Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 174

८० वर्षांच्या वाचनप्रेमी आजीचा गौरव ! २५० हून अधिक पुस्तकांचं वाचन करणाऱ्या बबई बनसोडे यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार”

0
८० वर्षांच्या वाचनप्रेमी आजीचा गौरव ! २५० हून अधिक पुस्तकांचं वाचन करणाऱ्या बबई बनसोडे यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार”

निंबूत ( साहस Times ):  निराशिवतक्रार ग्रामपंचायतीच्या वतीने आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने निंबूत येथील बबई केरबा बनसोडे यांना त्यांच्या सामाजिक आणि साहित्य वाचन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सुनील अण्णा पाटोळे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बबई बनसोडे यांनी आतापर्यंत २५० हून अधिक पुस्तके वाचली आहेत. विशेष म्हणजे ८० वर्षांहून अधिक वय असूनही त्या चष्म्याविना वाचन करतात. त्यांची ही साहित्यप्रेमाची जिद्द कौतुकास्पद आहे.

त्यांचा जन्म फलटण तालुक्यातील कांबळेश्वर येथे झाला. लग्नानंतर त्या निंबूत येथे बनसोडे कुटुंबात सून म्हणून आल्या. शेतीप्रेमी असलेल्या आणि जुन्या सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बबई आजींचा वाचनाशी दृढ संबंध निर्माण झाला. महापुरुषांचे विचार, कादंबऱ्या, सामाजिक वाड्मय यांचे वाचन त्या सातत्याने करतात.

यापूर्वी निरे येथील युवा कार्यकर्ते स्व. सुनील अण्णा पाटोळे यांनी ११ वर्षांपूर्वी आपल्या घरी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याची सुरुवात केली होती. त्यांचे मागील वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी दादासाहेब गायकवाड, कांताभाऊ राखपसरे आणि मित्रपरिवाराने त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू केला.

या कार्यक्रमात निरे ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्रीताई काकडे, उपसरपंच राजेशभाऊ काकडे, सदस्य अनिलअण्णा चव्हाण, राधाताई माने, सुनीलप्पा चव्हाण, आंनता शिंदे, अभि भालेराव, तसेच दादासाहेब गायकवाड, अमोल साबळे, कांताभाऊ राखपसरे, भिवा वळकुंदे, अजितदादा जैन, टी. के. जगताप, महेश जेधे, बनसोडे परिवार व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे आणि भारतीय संविधान यांच्या पूजनाने करण्यात आली.

इंग्लंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; बुमराहबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट

0
इंग्लंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; बुमराहबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट



IND vs ENG: इंग्लंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; बुमराहबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट





Source link

किडनी फेल, डायबिटीस… अन् 172 आजारांना निमंत्रण; कमी झोपेमुळं होतंय शरीराचं ‘इतकं’ नुकसान?

0
किडनी फेल, डायबिटीस… अन् 172 आजारांना निमंत्रण; कमी झोपेमुळं होतंय शरीराचं ‘इतकं’ नुकसान?


Impact of incomplete sleep on health : जागतिक स्तरावरच सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे, की स्वत:च्या खाण्यापिण्यापासून ते अगदी व्यायाम, शारीरिक सुदृढता याकडे लक्ष देण्याचासुद्धा वेळ अनेकांना मिळत नाही. घरापासून दूर राहणाऱ्या मंडळींना बऱ्याचदा बाहेरच्या जेवणावर अवलंबून राहावं लागतं. या साऱ्यात भरीस भर म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या घटना, हातातील मोबाईल फोन आणि त्यावरचं सर्फिंग. 

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रत्येक मानवी कृतीचा परिणाम हा त्या त्या व्यक्तीच्या शरीरावर होत असून, हळुहळू याच काही सवयी घात करू लागतात. जाणून धक्का बसेल, मात्र अपूर्ण झोपसुद्धा आजारपणांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळं हृदयरोग, किडनी फेल या आणि अशा कैक गंभीर आजारांचा शरीराला धोका असतो. ‘हेल्थ डेटा सायन्स’ या नियतकालिकामध्ये यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, एका संशोधनाच्या आधारे हे संदर्भ आणि काही चिंता वाढवणारी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

भीती वाढली, कमी झोपेमुळं 172 आजारांचा धोका? 

झोपेचं सरासरी प्रमाण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या धर्तीवर करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार गाढ झोपेत असतानाही मध्येच जाग येणं, सतत झोपेच्या वेळा बदलत राहणं अशा सवयींचा थेट संबंध पार्किन्सन्स, टाईप 2 डायबिटीस, किडनी फेल, अशक्तपणा, गँगरिन अशा 172 आजारांशी जोडला गेला आहे. अपुऱ्या झोपेमुळं हे आजार होण्याचा धोका दुपटीनं बळावण्याचा धोका वाढतो असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

किती तासांची झोप आवश्यक? 

सुदृढ आरोग्यासाठी साधारण 7 ते 9 तासांची झोप आवश्यकच आहे. मात्र सोबतच चांगली आणि आरोग्यदायी जीवनशैली, आरोग्यास पूरक अशा सवयी या साऱ्याचा परिणामही झोप आणि आजारपणाच्या या समीकरणावर परिणाम करताना दिसतो. प्रत्येक व्यक्तीनुरूप झोपेच्या वेळी, झोपेचं प्रमाण विभिन्न असून, या साऱ्यामध्ये सवयींचं सातत्य, झोपेच्या निर्धारित वेळा आणि सरकतेशेवटी पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची असल्याची बाब या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. 





Source link

महसूल दिनानिमित्त सौ. पल्लवी शरद पवार यांचा गौरव!

0
महसूल दिनानिमित्त सौ. पल्लवी शरद पवार यांचा गौरव!

धुमाळवाडी (फळांचे गाव), ता. फलटण | १ ऑगस्ट २०२५ साहस Times प्रतिनिध( उमेश काकडे ) :- १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिनाच्या निमित्ताने सातारा जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सौ. पल्लवी शरद पवार, पोलीस पाटील – धुमाळवाडी (फळांचे गाव), ता. फलटण यांना सन्मानित करण्यात आले.

गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी दाखवलेली तळमळ, दक्षता आणि लोकसंपर्काची कार्यपद्धती ही इतरांसाठी आदर्शवत ठरली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांना गौरवाचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.

सौ. पल्लवीताईंच्या या सन्मानामुळे संपूर्ण धुमाळवाडी गावासह फलटण तालुक्याचा अभिमान वाढला आहे.

मालेगाव प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी दबाव, माजी ATS अधिकाऱ्याचा दावा

0
मालेगाव प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी दबाव, माजी ATS अधिकाऱ्याचा दावा


२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) माजी पोलिस अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता आणि त्यांना तसे करण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणी भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र एटीएसचे निवृत्त निरीक्षक मेहबूब मुजावर म्हणाले की, भागवत यांना अटक करण्याचा आदेश भगवा दहशतवाद प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आहे.



Source link

महसूल विभागाचा मूक सेवाभाव – फलटण महसूल विभाग साजरा करतो १ ऑगस्ट महसूल दिन

0
महसूल विभागाचा मूक सेवाभाव – फलटण महसूल विभाग साजरा करतो १ ऑगस्ट महसूल दिन

फलटण, १ ऑगस्ट २०२५ ( साहस Times ) :- राज्याच्या प्रशासनात आधारस्तंभ मानला जाणारा महसूल विभाग दरवर्षी १ ऑगस्ट रोजी आपला ‘महसूल दिन’ साजरा करतो. या निमित्ताने महसूल अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेचा गौरव केला जातो. फक्त शेतसाऱ्याची वसुली एवढ्यापुरता मर्यादित नसलेला महसूल विभाग, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, जमिनीचे हक्क, विविध प्रमाणपत्रांचा निर्गम आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्येही मोलाची भूमिका बजावतो.

फलटण तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे यांनी सांगितले की, महसूल विभागाचे कार्यक्षेत्र हे अत्यंत व्यापक असून नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात विभागाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आहे.

महसूल दिनापासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहात राज्यभर विविध उपक्रम, शिबिरे, महसूल अदालत यांचे आयोजन केले जाते. महसूल विभाग फक्त शेती नोंदीसाठीच नाही तर अवैध खनिज वाहतूक प्रतिबंध, करमणूक कराची वसुली, शस्त्र व अकृषिक परवाने, आणि जमिनीच्या हक्क नियंत्रण या सर्व बाबींसाठीही जबाबदार असतो.

कोविड-१९ महामारीच्या काळात महसूल विभागाने आरोग्य व पोलीस विभागासोबत समन्वयाने काम करत कोविड केअर सेंटर उभारणी, जनजागृती, व तांदळ वाटप यासारखी महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेक गरजूंना मदतीचा हात दिला.

सातबारा संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी ही महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून शक्य झाली असून यामुळे शेतकऱ्यांना माहिती सुलभतेने उपलब्ध होत आहे. महसूल विभाग शेतकरी आत्महत्यांवरील अहवालापासून ते निवडणुका, सरकारी योजना व मदतवाटपापर्यंतच्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहे.

फलटण उपविभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी आणि कर्मचारी यांचा कार्यसमूह आपल्या प्रामाणिक सेवाभावाने विभागाचा सन्मान राखत आहे. महसूल विभागाला फारसे प्रकाशझोतात येत नसले तरी त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडत लोकसेवेसाठी वचनबद्ध राहण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

लक्ष्मण सुभाष अहिवळे यांनी सांगितले की, महसूल दिन हा दिवस महसूल कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे स्मरण करतो आणि राज्यातील सामाजिक व कायदा सुव्यवस्थेतील विभागाच्या योगदानाचा सन्मान करणारा दिवस ठरतो.


📰 साहस Times
आपल्या समाजाचे, आपल्या विकासाचे प्रतिबिंब.

फलटण डीवायएसपी पदावर बदल: राहुल धस यांची बदली, विशाल खांबे नव्या जबाबदारीवर

0
फलटण डीवायएसपी पदावर बदल: राहुल धस यांची बदली, विशाल खांबे नव्या जबाबदारीवर

फलटण (साहस Times ) :- महाराष्ट्र राज्य गृह विभागाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेत उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्री. राहुल धस यांची बदली नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर केली आहे. त्यांच्या जागी आता जालना जिल्ह्यातील अंबड उपविभागाचे DYSP श्री. विशाल खांबे यांची नियुक्ती फलटण उपविभागात करण्यात आली आहे.

नवीन नियुक्त अधिकारी श्री. विशाल खांबे हे यापूर्वी अंबड येथे काम पाहत होते. आता त्यांच्यावर फलटण उपविभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, ते लवकरच आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.

या बदल्यांमुळे स्थानिक गुन्हे तपास, कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसी प्रशासनात काही प्रमाणात नवीन दृष्टिकोन आणि कार्यपद्धती पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निगडीतील दरोड्याप्रकरणी दोघे अटकेत, आरोपींकडून मोबाईलऐवजी ‘वॉकी टॉकी’चा वापर

0
निगडीतील दरोड्याप्रकरणी दोघे अटकेत, आरोपींकडून मोबाईलऐवजी ‘वॉकी टॉकी’चा वापर


पिंपरी : निगडी, प्राधिकरणातील दरोड्याचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, आरोपींनी मोबाईलऐवजी ‘वॉकी टॉकी’चा वापर केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.या टोळीतील आरोपींचा राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी सुरेश लादुराम ढाका (वय २९, रा. राजस्थान) याला अटक केली. तर, त्याचा साथीदार महिपाल रामलाल बिष्णोई (वय १९, वडगाव मावळ. मूळ रा. राजस्थान) याला तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले. त्यांचा मुख्य सूत्रधार आणि अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण परिसरात एका बंगल्यात काम करणाऱ्या कुटुंबाला आणि घरमालक व्यावसायिकाला बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवून लुटण्याची घटना १९ जुलै रोजी घडली. घटनेच्या दिवशी बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानुसार त्यांनी संपूर्ण कट रचला. मात्र, बंगल्यात त्यांना केवळ पाच हजार रुपये मिळाले. दरोडेखोरांनी तक्रारदाराला दागिने आणि रोख रक्कम कुठे आहे, याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी कोणतीही रोख रक्कम घरात नसल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी सर्व कपाटांमध्ये शोध घेऊन एक पिशवी भरून दागिने जमा केले. आरोपींनी वॉकी टॉकीचा वापर केला. मोबाईल संचाचा वापर केल्यास तांत्रिक तपासात लवकर पकडले जाऊ, या भीतीने आरोपींनी मोबाईल संचाचा वापर टाळल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्ह्यात वापर झालेल्या मोटारीची ओळख पटवून १२०० किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. या अंतरात २०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपींनी वापरलेल्या मोटारीला मराठी भाषेत बनवलेली बनावट नंबर पाटी वापरली होती. रस्त्यात एका ठिकाणी ही पाटी बदलून आरोपींनी मूळ पाटी बसवून प्रवास केला. सुरेशला शामनगर जयपूर येथून अटक केली. त्याच्याकडून चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल संच, कागदपत्रे, मोटार जप्त केली. महिपालला तळेगाव येथून अटक केली. त्याच्याकडून बनावट नंबर पाटी, नकली दागिने, घड्याळ जप्त केले आहे. दरोडा घातल्यानंतर आरोपींनी दागिन्यांची पाहणी केली असता बहुतांश दागिने खोटे असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी खोटे दागिने महिपालकडे ठेवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर पोलीस पथके आहेत. त्याला आणि आरोपी महिलेला लवकरच अटक केली जाईल. ही कामगिरी करणाऱ्या पथकाला पोलीस आयुक्तांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड





Source link

तेल्हारा बाजार समितीत इतिहासाची नोंद: श्याम भोंगे यांची बिनविरोध निवड, धनगर समाजाचे सहकारात पहिले पाऊल!

0
तेल्हारा बाजार समितीत इतिहासाची नोंद: श्याम भोंगे यांची बिनविरोध निवड, धनगर समाजाचे सहकारात पहिले पाऊल!

अकोला, 31 जुलै 2025 – विदर्भाच्या सहकार क्षेत्रात आज एक ऐतिहासिक क्षण घडला. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि धनगर समाज संघटनेचे नेते श्याम भोंगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या उपसभापतीपदी शेतकरी पॅनलचे हरिदास वाघ यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीमुळे संपूर्ण अकोला जिल्हा आणि विदर्भातील वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांमध्ये तसेच धनगर समाजात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सहकार क्षेत्रात आजपर्यंत धनगर समाजाला बाजूला ठेवणाऱ्या प्रवाहाला छेद दत ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ही संधी निर्माण करून एक नवा इतिहास घडवला आहे.

सभापती म्हणून निवड झाल्यानंतर तेल्हारा शहरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, माजी सभापती सुनील इंगळे, संचालक मोहन पात्रीकर, गोपाल कोल्हे, श्रीकृष्ण जुमडे, सुमित गवारगुरु, संदीप गवई, श्रीकृष्ण वैतकार, रवि भाऊ भिसे, जीवन बोदडे, पंजाब तायडे, बाबूजी खोब्रागडे, मधुसूदन बरिंगे, रतन दांडगे, इद्रिस भाई यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना नवनिर्वाचित सभापती श्याम भोंगे यांनी म्हटले की,

ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. सहकार क्षेत्रात आम्हाला प्रथमच प्रतिनिधित्व देण्यात आले, ही केवळ निवड नव्हे तर आमच्या अस्तित्वाची कबुली आहे.

गुरु द्रोणा अकॅडमीतील मारहाण प्रकरण गाजतंय! प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
गुरु द्रोणा अकॅडमीतील मारहाण प्रकरण गाजतंय! प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

फलटण साहस Times :- फलटण शहरात खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण नसल्यामुळे गंभीर प्रकार घडू लागले आहेत. शहरातील गुरु द्रोणा अकॅडमीमध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा कामगार संघर्ष संघटनेने तीव्र निषेध करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष सनी घनश्याम काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून फलटणमधील खासगी अकॅडम्यांविरोधात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर व गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप आहे. या निष्क्रियतेमुळेच अशा प्रकारचा गंभीर अनर्थ घडल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप लावले जात असलेल्या गुरु द्रोणा अकॅडमीने शाळांतील अभ्यासक्रम शिकवून पालकांची दिशाभूल व फसवणूक केल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने आगामी ०४ ऑगस्ट, सोमवार रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारले असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा मानसिक व आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थांपासून दूर राहावे.