
Mumbai News: मुंबईतील एका शाळेत मुलांना प्रवेश देताना अर्जाद्वारे पालकांकडे काही खाजगी गोष्टी विचारल्या जात असल्याचा प्रकार समोर आला. स्टँडअप कॉमेडियन श्रीधर व्ही यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्यानंतर चर्चेला उधाण आले. पालकांना विचारण्यात येणारा प्रश्न त्यांच्या मुलाच्या करिअरशी जुडीत असायला हवा आणि पालकांच्या खाजगी गोष्टींशी त्याच्या काहीही संबंध नसला पाहिजे, असा सल्ला पालकवर्गाकडून दिला जात आहे.