Jan Sanvad Yatra : काँग्रेसची तीन सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा; लोकसभेपूर्वी महाराष्ट्र पिंजून काढणार

0
113
Jan Sanvad Yatra : काँग्रेसची तीन सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा; लोकसभेपूर्वी महाराष्ट्र पिंजून काढणार


Maharashtra Congress Jan Sanvad Yatra : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातील २६ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. शिमला, बंगळुरू या शहरांनंतर मुंबईत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे.



Source link