
महाराष्ट्रात सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत जाऊन उपोषण सुरू करणार आहे. त्यासाठी २० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावातून जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने ‘मराठा आरक्षण दिंडी’ कूच करणार असून उपोषणात सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मराठा कार्यकर्ते मुंबईत धडकणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुंबईत उपोषणाला बसण्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्क किंवा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानापैकी एक ठिकाण येत्या एक दोन दिवसांत निश्चित केले जाईल अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.





