
Maharashtra weather update: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रिय स्थितीमुळे राज्यात काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अनेक जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, सध्या राज्यावर कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. यामुळे राज्यात पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहून वातावरण कोरडे राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे १५ जानेवारी पर्यंत थंडी वाढणार असून त्यानंतर तापमानात दोन ते चार डिग्री सेल्सिअसने घट होणार आहे. यानंतर मात्र, तापमानात वाढ होणार आहे. दरम्यान, उत्तर भरातात थंडीची लाट कायम आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा





