Thursday, July 9, 2026
Home Blog Page 183

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू! प्रारूप प्रभागरचना १४ जुलैपासून जनतेसाठी उपलब्ध

0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू! प्रारूप प्रभागरचना १४ जुलैपासून जनतेसाठी उपलब्ध

सातारा : राज्य शासनाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा-२ दिनांक १२ जून २०२५ अन्वये प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या आदेशानुसार, सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे ती सर्वसामान्य नागरिकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर प्रारूप प्रभागरचनेविषयी नागरिकांना काही हरकत, सूचना किंवा सुधारणा करावयाची असल्यास संबंधित तहसीलदार कार्यालयात दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत सकारण लेखी निवेदन सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. त्या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती वा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता, आता तरी सुधरा, जयकुमार गोरेंचा रामराजेंवर हल्लाबोल

0


Jayakumar Gore on Ramraje Naik Nimbalkar :  गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) हे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येत आहे. आजही फलटणमध्यो बोलताना गोरेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला. 
देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधरा, नीट वागा असे म्हणज जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली.  

फलटण येथील मेळाव्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. “असत्य, कटकारस्थानाचा आनंद तात्पुरता असतो. शकुनी मामांनी कटकारस्थानातून दुर्योधनाच्या अंताचा आसुरी आनंद घेतला. तशाच प्रकारचा असुरी आनंद जयकुमार गोरे, रणजितसिंह तसेच गाळेधारकांवर अन्याय करत असताना ते आसुरी आनंद घेत होते. मात्र त्यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहित असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. 

मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात 

परमेश्वराच्या रुपाने आपणाला देवेंद्र पावले. मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात असेही जयकुमार गोरे म्हणाले. त्याची जाणीव ठेवा. आता तरी सुधरा, नीट वागा. चुकीचं वागलात तर ते तुम्हालाच फेडावे लागणार आहे हे ही ध्यानात ठेवा अशी टीका जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केली.

कटकारस्थान जास्त दिवस टिकत नाहीत

कटकारस्थान जास्त दिवस टिकत नाहीत. हा आनंद जास्त दिवस नसतो, तात्काळ असतो असे जयकुमार गोरे म्हणाले. माझ्यावर 29 केसेस झाल्या तरी मान कधी वाकवली नाही. कोणाच्या दारात कधी गेला नाही असे गोरे म्हणाले. रामराजे नाईक निंबाशकर यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहित असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. तुमच्या दारासमोर पोलीस उभा राहिल्याचे देखील गोरे म्हणाले. जयकुमार गोरे हे फलटणमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधरा अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, आता जयकुमार गोरे यांच्या या टीकेला रामराजे नाईक निंबाळकर काही उत्तर देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

तुमच्यात दम असेल तर मैदानात या, नाव न घेता जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर हल्लाबोल 

 

आणखी वाचा



Source link

रिकाम्या पोटी पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ, युरिक ऍसिड आपोआप होईल गायब? कसं ते पाहा

0
रिकाम्या पोटी पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ, युरिक ऍसिड आपोआप होईल गायब? कसं ते पाहा


युरिक अ‍ॅसिड वाढल्याने शरीरात सांधेदुखी, सूज आणि संधिवात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. आजकाल युरिक अ‍ॅसिडची समस्या खूप वेगाने वाढत आहे, विशेषतः जे जास्त प्रथिने, लाल मांस किंवा अल्कोहोलचे सेवन करतात त्यांच्यामध्ये. युरिक अ‍ॅसिडची समस्या आजकाल झपाट्याने वाढत आहे. विशेषतः वयाच्या ३० व्या वर्षानंतर हा त्रास जाणवतो. सहसा लोक त्यावर उपचार करण्यासाठी औषधांचा अवलंब करतात, परंतु आयुर्वेदात आणि घरगुती उपायांमध्ये असे काही उपाय आहेत जे खूप प्रभावी मानले जातात.

Add Zee News as a Preferred Source

हाय युरिक अ‍ॅसिड एका अतिशय सोप्या घरगुती उपायाने नियंत्रित करता येते? आयुर्वेदिक आणि पोषण तज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी एका खास गोष्टीत कोमट पाण्यात मिसळून पिल्याने युरिक अ‍ॅसिड हळूहळू कमी होऊ लागते. हा उपाय केवळ सुरक्षितच नाही तर शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करतो.  नैसर्गिकरित्या युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्याचा हा प्रभावी मार्ग कोणता आहे आणि त्याचा फायदा कसा मिळवायचा.

आज आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे “अ‍ॅपल व्हिनेगर” म्हणजेच अ‍ॅपल सायडर व्हिनेगर. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मिसळून ते प्यायले तर ते नैसर्गिकरित्या युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर कसे काम करते?

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर शरीरात असलेल्या आम्लाचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यात असलेले अ‍ॅसिटिक अॅसिड आणि इतर एन्झाईम्स चयापचय सुधारतात आणि मूत्रपिंडांना युरिक अॅसिड बाहेर टाकण्यास मदत करतात. याशिवाय, ते शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे युरिक अॅसिडचे संचय कमी होते.

कसे वापरावे?

एक ग्लास कोमट पाण्यात १ ते २ चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा.

सकाळी लवकर रिकाम्या पोटी ते प्या.

चांगल्या परिणामांसाठी, ते दररोज किमान २-३ आठवडे वापरा.

 

काय काळजी घ्याल?

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आम्लयुक्त आहे, म्हणून ते नेहमी पाण्यात मिसळून सेवन करा.

जर तुम्हाला आम्लता, अल्सर किंवा पोटाची गंभीर समस्या असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांच्या मुलामा चढवणे खराब होऊ शकते, म्हणून ते स्ट्रॉमधून पिणे चांगले.

जर तुम्हाला औषधांशिवाय युरिक ऍसिड नियंत्रित करायचे असेल तर हा एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय असू शकतो. जरी हा चमत्कारिक उपचार नसला तरी, जीवनशैलीत सुधारणा आणि नियमिततेसह त्याचे सेवन केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

गाळेधारकांना मिळाला न्यायाचा विश्वास, मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गाळेधारकांचा भाजपात जाहीर प्रवेश

0
गाळेधारकांना मिळाला न्यायाचा विश्वास, मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गाळेधारकांचा भाजपात जाहीर प्रवेश

फलटण (प्रतिनिधी) : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळेधारकांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमारजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गाळेधारकांनी आपल्या अडचणी मांडत स्पष्ट व ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर मंत्री गोरे यांनी गाळेधारकांच्या न्याय्य मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या विश्वासदायक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीतील सर्व व्यापारी गाळेधारकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून भाजपाच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव (विकास) शिंदे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कोणताही बेशिस्त माफ नाही! टायरात घालायचा आदेश; अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा”

0
“कोणताही बेशिस्त माफ नाही! टायरात घालायचा आदेश; अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा”

बारामती | प्रतिनिधी :- माझं काम जनतेसाठी, पण बेशिस्त वागणाऱ्यांना माफ नाही! – असे ठणकावून सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कार्यक्रमात उपस्थितांना चांगलाच इशारा दिला.

सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बारामतीला ‘मेडिकल हब’ बनवण्यासाठी सुरू असलेल्या आरोग्य प्रकल्पांची माहिती देतानाच त्यांनी बेशिस्तपणाविरोधात कठोर भूमिका घेतली.

“कधी काहीजण नियम तोडतात, रस्त्यावर कचरा टाकतात, जनावरे मोकळी फिरवतात, रॉंग साईडने गाडी चालवतात… मग त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग तो कोणीही असो – अगदी माझा नातेवाईक का असेना, त्यालाही टायरात घाला,” असा स्पष्ट दम त्यांनी दिला.

अजित पवार पुढे म्हणाले की, “माझी गाडी वळवून मी पोलिसांना सांगतो की त्याच्या गाडीवर कारवाई करा. जर कोणी चुकीचे वागले तर त्याला त्याच्या दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत.”

तसंच, बारामतीत झाडे लावली तरी जनावरे त्यावर ताव मारतात, असा अनुभव सांगत त्यांनी जनावरांच्या मालकांनाही इशारा दिला – “जनावरे मोकळी फिरणार नाहीत, नाहीतर मालकांवरच गुन्हे दाखल करू.”

आई-वडिलांचा सन्मान करण्याबाबतही त्यांनी आजच्या तरुण पिढीला संदेश दिला. “आई-वडिलांचे ऋण विसरू नका. तुम्ही त्यांच्यामुळेच आहात. त्यांच्या त्यागाचा विसर नको,” असं भावनिक आवाहन त्यांनी केलं.

बारामतीमध्ये वैद्यकीय क्षेत्रात मोठी गुंतवणूक

पवार यांनी सांगितलं की, बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलसह आयुर्वेदिक कॉलेज उभारणी सुरू आहे. बस स्थानक, वर्कशॉप, आरोग्य सेवा यामधून बारामतीचा चेहरामोहरा बदलणार आहे.

शिवरायांचे दुर्ग जागतिक पातळीवर! युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ले

0
शिवरायांचे दुर्ग जागतिक पातळीवर! युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ले

साहस Times | मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले महाराष्ट्रातील 12 किल्ले अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या यादीत रायगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळा, शिवनेरी अशा ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश असून, तामिळनाडूतील जिंजी किल्लाही या यादीत स्थान पटकावतो.

युनेस्कोच्या यादीत समावेश झालेल्या किल्ल्यांमध्ये सतराव्या शतकातील मराठा लष्करी स्थापत्य, अभेद्य तटबंदी आणि ऐतिहासिक महत्त्वाचा ठसा उमटलेला आहे. भारत सरकारने 2023 मध्ये यासाठी युनेस्कोसमोर प्रस्ताव मांडला होता आणि आता तो मान्य झाला आहे.

जागतिक वारसा यादीतील 12 किल्ले पुढीलप्रमाणे :

  • रायगड
  • राजगड
  • प्रतापगड
  • पन्हाळा
  • शिवनेरी
  • लोहगड
  • साल्हेर
  • सिंधुदुर्ग
  • विजयदुर्ग
  • सुवर्णदुर्ग
  • खांदेरी
  • जिंजी (तामिळनाडू)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे हे ऐतिहासिक दुर्ग जागतिक स्तरावर सन्मानित होणे हे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे.” या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष योगदान असून, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांचेही सहकार्य लाभले, असेही त्यांनी नमूद केले.

भारतामध्ये युनेस्कोच्या यादीतील वारसा स्थळांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. यामध्ये आधीच अजिंठा, वेरूळ, एलिफंटा लेणी, मुंबईचा व्हिक्टोरियन आर्ट डेको परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांचा समावेश आहे.

खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगुलाची आत्महत्या; घरच्यांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय?

0
खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगुलाची आत्महत्या; घरच्यांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय?

पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा एका हृदयद्रावक घटनेने हादरले आहे. खडकवासला धरणाजवळील जंगलात एका अल्पवयीन मुली आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन ते तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या या युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही घटना गुरुवारी (ता. 10 जुलै) रात्रीच्या सुमारास घडली असून, शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास ही बाब उघडकीस आली. मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमसंबंधांना विरोध केला असल्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रकरणाची माहिती अशी की, 16 वर्षीय अक्षरा हिला तिच्या बहिणीने क्लाससाठी 93 अव्हेन्यूजवळ सोडले होते. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत आली नाही. तिचा शोध घेतल्यानंतर ती न सापडल्याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयित संतोष कळसाईत या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद आढळला.

दरम्यान, उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला बॅक वॉटरजवळील जंगलात एक तरुण आणि तरुणीचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी हे वृत्त तातडीने वानवडी पोलिसांना कळवले. ओळख पटवल्यानंतर समोर आले की मृत दोघेही प्रेमसंबंधात होते.

विशेष म्हणजे मृत तरुणाचा मृतदेह पाहताना त्याची जीभ बाहेर आलेली होती, ज्यामुळे या प्रकरणात घातपाताची शक्यताही वर्तवली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकी कारणमीमांसा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ही घटना फक्त एका प्रेमप्रकरणाचा शेवट नाही, तर समाजात अजूनही प्रेम, विशेषतः अल्पवयीन मुला-मुलींमध्ये घरच्यांकडून मिळणाऱ्या विरोधामुळे किती टोकाची पावलं उचलली जातात, याचे एक भयावह उदाहरण आहे.

‘love Bite’ मुळे स्ट्रोकचा धोका! Hickey संदर्भात डॉक्टरांचा गंभीर इशारा

0
‘love Bite’ मुळे स्ट्रोकचा धोका! Hickey संदर्भात डॉक्टरांचा गंभीर इशारा


Hickey or love Bite : प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर भावना असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकार असतात. प्रेमाची भावना आणि शारीरिक जवळीची सुरुवात अनेक जोडपी ही लव्ह बाईट किंवा हिकीने करतात. खास करुन मानेवर दिलेले जाणारे हे लव्ह बाईट अनेक जोडपी लपवतात. ही शरीरावरील थोडी दुखणारी पण हवी हवीशी अशी खूण जेव्हा भावना शब्दांच्या पलीकडे जातात त्या क्षणाची एक गोड आठवण असते. प्रेमात ही जोडी एकमेकांना देणारे हे लव्ह बाईट तुम्हाला सामान्य आणि प्रेमाचं प्रतीक वाटत असेल, पण त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. 

Add Zee News as a Preferred Source

हो, लव्ह बाईटमध्ये रक्त गोठणे, त्वचा निळी पडणे आणि सूज येणे यासारख्या समस्यांशिवाय, तुम्हाला काही गंभीर समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकतं. एवढंच नाही तर या समस्यांमध्ये स्ट्रोक देखील येण्याची दाट शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. लव्ह बाईट किंवा हिकीमुळे होणाऱ्या धोक्यांबद्दल प्रत्येकाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. 

हिकी, ज्याला लव्ह बाईट असेही म्हणतात, तुमच्या त्वचेवर एक खोल लाल किंवा जांभळा रंगाचा डाग असतो जो 20 किंवा 30 सेकंदांपर्यंत त्वचेला चोखल्याने किंवा चावल्याने येतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर, हिकीनंतर शरीरावर उठलेला डाग रक्त गोठण्यामुळे असतो. खरं तर, जेव्हा तुमचा जोडीदार तुमची त्वचा वेगाने चोखतो किंवा चावतो तेव्हा पृष्ठभागाखालील लहान रक्तवाहिन्या दाबामुळे तुटतात. या तुटलेल्या रक्तवाहिन्यांमधून पेटेचिया नावाचे रक्ताचे छोटे ठिपके पडतात जे शरीरावर दिसतात. ते लाल, निळे किंवा जांभळे रंगाचे दिसतात. वैद्यकीय भाषेत याला हिकीला असं देण्यात आलं आहे. 

एकायमोसिस
एरिथेमा
रक्ताबुर्द
पुरपुरा
पेटीचिया

हिकीमुळे या 3 गंभीर आजाराची भीती

1. रक्त गोठणे 

लव्ह बाईटदरम्यान तुटलेल्या रक्तवाहिन्यांमधून गोळा केलेले रक्त गोठू शकतं आणि नसांना अडथळा आणू शकतो.

2. स्ट्रोकचा धोका

डॉक्टरांच्या मते, मानेवर जास्त दाब पडल्याने धमन्यांचे नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

3. त्वचेवर दीर्घकाळ सूज आणि चट्टे

काही प्रकरणांमध्ये, हिकी झाल्यानंतर त्वचेवर सूज, वेदना आणि खोल खुणा बराच काळ टिकून राहू शकतात.

काही घटनांवर नजर टाकूयात 2011 मध्ये , न्यूझीलंडमधील एका महिलेला हिकीनंतर अर्धांगवायू झाला. आपत्कालीन डॉक्टरांना तिच्या मेंदूत रक्ताची गुठळी आढळली आणि तिला स्ट्रोक असल्याचे निदान झाले. दरम्यान, डेन्मार्कमधील एका 34 वर्षीय महिलेला हिकीनंतर 12 तासांनी स्ट्रोक आला आणि तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला अशक्तपणा आला.

वेबमेडच्या मते, हिकीमुळे स्ट्रोक येण्यासाठी अतिशय असामान्य परिस्थिती आवश्यक असते. कारण कॅरोटिड नावाची एक मोठी धमनी तुमच्या मानेच्या दोन्ही बाजूंमधून जाते. ती तुमच्या मेंदू, चेहरा आणि मानेला रक्तपुरवठा करते. हिकी दरम्यान कॅरोटिड धमनीवर जास्त दबाव टाकला तर त्यामुळे रक्ताची गुठळी होऊ शकते किंवा आधीच असलेली गुठळी जागेवरून हलू शकते आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. न्यूझीलंड आणि डेन्मार्कमधील महिलांना आधीच धमनी समस्या असू शकतात, ज्यामुळे त्यांना स्ट्रोकचा धोका जास्त असू शकतो. 

बंगळुरूमधील स्पर्श रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितीन कुमार एन म्हणतात की, लव्ह बाईटला सामान्यतः हलक्यात घेतल्या जातं पण अलिकडच्या काळात काही गुंतागुंतीच्या केसेस दिसून आल्या आहेत. विशेषतः मानेसारख्या संवेदनशील भागावर तीव्र दाब, नसांवर परिणाम करू शकतो. 

विशेष काळजी घ्या!

जर एखादी व्यक्ती रक्त पातळ करणारी औषधे घेत असेल, तर त्याने विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे. जर लव्ह बाईटची खूण ही 10-12 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिले किंवा सूज/वेदना होत असतील, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

फॅटी लिवर, किडनीच्या समस्येवर ५ रुपयाचं औषध ठरणार रामबाण उपाय, डॉक्टरांनी सांगितले २ उपाय

0
फॅटी लिवर, किडनीच्या समस्येवर ५ रुपयाचं औषध ठरणार रामबाण उपाय, डॉक्टरांनी सांगितले २ उपाय


हल्ली यकृत आणि किडनीच्या समस्यांमुळे खूप त्रस्त आहेत. फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी लोकांना खूप औषधे आणि संयम घ्यावा लागतो. पण तरीही काही लोकांना फायदा होत नाही. दुसरीकडे, किडनीची समस्या खूप गंभीर आहे, एकदा ती झाली की, तुम्हाला आयुष्यभर त्याचे औषध घ्यावे लागते.

Add Zee News as a Preferred Source

पण जर सुरुवातीलाच लक्षणे समजून घेऊन योग्य उपाय केला तर लवकर आराम मिळतो. आयुर्वेद तज्ञ डॉ. निशांत गुप्ता यांनी किडनी-यकृतासाठी एक उत्तम रेसिपी शेअर केली आहे, जी फक्त ५ रुपयांमध्ये तयार होईल.

उपचार नाही 

डॉक्टर निशांत गुप्ता म्हणतात की ज्यांचे यकृत आकार वाढले आहे, फॅटी लिव्हर विकसित झाले आहे, ज्यावर कोणतेही औषध काम करत नाही किंवा ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी हा उपाय करावा. किडनी किंवा हृदयाचा वाढलेला आकार कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. लक्षात ठेवा की अ‍ॅलोपॅथीमध्ये यासाठी कोणतेही औषध नाही.

५ रुपये महत्त्वाचे 

डॉक्टरांनी पुढे सांगितले की आयुर्वेदात कफ दोषामुळे होणाऱ्या समस्यांसाठी लिहिले आहे. ते शरीरात खूप जास्त प्रमाणात साचते आणि बाहेर पडू शकत नाही. म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला ही रेसिपी घ्यावी लागेल, जी बनवण्यासाठी दररोज फक्त ५ रुपये खर्च येईल.

औषध कसं बनवाल?

१५ ते २० तुळशीची पाने एका तुळशीवर आणि मुसळावर घ्या.
त्यात ४-५ काळी मिरी टाका आणि चांगले बारीक करा.
जेव्हा ते चटणीसारखे होईल तेव्हा ते कापसाच्या कपड्यात घाला.
आता ते एका ग्लास कोमट पाण्यात बुडवा आणि पूर्णपणे पिळून घ्या.
मूत्रपिंडाच्या समस्यांवर उपचार

उपायाची पद्धत 

दिवसातून ३ ते ४ वेळा प्या, परंतु हे लक्षात ठेवा की हे जेवणानंतर १ तासाने करावे. यासोबतच, दररोज सकाळी आणि संध्याकाळी १२५ मिलीग्राम ते २०० मिलीग्राम शिलाजीत कॅप्सूल घ्या. डॉक्टरांनी सांगितले की ते इतके चांगले काम करेल की तुम्हाला ते आवडेल.





Source link

आठवड्यातून एकदा मद्यसेवनाने यकृत खराब होत नाही? कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सत्य जाणून घ्या

0
आठवड्यातून एकदा मद्यसेवनाने यकृत खराब होत नाही? कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सत्य जाणून घ्या


Alcohol Drinking Once In A Week: बऱ्याचदा लोक असा विश्वास करतात की जर ते आठवड्यातून एकदाच दारू पितात तर त्याचा त्यांच्या यकृतावर कोणताही लक्षणीय परिणाम होणार नाही. पण ही विचारसरणी बरोबर आहे का? मर्यादित प्रमाणात दारू पिणे देखील यकृताला हानी पोहोचवू शकते का? या प्रश्नाचे उत्तर वैद्यकीय शास्त्रात लपलेले आहे, जे म्हणते की अल्कोहोलचा यकृतावर होणारा परिणाम केवळ त्याच्या प्रमाणातच नाही तर सवय आणि शरीराच्या क्षमतेवर देखील अवलंबून असतो.

Add Zee News as a Preferred Source

आठवड्यातून एकदा दारू प्यायल्याने नुकसान होणार नाही का?

डॉ. इम्रान अहमद यांच्या मते, जर एखादी व्यक्ती आठवड्यातून फक्त एकदाच दारू पिते, परंतु खूप मोठ्या प्रमाणात (जसे की ४-५ पेग किंवा त्याहून अधिक) तर त्याला “बिंज ड्रिंकिंग” म्हणतात. ही सवय दररोज थोडेसे मद्यपान करण्याइतकेच यकृताचे नुकसान करू शकते. बिंज ड्रिंकिंग यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकते आणि फॅटी लिव्हर, लिव्हर इन्फ्लेमेशन आणि अगदी सिरोसिस देखील होऊ शकते.

अल्कोहोलचा यकृतावर कसा परिणाम होतो?

शरीरात अल्कोहोलचे सर्वात आधी प्रक्रिया करणारे यकृत असते. परंतु जेव्हा अल्कोहोल जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा यकृतावरील भार वाढतो आणि ते योग्यरित्या तोडण्यास असमर्थ ठरते. यामुळे यकृताच्या पेशींना नुकसान करणारे विषारी पदार्थ तयार होतात. हळूहळू, यामुळे फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस आणि नंतर सिरोसिस होऊ शकते.

प्रत्येकावर परिणाम वेगवेगळे असतात

काही लोकांचे चयापचय जलद असते आणि ते मर्यादित प्रमाणात अल्कोहोल जास्त नुकसान न करता पचवू शकतात. परंतु ज्यांचे यकृत कार्य आधीच कमकुवत आहे, जे लठ्ठ आहेत, ज्यांना हिपॅटायटीस बी किंवा हिपॅटायटीस सी संसर्ग आहे किंवा जे औषधे घेत आहेत त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदाही अल्कोहोल पिणे धोकादायक असू शकते.

डॉ. इम्रान यांच्या मते, “कोणत्याही प्रमाणात अल्कोहोल पूर्णपणे सुरक्षित नाही.” म्हणजेच, कोणत्याही प्रमाणात अल्कोहोल पूर्णपणे सुरक्षित मानले जात नाही. यकृताचे आरोग्य राखण्यासाठी कायमचे अल्कोहोल सोडणे चांगले.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link