
महाराष्ट्रातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले. तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. वाढत्या वायू प्रदूषणाने मुंबईतील नागरिकांची चिंता वाढवली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यातील रेल्वे जंक्शन, गार्डन आणि रुग्णालयात एअर फिल्टर बसवले जाणार असल्याची माहिती शिंदे गटातील नेते दिपक केसरकर यांनी दिली.







