पावसाळ्यात मुरुमांपासून बचावासाठी हे उपाय करा

1. नेहमीपेक्षा अधिक स्वच्छता
पावसाळ्यात चेहऱ्याची स्वच्छता ही अत्यावश्यक गोष्ट आहे. दिवसातून किमान दोन वेळा पीएच बॅलन्सिंग क्लीन्सर वापरा. जो चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकेल आणि छिद्रे बंद होण्यापासून थांबवेल.

2. एक्सफोलिएशन
आठवड्यातून एक ते दोन वेळा सौम्य एक्सफोलिएटरचा वापर करा. यामुळे मृत पेशी हटून त्वचा श्वास घेऊ लागते. कठोर स्क्रब टाळावे कारण हे त्वचेचे नुकसान करू शकते.

3. आहारात सुधारणा
तळलेले, मसालेदार आणि फास्ट फूड हे पावसाळ्यात मुरुमांना अधिक आमंत्रण देतात. त्याऐवजी ताज्या फळांमध्ये  लिंबू, पपई, काकडी, टोमॅटो यांचा समावेश करा. अँटीऑक्सिडंटयुक्त अन्न त्वचेसाठी लाभदायक ठरते.

4. हायड्रेशन
पावसाळ्यात तहान कमी लागते म्हणून पाणी कमी प्यायले जाते, पण ही सवय त्वचेसाठी घातक ठरते. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. यामुळे टॉक्सिन बाहेर टाकले जातात आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.

5. मेकअप टाळा
पावसाळ्यात मेकअप वापरणे टाळा किंवा हलका मेकअप वापरा. मेकअप करताना ही काळजी घ्या की तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र बंद होणार नाहीत.

6. चेहऱ्याला वारंवार हात लावू नका
पावसाळ्यात आपण अनेकदा बाहेर जातो तेव्हा अनेक सुक्ष्मजीव आपल्या हातांना लागतात. चेहऱ्याला वारंवार हात लावल्याने बॅक्टेरिया त्वचेत प्रवेश करतात आणि मुरुमे होतात.

होममेड फेसपॅक वापरा
1. मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. हा पॅक अँटीबॅक्टेरियल असून मुरुमांवर नियंत्रण ठेवतो.

2. चंदन आणि गुलाबजल एकत्र करुन लावल्याने चेहरा थंड राहतो आणि डाग कमी होतात.

3. बेसन आणि हळद नैसर्गिक क्लिंजर म्हणून उत्तम आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा नक्कीच वापरले पाहिजे. हा पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी एकदा पॅचटेस्ट करणे महत्त्वाचे आहे. 

पावसाळा कितीही सुंदर वाटत असला तरी त्वचेसाठी ही वेळ सावधगिरीची असते. मुरुमांना दूर ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता, योग्य आहार, भरपूर पाणी आणि नैसर्गिक उपाय हेच आपले संरक्षण कवच आहे. त्वचेला आरोग्यदायी ठेवण्यासाठी आजपासूनच हे उपाय अमलात आणा.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)





Source link

20 दिवसांची चिमुकली ICU मध्ये दाखल, डॉक्टर म्हणाले ‘पालकांनी कधीही ही चूक करु नये’

0
20 दिवसांची चिमुकली ICU मध्ये दाखल, डॉक्टर म्हणाले ‘पालकांनी कधीही ही चूक करु नये’


घरात लहान बाळ असलं की आनंदाचं वातावरण असते. पण त्यासोबत त्या चिमुकल्या बाळाचीही तेवढीच काळजीही घ्यावी लागते. बाळाचा जन्म हा पालकांसोबत घरातील अनेक सदस्यांच्या आनंदात भर टाकतो. त्या बाळाला प्रेम करण्यासाठी बघण्यासाठी अनेक लोक येत असतात. पण तुम्हाला माहितीय का हे नुकतच जन्माला आलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते. त्या बाळाला लगेचच संसर्ग होण्याचा धोका असतो. नुकतच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात फक्त 20 दिवसांच्या चिमुकलीला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ आली. या निष्पाप बाळाची प्रकृती अचानक खराब झाली. त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली. 

डॉक्टर पवन मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात या घटनेबद्दल सांगितलं आहे. त्यासोबत प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाची सुचना केली आहे. कारण या निष्पाप बाळाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ तिच्या पालकांच्या चुकीमुळे आली आहे. 

डॉ. पवन मांडवीय सांगितलं की, अलिकडेच एका पालकाने त्यांच्या 20 दिवसांच्या नवजात बाळाला आपत्कालीन कक्षात आणले. बाळाची तपासणी केली असता त्याला सर्दी, खोकला आणि न्यूमोनिया झाल्याचं निष्पण झालं. बाळाची प्रकृती अशी होती की त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. कुटुंबाशी बोलले असता असे आढळून आले की, आपल्या भारतीय समाजात ज्याप्रमाणे बाळाच्या जन्मानंतर नातेवाईक आणि मित्र त्याला पाहिला येतात. त्याचप्रमाणे त्या नवजात बाळाला भेटण्यासाठी अनेक लोक एकत्र आले होते.

डॉ. पवन मांडवीय म्हणतात की, अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा घरात एखादा छोटा पाहुणा येतो तेव्हा नातेवाईक आणि मित्र त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात. या काळात बरेच लोक मुलाला आपल्या मांडीवर घेतात, काहीजण त्याला खायला घालतात आणि अनेक वेळा प्रेमाने गालावर चुंबनही घेतात.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत जर त्यापैकी कोणालाही सर्दी, खोकला, फ्लू किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला तर ते मुलासाठी खूप धोकादायक ठरू शकते. डॉ. पवन स्पष्ट करतात की अशा संसर्गांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती मोठ्या मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये आधीच विकसित झालेली असते, पण नवजात किंवा लहान मुलांमध्ये ती पूर्णपणे विकसित झालेली नसते.

आता अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग झाला असेल आणि तो मुलाच्या जवळ आला किंवा त्याचे चुंबन घेतले तर हा संसर्ग मुलापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मुलामध्ये सर्दी, खोकला किंवा अगदी न्यूमोनिया देखील होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात, ‘मला समजते की आपल्या भारतीय समाजात, जर एखाद्या नातेवाईकाला मुलापासून दूर राहण्यास किंवा त्याचे चुंबन घेऊ नये असे सांगितले तर त्याला वाईट वाटू शकते. पण आपण हे विसरू नये की आपल्या मुलाची सुरक्षितता ही आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे.’

जर एखाद्याला सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला असेल तर त्याने मुलापासून कमीत कमी 6 फूट अंतर राखले पाहिजे. जवळ जाणे आवश्यक असेल तर मास्क घालून जावे. पालकांनी कोणालाही मुलाला किस करू देऊ नये, कारण यामुळे मुलाला विषाणूजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. डॉक्टर पवन म्हणतात की जर घरात एखादा छोटा पाहुणा आला असेल आणि लोक त्याला भेटायला येत असतील तर काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम, जर कोणी मुलाला स्पर्श करणार असेल किंवा खायला घालणार असेल तर त्याने त्याचे हात योग्यरित्या स्वच्छ केले आहेत याची खात्री करा .





Source link

Success Story: 2 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक आणि आज करतोय ₹310000000 ची उलाढाल, काय आहे व्यवसाय?

0
Success Story: 2 लाखांपेक्षा कमी गुंतवणूक आणि आज करतोय ₹310000000 ची उलाढाल, काय आहे व्यवसाय?


Manish Mohta Success Story: उद्योग करावा आणि आयुष्यात यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्यक्षात हे सोपं नसतं. मार्केटची गरज ओळखून उद्योग काय करायचा? हे ठरवता आले पाहिजे. कोणाची मदत घ्यायची? व्यवसाय कसा चालू ठेवायचा याचे प्लानिंग पाहिजे. सुरुवातीला कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. व्यवसाय सुरु झाल्यावरही अनेकदा शुन्यापासून सुरुवात करावी लागू शकते. यासाठी मानसिक तयारी हवी. फार कमीजण हे सर्व टप्पे पूर्ण करतात. मनीष मोहता हे त्यापैकीच एक आहेत. मार्केटची गरज ओळखत कमी गुंतवणूक करुन त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. आज ते यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. आजच्या घडीला लर्निंग स्पायरलची उलाढाल सुमारे 31 कोटी रुपयांची आहे. ही कंपनी भारतीय रेल्वे, ओडिशा पोलीस आणि जामिया मिलिया इस्लामिया सारख्या मोठ्या ग्राहकांना त्यांच्या सेवा पुरवते. लर्निंग स्पायरल परीक्षा सुलभ करण्यासाठी आणि मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी काम करते. मनीष मोहता यांनी हे यश कसं मिळवलं? जाणून घेऊया.

रायपूरचे मनीष मोहता हे लर्निंग स्पायरल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक आहेत. ही एक एड-टेक कंपनी असून माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि एआय वापरून मूल्यांकन उपाय सुचवते. मनीष मोहता यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्या शेवटच्या वर्षात लर्निंग स्पायरल लाँच केले. 2000 मध्ये त्यांनी फक्त 1.85 लाख रुपयांच्या माफक गुंतवणूक करुन व्यवसाय सुरु केला. त्यावेळी 3 मत्र त्यांच्या मदतीला होते. 

कशी सुचली कल्पना?

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात परीक्षा आणि प्रोजेक्ट्स एकाचवेळी मॅनेज करणं खूप कठीण असतात. बहुतांश विद्यार्थ्यांची हीच समस्या असते. 
याच काळात रायपूरचे रहिवासी असलेल्या मनीष मोहता यांना एक कल्पना सुचली. त्यांनी लर्निंग स्पायरल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक एड-टेक कंपनी सुरू केली. त्यांची कंपनी परीक्षा सोप्या करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. ही कंपनी महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित कामात मदत करते. यामध्ये सॉफ्टवेअर बनवणे, पेपर्स प्रिंट करणे आणि योग्य पद्धतीने परीक्षा घेणे यासारख्या कामांचा समावेश आहे.

क्लायंटची मोठी यादी

रायपूर, छत्तीसगड येथे असलेली लर्निंग स्पायरल ही मोहता ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत एक उपकंपनी आहे. ती भारतीय रेल्वे, ओडिशा पोलीस, जामिया मिलिया इस्लामिया आणि पश्चिम बंगाल स्कूल बोर्ड सारख्या प्रतिष्ठित क्लायंटना सेवा पुरवते. लर्निंग स्पायरल देशभरात एंड-टू-एंड परीक्षा सेवा प्रदान करते. यामध्ये सॉफ्टवेअर सोल्यूशन्स, मॅनेज्ड सर्व्हिसेस, आउटसोर्स्ड बिझनेस प्रोसेस, सिक्युरिटी प्रिंटिंग, प्रोक्टरिंग आणि सप्लाय यासारख्या सेवांचा समावेश आहे. ही कंपनी शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबतच रिक्रूटर्स, रिक्रूटमेंट बॉडीज आणि इतर मूल्यांकन बॉडीजना देखील सेवा देते. मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणणे हे लर्निंग स्पायरलचे उद्दिष्ट आहे.

आजच्या घडीला कोटींची उलाढाल

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात मनीष मोहता यांनी त्यांच्या मित्रांसह सुरू केलेल्या लर्निंग स्पायरलची आज 31 कोटी रुपयांची उलाढाल आहे. ही कंपनी परीक्षांशी संबंधित अनेक कामे करते. सॉफ्टवेअर बनवणे, पेपर्स प्रिंट करणे आणि परीक्षा योग्यरित्या घेणे, अशी कामे ही कंपनी करते. मी परीक्षा देत होतो तेव्हा अभ्यास करू शकत नव्हतो. सर्वजण परीक्षांमध्ये व्यस्त होते. 2 सेमिस्टर होते आणि परीक्षेचा वेळ खूप जास्त होता. जवळजवळ 2 महिने फक्त परीक्षांमध्येच जात होते. त्यामुळे अभ्यासासाठी कमी वेळ होता. त्यामुळे मला ही समस्या बदलायची होती, असे मनीष सांगतात.

सुरुवातीला कुटुंबाला शंका

मनीष मोहता यांचा जन्म एका यशस्वी व्यावसायिक कुटुंबातून झाला. कुटुंबाने त्यांच्या स्टार्टअपला पाठिंबा दिला पण त्यांना त्याच्या यशाबद्दल थोडे शंका होती. ते योग्य मार्गावर आहे की नाही याची कुटुंबाला भीती वाटत होती. सुरुवातीला मनीष यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात अडचण यायची. पण हे तंत्रज्ञान आपल्यासाठी फायदेशीर ठरतेय असे लोकांना जाणवले आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. 

पत्नी देते साथ

बनारस हिंदू विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया हे त्यांचे पहिले ग्राहक होते. या विद्यापीठांच्या प्राध्यापकांनीही त्यांना खूप मदत केली. मनीष यांना आता त्यांची कंपनी इतर देशांमध्येही घेऊन जायचीय. पुढील काही वर्षांत त्यांना त्यांची कंपनी आणखी वाढवायचीय. त्यांना दरवर्षी 100% विकास दर मिळवायचाय. मनीष यांना 3 मुले असून ते कुटुंब आणि व्यवसाय यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. पत्नी रंजिता त्यांना घरी आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी साथ देत असल्याचे ते सांगतात.





Source link

जीममध्ये व्यायामाआधी वॉर्म अप करणं महत्त्वाचं का असतं? तरुणीसोबत काय झालं पाहा, थेट ICU त दाखल

0
जीममध्ये व्यायामाआधी वॉर्म अप करणं महत्त्वाचं का असतं? तरुणीसोबत काय झालं पाहा, थेट ICU त दाखल


जीममध्ये अनेकदा तरुण, तरुणी वॉर्म अप न करता थेट व्यायाम करण्यास सुरुवात करतात. पण यामुळे आपण आपल्या शरिराला धोका निर्माण होऊ शकतो. एका महिलेवर अतिदक्षता विभागात दाखल होण्याची वेळ आली आहे. 24 वर्षीय तरुणीला जिममध्ये जास्त काम केल्याने झालेल्या जीवघेण्या आजारामुळे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. या तरुणीला रॅबडोमायोलिसिस झाल्याचं निदान झालं आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये जास्त व्यायाम केल्याने स्नायू मरतात, तुटतात आणि रक्तात विषारी पदार्थांची गळती होते. 

डॉक्टरांच्या मते, रक्तातील विषारी पदार्थांमुळे किडनीचं कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं. मूत्रपिंड निष्क्रिय होण्याचा धोका असतो. जर लवकर उपचार केले नाहीत तर ही जीवघेणी स्थिती आहे. स्पिनिंग ही उच्च-तीव्रतेची इनडोअर सायकलिंग असते जी सहसा मांड्या आणि नितंबांमधील मोठ्या स्नायूंना लक्ष्य करते. कॅलरी बर्न आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी हे खूप लोकप्रिय असले तरी, नव्याने व्यायाम सुरु करणाऱ्यांसाठी धोका निर्माण करणारं असतं. 

“डिहायड्रेशन, फिटनेसचा अभाव आणि क्वाड्रिसेप्सच्या मसल मासमुळे एकत्रितपणे पहिल्या स्पिनिंग सत्रानंतर रॅबडोमायोलिसिस होण्याची शक्यता जास्त असते,” असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. 

फक्त दोन दिवसांत तरुणीला असह्य वेदना

जीम सुरू केल्यानंतर फक्त दोनच दिवसांत महिलेला वरच्या मजल्यावर चढताना त्रास होत होता. तिला तिच्या मांड्यांमध्ये प्रचंड वेदना होत होत्या, ज्या असामान्यपणे तीव्र होत्या असं तिने सांगितलं. तिच्या लघवीचा रंगही बदलला होता. ज्यामुळे काहीतरी गंभीर घडल्याचं कळत होतं. यानंतर ती नंतर रुग्णालयात गेली, जिथे चाचण्यांमध्ये तिच्या क्रिएटिन काइनेजची पातळी – स्नायूंच्या नुकसानाचे चिन्हक – सामान्य मर्यादेपेक्षा 50 पट जास्त असल्याचे दिसून आलं. तिच्या मांड्यांमधील स्नायू पेशी फुटल्या होत्या, ज्यामुळे तिच्या रक्तात मायोग्लोबिनसारखे हानिकारक पदार्थ बाहेर पडले होते. याचा तिच्या मूत्रपिंडांवर गंभीर ताण पडला होता.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तिला ताबडतोब सलाईन लावण्यात आली होती. डॉक्टरांनी तिच्या मूत्रपिंडाच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण केले जेणेकरून ते निकामी होऊ नये. पाच दिवसांच्या उपचारानंतर, तिच्या स्नायूंच्या एंजाइमची पातळी अखेर कमी झाली आणि तिचं मूत्रपिंड चांगल्या पद्धतीने काम करु लागलं. 

व्यायामाआधी वॉर्म अप करणं महत्त्वाचं का असतं?

डॉक्टर सांगतात की, जर तुम्ही नव्याने व्यायाम सुरु करत असाल तर हळूहळू आणि कमी तीव्रतेने करा. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी पुरेसे हायड्रेशन, वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग आणि नंतर कूल-डाऊनसह प्रशिक्षण सुरू करा.

व्यायामापूर्वी वॉर्म अप करणं अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यामुळे शरिराला पुढील हालचालींची तयार करतं. तसंच दुखापतीचा धोका कमी होते आणि कार्यक्षमता सुधारते. ते रक्त प्रवाह, शरीराचे तापमान वाढवते णि लवचिकता वाढवतं, ज्यामुळे तुमचे स्नायू अधिक लवचिक आणि परिश्रमासाठी तयार होतात.





Source link

500 च्या नोटा चलनातून काढून टाका! जाहीर सभेत मोदींच्या निकटवर्तीय CM ची मागणी; म्हणाले, ‘देशात…’

0
500 च्या नोटा चलनातून काढून टाका! जाहीर सभेत मोदींच्या निकटवर्तीय CM ची मागणी; म्हणाले, ‘देशात…’


Ban Rs 500 Notes: सध्या चलनात असलेल्या उच्च मूल्याच्या नोटा चलनामधून काढून टाकाव्यात अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. राजकीय तसेच दैनंदिन आयुष्यातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी डिजीटल करन्सीचा विचार गांभीर्याने केला पाहिजे असंही चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच तेलगु देसम पार्टीच्या महानाडू या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

मोदींना सल्ला दिल्याचा उल्लेख

कडपा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना नायडू यांनी 2016 साली नोटबंदीदरम्यान 500 आणि एक हजाराच्या नोटा चलनामधून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आपण पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिल्याचंही सांगितलं. देशामध्ये डिजिटल करन्सी सुरु करावी असं आपण त्याचवेळी पंतप्रधान मोदींना सुचवलं होतं असं नायडू म्हणाले. 

अहवाल केलेला सादर

2016 मध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगु देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू हे त्यावेळी निती आयोगाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ, भागिदार आणि मुख्यमंत्र्यांच्या समितीचे प्रमुख होते. चलनी नोटा नसलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा तातडीने पुन्हा रुळावर कसा आणावा यासंदर्भातील सल्ला देण्याचं काम या समितीवर सोपवण्यात आलं होतं. “आम्ही आमचा अहवाल सादर केल्यानंतर मी पंतप्रधान मोदींनी 2 हजाराच्या आणि 500 च्या नाव्या नोटा चलनात आणल्यानंतर उच्च मूल्य असणाऱ्या नोटांवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. डिजिटल करन्सी चलनात आणावी. त्यामुळे बेकायदेशीर व्यवहार आणि भ्रष्टाचार सहज समोर आणता येईल, असा सल्ला मी दिलेला,” असं नायडू म्हणाले.

भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईत कोणतीही तडजोड नाही

लोकांची खरंच सेवा करायची असेल तर कारभार स्वच्छ हवा, असं सांगतानाच नायडू यांनी उच्च मूल्याच्या नोटांवर बंदी घालणं आवश्यक असल्याचं म्हटलं. असं केलं तरच भ्रष्टाचार संपवता येईल असा युक्तीवाद त्यांनी केला. “आज या मंचावरुन मी पुन्हा त्याच मागणीचा उल्लेख करतो. आता आपल्याकडे डिजिटल चलन आहे तर आपल्याला 500, एक हजार आणि दोन हजारांच्या नोटांची गरज नाही. चलनी नोटांचं वाटप करताना राजकारण होता कामा नये,” असंही नायडू यावेळी म्हणाले. माझ्या या मागणीला पाठिंबा असेल तर टाळ्या वाजून तुमचा पाठिंबा द्या, असं नायडू उपस्थितांना म्हणाला. समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट केल्यानंतर त्यांनी, “आपल्या देशातून भ्रष्टाचार संपवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आम्ही यावर नक्कीच काम करु,” असं म्हटलं. तसेच भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईत मी किंवा माझा पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही, असंही नायडू यावेळी म्हणाले.

मोदींची साथ सोडून पुन्हा मोदींबरोबरच

नायडू यांनी एनडीएमधून मार्च 2018 मध्ये एक्झिट घेतली होती. 2024 मध्ये ते पुन्हा एनडीएसोबत आले. आरबीआयने 2023 साली मे महिन्यामध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा हद्दपार केल्या जात असल्याचं जाहीर केलं होतं.





Source link

“मी हार मानणारा नाही! तुमचं नवं नेतृत्व उपयोगाचं नाही” – रामराजे नाईक निंबाळकरांचा थेट इशारा

0
“मी हार मानणारा नाही! तुमचं नवं नेतृत्व उपयोगाचं नाही” – रामराजे नाईक निंबाळकरांचा थेट इशारा

कुरवली (फलटण) | “मी हार मानणारा माणूस नाही. मी आता पुन्हा एकदा तालुक्यात फिरणार आहे. जनतेला विचारणार आहे की, आमचं काय चुकलं? चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नव्या नेतृत्वाचा फायदा या तालुक्याला होणार नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट विरोधकांना इशारा दिला.

ते फलटण तालुक्यातील कुरवली येथील बाणगंगा धरण पाणीपूजन कार्यक्रमात बोलत होते. आपल्याच रोखठोक शैलीत त्यांनी स्पष्ट केलं की, “मी कुठलंही राजकारण न करता लोकांशी संवाद साधणार आहे. आमचं ढीग चुकलं असेल, पण ज्यांचं नेतृत्व आज तयार होतंय, त्यांच्यामुळे तुमचं आणि पुढच्या पिढ्यांचं नुकसान होणार आहे, हे तुम्हीही जाणताय.”

💬 “सगळं मिळालं फुकटात, किंमतच राहिली नाही!

रामराजे म्हणाले, “आमच्यातील काही लोक निघून गेले. सगळं सहज मिळालं की, त्याची किंमत राहत नाही हे उशिरा समजतं. पण आम्ही कुणाकडे राजकीय किंमत मागितली नाही. आमच्यावर पिढ्यानपिढ्या संस्कार आहेत की संधी मिळाली की काम करायचं.”

“माझ्या तोंडात ‘मसाकार’ हा शब्द कमीच असतो. माझे आजोबा जनतेला ‘जनता’ म्हणून पाहायचे. मतांचा अधिकार दिला गेला. मी राजा आहे की नाही, हा मुद्दा वादाचा असू शकतो. पण मी सर्व काही बघतो. विरोधक म्हणतात आम्ही केलं नाही, पण त्यांचं 90 टक्के काम आमच्या पायावर उभं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

तालुक्याची घडी कोसळू देणार नाही!

“फेब्रुवारी-मार्चमध्ये काही अडचणी आल्या. त्यामुळे मी थोडा मागे बसलो. पण आता मी स्वतः मैदानात उतरणार आहे. माझ्या वयाचे कार्यकर्ते थकले आहेत, म्हणूनच मला पुढे यावं लागणार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

“आम्ही शून्यातून राजकारण उभं केलं. आज जी व्यवस्था दिसते, ती कोणीतरी दुसऱ्याने उभी केली, असं मानणं मूर्खपणाचं आहे. तालुक्याची बसवलेली घडी कोसळू देणार नाही,” अशा शब्दांत रामराजेंनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

नैसर्गिक उपचार आणि समग्र काळजीसाठी लोक पतंजली वेलनेस सेंटर का निवडतात?

0
नैसर्गिक उपचार आणि समग्र काळजीसाठी लोक पतंजली वेलनेस सेंटर का निवडतात?


आजच्या धावपळीच्या जीवनात, प्रत्येकजण ताणतणाव आणि दबावाने वेढलेला आहे. अशा परिस्थितीत, लोक आता त्यांचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धती आणि प्राचीन उपचारांकडे वळत आहेत. भारतात अशी अनेक वेलनेस सेंटर्स असली तरी, नैसर्गिक आणि संपूर्ण आरोग्य सेवा हव्या असलेल्यांसाठी पतंजली वेलनेस सेंटर एक विश्वासार्ह ठिकाण बनले आहे.

येथे केले जाणारे उपचार प्राचीन भारतीय पद्धतींवर आधारित आहेत, परंतु आधुनिक संशोधनाशी देखील जोडलेले आहेत. आयुर्वेद, योग, नैसर्गिक उपचार आणि इतर पारंपारिक पद्धती एकत्र करून, ही केंद्रे शरीर, मन आणि आत्म्याची काळजी घेतात. तर मग जाणून घ्या की लोक नैसर्गिक उपचार आणि समग्र काळजीसाठी पतंजली

वेलनेस सेंटर का निवडतात?

केवळ रोग बरा करत नाही तर एक चांगली जीवनशैली निर्माण करते. पतंजली वेलनेस सेंटर आरोग्याला केवळ रोगाशी संबंधित गोष्ट मानत नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याकडे विशेष लक्ष देते. त्यांचा असा विश्वास आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या शांत, स्पष्ट विचार करणारी आणि आतून जोडलेली असते तेव्हाच खरे आरोग्य असते. या विचारसरणीने येथे उपचार केले जातात. हे लोक औषधांवर किंवा ऑपरेशन्सवर जास्त अवलंबून नसतात, तर अशा नैसर्गिक पद्धतींनी उपचार करतात ज्यामुळे शरीर स्वतःला बरे होण्यास मदत होते.

यासोबतच, येथील उपचारपद्धती आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचारांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची समस्या, शरीराचे स्वरूप, त्याची जीवनशैली आणि निवड लक्षात घेऊन वैयक्तिक उपचार केले जातात. आणि थोड्याच वेळात लोकांना बरे वाटू लागते की त्यांच्या शरीरातील घाण काढून टाकली जाते, शरीरात नवीन ऊर्जा प्रसारित होते.

पतंजली वेलनेस सेंटर निवडण्याची कारणे

लोकांना पतंजली वेलनेस सेंटर आवडते आणि ते निवडण्याची अनेक कारणे आहेत, कारण ते विश्वसनीय आहे आणि येथील उपचारपद्धती पूर्णपणे नैसर्गिक आहेत. पतंजलीची सुरुवात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी केली होती आणि आज पतंजली भारतातील शीर्ष प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक बनली आहे. कंपनीचे दृष्टिकोन खूप स्पष्ट आहे. प्राचीन भारतीय ज्ञान सर्वांना परवडणाऱ्या आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे. गेल्या काही वर्षांत, लाखो लोकांनी त्यांच्या उत्पादनांचा आणि उपचारांचा फायदा घेतला आहे, ज्यामुळे लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे.

त्यांची वेलनेस सेंटर देखील खूप खास आहेत. ते हिरवळीने वेढलेले आहेत आणि खूप शांत वातावरण प्रदान करतात. जिथे लोक शहराच्या गर्दीपासून दूर त्यांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करू शकतात. येथील डिझाइन, जेवण आणि उपचार हे सर्व अशा प्रकारे डिझाइन केले आहे की ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आजारानुसार वैयक्तिक काळजी मिळते. एखाद्याला मधुमेह, रक्तदाब किंवा ताण यासारखे सामान्य जीवनशैलीचे आजार असोत किंवा संधिवात आणि पोटाच्या समस्या यासारख्या गंभीर समस्या असोत, येथे प्रत्येकासाठी एक वेगळी उपचार योजना बनवली जाते. त्यात आयुर्वेदिक औषधे, योग सत्रे, पंचकर्म, आहारातील बदल आणि पसंतीच्या इतर गोष्टींचा समावेश आहे. जेणेकरून उपचार पूर्णपणे कार्य करतील.





Source link

सकाळी उठताच टॉयलेटमध्ये ‘ही’ लक्षणे दिसली तर समजा लिवर सडतंय? अजिबात इग्नोर करु नका?

0
सकाळी उठताच टॉयलेटमध्ये ‘ही’ लक्षणे दिसली तर समजा लिवर सडतंय? अजिबात इग्नोर करु नका?


Liver Damage Symptoms in Marathi: आजच्या प्रदूषित वातावरण, अनियमित जीवनशैली आणि भेसळयुक्त अन्नामुळे यकृतावर सर्वात जास्त दबाव असतो. यकृत शरीरातील विषारी घटक काढून टाकण्याचे काम करते, परंतु जेव्हा आपण जंक फूड, अल्कोहोल, धूम्रपान आणि ड्रग्जचे जास्त सेवन करतो तेव्हा हा अवयव हळूहळू कमकुवत होऊ लागतो. याशिवाय प्रदूषित हवा आणि पाण्यात असलेले रसायने देखील यकृताचे नुकसान करतात. जर यकृताची वेळीच काळजी घेतली नाही तर ते सिरोसिस, फॅटी लिव्हर आणि हेपेटायटीससारखे गंभीर आजार होऊ शकते. तथापि, जेव्हा यकृत हळूहळू खराब होऊ लागते तेव्हा शरीर काही संकेत देऊ लागते. विशेषतः, सकाळी आतड्यांदरम्यान काही लक्षणे दिसतात, जी यकृताच्या नुकसानाकडे निर्देश करू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते, म्हणून चला त्याबद्दल जाणून घेऊया.

विष्ठेचा रंग
जर सकाळी विष्ठेचा रंग सामान्य तपकिरी रंगापेक्षा खूपच हलका, पिवळा किंवा पांढरा असेल, तर ते यकृत पित्त (पित्त रस) तयार करत नसल्याचे किंवा आतड्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे लक्षण असू शकते. हे यकृत निकामी होण्याचे किंवा पित्त नलिकेत अडथळा येण्याचे लक्षण असू शकते. म्हणून, विष्ठेच्या रंगात कोणताही बदल झाल्यास दुर्लक्ष करू नये.

तेलकट आणि दुर्गंधीयुक्त विष्ठा
जर तुम्हाला तुमचा विष्ठा अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि स्निग्ध वाटत असेल, जो पाण्यात तरंगत राहतो, तर तो चरबी पचनातील अडथळ्याचे लक्षण आहे. याचे कारण यकृताची कार्यक्षमता कमी होणे असू शकते. जे वेळेवर ओळखून टाळता येते. ज्या लोकांना विष्ठेमध्ये असामान्य वास येतो त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये.

मलमध्ये रक्त
जर मलमध्ये रक्त असेल किंवा त्याचा रंग गडद काळा असेल तर ते यकृत सिरोसिस किंवा आतड्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ब्लीडिंग) चे गंभीर लक्षण असू शकते. ही स्थिती धोकादायक आहे आणि त्यासाठी त्वरित वैद्यकीय तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत, अन्यथा ते घातक ठरू शकते.

वारंवार अतिसार आणि पोटदुखी
सकाळी सतत पोटात पेटके येणे, गॅस, अतिसार किंवा अस्वस्थता हे यकृताच्या जळजळ किंवा हिपॅटायटीससारख्या संसर्गाचे लक्षण असू शकते. ही समस्या पचन प्रक्रियेवर परिणाम करते आणि यकृताची कार्यक्षमता कमकुवत करते, म्हणून वेळेवर तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत.

खबरदारी घेणे महत्वाचे
जर ही लक्षणे वारंवार दिसून येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यकृताचे नुकसान हळूहळू होते आणि वेळेवर उपचार न केल्यास हा अवयव पूर्णपणे खराब होऊ शकतो. वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हे तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम संरक्षण आहे.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

फलटण तालुक्याची घडी विस्कटून देणार नाही, मी हार मानणारा माणूस नाही: रामराजे नाईक निंबाळकर

0


Ramraje Naik Satara Speech: मी हार मानणारा माणूस नाही. मी आता तालुक्यात फिरुन जनतेशी संवाद साधणार आहे. आमचं काय चुकलं आहे, हे जनतेला विचारणार आहे. आमच्या ढीग चुका झाल्या असतील पण नवे नेतृत्व तालुक्यासाठी लाभकारक नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केले. ते फलटण तालुक्यातील कुरवली येथे बानगंगा धरण पाणी पूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत विरोधकांना इशारा दिला. 

आम्ही शुन्यातून राजकारण निर्माण केलं आहे. कोण होतं आपल्याकडे, एक माणूस नव्हता. इथल्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं आहे. माझ्या वयाचे कार्यकर्ते आता थकले आहेत. त्यामुळे आता काही ना काही कारणाने मी बाहेर पडणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अडचणी तयार झाल्या, त्यामुळे मी अडकून बसलो.  मी फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न करता लोकांना भेटून जाणून घेईन, आमचं काय चुकलंय आणि त्या चुका दुरुस्त करतो. आमचं ढीग चुकलं असेल, पण तुमच्यापुढे आज जे नेतृत्व तयार होतंय, ते नेतृत्व तुम्हाला आणि तुमच्य पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. तुम्हाला याचा अनुभव येत असेल. त्यामुळे तालुक्याची बसवलेली घडी कोणाला विस्कटू देणार नाही, असा देखील इशारा रामराजे यांनी आपल्या भाषणामध्ये दिला आहे.

Satara News: तुम्ही जे केलंय त्याचा 90 टक्के पाया आम्ही रचलाय: रामराजे नाईक निंबाळकर

आमच्यातील काही लोक सोडून गेले. सगळं सोप्या पद्धतीने होत गेलं की, त्याची किंमत राहत नाही, हे कळायला उशीर झाला. मी राजकीय किंमत मागण्यासाठी काम केलं नाही. माझ्यावर  पिढ्यानुपिढ्या हे संस्कार झाले आहेत की, संधी मिळाली की जनतेसाठी काम करायचे. माझ्या तोंडात ‘मसाकार’ हा शब्द कमी असतो. माझ्या आजोबांनी तुमच्याकडे जनता म्हणून पाहिलं. तुम्हाला मतांचा हक्क मिळाला असेल. मी राजा आहे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे, ते मला माहिती नाही. मी मीडियात जास्त दिसत नाही. पण मी सगळं बघत असतो. आम्हाला उत्तर देणारे बोलतात की, आम्ही हे केलं नाही, ते केलं नाही. पण तुम्ही जे केलंय त्याचा 90 टक्के पाया आम्ही घातलाय, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना सुनावले.

आणखी वाचा

रामराजे निंबाळकरांना त्रास देण्याचा प्रयत्न, पण सत्ता ही सदासर्वकाळ…; रोहित पवारांचा जयकुमार गोरेंवर संताप

अधिक पाहा..



Source link