
जरांगे म्हणाले की, मराठा मराठा समाज एकत्रित आहे. मात्र अजूनही सरकारने हे गांभीर्याने घेतले नाही. आरक्षण मिळालं तरी मराठा समाजापुढं अनेक प्रश्न आहेत. तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातील एकही रस्ता वर्षांनुवर्ष खुला राहणार नाही, हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावे. मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचे वार कुठल्या दिशेने आहे हे सरकारला कळत नाही. सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल, तर सत्ता येत असते आणि जात असते. पण मराठे कायमचे आयुष्यातून राजकीय सुपडासाप करतील, असा सरकारमधील नेत्यांना जरांगे यांनी इशारा दिला आहे.





