
यानंतर योजनाने थेट टीव्ही मुलाखत देत आपले आरोप खोटे असल्याचे म्हटले. आपण हे केवळ सूड भावनेने केल्याचे देखील तिने स्पष्ट केले. याशिवाय तिने लावलेले सगळे आरोप देखील मागे घेतली. यावेळी ती म्हणाली की, ‘राघव कर्णिक यांनी आपल्याला अगदी लहान बहिणीप्रमाणे प्रेम दिले होते. त्यांनी मला नेहमीच खूप मदत केली होती. मात्र, मीच सूड भावनेतून राघवविरोधात एक व्हिडीओ बनवला, ज्यात त्यांनी आपल्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोपही केला. मात्र, आता मी स्वतः माझी चूक मान्य करून त्यांची जाहीर माफी मागत आहे.’ यानंतर आता सगळेच कर्णिक खूश झाले असून, त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.








