
सुखं म्हणजे नक्की काय असतं
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आता नित्या आणि अधिराज यांना आपल्या पुनर्जन्माची आठवण होणार आहे. अधिराजच्या आईला त्याच्या आयुष्यात नित्याचा येणं पटलेलं नाही. मात्र, ही देवीचीच कृपा असल्याचे सगळ्यांचे मत आहे. आता एका उत्सवदरम्यान नित्या म्हणजेच गौरीला तिच्या पुनर्जन्माची आठवण होणार असून, ती अधिराजला जयदीप या नावाने आवाज देणार आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यती पाचवं स्थान पटकावलं असून, ५.८ रेटिंग मिळवले आहे.