

Satara Accident News सातारा : सातारा जिल्ह्यातील तेटली गावात एक विचित्र अपघात झाला आहे. यात पंक्चर झालेलं कारचं चाक बदलताना अचानक जॅक निसटला आणि कार थेट छातीवर आदळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात 25 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. प्रणय शंकर भोसले असे 25 वर्षीय मयत तरुणाचं नाव असून या घटनेने तेटली गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय भोसले सातारा जिल्ह्यातील जावळीच्या तेटली गावातील रहिवासी असून ते हॉटेल व्यवसाईक होते. अशातच प्रणय बाहेर जाण्यास निघाले असता त्यांना आपल्या गाडीचं चाक पंक्चर झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांची गाडी त्यांच्या हॉटेलबाहेरच पार्क होती. यावेळी त्यांनी मेकॅनिकला न बोलवता स्वतःच गाडीचं पंक्चर झालेलं चाक बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गाडी वर उचलण्याची ते गाडीखाली शिरले आणि जॅक पुन्हा वर चढवू लागले. मात्र त्याच वेळी अचानक जॅक मूळ जागेवरून सटकून बाजूला पडला आणि गाडी थेट त्याच्या छातीवर पडली. गाडीचा संपूर्ण भार प्रणयच्या छातीवर आल्याने त्यांनी मदतीसाठी मोठ्यांना आवाज दिला. त्याच वेळी प्रणय यांच्या किंकाळ्या ऐकून त्यांच्या पत्नीने हॉटेलमधून बाहेर धावत आली. सोबत त्यांचे वडीलही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, या दोघांनी गाडी वर उचलण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदत करत प्रणयला बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हि बातमी कुटुंबियांना समजताच भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तेटली गावात शोककळा पसरली आहे.
कोल्हापूर शहरातील फुलेवाडीमध्ये मध्यरात्री गुंडांनी घरात घुसून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून केलाय. महेश राजेंद्र राख असं खून झालेल्या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आठ ते दहा जणांनी केलेल्या हल्ल्यात महेश राख मृत्यू झाला असून त्याचा मित्र विश्वजीत भाले हा गंभीर जखमी झालाय. हल्लेखोर आणि विश्वजीत भाले यांच्यात किरकोळ कारणावरून रात्री वाद झाला होता. या वादातून रात्री उशिरा हल्लेखोर विश्वजीत भाले याच्या घरी दाखल झाले. ही घटना कळताच रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राख त्या ठिकाणी पोहोचला, त्यावेळी हल्लेखोरांनी महेश राख आणि त्याचा मित्र विश्वजीत भाले यांच्यावर एडका तलवार अशा धारदार शस्त्राने हल्ला चढविला.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
6 तासांपूर्वी
आपल्या जीवनात काही पुस्तके असली पाहिजेत. कोणताही गोंधळ किंवाविचलितता येते तेव्हा या ग्रंथांना वाचावे. मग ते गीता, महाभारत,रामचरितमानस, भागवत, बायबल, कुराण किंवा इतर कोणताही ग्रंथअसो. त्यामध्ये दिलेले संकेत ओळीदरम्यान शोधले पाहिजे. अशा ग्रंथांचेवाचन करण्याचा अर्थ म्हणजे त्याचा भावार्थ जाणून ताे जीवनाशी जोडणे.आजच्या पिढीला काही गोष्टी आजच्या उदाहरणांवरूनच समजतात.आपल्या देशातील सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष धक्कादायक निर्णय घेतोतेव्हा लोकांना ते खूप आश्चर्यकारक वाटते. परंतु त्यांच्या भूतकाळातीलराजकारण्यांनी काही सखोल अर्थ असलेले ग्रंथ लिहिले आहेत. आजघेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा वेध त्या पुस्तकांमध्ये दिसताे. म्हणून हा एकधडा घेतला पाहिजे. काही उंची गाठायची असेल तर धर्मग्रंथ वाचावा.तुम्हाला उंचीवर राहायचे असेल तर त्या ग्रंथांमध्ये दिलेल्या शिकवणीआणि संकेतांना सतत जीवनाशी जोडा. भले दररोज एक पान वाचले तरीचालेल. पण जरुर वाचन करावे.



Paracetamol Effect: तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. ताप आला की आपण सर्रास मेडिकलमध्ये जातो आणि एखाद्या कंपनीचे पॅरासिटामोलची गोळी घेतो आणि मोकळे होते. त्यानं आपल्याला काहीसा आरमही पडतोय. मात्र या वारंवार तुम्ही पॅरासिटामोल औषध घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला नुकसान होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.
छोट्या छोट्या आजारांवर पॅरासिटामोल हे औषध आपण सर्रास घेत असतो. स्वस्त आणि केमिस्टच्या दुकानात सहज उपलब्ध होत असल्याने पॅरासिटामोल कोणीही घेतो. पण हीच सवय तुमच्या अंगलट येऊ शकते. कारण पॅरासिटामोलमुळे जसा फायदा होतो तसं शरिराचं नुकसानही होऊ शकतं असा दावा तज्ज्ञांनी केलाय.
ताप आल्यास रिकाम्यापोटी पॅरासिटामोल घेणं सामान्यपणे सुरक्षित मानलं जातं. मात्र पॅरासिटामोल जास्त प्रमाण घेतलं तर लिव्हरवर ताण येतो. लिव्हरमधील एन्झामाईनची पातळी वाढते. लिव्हरचा आजार असणाऱ्यांचं, वजन कमी असणाऱ्यांचं लिव्हर कायमचं निकामी होण्याचा धोका असतो. किडनीवर ताण येऊ शकतो.. तसंच ब्लडप्रेशरमधेही अडथळा येऊ शकतो. तेव्हा साध्या साध्या आजारांवर जर तुम्ही सतत पॅरासिटामोलचा वापर करत असाल तर सावधान… पॅरासिटामोलचा हाच डोस तुमच्या जिवावर बेतू शकतो
उत्तर: पॅरासिटामोल हे सामान्यतः ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी किंवा सौम्य वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. हे स्वस्त आणि केमिस्टच्या दुकानात सहज उपलब्ध असल्याने लोक सर्रास याचा वापर करतात.
उत्तर: जास्त प्रमाणात पॅरासिटामोल घेतल्याने यकृतावर (लिव्हर) ताण येऊ शकतो, ज्यामुळे यकृतातील एन्झाइम्सची पातळी वाढते. यामुळे यकृत निकामी होण्याचा धोका, तसेच मूत्रपिंडावर (किडनी) ताण आणि रक्तदाबात (ब्लड प्रेशर) अडथळे निर्माण होऊ शकतात.
उत्तर: सामान्यपणे रिकाम्या पोटी पॅरासिटामोल घेणे सुरक्षित मानले जाते. तथापि, जास्त प्रमाणात किंवा सतत घेतल्यास यकृत आणि मूत्रपिंदावर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय याचा वापर टाळावा.
उत्तर: यकृताचा आजार असणाऱ्या व्यक्ती, कमी वजन असणारे आणि ज्यांना मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी पॅरासिटामोल घेताना विशेष काळजी घ्यावी, कारण यामुळे यकृत कायमस्वरूपी निकामी होण्याचा धोका असतो.
उत्तर: वारंवार आणि जास्त प्रमाणात पॅरासिटामोल घेतल्याने यकृतावर ताण येतो, ज्यामुळे यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो. तसेच, मूत्रपिंडावर दबाव आणि रक्तदाबाच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते.
उत्तर: सौम्य आजारांसाठी पॅरासिटामोलचा वापर टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैकल्पिक उपचार, नैसर्गिक उपाय किंवा औषधांचा योग्य डोस घ्यावा. तसेच, औषध घेण्यापूर्वी यकृत आणि मूत्रपिंडाच्या आरोग्याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.



फलटण :- फलटण तालुक्यातील निरगुडी येथील प्राथमिक शिक्षक सचिन काकडे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण शिक्षक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी, जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारवायांच्या धास्तीने व त्यामुळे आलेल्या मानसिक दडपणातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा सामाजिक माध्यमांपासून शिक्षकांमध्ये जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर अमर साबळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले,
“ऑनलाइन बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याऐवजी, दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करून शिक्षकांचा अमानुष छळ केला जात आहे. सचिन काकडे यांच्याकडे अपघातामुळे आलेले ४१ टक्के दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र असतानाही, केवळ २०२४ चे नियम लावून ते २९ टक्क्यांवर आणण्यात आले. हा अन्यायकारक प्रकार असून, प्रशासन शिक्षकांवर अन्याय करत आहे.”
साबळे यांनी पुढे गंभीर आरोप करताना सांगितले की,
“शिक्षकांना निलंबन व पोलीस कारवाईच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. कराड येथील हॉटेलमध्ये बसून ‘अपात्र दिव्यांग’ यादीतून नाव वगळण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ ‘मुगलशाही’ असून, आम्ही हे खपवून घेणार नाही.”
साबळे यांनी प्रशासनाला आव्हान देत म्हटले की,
“जर दिव्यांग प्रमाणपत्रे बनावट असल्याचा दावा केला जात असेल, तर ही प्रमाणपत्रे देणाऱ्या वैद्यकीय मंडळांवरच कारवाई व्हायला हवी. अनेक शिक्षकांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे, त्यामुळे तरी त्यांच्यावर कारवाई करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. शिवाय, विशिष्ट जातीच्या शिक्षकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. हा प्रकार न थांबल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील.”
शेवटी त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की,
“जिल्हा परिषद प्रशासनाने आपला मनमानी कारभार थांबवावा, शिक्षकांचा छळ त्वरित थांबवावा आणि सचिन काकडे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”
साताऱ्यातील कास पठारावर 132 प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर; पर्यटकांसाठी यंदा खास सोय
Source link