
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. आता थेट मुंबईत घुसणार असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करत असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे.