
हा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेसोबतच मुंबईतील दैनंदिन व्यवस्था ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळं राज्य सरकार मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. सरकारनं आज एक जीआर काढला असून तो जरांगे पाटील यांच्याकडं पोहोचवण्यात आला आहे. त्या जीआरमध्ये नेमकं काय आहे हे जरांगे पाटील वाचून दाखवणार आहेत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.





