Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 173

एन. रघुरामन यांचा कॉलम: खरे प्रेम काही काळानंतर प्रकट होते

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  खरे प्रेम काही काळानंतर प्रकट होते


1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

जेव्हा मी माझे पहिले घर विकत घेतले तेव्हा मी शब्दकोशात “मालकी’ या शब्दाचा अर्थ शोधला. त्यात नियंत्रण, अधिकार आणि बाजारभाव असे म्हटले होते. स्वतःला लोकांपासून वेगळे करण्याव्यतिरिक्त जेव्हा मी तिथे राहू लागलो तेव्हा मला समजले की आईचा प्रभाव घरावर होता. वेगवेगळ्या राज्यांतील लोक माझ्या घरी येत असत आणि माझा त्यांच्यावर कोणताही अधिकार किंवा नियंत्रण नव्हते. मी त्यापैकी कोणालाही स्वतःपासून वेगळे करू शकत नव्हतो. ते मोबाइलचे दिवस नव्हते. मी कामावरून घरी परतल्यावरच पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मला मिळायची. मला असे वाटले की मुंबईत येणारे सर्व पाहुणे माझ्या घरावर ताबा मिळवत आहेत आणि मला कधीच वाटले नाही की मी त्या घराचा मालक आहे. आईच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांच्या भेटी पूर्णपणे बंद झाल्या.

तेव्हा मी तिच्या पलंगाखाली तिची सुटकेस उघडली. त्यात तिच्या जीवनसत्त्वे आणि कर्करोगविरोधी गोळ्या, गुलाबजल आणि ग्लिसरीनच्या सीलबंद बाटल्या होत्या. तसेच त्यात एक म्हैसूर चंदनाचा साबण होता, जो उघडला नव्हता. काही श्लोकांची पुस्तके, जी ती दररोज पाठ करत असे आणि काही अंतर्गत पत्रे, जी पोस्ट केली गेली नव्हती. त्यापैकी काही अर्धवट लिहिलेली होती, काही पोस्ट करण्यासाठी तयार होती. आणि सुटकेसच्या कोपऱ्यात तिची डायरी होती, जी ती दररोज लिहीत असे. डायरीत माझ्यासाठी एक पत्र होते, ज्यामध्ये ती गेल्यानंतर काय करावे हे सांगितले होते. डायरीत ती ज्या गोष्टींवर दृढ विश्वास ठेवते त्या सर्व गोष्टी होत्या. तिच्या देवाने तिच्या मुलाला दिलेल्या सूचना होत्या, जो आता आयुष्यभर तिच्या मुलीची काळजी घेणार होता. तिला भेटायला येणाऱ्या लोकांच्या गर्दीसाठी ती डायरी काही अर्थपूर्ण नसू शकते, परंतु मला त्यात तिची एक झलक दिसत होती. तिचे संपूर्ण आयुष्य त्या डायरीत सुरू झाले आणि संपले. मी वर्तमानपत्रात माझे लेख वाचले त्या पद्धतीने मी ते वाचले नाही. ते माझ्यासाठी एका पवित्र ग्रंथासारखे होते. प्रत्येक पान वाचण्यासाठी वेळ लागला. कारण त्यात काहीतरी होते, ज्याचा अर्थ मला समजून घ्यायचा होता. त्यांच्या मुलांकडून असलेल्या अनेक अपेक्षांसाठी मी त्या वेळी तयार नव्हतो. काही प्रमाणात मी अजूनही तयार नाही.

मी अशा लोकांपैकी एक आहे, जे सर्वकाही स्वच्छ करतात. मी “मृत्यू शुद्धीकरण’ नावाच्या स्कँडिनेव्हियन तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतो. हे तत्त्वज्ञान सांगते की, आपण मोठे झाल्यावर आपण आपल्या वस्तू कमी करायला सुरुवात केली पाहिजे. बऱ्याच काळापासून मी असेही मानत होतो की, आपण आपल्या मागे काहीही गोंधळात टाकू नये, जेणेकरून इतरांनी नंतर ते स्वच्छ करावे.

पण नंतर मला समजले की हे तत्त्वज्ञान खरे नव्हते. कारण माझ्या आईच्या निधनानंतर ती डायरी माझी सर्वात मोठी संपत्ती बनली. त्यात अनेक नॅपकिन्स होते, ज्यावर तिने काहीतरी लिहिले होते. त्यापैकी एकही नीट दुमडलेला नव्हता. नॅपकिन्सवरील क्रीज मऊ आहेत आणि अनेक ठिकाणी लेखन अस्पष्ट झाले आहे. फक्त मलाच त्या घड्यांमध्ये तिची उपस्थिती जाणवते आणि म्हणूनच मी आजही, तीन दशकांनंतरही तिला समजू शकतो! माझ्या बहिणीच्या जन्मानंतर दहा वर्षांनी, १९७८ मध्ये तिने एका पानावर लिहिले होते – “मी तिला गाणे आणि नृत्य करायला शिकवीन.’ काही कारणास्तव ती ते करू शकली नाही, पण आज माझ्या बहिणीची मुलगी कोरिओग्राफर आहे, ती अमेरिकेत सादरीकरण करते आणि जवळजवळ दररोज प्रवास करते.

अलीकडेच मी माझ्या आईच्या डायरीत एक पान जोडले होते, ज्यावर लिहिले होते – “अम्मा, तू अखेर तुझ्या नातवाला गाणे आणि नाचायला शिकवलेस.’ अशा अनेक नोंदी आहेत, ज्या आज आम्हा भावंडांच्या आयुष्यात वास्तवात आल्या आहेत. सुरुवातीला मला वाटले होते की, तिची डायरी यादृच्छिक विचारांनी भरलेली आहे. पण आज मला वाटते की ती आम्हा मुलांसाठी एक सुव्यवस्थित ब्लूप्रिंट आहे, जी आपण अमलात आणू शकतो.



Source link

विमानात सहप्रवाशाला कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीवर इंडिगोने घातली बंदी; Video झाला होता व्हायरल

0
विमानात सहप्रवाशाला कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीवर इंडिगोने घातली बंदी; Video झाला होता व्हायरल



IndiGo Viral Video : विमानात सहप्रवाशाला कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीवर इंडिगोने घातली बंदी; Video झाला होता व्हायरल





Source link

पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने मुलांवर काढला राग; Suicide Note मध्ये लिहिलं…, मोबाईलमध्ये सापडला ‘तो’ व्हिडीओ

0
पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने मुलांवर काढला राग; Suicide Note मध्ये लिहिलं…, मोबाईलमध्ये सापडला ‘तो’ व्हिडीओ


पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या निष्पाप मुलांनाही याची शिक्षा दिली. पतीने आपल्या 7 आणि 2 वर्षाच्या मुलांना विष पाजलं आणि नंतर आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

अल्पेशभाई असं या व्यक्तीचं नाव असून तो सुरत शहरातील दिंडोली येथील एका शाळेत शिक्षक होता. तो ४१ वर्षांचा होता. त्याची पत्नी जिल्हा पंचायत कार्यालयात लिपिक आहे. “जेव्हा अल्पेशभाई कांतीभाई सोलंकी यांनी पत्नीचा फोन उचलला नाही, तेव्हा ती त्यांच्या घरी आली. यावेळी तिला दरवाजे बंद असल्याचं आढळले. त्यानंतर तिने तिच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर त्यांना बेडवर मुले आणि अल्पेशभाई मृतावस्थेत आढळले,” असं सूरतचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) विजय सिंग गुर्जर यांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की त्यांना एक सुसाईड नोट, दोन डायरी आणि अल्पेशभाई सोलंकीच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ सापडले आहेत. अल्पेशभाईंच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भावाची पत्नी फाल्गुनीभाई हिचे नरेश कुमार राठोड नावाच्या दुसऱ्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते असा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. 

“तो (अल्पेशभाई) पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे खूप तणावात होता आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली,” असं भावाने पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्या खोलीत अल्पेशभाई गेल्या 1-2 महिन्यांपासून तपशीलवार नोंदी करत होते त्या खोलीतून त्यांना एक डायरी सापडली आहे. 

“तपासासाठी दोन्ही डायरी जप्त करण्यात आल्या आहेत. ही सुसाईड नोट 5 ते 6 पानांची आहे. ती पालकांना आणि त्याच्या पत्नीला उद्देशून लिहिली आहे. त्याचा सारांश असा आहे की या प्रकरणामुळे तो तणावात होता,” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “दोन्ही डायरींपैकी फक्त एकच डायरी त्याच्या पत्नीसाठी लिहिलेली आहे. त्यात सर्व तपशील नमूद केले आहेत,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांच्यात नेहमी भांडण होत होतं असाही खुलासा अधिकाऱ्याने केला आहे. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास केला जात आहे. 





Source link

Sakina empowers visually impaired girls to become self-reliant through Jagriti Blind School, या जीवनाने जे दिले…

0
Sakina empowers visually impaired girls to become self-reliant through Jagriti Blind School, या जीवनाने जे दिले…


दृष्टिहीनांनी याचक बनून दुसऱ्याच्या उपकारावर जगण्यापेक्षा स्वयंसिद्ध होऊन स्वकर्तृत्वावर आयुष्य घडवण्याचं बीज पेरणारी, त्यासाठी ‘जागृती अंध शाळा’ सुरू करणारी सकिना. या मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी तिने ब्रेल प्रेस, संगणक प्रशिक्षण केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असे उपक्रम सुरू केले. विंदा करंदीकरांच्या ‘या जीवनाने जे दिले, जन्मात ते मावेचना’ या काव्यपंक्तीप्रमाणे सकिना बेदीच्या या जगण्याविषयी… नुकत्याच झालेल्या ‘राष्ट्रीय अपंगत्व स्वातंत्र्य दिना’निमित्ताने.

माझ्या घरामागील आऊटहाऊसमध्ये गरजू, गुणवंत मुलींच्या शिक्षणाची आणि राहण्या-जेवण्याची सोय होत असे. एक दिवस सकाळी फोन आला, “मी सकिना बोलतेय, माझ्या मुलींना तुमच्या इथं शिकायला ठेवून घ्याल का? उद्या नऊच्या सुमारास भेटते.” तिच्या स्वरातील गोडवा आणि मार्दव यामुळे मी पटकन ‘हो’ म्हणून गेले.

सकिना, डोळ्यावर गॉगल, हातात पर्स, अंगात छानसा सलवार-खमिस अशा वेशात आली. मी विचारलं, “मुली कुठं आहेत?” सकिना म्हणाली, “आज मुलींचे आमच्या ‘जागृती अंध शाळे’त व्यवसाय प्रशिक्षण चाललं आहे म्हणून म्हटलं आधी तुम्हाला भेटून घेऊ.” मग एकदम प्रकाश पडला. ही तर आळंदीच्या ‘जागृती अंध शाळे’तील मुलींची ‘सकिनाताई’! तिच्या मुली म्हणजे अंधशाळेतल्या विद्यार्थिनी! सकिना स्वत: दृष्टिहीन होती आणि दृष्टिहीन मुलींना स्वावलंबी, सुशिक्षित, सुविचारी बनवण्यासाठी झटत होती. आज तिच्या शाळेत दृष्टिहीन १७१ मुली असून सर्व जातिधर्माच्या मुली तिथे आनंदाने राहत आहेत.

प्रसन्न चेहऱ्याच्या सकिनाने लगेचच मुद्द्याला हात घातला. म्हणाली, “दहावीचे निकाल लागलेत. शाळेतल्या तीन-चार हुशार मुलींना तुमच्या इथून जवळच असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला आहे. आमची निवासी शाळा दहावीपर्यंतच आहे. त्यांची राहण्याची-जेवण्याची सोय तुम्ही करू शकलात तर त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी सोयीचे होईल. दृष्टिहीन मुलींची जबाबदारी घेण्यात काय अडचणी येऊ शकतात याची थोडी-फार जाणीव मला लगेचच झाली. तोंडावर ‘नाही’ म्हणण्यापेक्षा मी एक-दोन दिवसांत कळवीन असं गुळमुळीत उत्तर दिलं. सकिनाला माझ्या बोलण्यातला अस्पष्ट नकार समजला असणार. ती म्हणाली, “मी मुलींना उद्या घेऊन येते, मग तुम्ही काय ते ठरवा.”

हेही वाचा

सकिनाच्या त्या तीन मुली दुसऱ्याच दिवशी आपापल्या महाविद्यालयामधून पांढरी काठी रस्त्यावर टकटक करत भर रहदारीतून, एकेकट्या वाट काढत हजर झाल्या. १६-१७ वर्षांच्या, नीटनेटके कपडे घालून, पाठीवर बॅकपॅक घेतलेल्या या मुलींनी आल्याआल्याच हसतमुखानं ‘नमस्ते’ म्हणत नमस्कार केला. प्रत्येकीनं स्वत:ची ओळख करून देत, पुढं काय करायची इच्छा आहे ते सांगितलं. त्यांचं विनयशील वागणं-बोलणं, आत्मविश्वास हे सगळंच लोभस होतं. त्यांच्या देहबोलीतून आपण आता उच्चशिक्षणाच्या वाटेवर आहोत याचा आनंद आणि वाणीतून उज्ज्वल भविष्याची आशा डोकावत होती. एव्हाना माझ्यातला विरोध विरघळायला लागला होता. एवढ्यात सकिना आली. म्हणाली, “तुम्ही ‘हो’ म्हणालात तर मुली आजपासून इथं राहतील, महाविद्यालय सुरू व्हायच्या आधी परिसराची माहिती करून घेतील.” मी म्हटलं, “मला जरा सध्या ज्या मुली इथं राहताहेत त्यांच्याशी बोलू दे.” मी चहा करून आणेपर्यंत नव्या-जुन्या मुली हसत खेळत एकमेकींत सहज मिसळल्या. पुढे जाऊन एकत्र राहायला लागून लवकरच रुळल्या.

आधीच्या डोळस मुली आता या दृष्टिहीन मुलींची काळजी घेऊ लागल्या. बाकीच्या मुली आपलं जेवणखाण स्वत: करायच्या. पण अंध मुलींसाठी मी डबा सुरू केला. दोन दिवसांनी त्या मुलींनीच डबा बंद करायला सांगितला आणि त्या स्वत:चा स्वयंपाक करू लागल्या. गोल पातळ लाटलेले फुलके तर पाहत राहावे असे. त्यांनी केलेल्या कांदे-बटाटे-टोमॅटो रश्श्याचा खमंग वास तर सगळीकडे दरवळत असे. छान तयार होऊन त्या महाविद्यालयामध्ये जाऊ लागल्या की आजूबाजूचे लोकही कौतुकानं पाहत राहायचे. ‘फर्ग्युसन महाविद्यालया’मध्ये जाणारी एक दृष्टिहीन मुलगी चांगली हुशार असूनही तिला परीक्षेत कमी गुण मिळाले. मुलांबरोबरचं फिरणं वाढल्यामुळे हे झालंय हे सकिनानं बरोबर ओळखलं, तेव्हा मात्र तिने माझ्यादेखत तिची चांगलीच कानउघाडणी केली. पुनश्च ती वेळ आली नाही. त्या सगळ्यांनीच आपापली वाटचाल उत्तम सुरू ठेवली. पदवीधर, द्विपदवीधर होऊन स्पर्धा परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या. काही आज राष्ट्रीयीकृत बँकेत, शासकीय कार्यालयात अधिकारी पदावर काम करत आहेत. योग्य जोडीदार निवडून संसार समर्थपणे सांभाळत असताना ‘जागृती अंध शाळे’ला हरप्रकारे मदतही करत आहेत.

स्वत: त्या अनुभवातून जात असल्यामुळे दृष्टिहीन मुलींना समजून घेणं, योग्य प्रकारे समजावून सांगणं, आवश्यक तेव्हा समज देणं हे सर्व सकिना कुशलतेनं आणि आपलेपणानं करते. अनेक दृष्टिहीन मुलींचं प्रेरणास्थान असलेल्या सकिनाला स्वत:ला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं ते समजून घेताना मी अधिक डोळस आणि समृद्ध झाले.

सकिना सार्जन. दाउदी बोहरा कुटुंबात जन्मली. दोन भावांपैकी एकाला थोडा दृष्टिदोष होता. सकिना जन्मत:च पूर्णपणे अंध होती. वडील आईला म्हणाले, “आपण पालक म्हणून अधिक समर्थ असू म्हणूनच आपल्याकडे देवानं जन्मांध मुलगी पाठवली आहे. आपण तिचे ‘प्रज्ञाचक्षू’ सक्षम करू.” सकिना पाच वर्षांची झाल्यावर तिला मुंबईच्या दृष्टिहीन मुलांच्या निवासी शाळेत शिशुवर्गात दाखल केलं. मात्र वसतिगृहातील गैरव्यवस्था, गोवर-कांजिण्यासारखे होणारे संसर्गजन्य रोग यामुळे पिडलेल्या सकिनाला वडिलांनी वर्षभरातच पुण्याला परत आणलं. सकिना म्हणते, “तिथल्या वास्तव्यामुळे माझ्या मनावर वसतिगृह कसं नसावं हे बालपणीच पक्क बिंबलं. त्याचा उपयोग पुढे ‘जागृती अंध शाळे’चं वसतिगृह उभारताना झाला.”

पुण्यात दृष्टिहीन मुलग्यांसाठी कोरेगाव पार्क इथे आणि मुलींची कोथरूडला शाळा आहे. कोथरूड लांब पडेल म्हणून वडिलांनी तिला मुलांच्या शाळेत घातलं. त्या शाळेत ती एकटीच मुलगी होती. तिथे ती ब्रेल लिपी लिहिण्यात-वाचण्यात पारंगत झाली. अधूनमधून दानशूर व्यक्ती शाळेला भेट द्यायला यायच्या. मग मुलांना रांगेत उभे करून आलेले पाहुणे प्रत्येक मुलाच्या हातात खाऊ, भेटवस्तू तर कधी कधी रुपयाची नोटसुद्धा द्यायचे. हे देताना त्यांच्या बोलण्यातून मुलांविषयीची दयाबुद्धी, सहानभूती जाणवायची. सकिनाला ते बिलकुल आवडायचं नाही, ती कुठं तरी लपून बसायची. दृष्टिहीनांनी याचक बनून दुसऱ्याच्या उपकारावर जगण्यापेक्षा स्वयंसिद्ध होऊन स्वकर्तृत्वावर आयुष्य घडवावं या तिच्या मनोधारणेचं बीज इथंच पेरलं गेलं. पुढे जाऊन याच विचारसरणीतून तिने स्वत:ला आणि इतर अनेक दृष्टिहीन मुलींना घडवलं.

सकिना बुद्धिमान आहे हे तिच्या वडिलांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनी तिला ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी’च्या सर्वसाधारण मुलामुलींच्या शाळेत घातलं. सकिना ब्रेल लिपीतील वह्या-पुस्तकांची भली मोठी बॅग सावरत शाळेत इतर मुलांच्या बरोबरीनं अभ्यास करत असे. एक हुशार विद्यार्थी म्हणून ती अभ्यासात आणि विविध आंतरशालेय स्पर्धांतून चमकली. वक्तृत्व स्पर्धेत तर तिने अनेक चषक शाळेसाठी जिंकून आणले. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अजिंठा-वेरुळची लेणी यांसारख्या अनेक ठिकाणांच्या सहली तिने केल्या. ‘वाडिया महाविद्यालया’मधून पदवी घेतल्यावर मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या मान्यवर संस्थेमध्ये समाजशास्त्रातील पुढील शिक्षण घ्यायचं तिने नक्की होतं. त्यांच्या प्रवेश परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण होऊन तेथील वसतिगृहात सकिना राहायला गेली. तिथं इतर मुलींबरोबर प्रयत्नपूर्वक इंग्लिशमध्ये बोलून तिने त्या भाषेत बोलण्याचा चांगला सराव केला. अभ्यासक्रमांतर्गत प्रत्यक्ष अनुभवासाठी सकिनाला ठाण्याचं मनोरुग्णालय, धारावी झोपडपट्टी इथं पाठवण्यात आलं. तिथलं दु:ख, दारिद्र्य, असहायता तिला जाणवत होती. पण ‘टाटा मेमोरिअल रुग्णालया’मध्ये कार्यानुभव घेताना मुलांच्या कर्करोग प्रभागामधले लहानग्या जीवांचे भोग तिला कमालीचे अस्वस्थ करून गेले आणि तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून गेला. अंधत्वाचा बाऊ करून स्वत:ला कुरवाळत बसण्यापेक्षा वंचित, दुर्बलांसाठीच्या कार्यात सक्रिय सहभागी असलं पाहिजे ही तळमळ निर्माण झाली. समाजाभिमुख नवी जीवनदृष्टी घेऊन आणि अव्वल श्रेणीत समाजशास्त्राची पदवीधर होऊन सकिना पुण्याला परत आली.

हेही वाचा

तिने मग सामाजिक संस्थांतून काम करायला सुरुवात केली. याच काळात कामानिमित्त तिची संदीप बेदी या काही प्रमाणात दृष्टिहीन असलेल्या, कुशाग्र बुद्धीच्या मुक्त पत्रकारिता करणाऱ्या तरुणाशी ओळख झाली. पुढे त्याचं प्रेमात आणि विवाहात रूपांतर झालं. संदीप सिंधी होता. सकिना सिंधी भाषा बोलायला शिकली. संदीपचा ‘इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग’चा व्यवसाय होता. त्याने सकिनालाही त्याविषयी प्रशिक्षण दिलं आणि ‘इंटेलेक्चुअल ॲसेट मॅनेजमेंट’ या नावानं दोघांनी भागीदारीत कंपनी सुरू केली. ती चांगली मोठी झाली, आर्थिक स्थैर्य आलं. पुढे सकिनाला सुदृढ, अव्यंग मुलगी झाली, अनमोल. आता अनमोल सीए झाली. तिचा पती चंद्रप्रकाश हाही सीए आहे. त्यांची स्वत:ची लेखापरीक्षणाची कंपनी आहे.

प्रापंचिक वाटचाल सुरळीत सुरू होती, तरी सकिनाला सामाजिक कार्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. पाचोऱ्याच्या एका गरीब शेतकऱ्याच्या दृष्टिहीन मुलीला ‘जागृती अंध शाळे’त प्रवेश मिळवून देताना सकिनाच्या लक्षातं आलं की ही शाळा चालवणाऱ्या ‘राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र’ यांच्या सहयोगानं काम केलं तर आपल्याला गरजू दृष्टिहीन मुलींच्या सबलीकरणासाठी निश्चित मदत करता येईल. ती या संस्थेची प्रमुख प्रवर्तक बनली. निधी संकलनासाठी भरपूर परिश्रम घेतले. प्रत्यक्ष उभं असलेलं काम पाहून अनेक हितचिंतक संस्थेशी जोडले गेले. यासाठी संदीपची साथ तिला नेहमीच लाभली. करोना साथीच्या पहिल्या लाटेत संदीपचं निधन झालं. सकिना म्हणते, “माझे वडील आणि संदीप यांनी मला खऱ्या अर्थानं जो आधार दिला, तो आयुष्यभर पुरून उरणारा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रेल प्रेस, संगणक प्रशिक्षण केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असे एकापाठोपाठ एक नवे उपक्रम सुरू झाले. शाळेच्या इमारतीत चांगल्या स्वच्छतागृहापासून अनेक आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. संस्थेला मिळालेल्या दोन एकर उजाड गायरान जमिनीचा कायापालट होऊन तिथं सर्व दृष्टीने दृष्टिहीन मुलींना सोयीचं वसतिगृह लवकरच पूर्णत्वास येत आहे. दरवर्षी २६ जुलै रोजी अपंग व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय अपंगत्व स्वातंत्र्य दिन’ दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सकिनाने केलेल्या कामाचा आढावा महत्त्वाचाच.

आपण दृष्टिहीन म्हणून जन्माला आलो याबद्दलचा कडवटपणा, नाराजी किंवा तक्रारीचा सूर तिच्या वागण्या-बोलण्यात अजिबात दिसत नाही. उलटपक्षी ‘या जीवनाने जे दिले, जन्मात ते मावेचना’ या विंदांच्या काव्यपंक्तीप्रमाणे तिच्यामध्ये एक आंतरिक तृप्ती आहे. ‘माणुसकी’ हा एकच धर्म सकिना मानते आणि अनुसरते!

jayakale99@gmail.com





Source link

विराग गुप्ता यांचा कॉलम: बनावट प्रकरणांत पीडितास ‎भरपाई बंधनकारक करावी‎

0
विराग गुप्ता यांचा कॉलम:  बनावट प्रकरणांत पीडितास ‎भरपाई बंधनकारक करावी‎


  • Marathi News
  • Opinion
  • Virag Gupta’s Column: Compensation To The Victim In Fake Cases Should Be Made Mandatory

15 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎विवाहित महिलांवरील हुंड्यासाठीचा छळ आणि‎क्रूरतेच्या प्रकरणांमध्ये दोन महिन्यांसाठी अटकेवर बंदी‎घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा नवीन निर्णय देखील‎जुन्या निर्णयांप्रमाणे कायद्याच्या पुस्तकात हरवला जाईल‎का? यासाठी ५ मुद्दे समजून घेणे महत्वाचे आहे.4‎

QuoteImage

खोटा एफआयआर आणि बेकायदा‎अटकेच्या प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तीला‎भरपाई मिळाली पाहिजे. असे झाले तरच‎हुंड्यासाठीचा छळ, अनुसूचित‎जाती/जमातीसह सर्व प्रकरणांमध्ये कठोर‎कायद्यांचा गैरवापर रोखले जाईल.‎

QuoteImage

1. अटक : जोगिंदर कुमार विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य‎(१९९४) च्या निर्णयानुसार, पोलिसांना ताब्यात घेण्याचे‎आणि अटक करण्याचे अनेक अधिकार आहेत. मुख्य‎न्यायाधीश वेंकटचलैया यांच्या मते, विवेकबुद्धीशिवाय‎मनमानी अटक करणे घटनाबाह्य आणि बेकायदा आहे.‎१९९६ मध्ये डीके बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्याच्या‎निर्णयात ताब्यात घेतलेल्या लोकांचे कायदेशीर अधिकार‎ठरवण्यात आले होते. अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य‎(२०१४) च्या निर्णयात ताब्यात घेणे आणि तुरुंगवास हे‎अपवाद असल्याचे म्हटले होते. या निर्णयांनुसार जारी ‎‎सरकारी आदेशांचे पालन न केल्यामुळे पोलीस ठाणे‎आणि न्यायालयांत खेटे मारून कोट्यवधी कुटुंबे‎उद्ध्वस्त होत आहेत.‎ २. सर्वोच्च न्यायालय : नवीन निर्णयानुसार कलम ‎‎४९८-अ चा गैरवापर रोखण्यासाठी, अलाहाबाद उच्च ‎‎न्यायालयाच्या जून २०२२ च्या आदेशानुसार जिल्ह्यांमध्ये ‎‎कुटुंब कल्याण समित्या स्थापन कराव्यात. या संदर्भात ‎‎सर्वोच्च न्यायालयाने जून २०१७ मध्ये राजेश शर्मा‎प्रकरणात एक मोठा निर्णय दिला होता. त्यानुसार‎४९८-अ शी संबंधित बहुतेक प्रकरणांमध्ये पती आणि‎त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिस प्रकरणांमध्ये खोटे‎गुंतवले जाते. निर्णयात राष्ट्रीय कायदेशीर सेवा‎प्राधिकरणाला मार्च २०१८ पर्यंत अहवाल सादर करण्याचे‎आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ८ वर्षांनंतरही‎कोणताही तपशील येत नाही. ४९८-अ चा गैरवापर‎रोखण्यासाठी २००८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या‎निर्णयानुसार दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्यांसाठी‎कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. असे‎अनेक जुने निर्णय लागू केले जात नसताना नवीन‎निर्णयानंतर लोकांना जमिनीवर न्याय कसा मिळेल?‎ ३. संसदेतून कायदा : माजी उपराष्ट्रपती जगदीप‎धनखड यांनी राज्यघटनेच्या कलम १४२ च्या विशेष‎अधिकारांचा गैरवापर, सर्वोच्च न्यायालयाचे‎सुपर-पार्लियामेंट बनण्यावर संताप व्यक्त केला होता.‎कलम १४१ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कनिष्ठ‎न्यायालयांवर बंधनकारक आहेत. परंतु त्या निर्णयांनुसार‎सरकार आणि संसदेने आयपीसी किंवा बीएनएस आणि‎सीआरपीसी किंवा बीएनएसएसच्या कायद्याच्या‎पुस्तकांत बदल केले नाहीत. या संसदीय अपयशामुळे‎पोलिसांच्या मनमानीसह न्यायालयांमध्ये अराजकता‎वाढत आहे.‎ ४. जिल्हा न्यायालये : न्यायालयांमध्ये सुरू‎असलेल्या ४.५५ कोटी खटल्यांपैकी ३.३४ कोटी खटले‎म्हणजेच ७५ टक्के गुन्हे आहेत. खऱ्या प्रकरणांतही‎एफआयआर नोंदवण्यासाठी गरिबांना पोलिस ठाण्यांत‎खूप प्रयत्न करावे लागतात. दुसरीकडे राजकारणी‎आणि प्रभावशाली लोकांच्या इशाऱ्यावर दिवाणी‎प्रकरणांमध्येही बनावट एफआयआर नोंदवले जातात.‎सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या आणि नवीन निर्णयांवरून‎हे स्पष्ट होते की कौटुंबिक बाबींमध्ये पती आणि त्याच्या‎कुटुंबातील सदस्यांना खोटे बोलून गुंतवण्याचे एक‎दुष्टचक्र सुरू आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर जिल्हा‎न्यायालयांमध्ये आरोपींना नियमितपणे तुरुंगात पाठवले‎जाते. जमिनीच्या बाबींमध्ये पटवारीचा अहवाल आणि‎गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिस निरीक्षकाचा एफआयआर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎न्यायालयात मानण्याच्या साम्राज्यवादी प्रथेमुळे स्वतंत्र‎भारतातील कोट्यवधी लोकांना पिढ्यानपिढ्या पोलिस‎स्टेशनच्या चकरा व कोर्टकज्ज्यांना तोंड द्यावे लागते.‎ ५. पोटगी: सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन‎निर्णयामुळे दोन डझनहून अधिक खटले आणि पोटगीची‎रक्कम रद्द केली आणि अलिकडच्या शिवांगी बन्सल‎प्रकरणात आयपीएस पत्नीलाही माफी मागावी लागली.‎पण पती आणि वडिलांना १०० दिवसांपेक्षा जास्त काळ‎तुरुंगात कसे राहावे लागेल याची भरपाई कशी होईल?‎काही दिवसांपूर्वी पत्नीने सर्वोच्च न्यायालयात पोटगीच्या‎नावाखाली १२ कोटी रुपये, एक आलिशान फ्लॅट आणि‎एक कारची मागणी केली होती. लिव्ह-इन रिलेशनशिप‎आणि लिंग समानतेच्या कायदेशीर मान्यताच्या युगात,‎घटस्फोटाचे कायदे सोपे करण्याबरोबरच, पोटगीचे‎नियम व्यावहारिक करण्यासाठी ७ दशके जुन्या‎कायद्यांमध्ये बदलाची आवश्यकता आहे. सर्वोच्च‎न्यायालयाच्या निर्विवाद निर्णयांची माहिती असलेले अॅप‎जारीकरावे. (लेखकाचेहेवैयक्तिकविचारआहेत.)‎



Source link

कोल्हापूर खंडपीठ सुरु होणार! – सहा जिल्ह्यांना दिलासा, रामराजेंच्या पुढाकाराचा विजय

0
कोल्हापूर खंडपीठ सुरु होणार! – सहा जिल्ह्यांना दिलासा, रामराजेंच्या पुढाकाराचा विजय

फलटण, १ ऑगस्ट २०२५ साहस Times –मुंबई न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच अखेर वास्तवात; १८ ऑगस्टपासून न्यायदान सुरु होणार!
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – या सहा जिल्ह्यांमधील जनतेसाठी ही ऐतिहासिक घोषणा म्हणजे न्याय मिळवण्याच्या लढ्यात मोठा दिलासा आहे. यामागे तत्कालीन विधानपरिषद सभापती आणि फलटण-कोरेगावचे लोकप्रिय नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, असे मत प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले.

प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, ‘‘राज्याच्या विविध भागातून या मागणीसाठी आंदोलने झाली, उपोषण झाले. सातारा जिल्ह्यातील वकीलांचा संघर्ष असो की कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचा आवाज – या सर्वांना एक राजकीय बळ देण्याचे काम श्रीमंत रामराजेंनी केले. मार्च २०२२ मध्ये झालेल्या मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत त्यांनीच हे प्रकरण विधानभवनात नेले.’’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या विशेष बैठकीतही रामराजेंनी सहा जिल्ह्यांच्या न्यायिक अडचणी समजावून सांगत सर्किट बेंचची गरज अधोरेखित केली. त्यांचा आग्रह इतका ठाम होता की बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले, आणि त्यानंतर प्रक्रियेला वेग आला.

‘‘या निर्णयामुळे वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचणार आहे. आम्हाला न्यायासाठी आता मुंबईच्या वाटा पाहाव्या लागणार नाहीत. आमच्या भागाला मिळालेला हा हक्क आणि श्रीमंत रामराजेंचे योगदान, हे आमच्यासाठी भूषणावह आहे,’’ असेही खानविलकर म्हणाले.

सेवेला सलाम! फलटण नगर परिषदेमध्ये श्रीमती माया काकडे यांचा अनोख्या पद्धतीने सेवानिवृत्ती सत्कार

0
सेवेला सलाम! फलटण नगर परिषदेमध्ये श्रीमती माया काकडे यांचा अनोख्या पद्धतीने सेवानिवृत्ती सत्कार

फलटण, ३१ जुलै २०२५ (साहस Times) – फलटण नगर परिषदेच्या सफाई विभागात २२ वर्षे निष्ठेने सेवा बजावलेल्या श्रीमती माया यशवंत काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार आज एक अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय क्षण ठरला.

या कार्यक्रमात फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांनी एक ऐतिहासिक आणि मनाला स्पर्शून जाणारा निर्णय घेतला — त्यांनी स्वतःची मुख्याधिकारी पदांची खुर्ची श्रीमती काकडे यांना अर्पण करत, त्यांना मानाचे आसन दिला. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी गौरवाचा आणि स्तुत्य ठरला.

नगर परिषदेच्या इतिहासात सफाई    कर्मचाऱ्याचा अशा प्रकारचा सन्मान पहिल्यांदाच झाल्यामुळे, याचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. कार्यक्रमाला श्रीमती माया काकडे यांच्याबरोबर मुलगा योगेश यशवंत काकडे सून पूजा योगेश काकडे व नात यशदा तसेच सर्व विभागांचे अधिकारी, फलटण नगर परिषद म्युनिसिपल कामगार संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याधिकारी मोरे यांची ही कृती ही केवळ एका कर्मचाऱ्याचा सन्मान नसून, कामगारवर्गाविषयी असलेली आपुलकी, कृतज्ञता आणि आदरभावनेचे प्रतीक आहे, असे मत अनेक उपस्थितांनी व्यक्त केले.

फलटण नगर परिषद म्युनिसिपल कामगार संघटनेच्या वतीनेही मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांचे विशेष सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले.

“एक खुर्चीने इतिहास घडवला, आणि एका कर्मचाऱ्याच्या सेवेला दिला योग्य सन्मान” — फलटण नगर परिषदेत आज हे प्रत्यक्षात दिसले!

श्रावणात उपवास करताय? पण डायबिटिस आहे? काय खाल अन् काय टाळाल एकदा बघाच

0
श्रावणात उपवास करताय? पण डायबिटिस आहे? काय खाल अन् काय टाळाल एकदा बघाच


श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या पवित्र महिन्यात शनिवार आणि सोमवारचा उपवास करण्याची परंपरा आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपवास चांगला मानला जातो, परंतु प्रत्येकाचे आरोग्य त्यावर लागू होत नाही. उदाहरणार्थ, काही गंभीर आजार असलेल्या लोकांना उपवास करणे सोपे नसते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांबद्दल बोललो तर उपवास केल्याने त्यांची साखर असंतुलित होऊ शकते. याशिवाय उपवासाच्या वेळी खाल्लेल्या अनेक गोष्टी त्यांच्या साखरेच्या पातळीसाठी देखील योग्य नसतात. अशा परिस्थितीत, श्रावणी शनिवारी मधुमेहाच्या रुग्णांनी उपवास ठेवणे योग्य आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे? जर हो, तर उपवासाच्या वेळी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल.

उपवास कोण ठेवू शकतो?

सर्व मधुमेहाच्या रुग्णांनी उपवास ठेवू नये. याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि तो घातक देखील ठरू शकतो. इन्सुलिन घेणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णांनी उपवास टाळावा. लक्षात ठेवा, जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल आणि तरीही उपवास करत असाल तर त्याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय, बीपी असलेल्या मधुमेही रुग्णांनीही उपवास टाळावा. जर तुम्हाला कोणत्याही विशेष स्थितीत उपवास करायचा असेल तर एकदा डॉक्टरांशी बोलणे चांगले. मधुमेहाचे रुग्ण कोणते उपवास करू शकतात हा प्रश्न आहे, तर त्यात मेटफॉर्मिन किंवा ग्लिप्टिन गटाची औषधे घेणारे लोक समाविष्ट आहेत. खरं तर, या औषधांनी हायपोग्लाइसेमियाचा धोका कमी होतो.

मधुमेहाच्या रुग्णांनी उपवास करताना काय खावे

प्रथिनेयुक्त आहार
मधुमेहाचे रुग्ण उपवास करत असले तरी त्यांनी त्यांच्या आहाराबद्दल निष्काळजी राहू नये. असे केल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणून, वेळोवेळी काहीतरी खात राहा. तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. त्यात चीज, कॉटेज, दही इत्यादींचा समावेश असू शकतो.

निरोगी चरबी घ्या
श्रावणी शनिवारच्या उपवासाच्या वेळी तुम्ही फळे खाऊ शकता. उपवास असूनही, निरोगी चरबी घेणे महत्वाचे आहे. तुम्ही काजू, बिया आणि एवोकॅडो सारख्या गोष्टी निरोगी चरबी म्हणून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते.

कमी ग्लायसेमिक फळे खा
जर तुम्ही श्रावणी शनिवारचा उपवास करत असाल तर तुमच्या आहारात ग्लायसेमिक फळे समाविष्ट करायला विसरू नका. त्यात स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, सफरचंद इत्यादींचा समावेश आहे. ही फळे खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेवर कमीत कमी परिणाम होतो. याचा अर्थ असा की ते खाल्ल्यानंतरही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खराब होत नाही.

शरीर हायड्रेट ठेवण्यास विसरू नका
श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे लोक अनेकदा कमी पाणी पितात. कारण त्यांना कमी तहान लागते. परंतु, उपवासाच्या वेळी तुम्ही पुरेसे पाणी पिणे आणि स्वतःला हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. तथापि, तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी इतर पर्याय निवडू शकता, ज्यामध्ये नारळ पाणी किंवा हर्बल टीचा समावेश आहे.

सामान्य प्रश्न

मधुमेहाचा रुग्ण उपवास ठेवू शकतो का?

मधुमेहाचा रुग्ण उपवास ठेवू शकतो पण जास्त वेळ उपाशी राहणे योग्य नाही कारण त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढतो. या उपवासातही दर काही तासांनी काहीतरी खात आणि पित राहा.

भूक लागल्याने साखर वाढते का?

चयापचय मंदावल्याने उपाशी राहिल्याने साखर वाढते, ज्यामुळे ग्लुकोज लवकर पचत नाही आणि शरीरातील साखरेची पातळी वाढत राहते.

उपवास करताना मधुमेहाच्या रुग्णांनी कोणता रस प्यावा?

मधुमेहाचे रुग्ण उपवास करताना काकडी आणि डाळिंबाचा रस पिऊ शकतात. रसाऐवजी फळे खाणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरीराला अधिक फायदा होईल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 





Source link

८० वर्षांच्या वाचनप्रेमी आजीचा गौरव ! २५० हून अधिक पुस्तकांचं वाचन करणाऱ्या बबई बनसोडे यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार”

0
८० वर्षांच्या वाचनप्रेमी आजीचा गौरव ! २५० हून अधिक पुस्तकांचं वाचन करणाऱ्या बबई बनसोडे यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार”

निंबूत ( साहस Times ):  निराशिवतक्रार ग्रामपंचायतीच्या वतीने आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने निंबूत येथील बबई केरबा बनसोडे यांना त्यांच्या सामाजिक आणि साहित्य वाचन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सुनील अण्णा पाटोळे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बबई बनसोडे यांनी आतापर्यंत २५० हून अधिक पुस्तके वाचली आहेत. विशेष म्हणजे ८० वर्षांहून अधिक वय असूनही त्या चष्म्याविना वाचन करतात. त्यांची ही साहित्यप्रेमाची जिद्द कौतुकास्पद आहे.

त्यांचा जन्म फलटण तालुक्यातील कांबळेश्वर येथे झाला. लग्नानंतर त्या निंबूत येथे बनसोडे कुटुंबात सून म्हणून आल्या. शेतीप्रेमी असलेल्या आणि जुन्या सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बबई आजींचा वाचनाशी दृढ संबंध निर्माण झाला. महापुरुषांचे विचार, कादंबऱ्या, सामाजिक वाड्मय यांचे वाचन त्या सातत्याने करतात.

यापूर्वी निरे येथील युवा कार्यकर्ते स्व. सुनील अण्णा पाटोळे यांनी ११ वर्षांपूर्वी आपल्या घरी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याची सुरुवात केली होती. त्यांचे मागील वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी दादासाहेब गायकवाड, कांताभाऊ राखपसरे आणि मित्रपरिवाराने त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू केला.

या कार्यक्रमात निरे ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्रीताई काकडे, उपसरपंच राजेशभाऊ काकडे, सदस्य अनिलअण्णा चव्हाण, राधाताई माने, सुनीलप्पा चव्हाण, आंनता शिंदे, अभि भालेराव, तसेच दादासाहेब गायकवाड, अमोल साबळे, कांताभाऊ राखपसरे, भिवा वळकुंदे, अजितदादा जैन, टी. के. जगताप, महेश जेधे, बनसोडे परिवार व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे आणि भारतीय संविधान यांच्या पूजनाने करण्यात आली.

इंग्लंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; बुमराहबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट

0
इंग्लंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; बुमराहबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट



IND vs ENG: इंग्लंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; बुमराहबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट





Source link