
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात एका पतीने पत्नीचा खून केला. कारण ती सोशल मीडियावर सक्रिय होती आणि ती तिच्या ऑनलाइन मित्रासोबत बोलायची.
कोलकाता : आजकाल पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण होऊन नातं तुटण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, अनेकदा अशी भाडणं मोठं स्वरुप घेऊन त्याचं रुपातंर गुन्हात होताना दिसतं. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडला आहे. सोशल मीडियावर असलेल्या मैत्रीमुळे एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही महिला सोशल मीडियावर सक्रिय होती. त्याचे अनेक ऑनलाइन मित्र होते. ती सोशल मीडियावर मित्रांशी बोलायची, मात्र नवऱ्याला हे मान्य नव्हते, यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्याने पत्नीला तसे करण्यास मनाई केली, परंतु तिनं मान्य न करत त्याच्यांशी बोलणं सुरूच ठेवलं. यामुळे संतापलेल्या पतीने भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीचा गळा चिरून खून केला.
हे सुद्धा वाचा
नेमका प्रकार काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील जयनगरमधील रुपनारायणपूरच्या हरिनारायणपूरमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. पत्नीची हत्या करून आरोपी पळून गेला. महिलेचा अल्पवयीन मुलगा घरी परतला तेव्हा त्याला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. अपर्णा बैद्य असे मृत महिलेचे नाव आहे. परिमल असे आरोपीचे नाव आहे. या दाम्पत्याच्या मुलाने सांगितले की, त्याच्या आई-वडिलांमध्ये भांडणे होत होती. तिच्या वडिलांनी तिच्या आईला अनेक वेळा तिचे तुकडे करण्याची धमकी दिली होती.









