
लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन बनलेला अभिनेता कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस आहे. ‘भूल भुलैय्या २’च्या यशानंतर कार्तिक आर्यनचा बॉलिवूडमधील दबदबाही चांगलाच वाढला आहे. आजघडीला कार्तिक आर्यनकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. कार्तिकने आपल्या चित्रपटात काम करावे, यासाठी अनेक निर्माते वाट पाहत आहेत. मात्र, एक काळ असा होता जेव्हा ऑडिशनसाठी आलेल्या कार्तिकला निर्माते स्टुडिओ बाहेरच नकार कळवायचे. या काळात स्ट्रगल करणाऱ्या कार्तिककडे अक्षरशः स्टुडिओपर्यंत प्रवास करण्यासाठीचे पैसे देखील नव्हते.







