
देशातील लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांनी देशवासियांना पत्र लिहिले आहे.
दिल्ली : देशातील लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या व सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरामध्ये निकालाबाबत उत्सुकता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का याकडे जगभरातून लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानामध्ये नरेंद्र मोदी यांची उमेदवार असलेला वाराणसी हा देखील मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे भवितव्य आज कुलूपबंद होणार आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवर देशवासियांना पत्र लिहिले आहे.
राहुल गांधी यांचे पत्र










