
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली व महिलांच्या मतांच्या जोरावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. निवडणुकीनंतर कसाबसा एक हल्ला महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. या छाननीत अनेक अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे. काही महिलांनी स्वत:हून आपले अर्ज मागे घ्यायला सुरूवात केली आहे. त्यातच अपात्र महिलांना आता योजनेचे १५०० रुपये बंद होणार असल्याची माहिती असून अशा महिलांना याआधी दिलेला ९००० हजार रुपयांचा लाभही परत घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे, यावर महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.