
मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानं राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. आमदारांच्या घरावर, कार्यालयांवर हल्ले होत आहेत. हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे म्हणत मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.





