महाराष्ट्रात खोदल्या गेलेल्या अनेक लेण्यांची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते जेव्हाकी लेणी ह्या आपला अनमोल ठेवा आहे सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्याही त्या महत्त्वाच्या आहेत,असे धार्मिक स्थापत्य प्रकार आधी महाराष्ट्रात नव्हती आज एकविसाव्या शतकात तांत्रिकदृष्ट्या आपण प्रगत असताना देखील असे वास्तू प्रकार आपण घडवू शकणार नाहीत तर असलेली वास्तू जोपासली जावी ही मानसिकता तयार होणे गरजेचे आहे .
महाराष्ट्रात “लेणी” हा वास्तू प्रकाराला सुरुवात जरी भाजा लेणी पासून झाली असली तरी तिच्या समकालीन असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील “पितळखोरा लेणी” देखील आद्य लेणी म्हणुनच गणली जाते “पीतांगल्य” हे तिचे पूर्वीचे नाव इ स पुर्व दुसऱ्या शतकातील ही तशी थेरवादी शाखेची लेणी पण इ स पाचव्या शतकात महायना शाखेच्या प्रभावाखाली आल्याने इथे तथागतांचे, बौध्दीस्तवांचे भित्तीचित्रे पाहायला मिळतात ही लेणी १८५३ मध्ये प्रथमता प्रकाश झोतात आणली ती संशोधक जॉन विल्सन यांनी “जनरल अॉफ रॉयल एशियाटिक सोसायटी” च्या ४ क्र खंडात या लेणीचा पहिल्यांदा उल्लेख मिळतो तसेच १८८० मध्ये जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी आपल्या “The Cave Temple of India” या आपल्या पुस्तकात तीचा उल्लेख मिळतो त्यात फक्त १ ते ९ फक्त या लेण्यांचीच माहिती मिळते नंतरच्या काळात M N Deshpande सरांनी १९५७/५८ मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले त्यात हत्तींची रांग काही शिल्प टेराकॉटा म्हणजे भाजकी भांडी सापडली तसेच “संकरीन यक्ष” स्फटिकात तयार केलेले स्तूपाच्या आकाराचे शरीर धातू ठेवण्यासाठी तयार केलेले करंडक सापडले होते आणि चार क्रमांकाच्या लेणीकडे जाणार्या दरवाज्यात दोन सुस्थितीत उभे असलेले द्वारपाल सापडले.
१९५३ साली ही लेणी “राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित करण्यात आली आहे, ही लेणी जाहिर केल्यापासून “संरक्षित” आहे असे म्हणता येईल का…?
पितळखोरा लेणी संरक्षित नाही असे म्हणायला खूप मोठा वाव आहे कारण ज्या वेळेस चार क्रमांकाच्या लेणी समोरील ढिगारा १९५७/५८ साली उपसला गेला तेव्हा त्या खाली दोन द्वारपाल सापडले जे अत्यंत सुंदर आणि सुस्थितीत होते लेणी समोरील उभे असलेल्या द्वारपालांच्या पेहराव्या वरून गत काळातील राहणीमान आपल्याला लक्षात घेता येते, तेव्हा हे द्वारपाल व्यवस्थित व सुस्थितीत होते त्या नंतरच्या काळात मात्र हळू हळू हे शिल्प नष्ट करण्यास सुरुवात झाली, नष्ट करण्याचा सपाटाच लावला होता मिळालेल्या माहितीनुसार इथल्या खालच्या गावातील गुरे चरायला आणणाऱ्या मुलांनी हे शिल्प दगड मारून मारून तोडले आहे तसेच हत्तींच्या रांगे आधी एक घोड्याचे शिल्प तसेच एक युगुल असलेलं शिल्प कोरलेले होते कदाचीत ते राज घराण्यातील स्त्री पुरुषाचे होते ते देखील नष्ट केले गेले आज ती शिल्प आपल्याला पाहायला मिळत नाहीत, जर “राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित असलेल्या महाराष्ट्रात प्रथम खोदलेल्या लेणींच्या श्रृंखलेतील आद्य लेणीची ही अवस्था आहे तर बाकीच्या छोट्या लेणी /स्मारकांची अवस्था काय असेल ही फक्त कल्पनाच करा.
जागतिक किर्ती मिळवली “अजिंठा लेणी” च्या जवळच असलेल्या या पितळखोरा लेणीकडे पर्यटक फारसे फिरकत नाही फक्त अभ्यासाच्या दृष्टीने येणारी मंडळी इकडे वळतात.
आपला सांस्कृतिक ठेवा जोपासण्यासाठी पाहण्यासाठी आम्ही अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अनेक लेणींनवर जात असतो त्यामुळे आपला वाढलेला वावर पाहून नासधूस करणारी मंडळीना आळा बसतो , अशा बारीकसारीक तपशीलवार माहिती जाणुन घेण्यासाठी येणार्या दिवसात आम्ही असाच एक अभ्यास दौरा आयोजित करत आहोत ज्यांना या अभ्यास दौऱ्यात समाविष्ट होण्याची इच्छा आहे त्यांनी खालील नंबरवर आपला संपूर्ण पत्ता आणि माहिती व्हॉट्स अप वर पाठवायची आहे.
संदर्भ
१) The Cave temple of India : James Burgess
२) Pitalkhora Cave Report : M N Deshpande
३) भारतीय कलेचा इतिहास : डॉ अनिल कठारे
सूरज रतन जगताप