
कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या पाणी पुरवठा प्रश्नांसदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, २७ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.






