



Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खटाव (khatav)तालुक्यातील कटगुण गावातील गोसावी वस्तीवर एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून तिचा निर्घृण खून केल्याची ही गंभीर घटना असून, परिसरात शोककळा पसरली आहे. (Satara Crime News)
या घटनेत विनोद विजय जाधव (वय 26) या तरुणाने पत्नी पिंकी विनोद जाधव (वय 21) हिच्यावर लोखंडी गजाने डोक्यावर वार करून खून केला. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतःच पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने म्हटले, “मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी गजाने खून केला आहे, तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे,”
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आणि पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात पोहोचल्यावर पिंकी जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तत्काळ नातेवाईकांच्या मदतीने तिला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पिंकीला तीन लहान मुले आहेत. आईच्या मृत्यूनंतर मुलांचे भवितव्य अंधारात गेले आहे. या अमानवी घटनेमुळे गोसावी वस्ती आणि संपूर्ण कटगुण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विनोद जाधव याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याच्या स्वप्नाला अनुसरून, मुंबई (mumbai) वायव्येकडील खासदार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी “संसद क्रीडा महोत्सव – 2025” (sansad krida mahotsav – 2025) चे आयोजन करण्याची घोषणा केली आहे.
हा महोत्सव 21 सप्टेंबर ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत मतदारसंघाच्या विविध भागात आयोजित केला जाईल, ज्यामध्ये तालुका स्तरावरील स्पर्धांचा समावेश असेल.
या महोत्सवात खो-खो, कबड्डी, फुटबॉल, धावणे, क्रिकेट, पोहणे, योगा आणि कॅरमसारखे इनडोअर खेळ यासह विविध लोकप्रिय तसेच पारंपारिक खेळांचा समावेश असेल.
जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, ऑनलाइन नोंदणी लवकरच सुरू केली जाईल, तसेच कार्यक्रमाची माहिती आणि ठिकाणे प्रदान करणारी वेबसाइट देखील सुरू केली जाईल.
खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) के-पूर्व वॉर्ड कार्यालयात एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार मुरजी पटेल, नगरसेवक राजुल पटेल, प्रतिमा खोपडे, आत्माराम चाचे, कमलेश राय, सदानंद परब, सहाय्यक महानगरपालिका आयुक्त नितीन शुक्ला आणि के-पश्चिम, पी-दक्षिण आणि पी-उत्तर वॉर्डचे अधिकारी उपस्थित होते.
मेघवाडी, एमआयडीसी आणि अंबोली पोलिस ठाण्यांचे अधिकारी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रतिनिधी माधव कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, तहसीलदार स्नेहलता स्वामी, इस्माइल युसूफ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्वाती व्हावल, अंधेरी क्रीडा संकुलाचे अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि अनेक प्रमुख स्थानिक प्रतिनिधी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
या उपक्रमावर प्रकाश टाकताना खासदार रविंद्र वायकर (ravindra waikar) म्हणाले की, संसद क्रीडा महोत्सवाचे उद्दिष्ट तरुणांना खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे, तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी समाजाला चालना देणे आहे.
या कार्यक्रमामुळे तरुण खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल, अशी आशा आहे की मतदारसंघातील अनेक उदयोन्मुख खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.
हा कार्यक्रम 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय क्रीडा दिनी सुरू केलेल्या “फिट इंडिया मूव्हमेंट” शी देखील सुसंगत आहे, जो दरवर्षी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो.
“या महोत्सवाच्या माध्यमातून, मतदारसंघातील प्रत्येक तरुण खेळाडूला त्यांचे क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. मला विश्वास आहे की त्यापैकी बरेच जण देशाचे भविष्यातील क्रीडा नेते बनतील,” असे खासदार वायकर म्हणाले.
हेही वाचा
7 तासांपूर्वी
आजकाल दोन शब्दांची खूप चर्चा होत आहे – सँडविच पिढी(जनरेशन), किंवा असं म्हणा, मध्यमार्गी जीवन (मिडलाइफ). हे असेलोक आहेत ज्यांचे पालक वृद्धापकाळात जात आहेत आणि अजूनहीजिवंत आहेत. ज्यांची मुले बालपणापासून किशोरावस्थेत आणित्यापलीकडे प्रौढत्वात संक्रमण करत आहेत. म्हणून तीन पिढ्यांमधीलहा मध्यमवयीन टप्पा एक महत्त्वपूर्ण आव्हान निर्माण करतो.
त्यात मोठेहोणे समाविष्ट आहे. शरीराच्या अतिवापराने त्याचे आरोग्य बिघडते.जीवनात विचित्र बदल होतात. जबाबदाऱ्या कमी होत नाहीत म्हणून यामध्यमवयीन काळात असहायता, असुरक्षितता आणि गोंधळ निर्माणहोतो. अशा परिस्थितीत स्वतःमध्ये तुमची शक्ती शोधा. आपण विसरतोकी आपल्याकडे एक अशी शक्ती आहे जी आपण मध्यमवयीन आणिसँडविच पिढीमध्ये पूर्ण क्षमतेने जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
कारणशक्ती नेहमीच निष्पक्ष असते. ती उदासीन, सहभाग नसलेली आणितटस्थ असते. वृद्धापकाळ, बालपण आणि मध्यमवय हे आपापल्यापद्धतीने वापरू शकतात. प्रत्येक वयात ती कशी वापरायची हे समजलेपाहिजे, जमले पाहिजे.


फलटण : दुधातून स्वावलंबन, रोजगार आणि आधुनिकतेची जोड देत फलटणमधील ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या अग्रगण्य संस्थेने आपल्या कार्याचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. संस्थेचा ३० वा वर्धापन दिन अनंत मंगल कार्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
फलटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, महिला भगिनी तसेच तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने गेली तीन दशके सेवा बजावत असलेल्या या कंपनीने आज देशपातळीवर ‘गोविंद’ या ब्रँडला वेगळी उंची दिली आहे.
३० वर्षांपूर्वी लावलेले छोटेसे रोप आज वटवृक्षाच्या रूपात बहरले असून, दुग्धजन्य उत्पादनातील नवनवीन प्रयोग, पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड आणि उत्कृष्ट व्यवस्थापन या आधारावर ‘गोविंद मिल्क’ने यशाची नवी शिखरे गाठली आहेत.
या प्रवासामागे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) यांचे प्रामाणिक समर्पण, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे कल्पक नेतृत्व, श्रीमंत सौ. मिथिलाराजे सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (वाहिनीसाहेब) यांची साथ आणि या ब्रँडचे शिल्पकार मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे उत्तम व्यवस्थापन हे यशाचे आधारस्तंभ ठरले आहेत. यासोबतच गोविंद परिवार, शेतकरी आणि हितचिंतक यांचे योगदान मोलाचे मानले जाते.


फलटण : शेतकऱ्यांच्या केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने पुन्हा एकदा राज्यस्तरीय यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे तर्फे दिला जाणारा मा. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार सन 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार समितीला सलग तिसऱ्यांदा मिळाल्याने राज्यस्तरीय “हॅटट्रिक” पूर्ण झाली आहे.
समितीच्या वतीने संचालिका सौ. जयश्री गणपत सस्ते यांनी उपाध्यक्ष भगवानराव होळकर, संचालक, सचिव व स्टाफ यांच्या उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
यापूर्वी समितीला मिळालेले पुरस्कारांमध्ये –
1️⃣ वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार
2️⃣ महाराष्ट्र शासनाचे स्टेट रँकिंग (स्मार्ट) – जिल्ह्यात सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक, कोल्हापूर विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक
3️⃣ नवराष्ट्र-नवभारत टाइम्सचा बेस्ट APMC पुरस्कार
चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पक दृष्टीकोनाखाली समितीने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांवर तोडगा काढणे, शेतमालाला चांगला दर मिळवून देणे, ई-नाम कामकाज, वृक्षारोपण, शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे.
पुरस्कारप्राप्तीनिमित्त मंत्री जयकुमार रावल, विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेतकरी व मार्केट फंक्शनरीज यांनी समितीचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सहकार व पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या.
समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी, संचालक मंडळ, सचिव शंकरराव सोनवलकर व संपूर्ण स्टाफ यांच्या टिमवर्कचे फळ आहे. या सर्व घटकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”