

Shambhuraj Desai on Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी ठेवण्या विषयी घेतलेल्या आक्षेपावरुन मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये भगवा फडकला त्यावेळी आनंद दिघे यांच्या कामाचे कौतुक केले होते असे देसाई म्हणाले. त्याचे काही व्हिडिओ अजूनही माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत असे देसाई म्हणाले. तसेच संजय राऊत हेच सर्वात मोठे गद्दार असून भाजप महायुती मधून निवडून येऊन देखील त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रवृत्त केल्याचे देसाई म्हणाले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये भगवा फडकला त्यावेळी आनंद दिघे यांच्या कामाचे कौतुक केले होते असे देसाई म्हणाले. बाळासाहेब ठाकरे जे बोलले ते संजय राऊत यांना मान्य नाही का? असा सवाल शंभूराज देसाई यांनी केला आहे. एवढे संजय राऊत मोठे लागून गेले का? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचा असून संजय राऊत हेच सर्वात मोठे गद्दार असून भाजप महायुती मधून निवडून येऊन देखील त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रवृत्त केलं. त्यामुळे सर्वात मोठे गद्दार पहिले संजय राऊत असल्याचा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय? अशा पद्धतीने ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा राष्ट्रीय कट आहे असा थेट आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला. आपण हे आनंद दिघे यांचा आदर ठेऊन बोलत आहोत असंही राऊत म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांचे नेते हे नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत असा टोला राऊत यानी लगावला. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिंदे गट ज्या जाहिराती करतो त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखाएवढाही नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला तुम्ही शिवसेना जिल्हाप्रमुखाचा फोटो लावता? तुम्हाला बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड कमी करायचा आहे का? बाळासाहेबांच्या बाजूला आणखी एक फोटो लावणे हा एक राष्ट्रीय कट आहे. बाळासाहेबांचे महत्व कमी करण्यासाठी तुम्ही या गोष्टी करताय हे जनता लक्षात ठेवते. आनंद दिघेंचा पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतोय.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा

सातारा – भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने महाबोधी महाविहार (बोधगया), महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अभिवादन करून झाली. गगनभेदी घोषणा देत जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच झाला. या मोर्चात जिल्हा, तालुका व ग्रामशाखांसह आंबेडकरी बहुजन समाजाच्या समविचारी संस्था आणि संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेरव, जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे, तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आंबेडकर स्मारक समिती, सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ यांसारख्या संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावोगावांतून आलेल्या जनसमुदायामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आक्रोश घुमला.
या जनआंदोलनाचे औचित्य अनागरिक धम्मपाल यांच्या जयंती दिन आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति दिनाशी साधण्यात आले. या आंदोलनाच्या मागण्यांसाठी डॉ. ऍड. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात बौद्ध इंटरवेंशन याचिका दाखल केली आहे.
मोर्चाच्या सांगता प्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित राहून या ऐतिहासिक अस्मिता लढ्याला जोरदार पाठिंबा दर्शविला.

फलटण (साहस Times प्रतिनिधी ): फलटण नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एका मुख्याधिकाऱ्याला इतक्या भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. तत्कालीन मुख्याधिकारी . निखिल मोरे यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात प्रामाणिक कामगिरी, सौजन्यशील वर्तणूक आणि आत्मीयतेच्या नात्यामुळे मिळवलेल्या लोकप्रियतेचा प्रत्यय निरोप समारंभात आला.
नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एकाच वेळी श्री. मोरे यांचा निरोप समारंभ आणि नूतन मुख्याधिकारी . निखिल जाधव यांचे स्वागत समारंभ पार पडले. दुहेरी सोहळ्याच्या या अनोख्या आयोजनामुळे संपूर्ण वातावरण अविस्मरणीय झाले.
आपल्या कार्यकाळात निखिल मोरे यांनी पालखी सोहळ्याचे यशस्वी नियोजन, बाणगंगा नदीच्या पूरस्थितीचे कुशल व्यवस्थापन, टाटा कमिन्स सीएसआर निधीतून पालिकेच्या शाळांसाठी सुविधा मिळवून देणे, तसेच शहरात प्रथमच स्वातंत्र्यदिनी तिरंगा रोषणाई उभारून कामाचा ठसा उमटवला.
प्रशासकीय कामकाजाबरोबरच त्यांच्या संवेदनशीलतेची झलकही वारंवार दिसून आली. निरोपाच्या दिवशी एका चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याला आपल्या खुर्चीवर बसवून केलेला सन्मान संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. त्याच दिवशी अनुकंपा तत्वावर चार जणांना नोकरी देऊन त्यांनी अनेक कुटुंबांना दिलासा दिला.
या कार्यामुळेच अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते त्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित राहून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली.



23 तासांपूर्वी
उत्तर भारतात या पावसाळ्यात झालेल्या विध्वंसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. विशाल असा भूभाग पाण्याखाली गेला. घरे, शाळा- रुग्णालये उद्ध्वस्त झाली. रस्ते उद्ध्वस्त झाले. शेतात पाणी शिरले. ढगफुटीच्या मालिकेमुळे मोठ्या प्रमाणात डोंगर कोसळले. परिस्थिती पाहता जीवित व मालमत्तेच्या नुकसानीची कल्पना येऊ शकते. या क्षेत्रात पावसाची ही तीव्रता सामान्य नाही. ऑगस्ट महिन्यात पंजाबमध्ये ३१ पैकी २४ दिवस मुसळधार व अत्यंत मुसळधार पाऊस पडला. हवामान विभाग ११२ मिमी पेक्षा जास्त पावसाला “जोरदार’ आणि २०४ मिमी पेक्षा जास्त पावसाला “अत्यंत मुसळधार’ असे वर्गीकृत करतो. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू – काश्मीरमध्येही अशीच परिस्थिती अनुभवली गेली. हिमाचल प्रदेशने सर्व विक्रम मोडले. गेल्या तीन महिन्यांत ९०% पेक्षा जास्त दिवस मुसळधार व अतिवृष्टीची नाेंद झाली. सरकारी आकडेवारीनुसार ढगफुटीशी संबंधित पुराच्या १३ घटना घडल्या तर माध्यमांनी १० घटना नोंदवल्या. जून – ऑगस्टमध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये सामान्यपेक्षा अंदाजे ५०% जास्त पाऊस पडला. आठवड्याच्या सरासरी म्हणून पाहिले तर विध्वंसाचे प्रमाण स्पष्ट होते. उदाहरणार्थ, ऑगस्टच्या शेवटच्या पंधरवड्यात पंजाबमध्ये सामान्यपेक्षा ४००% जास्त पाऊस पडला. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान हिमाचल प्रदेशात राज्याच्या आठवड्याच्या सरासरीपेक्षा ३००% जास्त पाऊस पडला. म्हणूनच आपण अशा विध्वंसाचे साक्षीदार आहोत.
अखेर हे का घडत आहे? ही निःशंकपणे हवामान -आणीबाणी आहे. हा विनाश कोणत्याही किंमतीवर विकास करण्याच्या प्रक्रियेतील बेपर्वाईला दर्शवणारा आहे. संपूर्ण जग हवामान बदलाला कारणीभूत ठरणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी संघर्ष करत असताना हे परिणाम अधिक विनाशकारी होतील. पण आपल्याला आता सुधारणा करण्याची वेळ आली आहे. म्हणजे आपण पुढच्या वेळी पूर किंवा ढगफुटीमुळे होणारे नुकसान कमी करू शकतो.हवामान कसे बदलत आहे? याचे एक प्रमुख कारण म्हणजे हवामान प्रणालींमध्ये बदल. आपल्याला माहिती आहे की हवामान जेवढे उष्ण असेल तितका जास्त पाऊस असेल. शिवाय ताे तुलनेने कमी दिवसांत पडेल. गेल्या हंगामात आपण संपूर्ण हंगामातील पाऊस काही तासांतच पडताना पाहिला. परंतु या हवामान पद्धतीत बरेच काही घडत आहे.
आपण समाधान मानून शांत बसू शकत नाही. तसेच हवामान बदलाला दोष देऊन या प्रश्नावर आपण माणूस म्हणून काय करू शकताे, असा बहाणाही चालणार नाही. हा विनाश ईश्वर करत नाही. हे कृत्य आपलेच असून ते आता आपल्या उंबरठ्याशी येऊन पाेहाेचले आहे.
पश्चिमी विक्षोभ ही नैसर्गिक घटना आहे. भूमध्यसागरीय प्रदेशातून येणारे वारे चक्रीवादळे व पाऊस आणतात. परंतु यावेळी पश्चिमी विक्षोभाचे कारण दिसत नाही. सहसा, नैऋत्य मान्सूनदरम्यान एक किंवा दोन विक्षोभ येतात. परंतु यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १९ विक्षेप दिसून आले. हे वारे प्रत्यक्षात मान्सूनच्या वाऱ्यांशी टक्कर देत आहेत. त्यामुळे उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये विनाशकारी पाऊस पडत आहे. पश्चिमी विक्षेप आर्क्टिकमधून येणाऱ्या जेट स्ट्रीम वाऱ्यांशी जोडलेले आहेत. हवामान बदलामुळे आर्क्टिक वायु प्रणाली कमकुवत होत असल्याने, ते इतर संबंधित जागतिक वायु प्रणालींवर परिणाम करत आहे.या वर्षी अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वायु प्रणालींमध्ये काहीतरी वेगळे घडत आहे. ते बंगालच्या उपसागरातून मान्सून वारे वाहत आहेत. हे अनेक घटकांचे एकत्रित परिणाम आहे – त्यात महासागरापासून आर्क्टिक प्रदेशात वाढती उष्णता व विषुववृत्त आणि उत्तर ध्रुवामधील कमी होत जाणारा तापमान फरक यांचा समावेश आहे. ही अस्थिरता आता पुराच्या स्वरूपात आपल्यावर परिणाम करत आहे. जणू निसर्ग आपल्यावर सूड उगवत आहे.हवामान बदल हा माणसाच्या आर्थिक विकास आणि लोभातून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्जनाचा परिणाम आहे. विकासाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन या समस्येला आणखी गुंतागुंतीचे करत आहे. आपण पूरग्रस्त भागात इमारती बांधत आहोत आणि पुरेसे ड्रेनेजचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहोत. डाेंगराळ भागात अतिक्रमण करत आहाेत. तेथे घरे, रस्ते आणि धरणे बांधत आहाेत. परंतु हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहे का, असाही विचार केला जात नाही. मी बरेच काही सांगू शकते. परंतु मी आता पुरे झाले म्हणते तेव्हा तुम्हाला माझे दुःख समजेल अशी आशा आहे. अनुकूल व विविध पद्धतींचा अवलंब करू, असे बाेलण्याची वेळ संपली आहे. आपण आता हवामान बदलाच्या युगात जगत आहोत.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)

