
छत्रपती संभाजीनगरता गेल्या दोन- तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर इतका होता की, काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले. तर, काही भागात घर आणि दुकानात पाणी शिरले. घरतळात असलेली दुकान आणि गोदाममध्ये पाणी घुसले. पावसामुळे मात्र हर्सूल तलावाच्या पाण्याच्या पातळीत एकदम अडीच फुटाने वाढ झाली. त्यामुळे तलावात सोळा फूट पाणी जमा झाले. जटवाडा कडील डोंगरांमधून आणि नदीमधून हर्सूल तलावात पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे आणखी किमान एक ते दीड फूट पाणी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.







