<p>Mhaswad Flood : जिथे महापूर शक्य नाही, अशा दुष्काळी माणमधील धडकी भरवणारी परिस्थिती </p>
Source link
Mhaswad Flood : जिथे महापूर शक्य नाही, अशा दुष्काळी माणमधील धडकी भरवणारी परिस्थिती
आईच्या मांडीवर जेवताना पायाला काहीतरी चावलं, दूर्लक्ष केलं पण नंतर सारेच धास्तावले, 4 वर्षीय चि
Satara: गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जवळपास निम्मे राज्य पूरग्रस्त परिस्थितीत आहे . अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे . अनेक शेतांमध्ये पाणी घुसलंय . अशातच अनेक सर्पदंशाच्या घटना समोर येत आहेत . सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गुरुवारी सकाळी केळघर गावातील श्रीशा मिलिंद घाडगे ही चार वर्षांची चिमुकली सर्पदंशाची बळी ठरलीय. (snake bite)
पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात सर्पदंशाचा धोका जास्त असल्याचे वेळोवेळी सांगितले जात असले तरी योग्य उपाययोजना आणि तत्काळ आरोग्य सेवा न मिळाल्याने एका निष्पाप जीवाला आपला प्राण गमवावा लागला.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. श्रीशा आईच्या मांडीवर बसून जेवत होती. त्याचवेळी तिच्या पायाला काहीतरी चावल्यामुळे ती किंचाळली. आईला तेव्हा उंदीर असेल असं वाटलं आणि त्या ओरडण्याकडे तिने फारसं लक्ष दिलं नाही. पण काही क्षणांनी घरातील बिळातून साप बाहेर येताना दिसला आणि कुटुंबीयांच्या धास्तीचं कारण स्पष्ट झालं. घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलीला तातडीने उपचारासाठी नेलं.
आरोग्य केंद्राचा निष्काळाचीपणा, ग्रामस्थांचा आरोप
श्रीशाला प्रथम केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे योग्य उपचारच झाले नाहीत. एवढंच नव्हे तर आरोग्य केंद्रात दोन रुग्णवाहिका असूनही त्या उपलब्ध करून दिल्या नाहीत, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी कुटुंबीयांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागला. त्यांनी श्रीशाला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं, परंतु तेथे पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेनंतर गावकरी संतप्त झाले आहेत. आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळेच लहानग्या मुलीचा जीव गेला, असा आरोप करत ग्रामस्थांनी केळघर येथे ठिय्या आंदोलन छेडलं. त्यांनी जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तपास सुरू केल्याचं कळतं.
जावळी तालुका हा अति पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसात सापांचे प्रमाण वाढते आणि ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वाढतात. परंतु अशा प्रसंगी योग्य आरोग्य सेवा तातडीने मिळणं गरजेचं असताना, आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणामुळे एका निरागस जीवाला प्राण गमवावा लागला. असा आरोप गावकरी करतायत .
Heavy Rain Crop Damage | साताऱ्यात Soybean चे मोठे नुकसान, बळीराजाला अश्रू अनावर
आणखी वाचा
दुष्काळ पाचवीला पुजलेल्या साताऱ्यातील माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर! म्हसवडला सुद्धा तडाखा
Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हसवड शहराला जोरदार फटका बसला आहे. शिंगणापूर रस्त्यालगतच्या भागात पाण्याचा वेढा निर्माण झाला असून रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. अचानक पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस
दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर आला आहे. म्हसवड येथील माणगंगा नदीने पुराचे पातळी ओलांडली आहे. त्यामुळे म्हसवड नगरपरिषदेकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे.
कोयना धरणातून विसर्ग वाढवला
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे 1 फुटांनी उघडून 6400 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाचा पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिटमधून 2100 क्युसेक विसर्ग सुरू असून असा एकूण कोयना नदीमध्ये 11,700 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर धरणातून विसर्ग वाढू शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव आणि मिरज तालुक्यातील बेळंकी मंडळात सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासात 90.8 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व पाचही म्हणजे ढालगाव, देशिंग, कुणी, हिंगणगाव व कवठेमहांकाळ मंडळात 73.5 ते 90.8 मिलीमीटर पाऊस झाला. अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तासगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, येळावी, मणेराजुरी,सावळज आणि वायफळे मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: आपले शब्द सत्याच्या जवळ असतील असा संकल्प करा
- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, Resolve That Your Words Will Be Close To The Truth
1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक
भविष्यात, माहितीचे सत्य जाणून घेणे कठीण होईल आणितंत्रज्ञानाच्या वाढत्या जगात हे घडेल. आघाडीचे शास्त्रज्ञ देखीलयावर विश्वास ठेवू लागले आहेत. तंत्रज्ञान निर्माण करणारे देखीलघाबरले आहेत. असे म्हणतात की त्यांनाही या तंत्रज्ञानाचे परिणाममाहीत नाहीत. तंत्रज्ञान आपल्या खिशात बाळगत असताना त्यासाठीइतके उत्साहित का व्हावे की प्रत्येक पाऊल जणू काही आपणआकाशातच उडत आहोत, असा भास व्हावा? बहुतेक लोकांचे जीवनअनियंत्रित झाले आहे.
चुकीची माहिती आणि प्रचाराचे एक मोठेउदाहरण आधीच समोर आले आहे. एका मोठ्या देशाचे राष्ट्रपतीखोट्या माहितीच्या आधारे लोक त्यांची व्यवस्था कशी चालवतील हेदाखवत आहेत. भारतीय संस्कृतीचे लोक म्हणून, आपण आपल्यापरंपरेकडे थोडे मागे वळून पाहिले पाहिजे, जिथे आपण शब्दांना ब्रह्ममानले गेले आहे. दैनंदिन प्रार्थनेत मंत्रांचे पठण केले आणि मंत्रांचा जपकेला तर असा संकल्प करा की, नेहमीच सत्याच्या जवळ असतील.
12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत… त्यानंतर पत्नीने केलं खतरनाक कांड

Crime News : उत्तर प्रदेशमधील झाशीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या रविवारी बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात ओम प्रकाश रायकवारचा मृतदेह सापडल्यानंतर तपासात या घटनेचा भयानक खुलासा झाला आहे. ओमचा मृतदेह हा रक्ताने माखलेला असल्याने अवघ्या 24 तासात पोलिसांनी मृताची ओळख पटवून या घटनेचा पदाफार्श केला आहे. पोलीस तपासात ओमची हत्या त्याच्या बायकोने केली आहे. एवढंच नाही या हत्येमध्ये त्याची मेव्हणी आणि मेव्हणीच्या प्रियकर सहभागी होते. या तिघांनी पोलिसांनी अटक केली आहे.
हत्यामागील कारण काय?
ओम प्रकाश हा झाशीचा रहिवाशी होता. याने 12 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील निवारी येथे राहणाऱ्या जयकुंवर नावाच्या तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांनी दिल्लीत संसार थाटला होता. त्यानंतर 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला होता. झाशीमध्ये आपल्या घराजवळच असलेल्या नजीकच्या पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये तो कामावर होता. यावेळी त्याची पत्नी जयकुंवर आणि त्याची मुलगी त्याच्यासोबत तिथे राहत होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या हत्येमागे कारण असं ठरलं की, जयकुंवरची बहीण हरदेवी ही देखील कधी-कधी आपल्या बहिणीच्या घरी येत होती. या काळात हरदेवी आणि ओम प्रकाश यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेम संबंधातून त्यांनी शारीरिक संबंधदेखील ठेवले. पण काही दिवसांनी या गोष्टीची कुणकुण जयकुंवर लागल्यानंतर तिने बहीण हरदेवीचा बॉयफ्रेंड अमर सिंग याला सांगितली.
यानंतर ओमच्या पत्नीला कळल्यानंतर ओमने पत्नीला मारहाण केल्याचा तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर तिने या रागाच्या भरातून धक्कादायक पाऊल उचले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृताच्या पत्नीने, तिची बहीण हरदेवी आणि तिचा प्रियकर अमर सिंग यांच्यासोबत मिळून ओम प्रकाशची हत्या करण्याचा कट रचला. कटाचा एक भाग म्हणून जयकुंवर हिने पतीला फसवून गावात बोलावलं आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली.
FAQ
1. झाशी हत्याकांड नेमके काय आहे?
झाशीमधील बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात 22 सप्टेंबर 2025 (रविवार) रोजी ओम प्रकाश रायकवार (वय 35) यांचा रक्तमाखलेला मृतदेह सापडला. तपासात उघड झाले की, त्याची पत्नी जयकुंवर, बहीण हरदेवी आणि हरदेवीचा प्रियकर अमर सिंग यांनी मिळून हत्या केली. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
2. हत्येची घटना कधी आणि कुठे घडली?
हत्येची घटना 21 सप्टेंबर 2025 रोजी झाशी जिल्ह्यातील बाबिना पोलीस स्टेशन परिसरात घडली. मृतदेह 22 सप्टेंबर रोजी जंगलात सापडला. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी मृताची ओळख पटवली आणि तपास पूर्ण केला.
3. ओम प्रकाश रायकवार यांची पार्श्वभूमी काय आहे?
ओम प्रकाश रायकवार हा झाशीचा रहिवासी होता. 12 वर्षांपूर्वी त्याने मध्य प्रदेशातील निवारी (मंदसौर) येथील जयकुंवरशी पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दिल्लीत संसार थाटला, आणि 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला. तो झाशीतील पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये काम करत होता.
फलटणमध्ये दांडिया धमाल – महिलांसाठी खास आयोजन

फलटण : जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने “दांडिया धमाल” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०१५ रोजी सायं. ५.०० वा. पासून रंगणार आहे.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध आकर्षक उपक्रम ठेवण्यात आले असून, आकर्षक बक्षिसांची देखील सोय करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि उत्साही महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन सणाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंगळवार दि.३०/०९/२०१५ रोजी
वेळ-सायं. ५.०० वा.
स्थळ-अनंत मंगल कार्यालय, फलटण.
नवरात्र उत्सवासाठी फलटण नगर पालिकेकडून विशेष वाहतूक नियोजन

🛕 माळजाई मंदिर येथे 28 सप्टेंबर रोजी भाविकांसाठी विशेष व्यवस्था
फलटण : नवरात्र उत्सवानिमित्त माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने रविवार, दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी माळजाई मंदिर येथे नवरात्र उत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भाविक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
रविवारच्या आठवडी बाजारामध्ये मुधोजी क्लबच्या बाजूच्या रस्त्यावर, महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा या ठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या पर्यायी जागेवर आपली दुकाने लावावीत, असे आवाहन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. निखिल जाधव यांनी केले आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या या नियोजनामुळे भाविकांना मंदिरात दर्शनासाठी व नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुविधा होणार आहेत.
फलटण नगरपालिकेच्या 97 हरकती फेटाळल्या : दिवाळीपूर्वीच आरक्षण जाहीर होणार!

P
फलटण : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या होत्या. यातील बहुतांश हरकती फेटाळण्यात आल्या असून प्रभाग रचनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
फलटण नगरपालिकेसाठी तेरा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. या रचनेवर तब्बल 97 हरकती दाखल झाल्या होत्या, मात्र त्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती आखणे शक्य होणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गण रचनेबाबतही अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, पण न्यायालयाने अनेक निर्णय फेटाळले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती मिळत आहे.
आगामी 15 ते 20 दिवसांत आरक्षणाची अंतिम घोषणा अपेक्षित असून यामुळे इच्छुकांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. परिणामी स्थानिक राजकारणात दिवाळीपूर्वीच निवडणुकीचा उत्साह ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: तुम्हाला एकांतात प्रवेश जमला तर त्याच्या शक्तीचा वापर जमेल
- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, If You Can Enter Solitude, You Can Use Its Power
14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
असे म्हटले जाते की, स्वप्ने केवळ भंग होत नाहीत तर ती मरतात. स्वप्नांना दहन किंवा दफन करण्याची घाई करू नका. स्वप्ने पुन्हा जिवंत केली जाऊ शकतात. आपण यशस्वी, आनंदी लोक पाहतो, परंतु त्यांची स्वप्ने भंगली हे बाहेरून समजू शकत नाही. आज क्वचितच एखादेच असे हृदय असेल जे जखमांनी भरलेले नाही. प्रसन्न चेहऱ्याच्या मागेही अनेक खोल वेदना आहेत.
आपल्याला आपले एखादे स्वप्न मृतवत आढळले तर आपण प्रथम हे काम केले पाहिजे की, एकांत शोधणे. एकांतात, आपण देवासोबत आहोत. एकांत विश्रांतीपेक्षा वेगळा आहे. आपण ध्यानाद्वारे एकांताचा सराव केला तर आपल्याला आढळेल की आपण त्या स्वप्नांना पुन्हा जिवंत करू शकतो.
एकांत आपल्याला अशी ऊर्जा प्रदान करतो जी शक्तीमध्ये रूपांतरित होते॰ नवरात्रीत एकांताचा सराव खूप फलदायी होईल. आपण जितके जास्त लोकांत स्वतःला वेढून घेतो तितके आपण विचलित होतो. तुम्ही जितके एकांतात जाल तितके तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर करू शकाल
फलटण तालुक्यातील १३ कि.मी. रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा

रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पाठपुरावा – मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तालुक्याला दिलासा
फलटण : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील १३ कि.मी. लांबीचे ५ अवगीकृत/योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे.
या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची गुणवत्ता व सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उंचावणार असून, शेतकरी व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळालेले रस्ते :
- राजाळे गाव – फलटण आसु रस्ता (टेंगील वस्ती ते अनपट वस्ती) : २ कि.मी.
- राजाळे गाव अंतर्गत – आसु रोड ते पिंपरद रस्ता : ४ कि.मी.
- राजाळे जाधव वस्ती (शिवाजीनगर) ते सोनगाव रस्ता : १ कि.मी.
- आळजापुर ते पवार वस्ती – मसुगडे वस्ती ते रणदिवे वस्ती : ३.५० कि.मी.
- आळजापुर ते शिंदे वस्ती (धनगरवाडा) बिबी रस्ता : २.५० कि.मी.
स्थानिक नेत्यांचा पुढाकार
या पाठपुराव्यात आमदार सचिन पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व विलासराव नलवडे यांनी विशेष भूमिका बजावली.
यापुढे फलटण तालुक्यातील रस्त्यांसाठी आणखी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

