
याचाच एक किस्सा त्यांनी यात सांगितला. ते म्हणाले, ‘आमच्या प्रोडूसर कै.वासवानीने ‘सुन लाडकी सासरची’ चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते. त्यांना इतकी खात्री होती की, सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार. सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्ही आमचं काम करत असताना मन मोकळं होतं. सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का? टॉक्सिक होत असेल का? स्ट्रेसफुल होत असेल का? म्हणून लोक आजारी पडत असतील का? महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं….’ त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.








